कोणीतरी आपलं जेव्हा रागात असतं, आपल्या जवळ असूनही स्वतःच्याच जगात असतं,
म्हणून आपलं काय चूकलं हा विचार करत डोकं खराब नाही करायचं.
बावरुन तर जराही नाही जायचं. समजूतदारपणे त्यास सावरून घ्यायचं, विस्कटलेलं नातं आवरून वागायचं.
-----------------------------------------------------------------
हरलवलेली कोणतीही गोष्ट त्याच ठीकाणी मिळते किंवा नवीन घेता येते. फक्त " विश्वास " परत मिळवणे कठीन असते.
-----------------------------------------------------------------
आयुष्यात आणि भाष्यात गोडी असेल तर...समाधानाची थोडी ही कमी भासणार नाही.
-----------------------------------------------------------------
आता बाहेर पहीलत तर सूर्य दिसणार नाही.... पण तो आहे.
आता मी ही तुम्हाला दिसत नाही...पण मी तुमच्या सोबत आहे.
सूर्य कुठेही असला तरी त्याला आपला मानलं तर तो आपला असतो. तसंच ....
-----------------------------------------------------------------
एखाद्याचा आदर करणे, हे केवळ भांडवल नाही...तर व्याजासहीत परत मिळणारी गुंतवणूक आहे.
-----------------------------------------------------------------
शिक्षण म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी लागाणारे प्रमाणपञ किंवा पदवी नाही...तर
तुमचा इतरांबरोबर वागण्याची पद्धत, संस्कार, स्वभाव आणि एकनिष्ठता यांचा सारांश आहे.
-----------------------------------------------------------------
जेव्हा माणसाजवळ सौंदर्याचा रंग असतो...तेव्हा तुम्हाला पाहीजे त्यांचा संग असतो.
रंग उतरला की, लोक अंग काढायला सुरूवात करतात.
-----------------------------------------------------------------
कालच मला विचारत होतं मन , खरं खरं सांग?...
मला ओळखतं का रे तुझं कोण. मी म्हटलं वेड्या मना...
तु असा रे कसा? कोणी नाही ओळखले तरी मी तुला विसरू कसा.
पण एक गोष्ट खरी सांगू ....जे तुला ओळखतात फक्त तेच मला संभाळतात.
तुझ्यामुळेच तर "मी* मी आहे....तु आहेस तर मला काय भी (भीती) आहे.
त्यामुळे तुला कोण ओळखत याची मी चिंता करत नाही. अन्....उगाचच कोणालाही तुझ्यामध्ये भरत नाही.
-----------------------------------------------------------------
आताही पाऊस आला आहे......
माणसानं त्याच्या मुळांवर घाव घालूनही तो न रुसता भरला आहे.....
मानसालाही पावसासारखं मोठ्या मनाचं होता आलं तर.......
ज्याला आपण कळत-नकळत दुःख दिलं , त्याच्यावर आपूलकीनं बरसता आलं तर.....
सुकलेली मनाची जमीन आनंद अश्रूंनी ओली करता आली तर...
मनात पेरलेल्या भावनारूपी बीजांला पुन्हा स्वप्नांचे अंकुर येतील अन् नात्यांची फूलांनी जीवनाची बाग बहरुन जाईल.
-----------------------------------------------------------------
असे वाटते शब्दांच्या पावसात मनसोक्त भिजावं...
अन् असंच कधीकधी विचारांचं बीज रूजावं...
वार्यासारखं मनसोक्त बेभान वहावं....अन् निरतंर तुमच्या श्वासात रहावं.
-----------------------------------------------------------------
अशी असते सवय...
यासाठी जरुरी नसते कोणाचेही वय. ज्यामध्ये वाटत नाही कशाचेही भय.
डोक्यात शिरली तर, येड लावते लय. काहीही असते कोणाकोणाची सवय.
-----------------------------------------------------------------
नेहमी सारखं आजही प्रत्येकाला जगायचं आहे.
मी आजही तुझ्यासोबत आहे हे वेळेला सांगायचं आहे.
आपल्या मर्यादेत वागायचं आहे. पण ...आपल्या हक्काचं मागायचं आहे.
