विचारांचा खेळ काही निराळाच..
मी नको असलो तरी तुमच्या विचारात ,
तुम्ही हवे आहात म्हणून माझ्या विचारात.
विचाराने विचार केला तुम्हांला विसरायचा
पण विचारांच न जुमानता तुम्ही पुन्हा माझ्या विचारात…
तूम्ही विचारून विचार मुरवला माझ्या विचारात
मी मात्र उगाचच , न विचारता तुझ्या विचारात…
कोणतीही संमती न घेता मी हैदोस घालतो तुमच्या विचारात
तुम्ही मात्र नेहमीच निरागस माझ्या विचारात…
तूम्ही हलकेच गुदगुल्या करता माझ्या विचारात
आणि मी खुदकन हसतो तुमच्या विचारात
तुम्ही खूपच हूशार, चाणाक्ष, आणि भूरळ घालणारे माझ्या विचारात
आणि मी सभ्य, सुशील, शब्दखेळात तुम्हांला अडकवणारा माझ्या विचारात…
आपल्या विचारांच्या या दुनियेत बरेच साम्य आणि विभिन्नता
तुमच्या विचारतली मी आणि माझ्या विचारातला तुम्ही यातही असेल का साम्य?
कि असेल फक्त विभिन्नता?
-------------------------------
कोडं स्वभावाचं....
कुणी सौम्य तर कुणी भयानक रागावतं,
कुणी अबोल होतं तर कुणी रुसून बसतं.
तर कुणी अगदी जुळलेल नातंच डावावर लावतं.
नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची ऐकमेकांकडून काहीं ना काही अपेक्षा असतेच.
त्यामुळे रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी अधेमधे घडत राहतातच.
कुणाला आपलं वागणं पटत नसतं,
कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो,
कुणाला आपला स्वभाव नडत असतो,
तर कुणाला निर्मळ मायेची अपेक्षा असते पण त्याची पूर्तता होत नसते,
कुणाची काही अजबच मागणी पुरी होत नसते.
ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचा लहान मोठा भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतोच.
तो आपण आपल्या परीने पूर्ण तोलण्याचा आणि पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.व्यक्तीव्यक्ती नुसार.....
-------------------------------
ट्रेनचा प्रवास...
रोजच सुरू होतो एक प्रवास नव्याने
धावपळ, गर्दी, कलकलाट
आणि त्यात अडकलेले उदास चेहरे.
माना खाली घातलेले ,
काही आपल्याच धुंदीत असलेले…
एखादा चेहरा पटकन हसतो ,
एवढ्या उदास चेहरात तो एकटाच खुलून दिसतो.
मधेच कुठेतरी जांभया देणारा कोणी ,
आळस झटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत.
काहीची चालू असते निरस बडबड ,
कोणताही निष्कर्ष न निघणारी अगदी वायफळ.
कुठेतरी एखादा पुस्तकाच्या नशेत ,
काही चेहरे जागा शोधण्याच्या दिशेत.
कुठेतरी शब्दांचे होते युद्ध ,
मिळवलेली जागा टिकवण्यासाठी.
कधी कधी नाही
रोजच सुरू असतो हा प्रवास नव्याने…
-------------------------------
स्वप्नातला सुंदर दिवस...
तारीख आणि वार आठवत नाही परंतु तो दिवस येणार हे निछ्चित !
त्या दिवसाच्या संध्याकाळी खरंच खूप बरे वाटत होतं,
सारी नाती... सार्ऱ्यांचे प्रेम अचानक सारे खरे वाटत होतं,
आजवर केलेले सारे वाद व्यर्थ केलेला मुर्खपणा वाटत होतं,
आजवर जपलेली सारी तत्वं अचानक अर्थशून्य वाटत होती,
न सांगताच सांऱ्यां अपेक्षांना पूर्णत्व आलेलं होतं,
कुणी न सावरता ही सारं दु:ख हलकं झालेलं होतं,
आयुष्यातला या एकाच दिवसानं बरचं काही दिलं होतं,
सगळे शातं होते पण.........
विशेष म्हणजे नेहमी विचारमग्न असणारा मी देखील हालचाल न करता निरागस, अचल, निर्विचार, डोळे मिटून एका जागेवर पडून होतो...
अगदी निर्विकार !
-------------------------------
स्वप्न....जगण्याची प्रेरणा !
