नक्की काय होऊ....
कोणाच्या ओठांवर हसू आणायला ..
जोकर होऊ.
की
कोणाच्या जीवनात गोडवा आणायला ... साखर होऊ.
नक्की काय होऊ.
मेंदू मध्ये राहून... साठवण होऊ.
की
मना मध्ये राहून .... आठवण होऊ.
नक्की काय होऊ.
जे असूनही ज्यांना ओळख नाही त्याचं .... अस्तित्व होऊ.
की
ज्यानां स्वतःचे जाणवलं आहे पण इतरांना ओळख करुन देण्यासाठी त्यांचा ..... मार्ग होऊ.
नक्की काय होऊ.
-----------------------------------------------------
जाण्याआधी असं काहीतरी करुन जावं.......
की आपण नसल्यावरही आठवणीत एखाद्याचे मन भरुन यावं.
तसे सिमेंट-विटांच्या घरात तर सारेच राहतात......
आपण एखाद्याच्या मनात घर करुन जावं.
वेळच नाही तर आपलेही दुःखाचे अश्रू देतेच.....
आपण एखाद्याच्या डोळ्यात आनंदअश्रू येतील अशी आठवण देऊन जावं.
जगण्यासाठी अन्न-पाणी कोणीही देतं किंवा मिळवतं......
आपण एखाद्याला जगण्यासाठी नवी उमेद देऊन जावं.
आनंद आणि पैसा मिळवाण्यासाठी सारेच नवी तंत्र शोधत असतात .....
आपण एखाद्याला समाधान आणि संयम याचा कानमंञ देऊन जावं.
जाण्याआधी असं काहीतरी करावं की......
-------------------------------------------------
कसं असतं जणातं जाणे फार सोपे असते....
एखाद्याच्या मनात जाणे तितकेच अवघड असते.
जणात लोक धनाने मोठे होत असतात..
मनात माञ मानाने मोठे होत असतात .
सत्ता- संप्पती संपली की जणातली एखाद्याची जागा सहज बदलते....
मनातली जागा जागा माञ शुद्ध प्रेमाने कायम राहते.
म्हणूनच जणात जागा मिळवण्यापेक्षा एखाद्याच्या मनात जागा मिळवावी .
-------------------------------------------------
मग नक्की का स्वार्थी आपण.....
तहानेपेक्षा जास्त पाणी पीत नाही कोणपण.
मग नक्की कशासाठी.....
नेहमी देवळात जाऊन येत नाही देवपण.
मग नक्की कशासाठी......
अमाप पैसा मिळवून कधी येत नाही शहाणपण.
मग नक्की कशासाठी.....
पोटात मावेल इतकच नेहमी खातो प्रत्येकजण.
मग नक्की कशासाठी......
मेल्यावर उंचीएवढीच जागा व्यापतो देहपण.....
मग नक्की कशासाठी......
संकटात नसतात आजूबाजूला चारजण.
मग नक्की कशासाठी......
-------------------------------------------------
कपडे आणि नाती....
आजकाल नाही माणसं ..
कपड्यासारखी बदलतात...
अगदी जुन्या कपड्याचा नवीन कपडे आल्यानंतर कसा विसर होतो...
अगदी तसेच नवी नाती जुळून आली की जुन्या नात्त्यानां माणूस विसरतो.
पण माणसं विसरतात...
कपडे निर्जीव आणि नाती सजीव असतात...
कपडे धाग्यांनी आणि नाती भावनांनी बनलेली असतात....
कपडे नटायला पण नाती आपल्यांसाठी झटायला असतात....
कपडे तन सांभाळतात आणि नाती मन सांभाळतात...
--------------------------------------------------------
पाहतो मी अनेक वेळा...
माझ्याच डोळ्यांनी ......
अस्पष्ट होणाऱ्या समोरच्या क्षणाला .
कळत नाही मला ....
मी काय करावं माझ्या समोरच्या बावरलेल्या मनाला.
अचानक माझ्या ....
नकळत होणाऱ्या अनपेक्षित हालचाली कशा कळतील कोणाला.
का सावरते वेळ मला नेहमी ...
अशा असह्य वेदना देऊन
कळेल का यातना माझी कधीतरी देवाला.
अचानक आलेला कंटाळा शब्दात उतरला आहे... टेन्शन नसावे.
मनोगत......

No comments:
Post a Comment