विचारांची दिशा बदलता येते, आचारांची पद्धत बदलता येते, पण स्वतःचा स्वभाव बदलने, सगळ्यांनाच येत नाही.
चढ - उतार...
माणसांच्या विचारांचा दोष की स्वभावाचा...जेव्हा,
माणसांच्या विचारांचा दोष की स्वभावाचा...जेव्हा,
काहींना मी भाषानिक वाटतो...
काहींना शोषनिक ही !
काहींना मी विचारांचा व्यसनिक वाटतो...
काहींना भावनांचा वासनिक ही !
काहींना मी अहंकारक वाटतो...
काहींना सहांरक ही !
काहींना मी गैरसोय वाटतो...
काहींना मी सोय ही !
काहींना मी अहीतदर्शक वाटतो...
काहींना आकर्षक ही !
काहींना मी व्यापारी वाटतो...
काहींना व्यवहारी ही !
काहींना मी पहिला वाटतो...
काहींना शेवटचा ही !
काहींना मी अगम्य वाटतो...
काहींना दुर्गम्य ही !
काहींना मी सहज वाटतो...
काहींना नेहमीच कठीण ही !
काहींना मी असाही वाटतो...
काहींना तसा ही !
मी फक्त मला वाटून देत नाही, कारण कोणाला काहीही वाटायला मी प्रदर्शनातली वस्तू नाही.
----------------------------------------
जेव्हा मनाचा मेळ नसतो....
तेव्हाच नात्याचा खेळ असतो...
जेव्हा पर्याय ठेवण्याची मनात भेळ असते...
तेव्हा जाणीवेने वागायला माणसाला वेळ नसते...
---------------------------------------------------
जे करता येत नाही ते बोलत बसू नये...
जे करता येते ते बोलण्याची गरज भासू नये.
जे करायचचं असेल तिथे आमंत्रणाची वाट बघत बसू नये.
जे करून झालयं त्यावर चर्चा करून वेळ वाया घालवू नये.
जे करणं जरूरीचे आहे ते करायला उगाच वेळ वाढवू नये.
---------------------------------------------------
माणसाचा स्वभाव seasonal झालाय...
कधीतरी एकदाच भावनांचा ( मोहर ) बहरतो...
त्यांनतर अल्पकाळ टिकणारी स्वप्न ( फुले ) आणि अपेक्षा ( फळे ) वाढतात...
कालांतराने या हा मोहर , फुले आणि फळे निखळून जातात.
जमिन मात्र गळून पडलेल्या फळांना पुन्हा आपल्या कुशीत घेऊन गर्भात रूजवते.
-----------------------------------------------------
अनेकांना निंदा करणाऱ्याचा राग येतो, प्रशंसा करणारे हवेहवेसे वाटतात.
खरतर...
आपल्यात जे नाहीच ते वाढवून सांगणारा प्रशंसक असतो.
जे खरं आहे आणि निच्छीत आहे त्याला प्रशंसेची आवश्यकता भासत नाही.
( सुर्य असतो का कधी प्रशंसेचा भुकेला ? )
खरी असो वा खोटी, स्वत:ची प्रशंसा अनेकांना आवडते.
प्रशंसेचे भुकेले नाहीत असे...अपवादात्मक !
बऱ्याचदा हिच प्रशंसा अहंकाराला पोशक असते.
अहंकार मोठा झाला की माणसाला छोटे करतोच.
क्षणातलं - मनातलं...
पुन्हा एक एल्गार होणं जरूरीचा आहे...
-
माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती. माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता. माझ्या नात्यांच्या ...
-
कधी कधी काहीच सुचत नाही… एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात. आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार...
-
उत्तर महाराष्ट्र (खान्देश) मधील लग्नातील काही व्हिडिओस जे मी गावी गेलो असताना शूट केलेले... आमची बोली भाषा अहिराणी आणि आम्हाला जास्त आवडणार...