माणूस जन्माला येतो पहीलं वस्ञ घालतो ते " लंगोट " ज्याला खिसा नसतो...
माणूस मेल्यावर शेवटचे वस्ञ घालतो ते " कफन " ज्यालाही खिसा नसतो...
तरी आयुष्यभर माणूस पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो.
------------------------------------------------------------------
शब्दांना जिवंत करता आले असते तर......
मी जाणीव , एकनिष्ठता आणि माणूसकीला पहिले जिवंत केले असते...
-----------------------------------------------------------------------
देवाने माणसाला पाठीला डोळे नाही दिले ....
नाहीतर विश्वास घातक्यानां आनंदाने जगण्यासाठी वेळच मिळाली नसती.
------------------------------------------------------------------------
प्रत्येकजण .......
तसं कोणचं चुकीचा नसतो. प्रत्येकजन ........
फक्त स्वतःच्या जागेवर स्वतःसाठी बरोबर असतो.
तसं कोणचं भरवश्याचा नसतो.
प्रत्येकजण ........ स्वतःच्या सोयीने बेभरवश्याने वागतो.
तसं वाईट कोणीही नसतो.
प्रत्येकजण..... स्वतःच्या नजरेत नेहमी चांगला असतो.
----------------------------------------------------
इथं....
प्रत्येकजण घाईत आहे..... तरीही वेळेवर कोणचं पोचत नाही.
प्रत्येकजण मनापासून वागतो.... तरीही संशय घेणं सोडत नाही.
प्रत्येकजण मदत करतो.... पण स्वार्थ काही सोडत नाही.
-----------------------------------------------------------------
जिद्द .....
अनेकदा ठेच लागली आहे तरी ताठ मान करुन चालावं...
पडलं तरी स्वतःला तटस्थ राखावं....
पुढंच पाऊल पुन्हा जिद्दीने टाकावं....
आपलं धैर्य सिद्ध करावं ....
अन् आदर्श म्हणून उरावं.......
आपल नाव दगडावर नाही...तर माणसांच्या मनावर कोरावं.
-----------------------------------------------------------
एक दिवस असा येईल.....
तेव्हा हरवून जाणार आहोत स्वतःला.
मग उगाचच का बरं माणसं लपवून ठेवतात मनातल्या नात्याला.
त्यापेक्षा त्याला जपायचं...
भावनांच्या नाजुक क्षणानां अचूक आणि अलगद टिपायचं.
आपल्या माणसांना तुटून नाही द्यायचं कारण एकदा आपलं माणूस हरवलं तर ते परत नाही यायचं.
-------------------------------------------------------------------
माणसं वचन देऊन आपले शब्द का बरं विसरतात...
मी तर ऐकलयं जिथे इच्छाशक्ती दाट असते....
तिथे मार्ग ही नतमस्तक होतात...
मग माणसं का साथ सोडून जातात.
-----------------------------------------
वेळ ......
एकतर वाट दावेल नाहीतर......
वाट लावेल.
वाट दावत असेल तर तिच्या सोबत रहा.
माञ तिला सोडलीत तर ती परत येणार नाही.
अन्
वाट लावत असेल तर तिच्या मागे रहा.
----------------------------------------------
कसं जगावं !
आपल्या हक्कातलं हक्काने मागावं..
आपल्या माणसाजवळ मनमोकळ वागावं.
आपल्यांच्या सुखासाठी स्वार्थीपण त्यागावं...
आपण असताना त्यांनी दुःख का बरं भोगावं.
आपल्या मायेत त्यांनी सदैव भिजावं.
असं जगाव.
-------------------------------------------
आज काही सुचत नाही ...
शब्दांच्या पलीकडे मन पोचत नाही.
आज काही.....
स्वतःचा स्वभावाच रुचत नाही.
आज काही......
-------------------------------------------
अस नाही की मला रडायला आवडत नाही....
पण....
मला कोणीही रडलेलं आवडत नाही.
कारण...
अश्रू म्हणजे देवाने आपल्याला दिलेले सर्वात मौल्यवान भेट आहे. ती मौल्यवान माणंसासाठीच आले पाहीजेत.
