गुंता आणि गुंफण !!!

गुंता आणि गुंफण !
यात फरक एवढाच की....गुंता संशयाने होतो, गुंफण संयमाने केली जाते.
गुंता सोडवताना तुटलं जातं, गुंफण सहज आणि हलकीच सोडवता ही येते.
गुंत्यात विश्वासाचा अभाव असतो, गुंफणीत विश्वासू स्वभाव असतो.
-------------------------

मी आणि आम्ही !
आपल्या प्रत्येकाच्या आतील "मी" जेव्हा एखाद्या बरोबर जुळतो तेव्हा "आम्ही" चा जन्म होतो.
या "आम्ही" ला "आम्ही" ठेवायचं की "तुम्ही" करायचे हे प्रत्येकातील "मी" वर अवलंबून असते.
-------------------------

कधीकधी वाटतं....
आयुष्यात सारेच सुखाची इच्छा आणि स्वप्नं ठेवत असतील. तर सुखाला ओळखणं कठीण होईल...
कारण आयुष्याची दुसरी बाजू म्हणजे दुःख नसल्यास जगण्यातली उत्सुकता लोप पावेल.
-------------------------

कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा....
स्वतःच्या श्वासाने होणारी आपल्या शरीराची हालचाल पहा.
शांतपणे आपल्या ह्दयाच्या ठोक्यानां अनुभवा.
आपल्या पायांना प्रेमाने गोंजारून पहा जे अथक झिजतात तुमच्यासाठी.
शांतपणा द्या आपल्या हातांनां जे त्यानां न आवडणाऱ्या अनेक गोष्टी करत असतात तुमच्यासाठी इच्छा नसताना.
डोळ्यांतील निरागसतेला मनापासून नाजूकपणे स्पर्श करून पहा ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष कधीच पाहीलेल नाही आणि पाहू शकणार नाही आहात.
आपल्या शरीरातील रक्ताचं नसांमधून वाहणाऱ्या प्रवाहास अनूभवा.
कधीतरी एकदा स्वतःजवळ राहून बघा.
-------------------------

एखाद्याच आपल्यामध्ये असणं आपल्याला खूप काही देऊन जातं.
त्याच्या असण्यानं मन नेहमी स्थिर राहत, तो नसेल तेव्हा सगळंच चूकत जातं.
त्याचचं राज्य असावं आपल्यावर असं वाटत कारण तो असल्यावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हींम्मत येते.
कसलाही अहंम नाही त्याच्यात आणि स्वार्थाचा तर लवलेशही नाही.
म्हणूनच असा मिञ तुमच्या जवळ असण्यावर माझी हरकत नाही.
मी नसलो तरी असा मिञ तुमच्यातील प्रत्येकाच्या जीवन प्रवासात असावा.
हा मिञ लाभणे म्हणजे भाग्यच.
"संयम" हाच सर्वश्रेष्ठ मिञ आहे.
-------------------------

पाणी जसे चढावर वाहत नाही बांध घातला म्हणून कायमचे अडवून ठेवता येत नाही......
मनाचे ही तसेच असते ते रागाने जिंकून घेता येत नाही आणि बंधने घालून बांधून ठेवता येत नाही.  
अडवून ठेवलेल पाणी आठुन, मुरून, किंवा बाष्प होऊन जातं. तसचं मन ही भावनाशून्य होऊन जातं किवां ज्याचं असतं त्याच्यामध्ये मूरून जातं.
-------------------------

एकाने विचारलं - सर्वात महाग "जागा" कोणती ?
मी म्हणालो जी आपण दुसर्याच्या ?"मनात" निर्माण करतो ती महाग जागा !
तिचा भाव करता येऊ शकत नाही.
अन् ती एकदा जर ग? गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य असतं.
-------------------------

आपल्याला विचार करता येऊ लागतो तेव्हा अविचारी वागणं गौण असतं.
नेहमीच आपण दिसतं आणि भासतं तसं सारंं काही नसतं.
म्हणूनच आपल्या इंद्रियांना योग्य वळण लावण्यास विचारांचा जन्म झाला आहे.
-------------------------

गंगा नदी म्हणजे शाश्वत पवित्र उत्पती आहे असं नाही.....
अन् गटारांचा जन्म निसर्गतः झालेला नाही.
गंगेला पवित्रतेची उपमा देऊन अशुद्ध करणारा आणि स्वतःच्या सांडपाण्यातून गटारांची निर्मिती करून त्यास अपविञतेचा ठसा मारणारे आपलेच वंशज आहेत.
-------------------------

आपण कुणाचे आहोत ? 
या प्रश्नांचे उत्तर तेव्हाच मिळते जेव्हा आपण अस्वस्थ असतो आणि ती अस्वस्थता समजून आपल्याला हलकेच आणि सहज स्वस्थ करेल अशा व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि विचार मनात येतो.
त्यानंतर आपण खरोखरच त्या व्यक्तीचे आहोत का हे कळतं. त्यानं दिलेल्या प्रतिक्रियेतून....कारण सत्य कृतीत आल्यावर ते शाश्वत होतं.
-------------------------

ज्यामध्ये ...
सगळंच सांगणे जरूरीचे नसते...सगळंच मागणे जरूरीचे नसते.
स्पर्शाला जिथे जाण असते...खांद्यावर टेकलेली निरागस मान असते.
सहवासात ज्याच्या असणे म्हणजे शान असते...हीच मनाच्या प्रेमाची पहचान असते.
-------------------------

बोलला नाहीत तुम्ही तरी जी ऐकते सर्व काही.
दाखवल नाहीत तुम्ही तरी जीला सहज दिसत सर्व काही.
देवाला बाजूला सारून जी फक्क तुम्हाला डोळे भरून पाही.
दुःख / वेदना तुमच्या पण जीव जीचा वरखाली सतत होई.
असे एकमाञ व्यक्तीमत्व म्हणजे " आई ".
-------------------------

माणसांची सवय असते स्वतःच्या कडू , वाईट आणि चुकीच्या विचारांनी माझ्यावर चिकलफेक करण्याची.
पण मला त्याचे वाईट नाही वाटत, अश्या अशुद्ध विचारांनी माझे चरीञ नाही बाटत.
म्हणूनच मला....समुद्रासारखं जगायला आवडतं. सारं काही स्वीकारायचं आणि योग्य ते ठेऊन नको असलेल कीनाऱ्यावर आणून टाकायचं.

मनोगत.....

No comments:

Post a Comment