माणसाला आयुष्यभर आपल्याला काय मिळवायचं आहे याचा निवाडा करता येत नाही.त्याला सैरभैर धावताना दिशांचं भान नसतं नि जेव्हा धावणं संपवून भिंतीला लावलेल्या शिडीवर चढून भिंतीपलीकडे नजर टाकतो तेव्हा त्याला कळून चुकते कि आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली...तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो...आयुष्यभर त्याला व्यक्तिमत्व नि चारित्र्य यातील फरक कळून येत नाही...व्यक्तिमत्व म्हणजे आपणाकडे कुणीना कुणी बघत असताना आपण जे असतो व आपण जे करतो...नि चारित्र्य म्हणजे आपणाकडे कुणीही बघत नसताना आपण जे असतो व आपण जे करतो...माणसाला जीवनात कृतार्थ (...यशस्वी नव्हे...) होण्यासाठी स्वत:च्या आतल्या आवाजाशी हितगुज करून कुठल्या तरी शिखराचा रस्ता पक्का करायला हवा...त्यावरील वाटचाल आत्मज्ञान...बुद्धिमत्ता ...खडतर परिश्रम...नि दृष्टीकोन या शिदोरीच्या बळावर पार करावयाची असते..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तुमची अर्धी लढाई सुरु होण्यापूर्वीच जिंकत असतो...तुमचा स्वत:च्या जगण्यावर ..बोलण्यावर...चालण्यावर असलेला " विश्वास नि श्रद्धा "! परीक्षेच्या घडीला किंवा अडचणीत असताना या दोन्हीला तडा न जावू देणारा तुमचा स्वभाव...समोर येणाऱ्या सगळ्या अडचणींना समर्थपणे तोंड देणारा असेल.
---------------------------------
शक्ती.....
प्रत्यक्षात शक्ती ही प्रगल्भ संकल्पना आहे. शक्ती ही स्वतःला आणि इतरांना सांभाळण्यासाठी आहे, ध्येयाचे रक्षण करण्यासाठी आहे.
चंदनाच्या वृक्षाला सर्प विळखा घालून बसतो व तोडावयास येणार्यावर फुत्कार करतो. त्याप्रमाणे आपली जी ध्येये- त्या ध्येयांभोवती आपली शक्तिसर्पिणी वेढे घालून जागरूक अशी राहिली पाहिजे.
शक्तीचा उपयोग शक्तीला लगाम घालून करावयाचा असतो. शक्तीबरोबर आपण वाहून जावयाचे नाही. अग्नीने लोखंड लाल होते, परंतु लोण्याप्रमाणे लगेच वितळून जात नाही. आपण भावनावश होऊन शक्तीबरोबर वितळून जाता कामा नये. हुशार सारथ्याने काबूत ठेवलेल्या घोड्याप्रमाणे आपली शक्ती असली पाहिजे. घोड्याला लगाम घालता येतो, म्हणून घोड्याची किंमत आहे. संयम हेच खरे सामर्थ्य. सामर्थ्याला ताब्यात ठेवण्यातच खरे बळ आहे; ज्याच्याकडे धैर्य नाही, ज्याच्याजवळ शौर्य नाही, त्याला कोणी मान देत नाही; त्याप्रमाणेच संयमहीन माणसाच्या शक्तीलाही कोणी मान देत नाही. ज्याच्या कृत्यांवर विचाराचा ताबा नाही, ज्याची कृत्ये विकाराच्या ताब्यात गेलेली असतात, अशाला मान मिळत नाही.