मनोगत...
माणूस मेल्यावर शेवटचे वस्ञ घालतो ते " कफन " ज्यालाही खिसा नसतो...
तरी आयुष्यभर माणूस पैसा मिळवण्यासाठी धडपडत असतो.
------------------------------------------------------------------
शब्दांना जिवंत करता आले असते तर......
मी जाणीव , एकनिष्ठता आणि माणूसकीला पहिले जिवंत केले असते...
-----------------------------------------------------------------------
देवाने माणसाला पाठीला डोळे नाही दिले ....
नाहीतर विश्वास घातक्यानां आनंदाने जगण्यासाठी वेळच मिळाली नसती.
------------------------------------------------------------------------
प्रत्येकजण .......
तसं कोणचं चुकीचा नसतो. प्रत्येकजन ........
फक्त स्वतःच्या जागेवर स्वतःसाठी बरोबर असतो.
तसं कोणचं भरवश्याचा नसतो.
प्रत्येकजण ........ स्वतःच्या सोयीने बेभरवश्याने वागतो.
तसं वाईट कोणीही नसतो.
प्रत्येकजण..... स्वतःच्या नजरेत नेहमी चांगला असतो.
----------------------------------------------------
इथं....
प्रत्येकजण घाईत आहे..... तरीही वेळेवर कोणचं पोचत नाही.
प्रत्येकजण मनापासून वागतो.... तरीही संशय घेणं सोडत नाही.
प्रत्येकजण मदत करतो.... पण स्वार्थ काही सोडत नाही.
-----------------------------------------------------------------
जिद्द .....
अनेकदा ठेच लागली आहे तरी ताठ मान करुन चालावं...
पडलं तरी स्वतःला तटस्थ राखावं....
पुढंच पाऊल पुन्हा जिद्दीने टाकावं....
आपलं धैर्य सिद्ध करावं ....
अन् आदर्श म्हणून उरावं.......
आपल नाव दगडावर नाही...तर माणसांच्या मनावर कोरावं.
-----------------------------------------------------------
एक दिवस असा येईल.....
तेव्हा हरवून जाणार आहोत स्वतःला.
मग उगाचच का बरं माणसं लपवून ठेवतात मनातल्या नात्याला.
त्यापेक्षा त्याला जपायचं...
भावनांच्या नाजुक क्षणानां अचूक आणि अलगद टिपायचं.
आपल्या माणसांना तुटून नाही द्यायचं कारण एकदा आपलं माणूस हरवलं तर ते परत नाही यायचं.
-------------------------------------------------------------------
माणसं वचन देऊन आपले शब्द का बरं विसरतात...
मी तर ऐकलयं जिथे इच्छाशक्ती दाट असते....
तिथे मार्ग ही नतमस्तक होतात...
मग माणसं का साथ सोडून जातात.
-----------------------------------------
वेळ ......
एकतर वाट दावेल नाहीतर......
वाट लावेल.
वाट दावत असेल तर तिच्या सोबत रहा.
माञ तिला सोडलीत तर ती परत येणार नाही.
अन्
वाट लावत असेल तर तिच्या मागे रहा.
----------------------------------------------
कसं जगावं !
आपल्या हक्कातलं हक्काने मागावं..
आपल्या माणसाजवळ मनमोकळ वागावं.
आपल्यांच्या सुखासाठी स्वार्थीपण त्यागावं...
आपण असताना त्यांनी दुःख का बरं भोगावं.
आपल्या मायेत त्यांनी सदैव भिजावं.
असं जगाव.
-------------------------------------------
आज काही सुचत नाही ...
शब्दांच्या पलीकडे मन पोचत नाही.
आज काही.....
स्वतःचा स्वभावाच रुचत नाही.
आज काही......
-------------------------------------------
अस नाही की मला रडायला आवडत नाही....
पण....
मला कोणीही रडलेलं आवडत नाही.
कारण...
अश्रू म्हणजे देवाने आपल्याला दिलेले सर्वात मौल्यवान भेट आहे. ती मौल्यवान माणंसासाठीच आले पाहीजेत.
मनोगत...

