कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.

जर कधी मन खूपच नाराज असेल , आणि स्वतःजवळ कोणीच नसेल.
तेव्हा मनाला संयमाचा आधार द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा...
विचारांची वादळं तर असणारचं , एकटेपणा कधीतरी भासणारचं.
अशावेळी मनाला स्वतःचं भाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
जसे भासते तसे असतेच असे नाही , आपले दुःख सांऱ्यांनां दिसतेच असे नाही.
अशावेळी मनाला क्षणांचा गाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
-----------------------

बऱ्याच काळानंतर पाहिले मी तीला काल.
तेव्हा ही तशीच जसं माकडं म्हणतं "माझीच लाल."
मी म्हटलं" दिसत नाहीस हल्ली.
"म्हणाली" अजून सोडली नाही गल्ली".
मी म्हटलं मला तर म्हणाली होतीस मुलांची लाईन लावीन, तेव्हा मला वाटलं शिस्त प्रमुख होशील.
वाटलं नव्हतं अशी वाया जाशील. म्हणाली.."वाया गेलयं माझ खेटर.. माझा नवा छावा आहे चायनीज हाँटेलात वेटर.
मी म्हटलं.... मस्त! तुझ्या मोठ्या स्वप्नांनां आणखीन काय असेल बेटर.
मी म्हटलं अगं आता तरी सुधर, आवर जरा पदर.
"म्हणाली" पदर तर पडणारच रे, वाऱ्यावार उडणारचं रे.
"मी म्हटलं" अगं अशी किती दिवस वाऱ्यावर ठेवणार.
"म्हणाली" अजून मी तरूण आहे, सारं काही भरून आहे.
मी म्हटलं ठीक , वेळ आल्यावर शिक.
जे इतरांची ठेवत नाहीत इज्जत,  त्यांची अशीच राहणार भाजत.
मग भाजल्यावर झाले जरी कडक हाल, तरी माकड म्हणणार माझीच लाल.
-----------------------

शिऱ्याची प्लेट आली की त्यात रवा, काजू, बदाम, मणूके, बेदाणे सगळंच दिसत होतं.आपल्याला ते सगळं आकर्षित करत आणि ते पाहून आपण भारावून जातो.
पण ज्या मुळे तो शिरा गोड लागतो ती साखर आपल्या सहज लक्षात येत नाही कारण ती दिसत नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असतं. दिसत नसलं तरी आपल्यामुळे त्या व्यक्तीला गोडवा आणि पूर्णत्व मिळावं यासाठी आपण सहज विरघळून जातो आणि एकरूप होतो.
आपला जीवन रुपी शिरा देखील असाच असतो. जीवनात त्याला बदाम, काजू, मणुके, बेदाणे अशा रूपात येणारी माणसं सहज दिसतात आणि त्यात आपण भारावून जातो.
पण आपल्यासाठी विरघळलेलं आणि  एकरुप झालेलं साखर रुपी माणूस आपण सहज विसरतो.
-----------------------

झिडकारलं जरी जणानं मला, तरी आधार द्यावा मनानं मला.
दूर केल जरी इतरांनी मला, जवळ ठेवावं माझ्यांनी मला.
तिरस्कारलं जरी परक्यांनी मला, तरी स्वीकारावं माझ्यांनी मला.
झालो जरी कधी अपरिचित या विश्वाला, परिचित असावं मी माझ्या विश्वासाला.
-----------------------

जीवनाचा प्रवास.......
ऐश्वर्य भोगताना आईच्या गर्भात, जेव्हा घेता येत नव्हता स्वतःहून श्वास.
तेव्हापासून सुरू झाला हा प्रवास....
जोपर्यंत जात नाही पुन्हा आईच्या गर्भात तो पर्यंत सुरू राहणार हा जीवनाचा प्रवास.
-----------------------

काय पाहतोस रे मना, जे दिसत नाही कुणा !
का बावरतोस रे मना, तरी कळतं नाही कुणा !
काय मागतोस रे मना, जे देता येत नाही कुणा !
का उदास होतोस रे मना, जर कळत नसेल कुणा !
-----------------------

चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
नेहमीच कोणासाठी तरी किंवा  कशासाठी तरी धावतोय, एकदाच मिळणाऱ्या या जन्मातील अनमोल क्षणांनां गमावतोय. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
काय करतोय तर फक्त मनाची ओढातानं, कशासाठी फक्त कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी अन् मग आपल्या मर्जीचं काय? म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.........
खरंतर सारे मस्त असतात आपआपल्या जगात, सारे रंग राखलेले आणि त्यात सोयीने माखलेले. आपणच बेरंग वाटतो सगळ्यांना. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या..........
-----------------------

काय करायचं जेव्हा सारं काही प्रतिकूल असतं !
असं वागायचं........
जणू जे होतयं ते सारं होणारच आहे , आयुष्य थोडं खाली-वर करणारंच.                                                                 घाबरायंंच नाही, बिनधास्त रहायंच !
असं वागायचं.....
आपली वाटणारी माणसं ही आपली नसतात, रक्ताच्या नात्याची अंग काढून बसतात.
तूटायंच नाही, तटस्थ रहायंच !
असं वागायचं..........
आपण परिपूर्ण  प्रयत्न करतोय , जिंकायचंच आहे असा निर्धार मनी धरतोय तरीही हरतोय.
पडायंच नाही, फक्त लढायंच !
असं वागायचं........
-----------------------

सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त आकर्षण ! मनं जुळण्याचा एकही क्षण नसतो.  तेव्हा प्रेमात ....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त देखावा ! प्रत्यक्षात काहीच हवा नसते. अशा मैञीत .......
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त विरंगुळा ! एकमेकांबाबत जराही लळा नसतो. अश्या नात्यात.....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
-----------------------

धन्य मम हा जन्म जाहला, या जन्मी मज तुम्ही लाभला.
एकमाञ हा जन्म जाहला, अस्तित्व मार्ग या मनी कोरला.
येथेच मज हो देव भावला, तुमच्या सहवासात पावला.
अधिक नको आता काही मजला, अतुट असावा मनबंध आपला.
-----------------------

माझं मनोगत जेव्हा काही गोष्टी मांडत असतं,
तेव्हा ते प्रत्यक्षात त्या गोष्टी विरूद्ध भांडत असतं.
माझं मनोगत म्हणजे कोणाच्या विरोधात जाण्याचं तंञ नसतं,
कारण प्रत्येकाला मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य असतं.
म्हणूनच मला ही माझं विचार स्वातंत्र्य वापरून वागायला आवडतं,
अन् ... कोणालाही खटकलं तरी जे खरं ते सांगायला आवडतं.
मनोगतातलं कोणी काय घ्यायचं आणि टाळायचं हा ज्याचं त्यानं ठरवायचं असतं,
मला फक्त माझ्या मनाला प्रत्यक्ष  मांडायचं असतं.

मनोगत...

No comments:

Post a Comment