खरचं छान आहे...

नातं ( रक्ताचं किंवा रुढींनुसार असो )
आपण कोणाचे तरी आहोत...

आणि

आपलं कोणीतरी आहे.....
या दोन्हीनां जपणारं " भान " आहे.

प्रेम प्रत्येक माणसाची तहान आहे.
ज्याला " नातं ' रुपी पाणी मिळत तो महान आहे.
मनापासून दिलात तर " मान " आहे

नाहीतर...

मेंदूच्या राज्यात अपमानाच रान आहे
अपेक्षा न करता जगलात तर..
सगळं खरंच छान आहे...

-----------------------------------------

जग माणंसानी भरलेले आहे....
तरी....
माणुसकी शोधावी लागते.

कदाचित म्हणूच....

देवाने " संसार " या बेढीची निर्मिती केली असावी.

जेणेकरुण.....
नाती असल्यावर माणूस माणूसकी जपेल आणि एकटा पडणार नाही.

-----------------------------------------------------

मला हे माहीत आहे की,  प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे भावविश्व असते. बदलत्या वयानुसार आणि वेळेनुसार स्वतःची स्वप्न असतात.
पण आजही ठामपणे मी स्वतःचे खरे करतो आणि स्वतःच्या मनासारखाच वागतो.
मी बरोबर असलो तरी आणि चूकीचा  असलो तरीही  .....

कारण मला माहीत आहे मी कोणाजवळ हट्ट करु शकत नाही. मग माझे हट्ट मला स्वतःला पूर्ण करता आले पाहीजेत म्हणून....
मी जे वागतो ते योग्य हा माझा ठाम विश्वास असतो.. कारण तो विश्वास मला तटस्थ उभे राहण्यासाठी मदत करतो....
कारण माझे हट्ट माझ्यासाठी योग्य असतात त्यामुळे ते पूर्ण करताना माझ्याबरोबर सारेच असतील असे नाही.
त्यामुळे मी हट्ट पूर्ण करण्यात जिंकलो तरी मी योग्य आणि हरलो तरी जिंकल्याच आत्मसुख मला माझा स्वतः वरचा विश्वासच देतो.

अर्थात .....
सर्वांनी माझ्या मनासारखेच वागले पाहीजे हा माझ्याबरोबरच्या नात्याचा नियम/ अट नाही.

पण.....
मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार यात काही शंका नाही.
" कोणीही  माझे नसले तरी.. मी सर्वाचा आहे आणि सर्वाचा असताना मला माझे रहाणे जरुरी आहे ".

फक्त अनुभवाने ..... मनोगत

जीवंत असतानाच...

https://plus.google.com/109098349145827374488
आपण जीवंत असतानाच ....

स्वतः आंनद अनुभवू शकतो

किंवा

इतरांना आनंदात पाहू शकतो

जीवनातील प्रत्येक क्षणात कोणाला तरी आंनद द्या.
तुम्हाला त्याच्या दुप्पट आनंद मिळेल.

कारण आनंद देण्यासाठी आंनदी असावे लागते. त्यामुळे दुसऱ्याला आनंद दिल्याचे समाधान तुमच्याकडे असतेच..... आणि
समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आल्यावर त्याचे अर्शिवाद ही तुम्हाला आनंदच देतात.

तुम्ही या जगात नसताना तुमच्यामुळे कोणाचे कल्याण झाले किंवा कोण आनंदी आहे याचे समाधान तुम्हाला मिळणार नाही...

म्हणून ,...

जीवंत असताना आनंदी रहा आणि प्रेम देऊन इतरांना आनंदी पहा.

----------------------------------------------------------------------------

जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.....

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत......

"मी दुनिये बरोबर लढ़ु शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांबरोबर मला 'जिंकायचे' नाही तर 'जगायचे' आहे".....

-------------------------------------------------------------------------------------------

परवाच एका बंगल्यामधून एक मढ घेऊन जाताना ७/८ लोकांना पाहील.

आज बंगल्याबाहेर बरीच गर्दी पाहीली.

अनेक ईम्पोरटेड गाड्या, नटलेली माणसं, काळे कोट घातलेले लोक...

न राहून ( माणसाच्या प्रवृत्ती प्रमाणे ) चौकशी केली....

आज काय झाले आहे ?

उत्तर ऐकून आच्छर्य वाटले....

सर्व रक्ताच्या नात्यातले आपआपल्या वकीलांसोबत ईस्टेटीमधील आपला वाटा घेण्याकरीता जमले आहेत.

---------------------------------------------------------------------------------

पैसा वाढवावा ......

त्यासाठी...

सुदृढ देह घडवावा...

राग, द्वेष, अहंकार पायी तुडवावा....

स्नेह - संबंध वाढवावा....

अस्तित्व मार्ग  निवडावा.....

--------------------------------------------------------------------------

" सत्याला मरण नाही " असे वाक्य पूर्वी  प्रचलीत होते.

आज त्यात थोडासा बदल झालाय ...

" सत्तेला मरण नाही ".

---------------------------------------------------------------------------------------

नेहमी हसत रहा....

तुमचा पैसा वाढला नाही तरी
आयुष्य नक्की वाढेल.

आयुष्य वाढले तर पैसा कमवाल , पण पैसा कमवून आयुष्य वाढवता येत नाही.

----------------------------------------------------------------------------------------

जर.....

एखाद्या महत्वकांक्षेकरीता " रण " ( युद्धमैदान ) स्विकारले असेल......

तर......

" कारण " या शब्द क्रीयेला जागा देऊ नये.

When their is resolution for the " cause "....
There is no way for "Because ",

--------------------------------------------------------------------------

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

पण...... प्रति स्वर्ग

म्हणजे अस्तित्व मार्ग.

ज्याचं नसीब आहे त्यालाच मिळतो.

----------------------------------------------------------

जी वाट देवळाकडे जाते.

ती...

तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाईल असे नाही.

---------------------------------------------------------

मी ठरवलंय !

दुसरा जन्म असेल तर.....

internet चा virus होऊन  ....

जे माणुसकी विसरुन तंत्रज्ञानाचे बळी,झाले आहेत.....

त्यांच्या system मध्ये घुसून यायचं रोज वाट लावून ....

-------------------------------------------------------------------

इथं प्रत्येकजन व्यस्त आहे.

कारण....

माणुसकी सोडून बाकी सर्व स्वस्त आहे.

म्हणूनचं....

समाधान कमी आणि पच्छाताप जास्त आहे.

------------------------------------------------------------

मी काल विचारलं मनाला....
तु का साठवतोस प्रत्येक क्षणाला ...

मन अलगद हसलं...
भलतंच आनंदात दिसलं .....

हळुच म्हणालं....

माझं अस्तित्वंच क्षणात आहे...

जिथे क्षणाला महत्त्व नाही, तिथे मनाला महत्त्व नाही....

-------------------------------------------------------------

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,

जे वाट बघतात...

अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,

जे प्रयत्न करतात...

पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात,

जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात.....!

मनोगत...