परंतु सामर्थ्य असेल तर संयम. आधी बळ मिळवा व मग ते बळ संयमित करा. शक्तीची उपासना करा, परंतु ती शक्ती शिवाच्या आज्ञेत राहणारी हवी. शक्तियुक्त शिव व शिवयुक्त शक्ती हे ध्यानात असावे. जेथे संयमशील शक्ती आहे, तेथे मंगल असा शिव नांदणारच. मला वाटते माणसाचे पहिले कर्तव्य शक्तिशाली होणे हे आहे. आपण केवळ जवळ असल्यानेच आपल्यानां सुरक्षितता वाटेल, आपण केवळ जवळ आहोत एवढ्यानेच आपल्यांच्या वाटेस कोणी जाणार नाही- असे बलशाली व प्रभावशाली आपले जीवन झाले पाहिजे. आपला असा दरारा सर्वत्र बसला पाहिजे. असे जीवन ज्याला साधले, असे जीवन ज्याला मिळाले, तोच खरा जगला. त्याने मनुष्यजन्मात येऊन पुष्कळच मिळविले असे म्हणता येईल.
---------------------------------
जाणीव..... स्वतःची.
आपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्त्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव.
जाणीव... उपकारांची
यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.
चांगल्या कामाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच चांगले काम सहज घडून येते.
आपल्या हातून किती चांगली कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.
आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचे उपकार स्वीकारत असतो. अनेकजण कळत - नकळत आपल्यासाठी बरंच काही त्याग करत असतात. आपण किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवावी.
---------------------------------
स्वः आणि स्वभाव......
माणसाचा स्वभाव चंचल आहे.त्याला त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचं अप्रूप असतं.कधी एकदा तिला मिळवितो असं त्याला झालेले असते.त्या गोष्टींच्या चिंतनात नि तिच्या प्राप्तीच्या स्वप्नात किती तरी राती त्यानं स्वत:ची झोप उडवून घेतलेली असते.पण एकदाका ती मिळाली कि त्याची हळू हळू त्या गोष्टीसोबतची जवळीक ..तिच्यातलं गुंतणं पातळ होत जातं...पुन्हा त्याला नव्या गोष्टींचा ध्यास लागतो...म्हणून तर घरात जेवताना घरगुती जेवणाला हॉटेलची चव नाही म्हणून तो नाक मुरडतो...नि बाहेर जेवायला गेल्यावर घरगुती चांगलं जेवण कुठं मिळते याची चौकशी करतो... अशी माणसाची अगम्य स्वभाव शैली असते...एखादी व्यक्ती आपण तीला कितीही ओळखत असलो तरी कुठल्या क्षणी आपण त्याच्याबाबतच्या अनुमानाला फसू याचा नेम नसतो...त्याही पुढे , एखाद्या व्यक्तीबद्दल कशाला ? आपल्या स्वत:बद्दल आपण तरी खात्रीने काही ठाम भूमिका घेऊ याची हमी देऊ शकतो काय ? लक्षात ठेवा खेळात आणि जीवनात सगळेच पत्ते काही आपल्या मनासारखे सगळ्याच डावात हाती येत नाहीत..पण आलेले पत्ते स्वीकारून योग्यवेळी नेमके पत्ते खेळून काही हरणारे डावसुद्धा जिंकता येतात...नि खरी कसोटी अश्या डावातच लागते...केवळ तुमच्या चेहरा वाचून तुमच्यापेक्षा चांगले पत्ते असणारा खेळाडू सुद्धा त्याचा होणारा डाव तुमच्या नावे करून जातो..डाव जिंकताना कधीही कुणाला फसवायचे नाही. फक्त डाव मांडताना आपल्या पुढचे मागचे किंवा बाजूचे सवंगडी आपल्यावर लोभ करणारे असावेत एवढीच काळजी घ्यायची.
---------------------------------
ज्यांच्या आठवणीनंही मन जात मोहरून, दिसला नाहीत तुम्ही तर डोळे जातात बावरून.
जाईल जेव्हा तोल माझा तेव्हा घ्यावं जरा सावरून, जाण्याआधी नक्कीच जाईन सारा पसारा आवरून.
माझ्या नसण्याची नसावी तुमच्या मनात उणीव, शेवटच्या श्वासापर्यत ठेवेन आणल्या नात्याची जाणीव.