कधीकधी स्वप्नात रमून राहतो मी... स्वप्नातच मी काय काय होत असतो...
स्वप्नातच कुठ कुठ जात असतो...स्वप्नांना बंधनं नसतात...ती मुक्त असतात...
स्वप्नांच्या आकाशात गरुड भरारी घेऊन मुक्त विहार करत बसतो मी...स्वप्न पाहणं कधी बंद करत नाही मी...
पण जगण्याला मर्यादा आहेत...काळाच्या मर्यादेत मिळालेलं मर्यादित आयुष्य आणि स्वप्नं मात्र अमर्याद...
economics मध्ये जशी limited resources आणि unlimited wants ची सांगड घालावी लागते तशीच सांगड जगण्यातही घालावी लागते.
तरीही स्वप्नं पहायची बंद करत नाही मी...एकमेकला जोडून येणारी अनंत स्वप्न....
कधीही सुरु होते हि स्वप्नांची साखळी अभिक्रिया..एखादं गाणं ऐकतानाही...
आनेवाला पल जानेवाला है ऐकताना....
"इक बार वक़्त से लम्हा गिरा कही,
वहा दास्तां हुई लम्हा कही नही"
खासकरुन या ओळी ऐकताना.....
“हो सके तो इसमे ज़िन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला है”
अस म्हणत मी प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचं स्वप्न पाहू लागतो..उद्याची पर्वा न करता आणि कालचा विचार न करता जगण्याचं स्वप्न...
ते गाणं संपेपर्यंत आणि आणि त्या गाण्याच्या मुड मध्ये मी असेपर्यंत तरी मी स्वप्नांमध्ये तसा जगत असतो...
अखंड वाळवंटात फिरून मृगजळापाशी येऊन थांबलेल्या,
अतृप्त प्रवाशासारखा आणि एखाद्या अधाशासारखा घटघट पिऊन घेतो आयुष्याच्या पेल्यात मिळालेलं...
मर्यादित जगणं अमर्याद स्वप्नांत !
-------------------------------
आज असही करून पहा...
एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा.
रोजच्यापेक्षा वेगळे एक जीवन कधी जगून पहा.
स्वत:च्या काळजीत तर नेहमीच असता..
आज एखाद्याची काळजी करून पहा.
स्वत:च्या भावनेला कुरवाळने रोजचे...
आज एखाद्याच्या मनातलं जाणून पहा.
स्वत:च्या मर्जीने नेहमीच वागता...
आज एखाद्याची मर्जीही राखून पहा.
स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादलेत सगळ्यांवर...
आज एखाद्याची अपेक्षा पूर्ण करून पहा.
भांडत वाद घातलात तत्वासाठी स्वत:च्या...
आज एखाद्याच्या तत्वाचाही मान ठेऊन पहा.
-------------------------------
तळ मनाचं...
उन्हाच्या झळीने काटोकाठ भरलेलं तळ देखील हळुवार कोरडं होतं जातं रे ...
आपल्या मनात तळ साचून असलेल्या अपेक्षांचं देखील असंच काहीस आहे.
दुर्लक्षितपणाची , दाहक झळ त्या तळ्यापर्यंत सातत्याने पोहचत राहिली कि त्याचं हि बाष्पीभवन होतं .
आणि साचलेल्या अपेक्षांचं तळ हळूच निकामी होतं जातं .
त्या तळ्याशी मग संवेदना उरत नाही. उरतो तो केवळ कोरडेपण.... अतृप्ततेचा... अपूर्णतेचा....
संयम सोडायचा नाही आपुलकीचा पाऊस पडला की मनाच तळं पुन्हा काठोकाठ भरतं !
-------------------------------
मन अस्वस्थ असताना !
एकाकी अस शांत राहून ...
सारी मनाची कवाडं बंद करून ...
सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत ,
उलट बऱ्यांचदा त्यातलं ते अंतर वाढत जाऊन,
असलेल्या त्या प्रश्नांचाच गुंता अधिकाधिक वाढत जातो.
अन त्या गुंत्यात आपण अधिकाधिक ओढले जातो.
म्हणूनच....
वेळीच विचार करा ,अंतर वाढवू देऊ नका ,असलेला गुंता सोडवा.
मन आपोआपच शांत होईल !
-------------------------------
नाते...
नाते या शब्दाचा खरा अर्थ 'व्यवहार' हाच असावा. नात्यांमध्ये ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा क्वचितच आणि अपवादात्मक दिसून येतो.
