का बरं जमतं नाही माणसाला "नाक " होऊन वागायला इतरांना दोष न देता जे योग्य ते स्वीकारायला.
हवेत असंख्य इतर नको असलेले वायु असतानाही नाक कसं फक्त आँक्सीजन शोषून घेतं.
का बरं जमतं नाही माणसाला " सूर्य " होऊन वागायला इतरांना दोष न देता निरपेक्ष जगायला.
एकमाञ तेजस्वी आणि स्वयंपूर्ण शक्ती असतानाही सर्वांनी आपल्याला पाहिलंचं पाहिजे असं हट्ट न करणं.
-------------------------------
काही सन दिवसाचे तर काही मोजक्या दिवसाचे, काही एक दिवसाचा आनंद देतात तर काही मोजक्या दिवसांचे.
माणूसही हे सारे सन साजरे करतो आणि त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
पण जन्मापासून मरणापर्यत जो सन रोज सोबत करतो एकनिष्ठपणे , आपण दुर्लक्ष केले तरी नियमित येतो आपली सोबत करायला त्याला कधीच जाणीवपूर्वक आंनदानै न्याहळत नाही.
अर्थात.... माणसाचा स्वभावाच असतो क्षणभंगुर आनंदात जगण्याचा, शाश्वत समाधान सोडून.
-------------------------------
आनंद आणि समाधान या एकमेकानां पूरक गोष्टी आहेत. जसं दूध आणि त्यावर येणारी साय. दूध म्हणजे आनंद आणि साय म्हणजे समाधान.
दूधाशिवाय साय तयार होत नाही कारण ती शाश्वत आहे, साईमधून लोणी किंवा तूपच तयार होतं. त्यामुळे साय नसेल तर दूध नासतं.
तसंच शुद्ध आनंदाशिवाय शाश्वत समाधान निर्माण होत नाही. ते क्षणभंगुर समाधान माणसाला नेहमी क्षणभंगुर गोष्टी शोधायला लावत.
अश्या क्षणभंगुर गोष्टीसाठी जन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा एखादी गोष्ट शाश्वत करावी. सगळे कसतात ते सगळ्यानांच येत , एक काहीतरी इतरांपेक्षा वेगळ करण्यातच शाश्वत समाधान असतं.
"तुम्ही जरी साऱ्या गोष्टीचे गुलाम असलात तरी एका गोष्टीचे राजा असावं ".
-------------------------------
कायम रहावी आठवण !
आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात अनेक माणसं येतात. जरुरीचं नसतं ती सारीचं मनात जागा घेतात.
पण त्यातली काही अचूक स्वतःच अस्तित्व कोरतात. अश्या माणसांशी जोडावं मन... अन् मनात तुमच्या त्यांची कायम रहावी आठवण.
जन्माला आलेला प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडणार, वेळ आली की मरणार. जन्म - मृत्यू शाश्वत सत्य आहे ते देव ही नाही खोडणारं.
अश्या या प्रवासात जोडावा प्रत्येक क्षण.. अन् तुमच्या आयुष्यात त्यांची कायम रहावी आठवण.
-------------------------------
आवडत नाही माझ्या पावलांनां अडखळून पडण्याची भीती, अनेकांची नीती जरी माझी वाट अडवण्याची होती.
मनी नाही माझ्या नसलेल्यांची खंत आता, दुःख करण्यास त्याचे नाही मला उसंत आता.
प्रवास हा आत्मशोधाचा माझा असेल सदैव निरंतर, जरी वाढले अनपेक्षित विश्वासाच्या नात्यांमधील अंतर.
-------------------------------
मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं. आता म्हणालं तरी असे का करता, समोरच्याच मन का मारता?
खरं सांगू... मला माझा स्वभाव लपवता येत नाही. उगाचच खोटे भाव आणून समोरच्याला फसवता येत नाही.
पण खरंच सागतो मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं.
-------------------------------
कसा गुंतला जीव माझा तुमच्या मनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
जुळले कसे हे नाते आपूले अन् कोणत्या क्षणी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
संगंम हा आपूल्या आयुष्याचा कधी आदर्श जाहला जनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
प्रेम लाभले असे मला हा जन्म तुमचा ज्ञ्रुनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
-------------------------------
काय देणार आपण एकमेकाला, जर कामी आलो नाही योग्य क्षणाला.
काय करणार अशा धनाला, जे समाधान देत नाही मनाला.
काय म्हणून मारायचं स्वतःला, जर फरक पडत नसेल त्यानं कोणाला.
काय देतो आपण अशा माणसाला, जे सर्वस्व अर्पण करत आपल्याला.
-------------------------------
धक्का देणारे बरेच असतात, पुढे नेण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी...
आपण स्वतःला सावरणं जरुरीचं असतं.
भडकवणारे बरेच असतात, जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी...
आपण स्वतःला आवरण जरुरीचं असतं.
शिजवणारे बरेच असतात , वाढण्यासठी नाहीतर नातं मोडण्यासाठी....