---------------------------------
आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस अमूक प्रकारचे वर्तन आपण करावयास पाहिजे असते.
पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की,
जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू,
तर मग कठीण प्रसंग येऊ शकतो. तर मग काही विस्कटेल. नाते तूटेल याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने आणि संयमाने वागतात. यातच जाणीव जन्म घेऊन वाढत असते.
-------------------------
पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत.
-------------------------
नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो.
जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------
आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.
मनोगत...
---------------------------------
शक्ती.....
प्रत्यक्षात शक्ती ही प्रगल्भ संकल्पना आहे. शक्ती ही स्वतःला आणि इतरांना सांभाळण्यासाठी आहे, ध्येयाचे रक्षण करण्यासाठी आहे.
चंदनाच्या वृक्षाला सर्प विळखा घालून बसतो व तोडावयास येणार्यावर फुत्कार करतो. त्याप्रमाणे आपली जी ध्येये- त्या ध्येयांभोवती आपली शक्तिसर्पिणी वेढे घालून जागरूक अशी राहिली पाहिजे.
शक्तीचा उपयोग शक्तीला लगाम घालून करावयाचा असतो. शक्तीबरोबर आपण वाहून जावयाचे नाही. अग्नीने लोखंड लाल होते, परंतु लोण्याप्रमाणे लगेच वितळून जात नाही. आपण भावनावश होऊन शक्तीबरोबर वितळून जाता कामा नये. हुशार सारथ्याने काबूत ठेवलेल्या घोड्याप्रमाणे आपली शक्ती असली पाहिजे. घोड्याला लगाम घालता येतो, म्हणून घोड्याची किंमत आहे. संयम हेच खरे सामर्थ्य. सामर्थ्याला ताब्यात ठेवण्यातच खरे बळ आहे; ज्याच्याकडे धैर्य नाही, ज्याच्याजवळ शौर्य नाही, त्याला कोणी मान देत नाही; त्याप्रमाणेच संयमहीन माणसाच्या शक्तीलाही कोणी मान देत नाही. ज्याच्या कृत्यांवर विचाराचा ताबा नाही, ज्याची कृत्ये विकाराच्या ताब्यात गेलेली असतात, अशाला मान मिळत नाही.
परंतु सामर्थ्य असेल तर संयम. आधी बळ मिळवा व मग ते बळ संयमित करा. शक्तीची उपासना करा, परंतु ती शक्ती शिवाच्या आज्ञेत राहणारी हवी. शक्तियुक्त शिव व शिवयुक्त शक्ती हे ध्यानात असावे. जेथे संयमशील शक्ती आहे, तेथे मंगल असा शिव नांदणारच. मला वाटते माणसाचे पहिले कर्तव्य शक्तिशाली होणे हे आहे. आपण केवळ जवळ असल्यानेच आपल्यानां सुरक्षितता वाटेल, आपण केवळ जवळ आहोत एवढ्यानेच आपल्यांच्या वाटेस कोणी जाणार नाही- असे बलशाली व प्रभावशाली आपले जीवन झाले पाहिजे. आपला असा दरारा सर्वत्र बसला पाहिजे. असे जीवन ज्याला साधले, असे जीवन ज्याला मिळाले, तोच खरा जगला. त्याने मनुष्यजन्मात येऊन पुष्कळच मिळविले असे म्हणता येईल.
---------------------------------
जाणीव..... स्वतःची.
आपण स्वतः व भोवतालची परिस्थिती यांतील संबंध जाणण्याची क्षमता, स्वतःचा दृष्टिकोन विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून वेगळे अस्तित्त्वात आहोत असे जाणण्याची क्षमता म्हणजे जाणीव.
जाणीव... उपकारांची
यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.
चांगल्या कामाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच चांगले काम सहज घडून येते.
आपल्या हातून किती चांगली कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.
आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचे उपकार स्वीकारत असतो. अनेकजण कळत - नकळत आपल्यासाठी बरंच काही त्याग करत असतात. आपण किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवावी.
