लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".

लोक म्हणतात, "आयुष्य छोटं आहे".
पण असं बिलकुल नाही....
खरं तर आपण जगायला उशीरा सुरुवात करतो.क्षणा क्षणाला जोडत आयुष्य पुढे सरकत असते.
कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो....जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो.
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. ज्याने तो क्षण ओळखून पाऊल उचलले आणि जाणीवेने चालत राहीला त्या माणसाकडे यश चालून येतं.
-------------------------

पुसून टाकावे सगळे रंग देखाव्याचे, मुखवटे पांघरलेल्या चेहऱ्यावरचे.
मोकळ करावं सर्व भावनांना, अडकल्या आहेत ज्या सांभाळात त्या मुखवट्यानां.
नसावा असा एकही चेहरा फसवणारा, मुखवटा पांघरूण हसणारा आणि हसवणारा.
-------------------------

एखाद्या माणसावर आंधळं प्रेम करणं हा त्या व्यक्तीवर केलेला विश्वास असतो.....
पण त्या व्यक्तीला ते प्रेम न सांभाळता येण हा त्या व्यक्तीमधील जाणीवेचा अभाव असतो.
-------------------------

विधात्याची भेट घेणं शक्य असतं तर माझ्या विधिलिखिताची प्रत मिळवली असती तर थोडेफार फेरबदल करायला सांगितले असते.
पण ते शक्य नाही म्हणूनच स्वः लिखित नवी प्रत तयार करायला घेतली जीला एकच अध्याय आहे " अस्तित्व मार्ग ".
-------------------------

तुमच्यामध्ये निर्बंध बांधल जाणं जर जाणीवपूर्वक नसतं तर तुमच्या बरोबर नातं जुळूनचं आल नसतं.
तुमच्या निस्वार्थ प्रेमाची जाणीव नसती तर आजपर्यंत तुमच्यासोबत राहिलो नसतो.
-------------------------

आपण सगळं बदलण्याचा हट्ट किंवा प्रयत्न करू नये.....कारण बदल घडून येण्यासाठी मन जूळुन यावी लागतात.
खरतरं.... मनं जुळली तर काही बदलण्याची गरज पडत नाही.
-------------------------

नेहमी हसत रहाण्याचा मुख्य फायदा म्हणजे " इतरांना तुमचे दुःख समजत नाही आणि ते तुमच्यावर दया दाखवू शकत नाहीत.
कोणाच्याही दयेवर केवळ आत्मसन्मान नसलेले जगतात.
पण...आत्मसन्मान मिळवण्यासाठी कर्तव्य आणि कर्तुत्व सिद्ध करावं लागतं.
-------------------------

जीवनातील सर्वात मोठं दुःख म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर निस्वार्थ नातं ठेऊनही ते स्वार्थ ठेऊनच वागतात.
पण या दुःखाने विस्कटून न जाता आपली मनात भावना कायम ठेऊन जगण्यातच खरा अर्थ असतो. स्वार्थ बदलतो अर्थ शाश्वत असतो.
-------------------------

तुमच्या असण्याने कुणाला फरक पडत नसेल तर नसण्याने पडणारच नाही. खरंतर....तुम्ही नसल्यावर फरक नाही पडला तर हरकत नाही
पण तुम्ही असताना तुमच्या असण्याची दखल घेतली जाईल अशा स्वभावात जगा.
-------------------------

काही लबाड लांडग्याच्या स्वभावाचे चोरून जातात ,
काही धुर्त कोल्ह्याच्या स्वभावाचे फसवून जातात,
काही चोर मांजरांच्या स्वभावाचे चोरून जातात,
माणसाच्या जन्मी येऊन प्राण्यांच्या स्वाभावात न जगता काही माणसं इमानाने जगून जातात.
-------------------------