अनंत काळापासून नाते हे व्यवहारावरच अवलंबून आहे. त्यामुळेच नाती जेव्हा बदलतात, तेव्हा आपण म्हणतो, माणूस बदलला. ते खरं नव्हे...
माणूस तोच असतो, त्याच्याशी केला जाणारा, त्याच्याकडून अपेक्षित असणारा व्यवहार फिसकटतो, तेव्हा आपण म्हणतो, तो आता बदलला.
मग हे नाते आप्तेष्टांशी असो, मैत्रीचे असो, वा प्रत्यक्ष जन्मदात्यांशी…
आई-वडील मुलगा किंवा मुलगी झाल्याबरोबरच आपले निकष लावण्यास सुरूवात करतात. जर मुलगा झाला, तर उतारवयातला आधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मुलगी झाल्यावर तिच्याकडे परक्याचं धन म्हणून पाहिलं जात.
मुलगा शिकता-शिकता कमवता झाला, आर्थिक मदत करू लागला, तर मुलाने नाव काढले, असे त्याचे कौतुक होते.
मुलगी शिकली तर आपल्या पायांवर उभी राहिली तरी तीचं कौतुक क्वचितच होत.महत्वाचं म्हणजे लग्नानंतरही ती आईवडीलांची काळजी करतेच.
मात्र, तरीही जन्मापासूनच मुलांवर वशांचा दिवा हा ‘टॅग’ लागतो. ( हा दिवा वाती शिवाय पेटत नाही हे सत्य नजरअंदाज केल जातं ) त्याच्या वाट्याला कौतुक येत.
कालांतराने जो अगदी आई-वडिलांच्या आज्ञेत असतो, तो लग्नानंतर आपल्या पत्नीचा आज्ञाधारक होतो किंवा आईवडीलांना दूर करतानाही दिसून येतो.
मग रक्ताचं नाते शाश्वत असं कोणतं ?
मनोगत...
मी नको असलो तरी तुमच्या विचारात ,
तुम्ही हवे आहात म्हणून माझ्या विचारात.
विचाराने विचार केला तुम्हांला विसरायचा
पण विचारांच न जुमानता तुम्ही पुन्हा माझ्या विचारात…
तूम्ही विचारून विचार मुरवला माझ्या विचारात
मी मात्र उगाचच , न विचारता तुझ्या विचारात…
कोणतीही संमती न घेता मी हैदोस घालतो तुमच्या विचारात
तुम्ही मात्र नेहमीच निरागस माझ्या विचारात…
तूम्ही हलकेच गुदगुल्या करता माझ्या विचारात
आणि मी खुदकन हसतो तुमच्या विचारात
तुम्ही खूपच हूशार, चाणाक्ष, आणि भूरळ घालणारे माझ्या विचारात
आणि मी सभ्य, सुशील, शब्दखेळात तुम्हांला अडकवणारा माझ्या विचारात…
आपल्या विचारांच्या या दुनियेत बरेच साम्य आणि विभिन्नता
तुमच्या विचारतली मी आणि माझ्या विचारातला तुम्ही यातही असेल का साम्य?
कि असेल फक्त विभिन्नता?
-------------------------------
कोडं स्वभावाचं....
कुणी सौम्य तर कुणी भयानक रागावतं,
कुणी अबोल होतं तर कुणी रुसून बसतं.
तर कुणी अगदी जुळलेल नातंच डावावर लावतं.
नाही नाही म्हणता म्हणता प्रत्येकाची ऐकमेकांकडून काहीं ना काही अपेक्षा असतेच.
त्यामुळे रागावणं , रुसणं , ह्या सारख्या गोष्टी अधेमधे घडत राहतातच.
कुणाला आपलं वागणं पटत नसतं,
कुणाला आपला चेहरा मोहरा पसंद नसतो,
कुणाला आपला स्वभाव नडत असतो,
तर कुणाला निर्मळ मायेची अपेक्षा असते पण त्याची पूर्तता होत नसते,
कुणाची काही अजबच मागणी पुरी होत नसते.
ह्या त्या कारणास्तव अपेक्षांचा लहान मोठा भार आपल्या मनावर थोड्या अधिक प्रमाणात तरी असतोच.
तो आपण आपल्या परीने पूर्ण तोलण्याचा आणि पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.व्यक्तीव्यक्ती नुसार.....