आपण न बावरणं जरुरीचं असतं.
मनोगत...
हवेत असंख्य इतर नको असलेले वायु असतानाही नाक कसं फक्त आँक्सीजन शोषून घेतं.
का बरं जमतं नाही माणसाला " सूर्य " होऊन वागायला इतरांना दोष न देता निरपेक्ष जगायला.
एकमाञ तेजस्वी आणि स्वयंपूर्ण शक्ती असतानाही सर्वांनी आपल्याला पाहिलंचं पाहिजे असं हट्ट न करणं.
-------------------------------
काही सन दिवसाचे तर काही मोजक्या दिवसाचे, काही एक दिवसाचा आनंद देतात तर काही मोजक्या दिवसांचे.
माणूसही हे सारे सन साजरे करतो आणि त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
पण जन्मापासून मरणापर्यत जो सन रोज सोबत करतो एकनिष्ठपणे , आपण दुर्लक्ष केले तरी नियमित येतो आपली सोबत करायला त्याला कधीच जाणीवपूर्वक आंनदानै न्याहळत नाही.
अर्थात.... माणसाचा स्वभावाच असतो क्षणभंगुर आनंदात जगण्याचा, शाश्वत समाधान सोडून.
-------------------------------
आनंद आणि समाधान या एकमेकानां पूरक गोष्टी आहेत. जसं दूध आणि त्यावर येणारी साय. दूध म्हणजे आनंद आणि साय म्हणजे समाधान.
दूधाशिवाय साय तयार होत नाही कारण ती शाश्वत आहे, साईमधून लोणी किंवा तूपच तयार होतं. त्यामुळे साय नसेल तर दूध नासतं.
तसंच शुद्ध आनंदाशिवाय शाश्वत समाधान निर्माण होत नाही. ते क्षणभंगुर समाधान माणसाला नेहमी क्षणभंगुर गोष्टी शोधायला लावत.
अश्या क्षणभंगुर गोष्टीसाठी जन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा एखादी गोष्ट शाश्वत करावी. सगळे कसतात ते सगळ्यानांच येत , एक काहीतरी इतरांपेक्षा वेगळ करण्यातच शाश्वत समाधान असतं.
"तुम्ही जरी साऱ्या गोष्टीचे गुलाम असलात तरी एका गोष्टीचे राजा असावं ".
-------------------------------
कायम रहावी आठवण !
आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात अनेक माणसं येतात. जरुरीचं नसतं ती सारीचं मनात जागा घेतात.
पण त्यातली काही अचूक स्वतःच अस्तित्व कोरतात. अश्या माणसांशी जोडावं मन... अन् मनात तुमच्या त्यांची कायम रहावी आठवण.
जन्माला आलेला प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडणार, वेळ आली की मरणार. जन्म - मृत्यू शाश्वत सत्य आहे ते देव ही नाही खोडणारं.
अश्या या प्रवासात जोडावा प्रत्येक क्षण.. अन् तुमच्या आयुष्यात त्यांची कायम रहावी आठवण.
-------------------------------
आवडत नाही माझ्या पावलांनां अडखळून पडण्याची भीती, अनेकांची नीती जरी माझी वाट अडवण्याची होती.
मनी नाही माझ्या नसलेल्यांची खंत आता, दुःख करण्यास त्याचे नाही मला उसंत आता.
प्रवास हा आत्मशोधाचा माझा असेल सदैव निरंतर, जरी वाढले अनपेक्षित विश्वासाच्या नात्यांमधील अंतर.
-------------------------------
मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं. आता म्हणालं तरी असे का करता, समोरच्याच मन का मारता?
खरं सांगू... मला माझा स्वभाव लपवता येत नाही. उगाचच खोटे भाव आणून समोरच्याला फसवता येत नाही.
पण खरंच सागतो मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं.
-------------------------------
कसा गुंतला जीव माझा तुमच्या मनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
जुळले कसे हे नाते आपूले अन् कोणत्या क्षणी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
संगंम हा आपूल्या आयुष्याचा कधी आदर्श जाहला जनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
प्रेम लाभले असे मला हा जन्म तुमचा ज्ञ्रुनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
-------------------------------
काय देणार आपण एकमेकाला, जर कामी आलो नाही योग्य क्षणाला.
काय करणार अशा धनाला, जे समाधान देत नाही मनाला.
काय म्हणून मारायचं स्वतःला, जर फरक पडत नसेल त्यानं कोणाला.
काय देतो आपण अशा माणसाला, जे सर्वस्व अर्पण करत आपल्याला.
-------------------------------
धक्का देणारे बरेच असतात, पुढे नेण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी...
आपण स्वतःला सावरणं जरुरीचं असतं.
भडकवणारे बरेच असतात, जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी...
आपण स्वतःला आवरण जरुरीचं असतं.
शिजवणारे बरेच असतात , वाढण्यासठी नाहीतर नातं मोडण्यासाठी....
आपण न बावरणं जरुरीचं असतं.
मनोगत...






