मन अपंग झालं की...

मन अपंग झालं की...
माणसं सहज अंग काढतात.

त्यामुळे ....

शरीर अपंग झालं तरी ....
मन कधी अपंग होऊ देऊ नका.

मनाचे अपंगत्व म्हणजे लाचारी ज्यामध्ये माणसाला किंमत नसते.
-------------------------------------------


वेळेने एकदा विचारले......

तू नेहमी सांगतोस तुझी काळजी करणारी आणि तुझ्या मनात असलेली काही माणसंआहेत.....

कळू दे तरी मला एखाद्याबद्दल ...

मी... हसतच उत्तर दिले.

हा मेसेज वाचणार्या माणसालाच विचार.... माझ्याबद्दल.
-------------------------------------------

अपेक्षाच्या बीज
भावनेच्या पाण्याने मोड धरते...

म्हणूनच भावनांच्या पावसाला
अपेक्षाच्या शेतात पडू देऊ नये.

जर बीज रुजलेच
तर वेळीच त्याचा मोडून खूडुन टाका.

जेणे करुन दुखाःचे कुरण वाढणार नाही....
-------------------------------------------

नक्की कशासाठी.....

कोणी अमाप पैसा कमवायला धडपडत आहे.

तर

कोणी भरपूर सोने संप्पती जमवायला धडपडत आहे.

यातलं काहीच लागत नाही मनाच्या समाधानासाठी....
मग हे सर्व नक्की कशासाठी ?
-------------------------------------------

माणसाला माणूस का बनता येत नाही....

लोह वितळून हत्यार बनते.....

सोने वितळून अलंकार बनते.....

बाष्प वितळून जीवन बनते.....

पण आज....

माणसाचे मन वितळून माणूसकी बनने कठीन झाले आहे.
-------------------------------------------

माणूस हरवलाय.....

साधनांच्या बाजारात भोगवादी झालायं.....
माणूस हरवलाय.

सारंकाही तो आता पैशात मोजू लागलाय.....
माणूस हरवलाय.

शरीर नटवण्यात तो मनात विस्कटलाय....
माणूस हरवलाय.

बँकेचे खाते भरताना तो नाते विसरलाय....
माणूस हरवलाय.
-------------------------------------------

कधी तरी....

सगळेच नेहामी आपल्या मनासारखे असेल.... असे नसते.
योग्य असला तुम्ही जरी .....वेळ नसेल तुमच्या बरोबर.....
कधी तरी.

रोजच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात... आणि जातात.
तसेच सगळे असले आपल्या सोबत आज जरी...सोईने वेगळे होतील ते ..
कधी तरी.
-------------------------------------------

माणसाला जाणीव असावी...

आपल्या आयुष्यातील उणीव ....
कोणीतरी नकळत भरुन काढावी.
अनपेक्षित काळजीची...
माणसाला जाणीव असावी.

आपल्यावर केलेलं निरागस प्रेम ...
रक्तातील किंवा जोडलेल्या नात्याचे.
त्यातील शुद्ध भावनेची....
माणसाला जाणीव असावी.
-------------------------------------------


कधी कधी वाटते मला.....

काळजी करणे नसते माणसाच्या स्वभावात,
ते लादले आहे नातेरुपी नियमाने..
रक्ताची नाती असतात जन्मजात,
अन् लग्नाची बेडी बांधली देवाने....

कधी कधी वाटते मला.......
बांधून ठेवतात माणसाला फक्त  समाजाची  नितिमुल्य,
खरंतर...
आईच्या गर्भाची नाळ एकच पविञ,
त्यानंतर बांधते माणसाला मंगळसूञ.

कधी कधी वाटते मला......
नाती म्हणजे फक्त सोय वाटते,
कारण ........
माणसाला एकटेपणाचं भय वाटते.

कधी कधी वाटते मला.....
प्रत्यक्षात माणूस असतो सुरक्षित फक्त .....
जन्माआधी आईच्या गर्भात आणि मृत्यूनंतर जमिनीच्या गर्भात.
-----------------------------------------------------------------------

शपथ आणि आश्वासन ......

भावनेने घेतली जाते ती शपथ
अन्......
विचार करुन दिले जाते आश्वासन.

शपथ कदाचित शुद्ध असायची ...
म्हणूनच माणसं ... आई किंवा देवा शपथ म्हणतात.
शपथेत फसवणूक नसायची.

आश्वासन हे अर्थात promise ...
हे miss करण्यासाठीच असते.
म्हणूनच त्याची शाश्वती नसते.

पण.....
आजकाल माणसं दोन्हीही सहज तोडतात. त्यामुळेच शपथ आणि आश्वासन यात नाती टिकत नाहीत.