-------------------------------
ट्रेनचा प्रवास...
रोजच सुरू होतो एक प्रवास नव्याने
धावपळ, गर्दी, कलकलाट
आणि त्यात अडकलेले उदास चेहरे.
माना खाली घातलेले ,
काही आपल्याच धुंदीत असलेले…
एखादा चेहरा पटकन हसतो ,
एवढ्या उदास चेहरात तो एकटाच खुलून दिसतो.
मधेच कुठेतरी जांभया देणारा कोणी ,
आळस झटकण्याचा अयशस्वी प्रयत्न करत.
काहीची चालू असते निरस बडबड ,
कोणताही निष्कर्ष न निघणारी अगदी वायफळ.
कुठेतरी एखादा पुस्तकाच्या नशेत ,
काही चेहरे जागा शोधण्याच्या दिशेत.
कुठेतरी शब्दांचे होते युद्ध ,
मिळवलेली जागा टिकवण्यासाठी.
कधी कधी नाही
रोजच सुरू असतो हा प्रवास नव्याने…
-------------------------------
स्वप्नातला सुंदर दिवस...
तारीख आणि वार आठवत नाही परंतु तो दिवस येणार हे निछ्चित !
त्या दिवसाच्या संध्याकाळी खरंच खूप बरे वाटत होतं,
सारी नाती... सार्ऱ्यांचे प्रेम अचानक सारे खरे वाटत होतं,
आजवर केलेले सारे वाद व्यर्थ केलेला मुर्खपणा वाटत होतं,
आजवर जपलेली सारी तत्वं अचानक अर्थशून्य वाटत होती,
न सांगताच सांऱ्यां अपेक्षांना पूर्णत्व आलेलं होतं,
कुणी न सावरता ही सारं दु:ख हलकं झालेलं होतं,
आयुष्यातला या एकाच दिवसानं बरचं काही दिलं होतं,
सगळे शातं होते पण.........
विशेष म्हणजे नेहमी विचारमग्न असणारा मी देखील हालचाल न करता निरागस, अचल, निर्विचार, डोळे मिटून एका जागेवर पडून होतो...
अगदी निर्विकार !
-------------------------------
स्वप्न....जगण्याची प्रेरणा !
कधीकधी स्वप्नात रमून राहतो मी... स्वप्नातच मी काय काय होत असतो...
स्वप्नातच कुठ कुठ जात असतो...स्वप्नांना बंधनं नसतात...ती मुक्त असतात...
स्वप्नांच्या आकाशात गरुड भरारी घेऊन मुक्त विहार करत बसतो मी...स्वप्न पाहणं कधी बंद करत नाही मी...
पण जगण्याला मर्यादा आहेत...काळाच्या मर्यादेत मिळालेलं मर्यादित आयुष्य आणि स्वप्नं मात्र अमर्याद...
economics मध्ये जशी limited resources आणि unlimited wants ची सांगड घालावी लागते तशीच सांगड जगण्यातही घालावी लागते.
तरीही स्वप्नं पहायची बंद करत नाही मी...एकमेकला जोडून येणारी अनंत स्वप्न....
कधीही सुरु होते हि स्वप्नांची साखळी अभिक्रिया..एखादं गाणं ऐकतानाही...
आनेवाला पल जानेवाला है ऐकताना....
"इक बार वक़्त से लम्हा गिरा कही,
वहा दास्तां हुई लम्हा कही नही"
खासकरुन या ओळी ऐकताना.....
“हो सके तो इसमे ज़िन्दगी बिता दो,
पल जो ये जानेवाला है”
अस म्हणत मी प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचं स्वप्न पाहू लागतो..उद्याची पर्वा न करता आणि कालचा विचार न करता जगण्याचं स्वप्न...
ते गाणं संपेपर्यंत आणि आणि त्या गाण्याच्या मुड मध्ये मी असेपर्यंत तरी मी स्वप्नांमध्ये तसा जगत असतो...
अखंड वाळवंटात फिरून मृगजळापाशी येऊन थांबलेल्या,
अतृप्त प्रवाशासारखा आणि एखाद्या अधाशासारखा घटघट पिऊन घेतो आयुष्याच्या पेल्यात मिळालेलं...
मर्यादित जगणं अमर्याद स्वप्नांत !
-------------------------------
आज असही करून पहा...
एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा.
