विचारांची दिशा बदलता येते, आचारांची पद्धत बदलता येते, पण स्वतःचा स्वभाव बदलने, सगळ्यांनाच येत नाही.
तो एक क्षण....
तो एक क्षण तुझ्या प्रत्येक आठवणींचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबरच्या प्रत्येक सोबतींचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.
तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.
तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.
तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.
तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.
तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.
तो एक क्षण तो एक क्षण......
तो एक क्षण तुझ्या बरोबर मारलेल्या प्रत्येक गप्पांचा.
तो एक क्षण तुझ्या बरोबर टाकलेल्या प्रत्येक पावलांचा.
तो एक क्षण तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांचा.
तो एक क्षण तुझ्या माझ्यात झालेल्या छोट्या मोठ्या भांडणांचा.
तो एक क्षण तुझी प्रत्येकवेळेला समजूत काढताना झालेल्या दमछाकीचा.
तो एक क्षण तुझ्या प्रेमात अखंड बुडाल्यावर होत असलेल्या धाकधुकीचा.
तो एक क्षण अश्या प्रत्येक क्षणांची आठवण रोज होऊ देणाऱ्यांचा.
तो एक क्षण तो एक क्षण......
नजरेचा खेळ...
एकदा बघितल्यावर तुझ्याकडे
सारखे बघावेसे वाटते,
बघता बघता तुझा राग पाहून
नजर आपोआप खाली जाते,
माझं लक्ष्य नसताना
चोरून मलाच बघतेस,
आणि आशा या खेळiची
सुरवात मात्र तूच करतेस,
खुप काही बोलायचय
खुप कही विचारावस वाटतय,
रागाने बघताना राग, पण मग,
चोरून बघताना काय?
हेच समजावून घ्यायचय,
पण एकदा बघितल्यावर तुझ्याकडे
सारखेच बघावेसे वाटते...
मी अन् माझी स्वप्नं...
इवल्याशा डॉळयांत
आभाळाएवढी स्वप्नं घेउन..
रोज कोवळया ,ताज्या पहाटॅ उठते.,
लाल , तांबडया सूर्याला पाहून..
तेजस्वी बनण्याची एक उर्मी घेऊन..
कोवळया ऊन्हाचा तजेला घेऊन..
वार्याचा वेग अन् ढगांच बळ घेऊन..
नवीन दिवसाची सुरुवात करते..
पंख लावून उडते अवकाशात माझ्या..
फुलपाखरांच्या पंखावरल्या रंगांत मिसळून जाते..
पाण्यातल्या प्रतिबिंबात..
तरंगत राहते,
लव्हाळींचा गुंता सोडवत..
फुलांच्या पा़कळ्या कुरवाळत..
त्यांचा मऊपणा शोधत राहते..
धुक्यांच्या दुलईत..
रस्त्त्यांवारल्या आवाजांत..
चुलीच्या धुरात..
गुरफटून घेते स्वताला,
भान हरपून गाणं गाते,
आणि सांडते लोकांच्या हास्यांत..
मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलेल्या..
ओंजळीतल्या पाण्यात मिसळून जाते
अन् सागराच्या लाटांत..
हेलकावत राहते,
आकाशाने निळंभोर , चंदेरी वस्त्र पांघरल्यावर,
दमून भागून थकल्यावर..
शांतपणे रात्रीच्या कुशीत..
मऊ ढगांच्या ऊशीत,
निजून जाते..
पुन्हा नवीन स्वप्नं पाहण्यासाठी....
आभाळाएवढी स्वप्नं घेउन..
रोज कोवळया ,ताज्या पहाटॅ उठते.,
लाल , तांबडया सूर्याला पाहून..
तेजस्वी बनण्याची एक उर्मी घेऊन..
कोवळया ऊन्हाचा तजेला घेऊन..
वार्याचा वेग अन् ढगांच बळ घेऊन..
नवीन दिवसाची सुरुवात करते..
पंख लावून उडते अवकाशात माझ्या..
फुलपाखरांच्या पंखावरल्या रंगांत मिसळून जाते..
पाण्यातल्या प्रतिबिंबात..
तरंगत राहते,
लव्हाळींचा गुंता सोडवत..
फुलांच्या पा़कळ्या कुरवाळत..
त्यांचा मऊपणा शोधत राहते..
धुक्यांच्या दुलईत..
रस्त्त्यांवारल्या आवाजांत..
चुलीच्या धुरात..
गुरफटून घेते स्वताला,
भान हरपून गाणं गाते,
आणि सांडते लोकांच्या हास्यांत..
मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलेल्या..
ओंजळीतल्या पाण्यात मिसळून जाते
अन् सागराच्या लाटांत..
हेलकावत राहते,
आकाशाने निळंभोर , चंदेरी वस्त्र पांघरल्यावर,
दमून भागून थकल्यावर..
शांतपणे रात्रीच्या कुशीत..
मऊ ढगांच्या ऊशीत,
निजून जाते..