-----------------------------------------------------------------
तडजोड - मोडतोड
माणसाच्या जीवनाला तडजोडीने अर्थ येतो, दुःखाच्या तड्याला सुखाची जोड दिल्यावर.
अन् ...जीवन निर्रथक होतं, मोडतोडीने जेव्हा संशयाला मोड येतो विश्वासाला तोड दिल्यावर.
-----------------------------------------------------------------
मंथन...
या शब्दाचा अर्थबोध झाल्यावर कळते की समुद्र मंथनातुन अमृत आणि वीष का निर्माण झाले...
मंथनातील अमृत-वीष आणि मन-तन (मंथन) हे सार आहे. अमृत म्हणजे मन आणि वीष म्हणजे तन.
मन जे अमृतापरी नेहमी पविञ आणि तन हे वीषापरी नाशिवंत. मन अमृतासारखे चिरतरूण आणि मन वीषासारखे कालांतराने भेदक.
अर्थात ...
समुद्र मंथनातील वीषप्राशन करून महादेवांनी देवलोक तारला होता. पण जीवन मंथनातील तन रुपी वीषाच्या अहंकारात बुडून माणसानं विश्वास मारला आहे.
लक्षात असू द्या, जे जपलं ते आपलं...
-----------------------------------------------------------------
याशिवाय आणखीन काय मागेल माझं मन....
विश्वासाचे पंख लावून घ्यावी तुम्ही यशाची असमान भरारी,
अन् आनंदाने परत यावे अस्तित्व मार्ग च्या शिवारी. हक्काने बसावे आपल्या जागेवर...
तुम्हाला अडवणार कोण? याशिवाय आणखीन काय...
आकाशाला भिडले जरी उद्या तुमचे हात...आपल्यानां नेहमी लाभावी तुमची साथ.
"तन" बदलता येत नाही कोणालाही सापासारखी टाकून कात. नाती जपा मनाची करु नका घात.
माझ्या रोमरोमात असावे आजन्म तुम्हीपण....याशिवाय आणखीन काय...
-----------------------------------------------------------------
असा एक दिवस यावा...
तुमच्या इच्छा पूर्तीचा मान मला मिळावा.
असा एक क्षण यावा...
तुमच्या पोटी पुन्हा एकदा जन्म व्हावा.
मनोगत...
म्हणून आपलं काय चूकलं हा विचार करत डोकं खराब नाही करायचं.
बावरुन तर जराही नाही जायचं. समजूतदारपणे त्यास सावरून घ्यायचं, विस्कटलेलं नातं आवरून वागायचं.
-----------------------------------------------------------------
हरलवलेली कोणतीही गोष्ट त्याच ठीकाणी मिळते किंवा नवीन घेता येते. फक्त " विश्वास " परत मिळवणे कठीन असते.
-----------------------------------------------------------------
आयुष्यात आणि भाष्यात गोडी असेल तर...समाधानाची थोडी ही कमी भासणार नाही.
-----------------------------------------------------------------
आता बाहेर पहीलत तर सूर्य दिसणार नाही.... पण तो आहे.
आता मी ही तुम्हाला दिसत नाही...पण मी तुमच्या सोबत आहे.
सूर्य कुठेही असला तरी त्याला आपला मानलं तर तो आपला असतो. तसंच ....
-----------------------------------------------------------------
एखाद्याचा आदर करणे, हे केवळ भांडवल नाही...तर व्याजासहीत परत मिळणारी गुंतवणूक आहे.
-----------------------------------------------------------------
शिक्षण म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी लागाणारे प्रमाणपञ किंवा पदवी नाही...तर
तुमचा इतरांबरोबर वागण्याची पद्धत, संस्कार, स्वभाव आणि एकनिष्ठता यांचा सारांश आहे.
-----------------------------------------------------------------
जेव्हा माणसाजवळ सौंदर्याचा रंग असतो...तेव्हा तुम्हाला पाहीजे त्यांचा संग असतो.
रंग उतरला की, लोक अंग काढायला सुरूवात करतात.
-----------------------------------------------------------------
कालच मला विचारत होतं मन , खरं खरं सांग?...
मला ओळखतं का रे तुझं कोण. मी म्हटलं वेड्या मना...
तु असा रे कसा? कोणी नाही ओळखले तरी मी तुला विसरू कसा.