रोजच्यापेक्षा वेगळे एक जीवन कधी जगून पहा.
स्वत:च्या काळजीत तर नेहमीच असता..
आज एखाद्याची काळजी करून पहा.
स्वत:च्या भावनेला कुरवाळने रोजचे...
आज एखाद्याच्या मनातलं जाणून पहा.
स्वत:च्या मर्जीने नेहमीच वागता...
आज एखाद्याची मर्जीही राखून पहा.
स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादलेत सगळ्यांवर...
आज एखाद्याची अपेक्षा पूर्ण करून पहा.
भांडत वाद घातलात तत्वासाठी स्वत:च्या...
आज एखाद्याच्या तत्वाचाही मान ठेऊन पहा.
-------------------------------
तळ मनाचं...
उन्हाच्या झळीने काटोकाठ भरलेलं तळ देखील हळुवार कोरडं होतं जातं रे ...
आपल्या मनात तळ साचून असलेल्या अपेक्षांचं देखील असंच काहीस आहे.
दुर्लक्षितपणाची , दाहक झळ त्या तळ्यापर्यंत सातत्याने पोहचत राहिली कि त्याचं हि बाष्पीभवन होतं .
आणि साचलेल्या अपेक्षांचं तळ हळूच निकामी होतं जातं .
त्या तळ्याशी मग संवेदना उरत नाही. उरतो तो केवळ कोरडेपण.... अतृप्ततेचा... अपूर्णतेचा....
संयम सोडायचा नाही आपुलकीचा पाऊस पडला की मनाच तळं पुन्हा काठोकाठ भरतं !
-------------------------------
मन अस्वस्थ असताना !
एकाकी अस शांत राहून ...
सारी मनाची कवाडं बंद करून ...
सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत ,
उलट बऱ्यांचदा त्यातलं ते अंतर वाढत जाऊन,
असलेल्या त्या प्रश्नांचाच गुंता अधिकाधिक वाढत जातो.
अन त्या गुंत्यात आपण अधिकाधिक ओढले जातो.
म्हणूनच....
वेळीच विचार करा ,अंतर वाढवू देऊ नका ,असलेला गुंता सोडवा.
मन आपोआपच शांत होईल !
-------------------------------
नाते...
नाते या शब्दाचा खरा अर्थ 'व्यवहार' हाच असावा. नात्यांमध्ये ओलावा, आपलेपणा, जिव्हाळा क्वचितच आणि अपवादात्मक दिसून येतो.
अनंत काळापासून नाते हे व्यवहारावरच अवलंबून आहे. त्यामुळेच नाती जेव्हा बदलतात, तेव्हा आपण म्हणतो, माणूस बदलला. ते खरं नव्हे...
माणूस तोच असतो, त्याच्याशी केला जाणारा, त्याच्याकडून अपेक्षित असणारा व्यवहार फिसकटतो, तेव्हा आपण म्हणतो, तो आता बदलला.
मग हे नाते आप्तेष्टांशी असो, मैत्रीचे असो, वा प्रत्यक्ष जन्मदात्यांशी…
आई-वडील मुलगा किंवा मुलगी झाल्याबरोबरच आपले निकष लावण्यास सुरूवात करतात. जर मुलगा झाला, तर उतारवयातला आधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मुलगी झाल्यावर तिच्याकडे परक्याचं धन म्हणून पाहिलं जात.
मुलगा शिकता-शिकता कमवता झाला, आर्थिक मदत करू लागला, तर मुलाने नाव काढले, असे त्याचे कौतुक होते.
मुलगी शिकली तर आपल्या पायांवर उभी राहिली तरी तीचं कौतुक क्वचितच होत.महत्वाचं म्हणजे लग्नानंतरही ती आईवडीलांची काळजी करतेच.
मात्र, तरीही जन्मापासूनच मुलांवर वशांचा दिवा हा ‘टॅग’ लागतो. ( हा दिवा वाती शिवाय पेटत नाही हे सत्य नजरअंदाज केल जातं ) त्याच्या वाट्याला कौतुक येत.
कालांतराने जो अगदी आई-वडिलांच्या आज्ञेत असतो, तो लग्नानंतर आपल्या पत्नीचा आज्ञाधारक होतो किंवा आईवडीलांना दूर करतानाही दिसून येतो.
मग रक्ताचं नाते शाश्वत असं कोणतं ?
मनोगत...