पुन्हा नवीन स्वप्नं पाहण्यासाठी....
आपल्यासारखा...
आपल्यासारखा..
फुलांचा सहवास तर सर्वांनाच हवा असतो..
फुला सारखा एखादाच असतो |
चंद्रावरची स्वप्नं तर सर्वच बघतात..
सुर्याकडे पाहून स्वप्नवेडा होणारा एखादाच असतो |
आकाश्याला गवसणी तर सर्वच घालतात..
आकाशा एवडा मोठा एखादाच असतो |
धेयाकड़े धावणारे तर सर्वच असतात..
धेय्य निर्माण करणारा एखादाच असतो |
जगा सारखे तर सर्वच असतात..
आपल्यासारखा एखादाच असतो |
फुलांचा सहवास तर सर्वांनाच हवा असतो..
फुला सारखा एखादाच असतो |
चंद्रावरची स्वप्नं तर सर्वच बघतात..
सुर्याकडे पाहून स्वप्नवेडा होणारा एखादाच असतो |
आकाश्याला गवसणी तर सर्वच घालतात..
आकाशा एवडा मोठा एखादाच असतो |
धेयाकड़े धावणारे तर सर्वच असतात..
धेय्य निर्माण करणारा एखादाच असतो |
जगा सारखे तर सर्वच असतात..
आपल्यासारखा एखादाच असतो |
-: आकर्षण म्हणजे प्रेम नसतं :-
प्रेम ही एक सदाबहार गोष्ट आहे. पिढी-दर पिढी पुन: पुन्हा नव्याने उमलणारी. कथा-कविता- नाटक- सिनेमा असे अनेक वाङ्मयप्रकार ‘प्रेम’ या विषयावर वर्षांनुवर्षे पोसले जाताहेत. तरीही प्रत्येकाला आपलं प्रेम अगदी एकमेवाद्वितीय वाटतं.
काय असतं बरं हे प्रेम? काय देतं माणसांना? प्रेमाची व्याख्या करणं खरं तर कठीण. हं, प्रेमाची लक्षणं सांगा म्हटलं, तर खूप सांगता येतील. सारखी त्याची/ तिची आठवण येणं, तो/ ती जवळ असताना हृदयाची धडधड वाढणं, कानशिलं तापणं, सतत एकत्र असावंसं वाटणं, हे नि ते.. न संपणारी यादी..
प्रेम करणं आणि करवून घेणं ही तशी नैसर्गिक गरज. त्यात वावगं काहीच नाही.
हेच प्रेम जेव्हा अधिकारी बनतं, प्रेमाच्या माणसावर अधिकार गाजवू लागतं, तिथे ‘मी’पण फार तीव्र होते आणि दुसऱ्या व्यक्तीचं माणूसपण संपवून तिला मालकीवस्तू समजली जाऊ लागते. तिथे हिंसा येते. अशा नात्यात प्रेम सोडाच, माणुसकीही नसते. का होत असेल असं? कुठे चुकतं नि फसतं सारं?
मुळात प्रेम म्हणजे काय, याचीच होते गल्लत नि मग पुढे सगळं फसत जातं.
तरुण वयात प्रेम करण्यापेक्षा प्रेम करण्याच्या/ प्रेमात असण्याच्या कल्पनेवरच प्रेम असतं. त्यामुळे प्रेम करावंसं वाटण्याच्या तीव्र इच्छेपायी युवावर्ग झटकन प्रेमात पडतो. प्रत्यक्षात प्रेमाऐवजी ते आकर्षणही असू शकतं.
ख-या प्रेमात दुसऱ्याची कदर, त्याच्या/ तिच्याबद्दलचा आदर आणि त्याच्या/ तिच्या इच्छेचा मनापासून केलेला स्वीकार असतो. मग भले तो त्याने/ तिने दिलेला नकार का असेना!
आजकाल प्रेम ही ‘करण्यापेक्षा’ ‘दाखवण्याची’ गोष्ट झाली आहे असं वाटतं. कोणी कोणासाठी काय दिलं/ किती केलं, याचे हिशेब मांडले जातात नि ते वाजवून दाखवले जातात.
प्रेम म्हणजे फक्त लाल गुलाब देणं, ‘आय लव्ह यू’ म्हणणं, ग्रीटिंग्ज/ भेटवस्तू देणं नव्हे. प्रेम म्हणजे अचानक बरसलेला पाऊस नव्हे, तर मातीत रुजलेलं आणि निगुतीनं, मशागतीने वाढवलेलं रोप असतं. मशागत जितकी मनापासून, प्रेमाचं नातं तितकंच बहरलेलं/ फुललेलं. इतक्या सुंदर नात्यात हिंसेला तर थाराच नाही. प्रेमात असायला हवं ते समजावून घेणं/ देणं, चुका मान्य करणं, पुन्हा त्या न होण्यासाठी प्रयत्न करणं. दोघांनी मिळून संपन्न होणं म्हणजे प्रेम.
यासाठी हवा संयम, विचार, मानसिक खुलेपणा नि आत्मीयता. शारीरिक आकर्षण हाही एक भाग प्रेमात आहेच. तो आपल्याला नाकारायचाही नाही. पण ‘तेवढंच’ म्हणजे प्रेम नाही.
आज प्रेम हा घासून पार गुळगुळीत झालेला शब्द झालाय. पण तरीही अनुभवासा वाटणारा. खरंतर अनुभवण्याजोगाच!
जमलं तर फुलवायचं नि सांभाळायचं असतं. जमलं नाही तर, भोसकायचं नाही. जाळायचं नाही, मारायचं नाही. हृदयात हळूच जपून ठेवायचं असतं.
काय असतं बरं हे प्रेम? काय देतं माणसांना? प्रेमाची व्याख्या करणं खरं तर कठीण. हं, प्रेमाची लक्षणं सांगा म्हटलं, तर खूप सांगता येतील. सारखी त्याची/ तिची आठवण येणं, तो/ ती जवळ असताना हृदयाची धडधड वाढणं, कानशिलं तापणं, सतत एकत्र असावंसं वाटणं, हे नि ते.. न संपणारी यादी..
प्रेम करणं आणि करवून घेणं ही तशी नैसर्गिक गरज. त्यात वावगं काहीच नाही.
हेच प्रेम जेव्हा अधिकारी बनतं, प्रेमाच्या माणसावर अधिकार गाजवू लागतं, तिथे ‘मी’पण फार तीव्र होते आणि दुसऱ्या व्यक्तीचं माणूसपण संपवून तिला मालकीवस्तू समजली जाऊ लागते. तिथे हिंसा येते. अशा नात्यात प्रेम सोडाच, माणुसकीही नसते. का होत असेल असं? कुठे चुकतं नि फसतं सारं?
मुळात प्रेम म्हणजे काय, याचीच होते गल्लत नि मग पुढे सगळं फसत जातं.
तरुण वयात प्रेम करण्यापेक्षा प्रेम करण्याच्या/ प्रेमात असण्याच्या कल्पनेवरच प्रेम असतं. त्यामुळे प्रेम करावंसं वाटण्याच्या तीव्र इच्छेपायी युवावर्ग झटकन प्रेमात पडतो. प्रत्यक्षात प्रेमाऐवजी ते आकर्षणही असू शकतं.
ख-या प्रेमात दुसऱ्याची कदर, त्याच्या/ तिच्याबद्दलचा आदर आणि त्याच्या/ तिच्या इच्छेचा मनापासून केलेला स्वीकार असतो. मग भले तो त्याने/ तिने दिलेला नकार का असेना!
आजकाल प्रेम ही ‘करण्यापेक्षा’ ‘दाखवण्याची’ गोष्ट झाली आहे असं वाटतं. कोणी कोणासाठी काय दिलं/ किती केलं, याचे हिशेब मांडले जातात नि ते वाजवून दाखवले जातात.
प्रेम म्हणजे फक्त लाल गुलाब देणं, ‘आय लव्ह यू’ म्हणणं, ग्रीटिंग्ज/ भेटवस्तू देणं नव्हे. प्रेम म्हणजे अचानक बरसलेला पाऊस नव्हे, तर मातीत रुजलेलं आणि निगुतीनं, मशागतीने वाढवलेलं रोप असतं. मशागत जितकी मनापासून, प्रेमाचं नातं तितकंच बहरलेलं/ फुललेलं. इतक्या सुंदर नात्यात हिंसेला तर थाराच नाही. प्रेमात असायला हवं ते समजावून घेणं/ देणं, चुका मान्य करणं, पुन्हा त्या न होण्यासाठी प्रयत्न करणं. दोघांनी मिळून संपन्न होणं म्हणजे प्रेम.
यासाठी हवा संयम, विचार, मानसिक खुलेपणा नि आत्मीयता. शारीरिक आकर्षण हाही एक भाग प्रेमात आहेच. तो आपल्याला नाकारायचाही नाही. पण ‘तेवढंच’ म्हणजे प्रेम नाही.
आज प्रेम हा घासून पार गुळगुळीत झालेला शब्द झालाय. पण तरीही अनुभवासा वाटणारा. खरंतर अनुभवण्याजोगाच!
जमलं तर फुलवायचं नि सांभाळायचं असतं. जमलं नाही तर, भोसकायचं नाही. जाळायचं नाही, मारायचं नाही. हृदयात हळूच जपून ठेवायचं असतं.
Subscribe to:
Comments (Atom)
-
माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती. माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता. माझ्या नात्यांच्या ...
-
कधी कधी काहीच सुचत नाही… एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात. आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार...
-
उत्तर महाराष्ट्र (खान्देश) मधील लग्नातील काही व्हिडिओस जे मी गावी गेलो असताना शूट केलेले... आमची बोली भाषा अहिराणी आणि आम्हाला जास्त आवडणार...