---------------------------------
स्वः आणि स्वभाव......
माणसाचा स्वभाव चंचल आहे.त्याला त्याच्याजवळ नसणाऱ्या गोष्टींचं अप्रूप असतं.कधी एकदा तिला मिळवितो असं त्याला झालेले असते.त्या गोष्टींच्या चिंतनात नि तिच्या प्राप्तीच्या स्वप्नात किती तरी राती त्यानं स्वत:ची झोप उडवून घेतलेली असते.पण एकदाका ती मिळाली कि त्याची हळू हळू त्या गोष्टीसोबतची जवळीक ..तिच्यातलं गुंतणं पातळ होत जातं...पुन्हा त्याला नव्या गोष्टींचा ध्यास लागतो...म्हणून तर घरात जेवताना घरगुती जेवणाला हॉटेलची चव नाही म्हणून तो नाक मुरडतो...नि बाहेर जेवायला गेल्यावर घरगुती चांगलं जेवण कुठं मिळते याची चौकशी करतो... अशी माणसाची अगम्य स्वभाव शैली असते...एखादी व्यक्ती आपण तीला कितीही ओळखत असलो तरी कुठल्या क्षणी आपण त्याच्याबाबतच्या अनुमानाला फसू याचा नेम नसतो...त्याही पुढे , एखाद्या व्यक्तीबद्दल कशाला ? आपल्या स्वत:बद्दल आपण तरी खात्रीने काही ठाम भूमिका घेऊ याची हमी देऊ शकतो काय ? लक्षात ठेवा खेळात आणि जीवनात सगळेच पत्ते काही आपल्या मनासारखे सगळ्याच डावात हाती येत नाहीत..पण आलेले पत्ते स्वीकारून योग्यवेळी नेमके पत्ते खेळून काही हरणारे डावसुद्धा जिंकता येतात...नि खरी कसोटी अश्या डावातच लागते...केवळ तुमच्या चेहरा वाचून तुमच्यापेक्षा चांगले पत्ते असणारा खेळाडू सुद्धा त्याचा होणारा डाव तुमच्या नावे करून जातो..डाव जिंकताना कधीही कुणाला फसवायचे नाही. फक्त डाव मांडताना आपल्या पुढचे मागचे किंवा बाजूचे सवंगडी आपल्यावर लोभ करणारे असावेत एवढीच काळजी घ्यायची.
---------------------------------
ज्यांच्या आठवणीनंही मन जात मोहरून, दिसला नाहीत तुम्ही तर डोळे जातात बावरून.
जाईल जेव्हा तोल माझा तेव्हा घ्यावं जरा सावरून, जाण्याआधी नक्कीच जाईन सारा पसारा आवरून.
माझ्या नसण्याची नसावी तुमच्या मनात उणीव, शेवटच्या श्वासापर्यत ठेवेन आणल्या नात्याची जाणीव.
---------------------------------
आपल्या जीवनात पदोपदी असे प्रसंग येत असतात की, ज्या वेळेस अमूक प्रकारचे वर्तन आपण करावयास पाहिजे असते.
पुष्कळ लोक आपणाजवळ चांगले वागतात; त्यांचे व आपले संबंध सलोख्याचे असतात, याचे कारण हे की, त्या लोकांना पूर्णपणे जाणीव असते की,
जर का आपण नीट वागलो नाही, समजुतीने घेतले नाही, जर का आपण योग्य मर्यादेचे अतिक्रमण करून अरेरावी करू,
तर मग कठीण प्रसंग येऊ शकतो. तर मग काही विस्कटेल. नाते तूटेल याची त्यांना भीती असते व म्हणून ते जपून गुण्यागोविंदाने आणि संयमाने वागतात. यातच जाणीव जन्म घेऊन वाढत असते.
-------------------------
पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत.
-------------------------
नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो.
जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------
आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.
मनोगत...


