आयुष्याच्या वाटेवर चालताना ...

पुढे कोणी नसलं तरी.....
मागे कोणी आहे का हे पाहणं जरुरी असतं....

नुसतं  बेभान चाललं राहील तर...
मागे वाळल्यावर कळत आपण फार पुढे आलोय....

पुढे जाण्याच्या सवयीमुळं मागे जाणं ही अशक्य होतं.
-------------------------------------------------

 जेव्हा......

विचारांचे वादळ मनात थैमान घालत असेल.
तेव्हा......
स्वतःला स्वतःच सावरायचे असते.

कितीही भरून  आलं तरी अश्रूनां आवरायचे असते.
-------------------------------------------------

बरं वाटत......

जेव्हा मन भरुन येत, तेव्हा अश्रू शब्द बनून बाहेर येतात.
अश्रू पाठवनं शक्य नसतं.. शब्द सहज पोचतात...
फक्त शब्दाचां अर्थ योग्य लावता आला पाहीजे...

मग अश्रूचं महत्त्व कळतं....
बरं वाटतं..... जेव्हा मन दाटतं.
-------------------------------------------------

असं नाही की मला भावनिक ओळीशिवाय काही सूचत नाही....

फक्त भावनांचा आदर केल्याशिवाय मला लिहता येत नाही.
-------------------------------------------------

माणसाला ञास कधी होतो.....

जेव्हा माणूस जसा स्वभाव आहे न वागता वेगळे वागण्याचा प्रयत्न करतो.
-------------------------------------------------

जीवनात वादळ तर येतातच....
गवताच्या पात्यासारखे वाकून राहीले पाहीजे....
आपण आपल्या जागेवर टिकून राहीले पाहीजे....
( कधीकधी मोडून जाण्यापेक्षा वेळरुपी वादळासमोर वाकल्याने माणूस लहान होत नाही.)
कारण... वादळ येते  आणि जात देखील. जीवनात आलेल वादळ म्हणजे.....

आपला  संयम आणि आत्मविश्वास याची परिक्षा असते.
-------------------------------------------------

ती म्हणाली .....

Frankly सांगते माझा तुझ्यावर प्रेम नाही..
तुझा माझा काही एक सबंध नाही...

मी ही म्हटलं.....

चल हटा... मी ही काही मंद नाही...
थुंकलेलं चाटण्याचा माझाही छंद नाही....
-------------------------------------------------

जानीव माझ्या मनातली !

खरं आहे....

मी तुम्हाला खूप छळलं....
तरी तुम्ही मला कधीच नाही टाळलं..

हे जेव्हा मला कळलं....
तेव्हापासून माझं मन तुमच्या कडे वळलं....

तुमच्या सारख्या गोड माणसांना मी गजर्या सारखं मनात माळलं...
----------------------------------------------------------------

तुम्ही  माझ्या मनोगताला म्हननं...
छान आहे....

यातच माझा मान आहे...
जग मोठं आहे आणि

माणसांच रान आहे.
-------------------------------------------------

तुमच्यासाठी लिहताना....

मन असं भरुन येतं....
अवखळ पाडस जणू गायीकडे दूरुन येतं.
-------------------------------------------------

असल्या जरी कठीण भविष्याच्या वाटा.....
येतीलच तुमच्या कीनार्याला  समाधानाच्या लाटा....

रोजच....

कारण भरती - ओहटी समुद्रात होणारच.....
नैराश्य जाऊन समाधान आपल्याकडे येणारंच....
-------------------------------------------------

झाड आकाशाच्या दिशेने वाढत असले तरी जमिनीशी एकनिष्ठ असते.
जसे...

मुळांनी वाढलेल्या झाडाला तुम्ही मुळांसहीत उपटून काढू शकत नाही...
तसेच...

भावनांनी जोडलेल्या नात्याला तुम्ही मनापासून वेगळं करु शकत नाही...
जशी मुळं जमिनीशी एकरुप होतात तश्याच भावना मनाशी एकरुप होतात....

मनोगत....... 😊

No comments:

Post a Comment