माणसानं विसरु नये शपथ आणि आश्वासन जनावरं देत नाहीत.

म्हणूनच... ती माणसांसारखी कोणाची फसवणूक करत नाहीत.
मनोगत.......

सगळ्यांनाच येत नाही.....

शब्द लिहिणे सोपे ,
शब्द वाचने सोपे ,
पण दिलेला शब्द पाळणे
सगळ्यांनाच येत नाही.

एखाद्याला स्वीकारणे सोपे ,
एखाद्याला नाकारणे सोपे ,
पण एखाद्याशी एकनिष्ठतेने राहणे
सगळ्यांनाच येत नाही.

कधीकधी सहज असते हसवने ,
कधीकधी सहज असते रडवने ,
पण एखाद्याचं आयुष्य घडवने
सगळ्यांनाच येत नाही.

विचारांची दिशा बदलता येते ,
आचारांची पद्धत बदलता येते ,
पण स्वतःचा स्वभाव बदलने
सगळ्यांनाच येत नाही.

निर्णय देणे शक्य असते ,
निर्णय घेणे शक्य असते ,
झालेल्या निर्णयाला सहज स्विकारणे
सगळ्यांनाच येत नाही.

पळून जाणे कोणालाही येतं ,
लपून राहणे कोणालाही येतं ,
पण तटस्थपणे सामोरे जाणं
सगळ्यांनाच येत नाही.
------------------------------------

फाँर्वड प्रेम....

काय म्हणे तर आम्ही प्रेम करतो एकमेकांवर ....

साला सगळं काही उदारीवर,
आईबापाच्या कमाईवर.
काय म्हणे तर.....

आत्मिक तर नसतच,
सर्वकाही शरीराच्या देखाव्यावर.
काय म्हणे तर.....

थोरा-मोठ्याचं भान सोडून,
प्रदर्शन भर रस्त्यावर.
काय म्हणे तर.....

भावनांचा अश्लील बाजार,
आवर नाही मनावर.
काय म्हणे तर .......

आजकाल प्रेम ....प्रेम नाही व्यसन झालायं.....
एकानं केली  कि दुसऱ्यांनी करायची अशी फँशन झालयं.
--------------------------------------------------------

कधीतरी आपणही !

एकदा मनापासून पहावं रुसून.....
कोणीतरी समजून घेतयं का आपल्याला जवळ बसून.

कधीतरी आपणही
एकटच रहावं.....
कोणीतरी न बोलवताही सोबत करतयं का पहावं.

कधीतरी आपणही
सारे बंध तोडून जगावं....
आपल्या मनाला वाटेल तसे बिनधास्त रहावं.

कधीतरी आपणही
कोणाचं तरी व्हावं....
त्यानं न मागता ही त्याला मनभरुन सुख द्यावं.
----------------------------------------------

भेटलाच जर देव कुठे तर विचारेन....

पुन्हा एकदा मिळेल का लहानपन ?

खरंच किती छान होतं आईला घट्ट मिठी मारून राहनं...
आता क्वचितच होत तिला पाहनं.
आठवण आली तीची की ...
भरुन येत मन.

भेटलाच जर देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.

लहानपणीची मैञी म्हणजे फक्त मजा..
अभ्यास असला तरी येई उन्हाळी रजा...
जबाबदारी काहीच नाही ....
सारे आनंदाचे क्षण....

भेटलाच देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.

मनात येईल ते हट्ट करुन मागावं..
आपण नकळत झोपलो की कुणीतरी अंगावर टाकावं..
सर्दी झाली... ठेच लागली तरी....
काळजी घेतो प्रत्येकजन..

भेटलाच  देव कुठे तर विचारेन...
पुन्हा एकदा मिळेल का लहानपन.
-------------------------------------

नात्याला नाव नसावे.....

सांगत असते "नाते"
नाव नाही मला...... ना...हे....ना...ते
जे तुम्हाला वाटते.....
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

नात्याला नाव दिले की....
लोक त्याला नाव ठेवायला लागतात.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

झाड आणि सूर्याच्या नात्याला ...
अग्नी आणि हवेच्या नात्याला....
पाणी आणि जमिनीच्या नात्याला...
नाव नाही तरी ही नाती पवित्र आहेत.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

मन दिसत नाही म्हणून ते पविञ आहे....त्यात परमेश्वर आहे.
नाते मनातून जोडलेले असेल तर ते इतर कोणालाही न दिसलेले बरे असते.
लोकांच्या नजरा नात्याला लगेचच लागतात..... त्यामुळे
नाते मनात जपून पविञ ठेवावे.
म्हणूनच नात्याला नाव नसावे.

मनोगत......😊