पण एक गोष्ट खरी सांगू ....जे तुला ओळखतात फक्त तेच मला संभाळतात.
तुझ्यामुळेच तर "मी* मी आहे....तु आहेस तर मला काय भी (भीती) आहे.
त्यामुळे तुला कोण ओळखत याची मी चिंता करत नाही. अन्....उगाचच कोणालाही तुझ्यामध्ये भरत नाही.
-----------------------------------------------------------------
आताही पाऊस आला आहे......
माणसानं त्याच्या मुळांवर घाव घालूनही तो न रुसता भरला आहे.....
मानसालाही पावसासारखं मोठ्या मनाचं होता आलं तर.......
ज्याला आपण कळत-नकळत दुःख दिलं , त्याच्यावर आपूलकीनं बरसता आलं तर.....
सुकलेली मनाची जमीन आनंद अश्रूंनी ओली करता आली तर...
मनात पेरलेल्या भावनारूपी बीजांला पुन्हा स्वप्नांचे अंकुर येतील अन् नात्यांची फूलांनी जीवनाची बाग बहरुन जाईल.
-----------------------------------------------------------------
असे वाटते शब्दांच्या पावसात मनसोक्त भिजावं...
अन् असंच कधीकधी विचारांचं बीज रूजावं...
वार्यासारखं मनसोक्त बेभान वहावं....अन् निरतंर तुमच्या श्वासात रहावं.
-----------------------------------------------------------------
अशी असते सवय...
यासाठी जरुरी नसते कोणाचेही वय. ज्यामध्ये वाटत नाही कशाचेही भय.
डोक्यात शिरली तर, येड लावते लय. काहीही असते कोणाकोणाची सवय.
-----------------------------------------------------------------
नेहमी सारखं आजही प्रत्येकाला जगायचं आहे.
मी आजही तुझ्यासोबत आहे हे वेळेला सांगायचं आहे.
आपल्या मर्यादेत वागायचं आहे. पण ...आपल्या हक्काचं मागायचं आहे.
-----------------------------------------------------------------
तडजोड - मोडतोड
माणसाच्या जीवनाला तडजोडीने अर्थ येतो, दुःखाच्या तड्याला सुखाची जोड दिल्यावर.
अन् ...जीवन निर्रथक होतं, मोडतोडीने जेव्हा संशयाला मोड येतो विश्वासाला तोड दिल्यावर.
-----------------------------------------------------------------
मंथन...
या शब्दाचा अर्थबोध झाल्यावर कळते की समुद्र मंथनातुन अमृत आणि वीष का निर्माण झाले...
मंथनातील अमृत-वीष आणि मन-तन (मंथन) हे सार आहे. अमृत म्हणजे मन आणि वीष म्हणजे तन.
मन जे अमृतापरी नेहमी पविञ आणि तन हे वीषापरी नाशिवंत. मन अमृतासारखे चिरतरूण आणि मन वीषासारखे कालांतराने भेदक.
अर्थात ...
समुद्र मंथनातील वीषप्राशन करून महादेवांनी देवलोक तारला होता. पण जीवन मंथनातील तन रुपी वीषाच्या अहंकारात बुडून माणसानं विश्वास मारला आहे.
लक्षात असू द्या, जे जपलं ते आपलं...
-----------------------------------------------------------------
याशिवाय आणखीन काय मागेल माझं मन....
विश्वासाचे पंख लावून घ्यावी तुम्ही यशाची असमान भरारी,
अन् आनंदाने परत यावे अस्तित्व मार्ग च्या शिवारी. हक्काने बसावे आपल्या जागेवर...
तुम्हाला अडवणार कोण? याशिवाय आणखीन काय...
आकाशाला भिडले जरी उद्या तुमचे हात...आपल्यानां नेहमी लाभावी तुमची साथ.
"तन" बदलता येत नाही कोणालाही सापासारखी टाकून कात. नाती जपा मनाची करु नका घात.
माझ्या रोमरोमात असावे आजन्म तुम्हीपण....याशिवाय आणखीन काय...
-----------------------------------------------------------------
असा एक दिवस यावा...
तुमच्या इच्छा पूर्तीचा मान मला मिळावा.
असा एक क्षण यावा...
तुमच्या पोटी पुन्हा एकदा जन्म व्हावा.
मनोगत...