सगळीच जोडलेली नाती निरपेक्ष आणि निस्वार्थ असतात असं ही नाही. त्यामुळे त्यानां गालबोट लागतं.
अर्थात... मनाची नाती ही रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यांपेक्षा निर्मळ असतात. कारण त्यात इतरांबद्दल तिरस्कार नसतो आणि मन जुळतं त्याच्याबद्दल अविश्वास नसतो.
-------------------------

एकदा पाण्याने भरलेले डोळे आणि भारावलेले शब्द आवरत ती मला सांगत होती.
जर जगातल्या सांऱ्यां पुरूषांना एका रांगेत उभं केल तरी मी माझं नातं तुमच्याशी आहे हे अभिमानाने सांगेन आणि तुझा हात पकडेन.
मी ही भावनांना आवरत तीला म्हटलं मी तुला दुसऱ्या कोणाला निवडायला संधीच देणार नाही.
-------------------------

आता नव्या प्रवासाची सुरूवात करण्याची वेळ झाली आहे.
पुन्हा स्वतःबरोबर नातं जोडून अपेक्षा आणि भावनिकतेला सोडून जाणीवांचे धागे जोडत नवा प्रवास सुरू करण्याची वेळ झालीआहे.
-------------------------

पाखरांच्या पंखात बळ आलं की ती भरारी मारतात आणि सगळं विसरून सोडून भरकटत जातात.
कदाचित निसर्गाचा मोह त्यानां आवरता येत नाही. अन् पाखरंचं ती....आता माणसांंची पाखरं होऊ लागलेत
-------------------------

नातं जपण्यासाठी कोणालाही मुद्दाम टाळण्याऐवजी स्पष्टपणे संवाद महत्वाचा असतो.
नाहीतर नाते तर तुटतेच राहीलेल्या व्यवहारी संबंधामध्ये देखील अविश्वास राहतो.
आपण एखाद्यच्या आयुष्यात काही क्षण आणि समाधान देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य वाढवत नाही तर असलेल आयुष्य फुलवतो. ...जर फुलवता येत नसेल तर ते विस्कटू नका.
-------------------------

आता सारं सावरण्याची वेळ झाली आहे. बरीच पडझड झाली आहे , आवरण्याची वेळ झाली आहे.
अपेक्षांच्या चिखलात माखलेल्या मनाला स्वच्छ करून आत्मविश्वासाचे चिलखत घालण्याची वेळ झाली आहे.
क्षणभंगुर नात्यांच्या मोहात न अडकता...जे खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष सोबत आहेत त्यानां घेऊन नाहीतर एकटेपणाला सोबत करत प्रवास सुरू करण्याची वेळ झालेली आहे.
थोडा वेळ लागले पण सुरवात करण्याची वेळ झालेली आहे.
-------------------------

कोण कुठं असतं हे फक्त वेळेला माहित असतं आणि ज्याचं त्याला माहीत असतं. अनेकदा जवळ वाटणारे लांब असतात. लांब असलेल्याचा जवळ असण्याचा संबंधच येत नाही. कोणी कुठेही असलं तरी मी माझ्यासोबत असणं जरूरीचे आहे हे कळलंय म्हणूनच कोण कुठं आहे हे न शोधता स्वतःला हरवून न देण्याचं ठरवलं आहे. आता कळतयं ञासात राहणं हे भासात राहाण्यापेक्षा कधीही योग्य असतं. म्हणूनच भासातून बाहेर येऊन जाणीवेच्या व्यासात असलेल्यांनां मनाच्या केंद्राच्या गुरूत्वकर्षणात कायम जोडलेल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या गुरूत्वकर्षनाच्या बाहेर गेलेल्या कोणालाही परत आणता येणार नाही. आता हे पाहायाचं आहे कोण या व्यासात आणि गुरूत्वकर्षणात आपली जागा कायम टिकवून ठेवणार आहे. म्हणूनच म्हटलं.... कोण कुठं असणार हे वेळेलाच माहित असतं.

मनोगत.....

No comments:

Post a Comment