माझ्या मनातील विचार...

* मला क्षणात बदलत येत नाही, आणि...मनात तर जराही बदलता येत नाही.
* मला तर्क जरी लावायला आवडले, तरी....बेतर्क विचार करायला आवडत नाही.
* विचार करायला आवडते...पण....अविचारी वागायला आवडत नाही.
* मानात नाही ठेवलं कोणी...तरी...मनात राहणं नेहमी आवडत मला.
* कोणाच्याही आयुष्यात माझी कमी नसावी ......पण....पण जिथे कमी तिथे आम्ही याची हमी असावी.
* असं नाही की मी सर्वांमध्ये रमत नाही....खरंतर.....मला आपल्यांशिवाय कोणाबरोबर जमत नाही.
* तुम्ही आनंदानं मस्त बोलणं हेच माझं समाधान आहे....नाहीतर....आजकाल दुखः स्वस्त झालयं अन् संशयाला उधान आलं आहे.
* असचं सारं आयुष्य तुमच्या सावलीत असावं....अन् ....प्रत्येकाचं भविष्य अस्तित्व मार्ग माऊलीत असावं
* जन्माला येऊन माणसानं एक करावं.....एखाद्याच्या जीवनात आठवणीत तरी उरावं.
* प्रत्येकाचं स्वतंत्र मन असतं....त्यामुळे.... आपल्या मनासारखे इतरांनी वागावं हा विचार गौण आहे.
* उधळुन दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं.....कळू दे मला दुःख तुझ्या काळजामध्ये टोचलेलं.......
* कोणाला तरी सावरने फार सोपे असते....अवघड असते... स्वतःला सावरने, कारण....स्वतःला सावरताना आधार कोणाचाच नसतो.
--------------------------------------------------------------------------------------------

अंतर .....

दोन माणसं जोडतं आणि दोन माणसं तोडतं....
मनामध्ये आलेलं अंतर.....

एका जीवाला निर्माण करतं आणि दोन जीवांना वेगळं करत.....
बाईच्या बाळंतपणाच अंतर....

सृष्टीला निरंतर सहज आणि अलगद खेळवत असतं....
दिवस राञी मधलं अंतर.......

स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूला नवी उमेद आणि आव्हान देत असतं....
विजय - पराजयातील अंतर......

जीवनाच्या प्रत्येक क्षणात आणि श्वासात ही असतं......
आत्मविश्वास अन् जिद्दीचे अंतर....

कधीच म्हणू नका..... नंतर...
कारण नंतर म्हणजे आपण जाणीवपूर्वक निर्माण केलेलं अंतर.
-------------------------------------------------------------

यातच त्यांचं महत्त्व कळतं.....

भावनांना मोजण्याचं परिमाण नाही,
मनातून ज्यांचा जन्म होतो,
अन् नात्याला नावं मिळतं,
यातच त्यांचं महत्त्व कळत.

आग , वारा आणि पाणी यांना मुक्त अवस्थेत मोजता येत नाही,
या शक्तींचे रूप म्हणजेच सृष्टी,
यांच्यावर जीवन आधारलेलं आहे,
यातच त्यांचं महत्त्व कळतं.

माणसानं अवकाश जिंकलं पण तिथं त्याला राज्य नाही करता आलं,
फक्त पृथ्वीवर वातावरण आहे,
आँक्सीजन हे सत्व फक्त हवेतच मिळतं,
यातच त्याच महत्त्व कळतं.

शरीरातील ह्दयदेखील कृत्रिम बनवलं,
पण नसानसात वाहणार रक्त नाही निर्माण करता आलं,
रक्त म्हणजे एकमाञ रहस्य आहे,
ते फक्त शरीरातंचं मिळतं,
यातच त्याच महत्व कळतं.
----------------------------------------------

जो जीव जन्माला येतो.....
तो मरेपर्यंत जगतोच.

सर्व जीवांमध्ये फक्त माणूसच...
स्वतःला निसर्गतः स्विकारत नाही.

सर्व जीव निसर्ग आणि वेळ...
यांच्या शृंगाराने नटतात.

फक्त माणूसच....
क्षणभंगूर नकली शृंगाराने स्वतःला नटवत असतो.
पण.. वेळ तो ही उतरवते.

माणसानं शरीर नटवण्यापेक्षा...
मनरुपी गाभारा सजवावा.
" वेळ " तेथे विश्रांती घेईल ...
अन् सैदव तुम्हाला साथ देईल.

मनोगत.......

1 comment: