कुणीच कुणाच्या जवळ नाही...

कुणीच कुणाच्या जवळ नाही...
हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि आमावस्या जास्त आहे

हल्ली माणसं पहिल्या सारखं...
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत

एवढंच काय...
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का?

अपवाद म्हणून असतील काही...
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैश्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय

नातेवाईक, शेजारी, कुटुंबातले...
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द  बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात

जाणे येणे न ठेवणे, न भेटणे, न बोलणे...
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका

धावपळ करून काय मिळवतो...
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा

एकमेका जवळ बसावं बोलावं...
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं

समुद्री चोहीकडे पाणी...
आणि पिण्याला थेंबही नाही.
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा

माणसं अन माणुसकी नसलेली घरे...
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काही  उपयोग नाही.
----------------------------

कधी असही जगावं लागतं ,खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,
कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबवाव लागतं,
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागतं,
मनात एखादी तिव्र इच्छा असून देखील नाही म्हणाव लागत ,
इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागत कधी असही जगाव लागते.
----------------------------

खुप खुप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळयात आलेलं पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला,
काहितरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला
शेवटी अपयशाचीच गरज असते मन खंबीर बनवायला.
----------------------------

सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
ऐकून होतो माणसं देखील रंग बदलतात, पण अनुभवलं कि वेळ आल्यावर अंग ही बदलतात.म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
नेहमीच भावनांना सांभाळलं, मनाशी जुळलेल्यानां उराशी कवटाळले.
पण कळलं नाही सारे कसे कुठे वळले अन् कोण कुठं खेळलं. म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
-------------------------

किती सहज फरक पडतो माणसात !
डोळ्यात स्वप्न नसतात तेव्हा आपल्यात असतात तेच अचानक आपल्याला सोडून आपल्यांमध्ये अचूक बसतात....
किती सहज फरक पडतो माणसात !
निरागस चेहऱ्यावर ज्यांच्या आपण हसू खेळवतो तेच अचानक आपल्यावरच सहज हसू लागतात...  
-------------------------

कधीतरी मनासारखं जगून पहा !
काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न तर आपण सारेच करतोय....पण....
स्वतःची गरज आहे ते मिळवण्यासाठी नाही तर जे इतरांकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून इतरांसारखं होण्यासाठी.
म्हणूनच या तुलनेतून बाहेर येऊन पहा.
कधीतरी मनासारखं जगून पहा.
-------------------------

आज एक आठवण आठवली....
बऱ्याच वर्षापूर्वीची... मी १७ वर्षाचा होतो. जेव्हा मला ज्यांच्या बरोबर लहानाचा मोठा झालो त्यांच गटानं  " वाळीत " टाकलं होतं. कारण एवढचं की मी माझ्या मनासारखं वागायचो आणि स्पष्ट-निडर बोलतो. मी समजवण्याचा प्रयत्न केला एक संधी मागितली पण... त्या गटातल्या कार्यकर्त्यांना माझ्या मनापेक्षा त्यांचा अहंकार प्रिय होता. भरलेल्या डोळ्यांनी तेथून निघोला पण अश्रू गळू दिले नाहीत.
त्याच अश्रूनां आवरत बंड पुकारलं त्या गटाविरूद्ध. अथक सूडाचं बंड माझ्या मनाला मारणाऱ्या विरूद्ध.......
कोणतंही खोटं न करता माझ्या छोट्या विचारांनी त्या अहंकारी गटाच्या सांऱ्यां वाटा फार चौकस बुद्धीने अडविल्या.
जेव्हा कळलं माझ्या बाजूने उभ्या असलेल्या शक्तीपुढे गट गर्भगळीत झालायं आणि नतमस्तक होऊन दुसरी कडे जातोय... म्हणून त्यानां मुद्दाम भेटायला गेलो.
तेव्हा ही डोळ्यांत बंड सुरू झाले तसेच अश्रू होते. पण तरीसुद्धा मनासारखंच बोललो...
"तुम्ही तर माघार घेताय ? तुम्ही ठसलं पाहिजे मला !
त्यातला मिस्कील हसला एक त्वेषाने उत्तरला...
"हमारी बिल्ली हमीसे म्याव ?" गपचूप जा , नाहीतर थोबाड फोडेन.
मी ही हसत म्हटले.. ते तर नेहमीच फोडलतं. म्हटलं.....
"आज ऐ बिल्ली थोडी नाराज है क्योंकी शेर घुटने टेकते देख उसे बूरा लग रहा है !"
एवढचं बोलून तेथून निघालो.
तेव्हा ठरवलं कोणाचाही सूड घ्यावा लागेलं एवढा कोणालाही स्वतःचा अपमान करू द्यायचा नाही. कारण या सुडाच्या बंडात एक गोष्ट शिकलो आणि समोरच्यांनां शिकवली......
"स्वतःचा अंहकार जपणं सोपं असतं, अवघड असतं एखाद्याचा स्वाभिमान ( मन ) जपणं."

मनोगत.....

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे !


