हीच खरी समस्या आहे
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी
आणि आमावस्या जास्त आहे
हल्ली माणसं पहिल्या सारखं...
दुःख कुणाला सांगत नाहीत
मनाचा कोंडमारा होतोय
म्हणून आनंदी दिसत नाहीत
एवढंच काय...
एका छता खाली राहणारी तरी
माणसं जवळ राहिलीत का?
हसत खेळत गप्पा मारणारी
कुटुंब तुम्ही पाहिलीत का?
अपवाद म्हणून असतील काही...
पण प्रमाण खूप कमी झालंय
पैश्याच्या मागे धावता धावता
दुःख खूप वाट्याला आलंय
नातेवाईक, शेजारी, कुटुंबातले...
फक्त एकमेकाला बघतात
एखाद दुसरा शब्द बोलतात
पण काळजातलं दुःख दाबतात
जाणे येणे न ठेवणे, न भेटणे, न बोलणे...
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका
गाठी उकलायचा प्रयत्न करा
जास्त गच्च होऊ देऊ नका
धावपळ करून काय मिळवतो...
याचा जरा विचार करा
बँकेचे अकाउंट भरण्या पेक्षा
आपल्या माणसांची मनं भरा
एकमेका जवळ बसावं बोलावं...
आणि नेहमी नेहमी
तिरपं चालण्याच्या ऐवजी
थोडं सरळ रेषेत चालावं
समुद्री चोहीकडे पाणी...
आणि पिण्याला थेंबही नाही.
अशी अवस्था झालीय माणसाची
यातून लवकर बाहेर पडा
माणसं अन माणुसकी नसलेली घरे...
अन देव नसलेले देव्हारे
कितीही पॉश असले
तरी त्याचा काही उपयोग नाही.
----------------------------
कधी असही जगावं लागतं ,खोट्या हास्याच्या पडद्याआड खरे दु:ख लपवाव लागतं,
कर्तव्याच्या नावाखाली स्व:ताला राबवाव लागतं,
इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातल पाणी लपवाव लागतं,
मनात एखादी तिव्र इच्छा असून देखील नाही म्हणाव लागत ,
इतरांना हसवता हसवता कधी खुप रडाव लागत कधी असही जगाव लागते.
----------------------------
खुप खुप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळयात आलेलं पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला,
काहितरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला
शेवटी अपयशाचीच गरज असते मन खंबीर बनवायला.
----------------------------
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
ऐकून होतो माणसं देखील रंग बदलतात, पण अनुभवलं कि वेळ आल्यावर अंग ही बदलतात.म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
नेहमीच भावनांना सांभाळलं, मनाशी जुळलेल्यानां उराशी कवटाळले.
पण कळलं नाही सारे कसे कुठे वळले अन् कोण कुठं खेळलं. म्हणूनच...
सारं काही नव्यानं रचून पहायाचं. पण असं मला खचून नाही जायाचं.
-------------------------
किती सहज फरक पडतो माणसात !
डोळ्यात स्वप्न नसतात तेव्हा आपल्यात असतात तेच अचानक आपल्याला सोडून आपल्यांमध्ये अचूक बसतात....
किती सहज फरक पडतो माणसात !
निरागस चेहऱ्यावर ज्यांच्या आपण हसू खेळवतो तेच अचानक आपल्यावरच सहज हसू लागतात...
-------------------------
कधीतरी मनासारखं जगून पहा !
काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न तर आपण सारेच करतोय....पण....
स्वतःची गरज आहे ते मिळवण्यासाठी नाही तर जे इतरांकडे आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून इतरांसारखं होण्यासाठी.
म्हणूनच या तुलनेतून बाहेर येऊन पहा.
कधीतरी मनासारखं जगून पहा.
-------------------------
आज एक आठवण आठवली....
बऱ्याच वर्षापूर्वीची... मी १७ वर्षाचा होतो. जेव्हा मला ज्यांच्या बरोबर लहानाचा मोठा झालो त्यांच गटानं " वाळीत " टाकलं होतं. कारण एवढचं की मी माझ्या मनासारखं वागायचो आणि स्पष्ट-निडर बोलतो. मी समजवण्याचा प्रयत्न केला एक संधी मागितली पण... त्या गटातल्या कार्यकर्त्यांना माझ्या मनापेक्षा त्यांचा अहंकार प्रिय होता. भरलेल्या डोळ्यांनी तेथून निघोला पण अश्रू गळू दिले नाहीत.
त्याच अश्रूनां आवरत बंड पुकारलं त्या गटाविरूद्ध. अथक सूडाचं बंड माझ्या मनाला मारणाऱ्या विरूद्ध.......
कोणतंही खोटं न करता माझ्या छोट्या विचारांनी त्या अहंकारी गटाच्या सांऱ्यां वाटा फार चौकस बुद्धीने अडविल्या.
जेव्हा कळलं माझ्या बाजूने उभ्या असलेल्या शक्तीपुढे गट गर्भगळीत झालायं आणि नतमस्तक होऊन दुसरी कडे जातोय... म्हणून त्यानां मुद्दाम भेटायला गेलो.
तेव्हा ही डोळ्यांत बंड सुरू झाले तसेच अश्रू होते. पण तरीसुद्धा मनासारखंच बोललो...
"तुम्ही तर माघार घेताय ? तुम्ही ठसलं पाहिजे मला !
त्यातला मिस्कील हसला एक त्वेषाने उत्तरला...
"हमारी बिल्ली हमीसे म्याव ?" गपचूप जा , नाहीतर थोबाड फोडेन.
मी ही हसत म्हटले.. ते तर नेहमीच फोडलतं. म्हटलं.....
"आज ऐ बिल्ली थोडी नाराज है क्योंकी शेर घुटने टेकते देख उसे बूरा लग रहा है !"
एवढचं बोलून तेथून निघालो.
तेव्हा ठरवलं कोणाचाही सूड घ्यावा लागेलं एवढा कोणालाही स्वतःचा अपमान करू द्यायचा नाही. कारण या सुडाच्या बंडात एक गोष्ट शिकलो आणि समोरच्यांनां शिकवली......
"स्वतःचा अंहकार जपणं सोपं असतं, अवघड असतं एखाद्याचा स्वाभिमान ( मन ) जपणं."
मनोगत.....

