का कळत नाही कधीकधी मनाला ?

अंथरूण पाहून पाय पसरावे...
दुखाःचे दिवस आठवणीत ठेवावे अन् सुखाचे दिवस विसरावे.
विसरावे अन् लक्षात ठेवावे कोणाला..
का कळत नाही कधीकधी मनाला ?

दिसतं तस नेहमीच नसतं.....
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा , का रे भुललासी वरीलीया अंगा.
नेहमी भूलुन जाऊ नये रंगा....
विसरु नये कधी आपल्या माणसाला..
का कळत नाही कधीकधी मनाला.
-----------------------------------------------

तर....

सगळं काही सहज असतं तर.....
प्रत्येक प्रश्नाला असलं असतं उत्तर.

सगळं काही सहज असतं तर....
प्रत्येकाने गाठले असते यशोशिखर.

सगळं काही सहज असतं तर....
मासे उडू शकले असते असून पर.

सगळं काही सहज असतं तर....
सर्वानाच मिळाला असता इच्छा पूर्तीचा वर.

सगळं काही सहज असतं तर....
जन्माला असता इथं मादी विना नर.

सगळं काही सहज असतं तर....
-----------------------------------

'वाद'आणि 'चर्चा' यात 'फरक' काय..?

वादातून  'भांडणं'  होतात;
चर्चेतून 'गोष्टी स्पष्ट' होतात.

वाद "अहंकार आणि  संकुचित  मनातून" होतो;
तर चर्चा 'मोकळ्या मनातून' होते.....

वादात 'अज्ञानाची देवाणघेवाण' होते,
तर चर्चेत 'ज्ञानाची देवाणघेवाण''होते.

वाद ही 'रागाची अभिव्यक्ती'आहे;
तर 'चर्चा'ही'तर्काची अभिव्यक्ती'आहे...

'' वादातून कोण बरोबर हे "सिध्द  करण्याचा प्रयत्न होतो"
तर 'चर्चेतून'काय "बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो

वाद "निरर्थकच" असतो..

"वादा"पेक्षा 'चर्चेने' आणि 'चर्चे' पेक्षा,
"संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात
-----------------------------------------

 बाकी सर्व ठीक आहे....

चेहऱ्यावर प्रेमाचे भाव अन् मनात काळा डाव....
असा नात्याचां सध्या व्यवहार आहे.
बाकी सर्व ठीकआहे.

कोणाच्या तरी समाधानासाठी अन् मन मारुन रहायाचे त्याच्यासाठी...
अशी जगण्याची रीत आहे.
बाकी सर्व ठीक आहे.

माणूस माणसाशी बोलेना अन् पावालो पावली करतोय तूलना...
माझंच नसीब फाटक आहे.
बाकी सर्व ठीक आहे.
--------------------------------------------

मी म्हटलं ....मस्त आहे .

ती त्या दिवशी त्याच्याकडे हट्ट करुन बसली.... तो म्हणाला जा मग.
दुसऱ्या दिवशी ती दुसऱ्या बरोबर दिसली.
आयला ... प्रेम एवढं स्वस्त आहे.
मी म्हटलं ...... मस्त आहे.

कालच बस स्टाँपवर एका  जोडप्याचं भांडण पाहील...
रागानं तीनं मंगळसूञ काढून त्याच्या तोंडावर मारलं.
साँलीड यार...लग्न एवढं स्वस्त आहे.
मी म्हटलं ..... मस्त आहे.

सकाळीच सगळीकडे कूजबुज सुरु होती.राञीच सासू - सूनेचं म्हणे भांडण झालं होतं.
अन् मुलानं आईचचं म्हणनं ऐकलं ..
म्हणून बायकोनं विष प्यालं.
आईशप्पथ असा....वाया घालवण्या इतका जन्म स्वस्त आहे....
मी म्हटलं ...... मस्त आहे.
-----------------------------------------------------------------------

वेळ ....

वेळ.......हळूवार असते.
जेव्हा तुम्ही वाट पाहत असता.

वेळ.......जलद असते.
जेव्हा तुम्हाला उशीर झालेला असतो.

वेळ.......ञासदायक असते.
जेव्हा तुम्ही दुःखी असता.

वेळ....कमी असते.
जेव्हा तुम्ही आनंदी असता.

वेळ.... जास्त असते.
जेव्हा तुम्ही कंटाळलेले असता.

खरंतर.......
प्रत्येक वेळी ...... वेळ तुम्ही तुमच्या भावना आणि मानसिकता यानुसार तुमच्या सोयीने ठरवता.

वेळ बदलत नाही... माणसं बदलतात

मनोगत.......😊

No comments:

Post a Comment