ज्याला आपल्या मनातले सर्व
काही सांगून टाकावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सरतानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण
थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे,
जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
ज्याच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे..
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे!
सूर त्याचेआणि शब्द माझे असावे......
----------------------------------

प्रेम कर मित्रा..
कोणावर ही कर...पण प्रेम कर...
बाजूच्या बाकावरल्या तीच्यावर कर...
नाहीतर ...समोर जी शिकवतेय तिच्यावर कर...
पडद्यावरल्या हिरोईनवर कर...
नाहीतर तिच्या ड्रेसच्या डिजाइनवर कर...
कारण…
प्रेमात पडण्याची आणि पाडण्याची ताकत सर्वांत असते.
प्रेम ही स्वत:पलीकडे पहाण्याची सुरुवात असते.

पण प्रेम कर मित्रा..
प्रेम आईवर कर...ताई वर कर...
अंगणातल्या जाई वर कर...
हंबरणार्या गाईवर कर...
जगातल्या कोणत्याही बाईवर कर
कारण..
लक्षात ठेव … प्रेम आहे ...तिथे आदर आहे
अंग झाकणारी ...मायेची चादर आहे…

प्रेम कर मित्रा...
प्रेम मित्रांवर कर ...घरच्यांवर कर...
खालच्यांवर करशील तितकच वरच्यावर कर...
आणि हो ...विसरू नकोस ...स्वत:वर कर...
स्वत:इतकाच … दुसर्यांच्या मतावर कर...

कारण …
प्रत्येक जण स्वत:च्या कहाणी चा नायक असतो,
आणि कोणाच्या तरी कहाणीचा सहाय्यक असतो,
तेव्हा प्रेम कर मित्रा प्रेम कर...

मनगटावरल्या राखीवर कर...
ह्र्दयातल्या सखीवर कर...
हरवलेल्या नात्यांवर कर...
जे जे आठवेल त्यां त्यां वर कर...
पहिल्यांदाच झालेल्या हशावर कर...
आणि सरतेशेवटी मिळालेल्या यशावर कर....
जगण्यावर करतोस तितकच मरणावर कर...
कृष्णावर करतोस तितकच कर्णावर कर....
फक्त एक लक्षात ठेव मित्रा…
प्रेमाचा आजार पांघरु नकोस...
प्रेमाचा बाजार माजवू नकोस.
----------------------------------

काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं.
वया सोबतं रहायला याला जमतंच नाही.

चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं...
आता मात्र सोबत यायला कुरकुर करतं.

शरीर वाढत्या वयाला  साथ द्यायला  लागतं.
मन मात्र मोठं व्हायला कायम नाराज असतं.

प्रौढत्वाच्या खुणा येऊन अंगभर  विसावतात.
मन मात्र डोळ्यातून मिश्कील हसतं असतं.

शरीराचं आणि मनाचं नातं  कधीतरी तुटतं.
शरीर भविष्याकडे....मन भूतकाळाकडे धावतं.

बुध्दीच मग कित्येकदा मनाला खेचून आणतें.
मन देखील सोबत असल्याचे मस्त नाटक करतें.

खोडकर मुलासारखे.....मन गुपचुप  बसून राहते.
आणि .....वयाचा डोळा चुकवून, परत निसटून जातें !
----------------------------------

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?
मी क्षणात उत्तरलो...
मनात जपायला चाफा आवडेल
आणि ओंजळीत धरायला मोगरा...

वहीत ठेवायला बकुळ आवडेल
आणि धुंद व्हायला केवडा...

बोलायला अबोली आवडेल
आणि फुलायला सदाफुली...

पण, प्राजक्त मात्र आवडेल तो,
देवाच्या पायाशी ठेवायला..आशीर्वादासाठी...

यावर ती थोडीशी नाराज झाली,
कारण तिचं नाव रातराणी होतं...

ती नाराज झाली मी ओळखलं... पुढे झालो आणि हलकेच हसत म्हणालो,
हे सगळं नंतर आवडेल.. रातराणी खिडकीशी दरवळल्यानंतर...!!

तेव्हापासून ती अखंड दरवळते आहे..
माझ्या मनात... अंगणात...!

मनोगत.....

गुंता आणि गुंफण !!!

गुंता आणि गुंफण !
यात फरक एवढाच की....गुंता संशयाने होतो, गुंफण संयमाने केली जाते.
गुंता सोडवताना तुटलं जातं, गुंफण सहज आणि हलकीच सोडवता ही येते.
गुंत्यात विश्वासाचा अभाव असतो, गुंफणीत विश्वासू स्वभाव असतो.
-------------------------

मी आणि आम्ही !
आपल्या प्रत्येकाच्या आतील "मी" जेव्हा एखाद्या बरोबर जुळतो तेव्हा "आम्ही" चा जन्म होतो.
या "आम्ही" ला "आम्ही" ठेवायचं की "तुम्ही" करायचे हे प्रत्येकातील "मी" वर अवलंबून असते.
-------------------------

कधीकधी वाटतं....
आयुष्यात सारेच सुखाची इच्छा आणि स्वप्नं ठेवत असतील. तर सुखाला ओळखणं कठीण होईल...
कारण आयुष्याची दुसरी बाजू म्हणजे दुःख नसल्यास जगण्यातली उत्सुकता लोप पावेल.
-------------------------

कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा....
स्वतःच्या श्वासाने होणारी आपल्या शरीराची हालचाल पहा.
शांतपणे आपल्या ह्दयाच्या ठोक्यानां अनुभवा.
आपल्या पायांना प्रेमाने गोंजारून पहा जे अथक झिजतात तुमच्यासाठी.
शांतपणा द्या आपल्या हातांनां जे त्यानां न आवडणाऱ्या अनेक गोष्टी करत असतात तुमच्यासाठी इच्छा नसताना.
डोळ्यांतील निरागसतेला मनापासून नाजूकपणे स्पर्श करून पहा ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष कधीच पाहीलेल नाही आणि पाहू शकणार नाही आहात.
आपल्या शरीरातील रक्ताचं नसांमधून वाहणाऱ्या प्रवाहास अनूभवा.
कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा.
-------------------------

एखाद्याच आपल्यामध्ये असणं आपल्याला खूप काही देऊन जातं.
त्याच्या असण्यानं मन नेहमी स्थिर राहत, तो नसेल तेव्हा सगळंच चूकत जातं.
त्याचचं राज्य असावं आपल्यावर असं वाटत कारण तो असल्यावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हींम्मत येते.
कसलाही अहंम नाही त्याच्यात आणि स्वार्थाचा तर लवलेशही नाही.
म्हणूनच असा मिञ तुमच्या जवळ असण्यावर माझी हरकत नाही.
मी नसलो तरी असा मिञ तुमच्यातील प्रत्येकाच्या जीवन प्रवासात असावा.
हा मिञ लाभणे म्हणजे भाग्यच.
"संयम" हाच सर्वश्रेष्ठ मिञ आहे.
-------------------------

पाणी जसे चढावर वाहत नाही बांध घातला म्हणून कायमचे अडवून ठेवता येत नाही......
मनाचे ही तसेच असते ते रागाने जिंकून घेता येत नाही आणि बंधने घालून बांधून ठेवता येत नाही.  
अडवून ठेवलेल पाणी आठुन, मुरून, किंवा बाष्प होऊन जातं. तसचं मन ही भावनाशून्य होऊन जातं किवां ज्याचं असतं त्याच्यामध्ये मूरून जातं.
-------------------------

एकाने विचारलं - सर्वात महाग "जागा" कोणती ?
मी म्हणालो जी आपण दुसर्याच्या ?"मनात" निर्माण करतो ती महाग जागा !
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर ग? गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.
-------------------------

आपल्याला विचार करता येऊ लागतो तेव्हा अविचारी वागणं गौण असतं.
नेहमीच आपण दिसतं आणि भासतं तसं सारंं काही नसतं.
म्हणूनच आपल्या इंद्रियांना योग्य वळण लावण्यास विचारांचा जन्म झाला आहे.
-------------------------

गंगा नदी म्हणजे शाश्वत पवित्र उत्पती आहे असं नाही.....
अन् गटारांचा जन्म निसर्गतः झालेला नाही.
गंगेला पवित्रतेची उपमा देऊन अशुद्ध करणारा आणि स्वतःच्या सांडपाण्यातून गटारांची निर्मिती करून त्यास अपविञतेचा ठसा मारणारे आपलेच वंशज आहेत.
-------------------------

आपण कुणाचे आहोत ? 
या प्रश्नांचे उत्तर तेव्हाच मिळते जेव्हा आपण अस्वस्थ असतो आणि ती अस्वस्थता समजून आपल्याला हलकेच आणि सहज स्वस्थ करेल अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि विचार मनात येतो.
त्यानंतर आपण खरोखरच त्या व्यक्तीचे आहोत का हे कळतं. त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेतून....कारण सत्य कृतीत आल्यावर ते शाश्वत होतं.
-------------------------

ज्यामध्ये ...
सगळंच सांगणे जरूरीचे नसते...सगळंच मागणे जरूरीचे नसते.
स्पर्शाला जिथे जाण असते...खांद्यावर टेकलेली निरागस मान असते.
सहवासात ज्याच्या असणे म्हणजे शान असते...हीच मनाच्या प्रेमाची पहचान असते.
-------------------------

बोलला नाहीत तुम्ही तरी जी ऐकते सर्व काही.
दाखवल नाहीत तुम्ही तरी जीला सहज दिसत सर्व काही.
देवाला बाजूला सारून जी फक्क तुम्हाला डोळे भरून पाही.
दुःख / वेदना तुमच्या पण जीव जीचा वरखाली सतत होई.
असे एकमाञ व्यक्तीमत्व म्हणजे " आई ".
-------------------------

माणसांची सवय असते स्वतःच्या कडू , वाईट आणि चुकीच्या विचारांनी माझ्यावर चिकलफेक करण्याची.
पण मला त्याचे वाईट नाही वाटत, अश्या अशुद्ध विचारांनी माझे चरीञ नाही बाटत.
म्हणूनच मला....समुद्रासारखं जगायला आवडतं. सारं काही स्वीकारायचं आणि योग्य ते ठेऊन नको असलेल कीनाऱ्यावर आणून टाकायचं.

मनोगत.....