आपण निर्मळ वागलं तरी संशयाला जास्त बळ आहे, निरागस भावनांना नेहमीच फसवणूकीचे फळ आहे....
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
स्वार्थ येथे पावलांवर आणि एकनिष्ठता मैलावर तरी, निस्वार्थी नात्यांवर अविश्वासाचा मळ आहे...
असं वाटतय माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
मेंदू म्हणजे खोटेपणाची एकमाञ कळ आहे, मनाचा माञ यामध्ये नेहमीच छळ आहे.
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
---------------------------
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आंनंदाचे नाही तर कधीतरी कोणीतरी अलगद सावरलेले क्षणही आठवायचे असतात.
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आपण कोणाला हरवले होते हे आठवण्यापेक्षा कधीतरी आपण हरुणही जिंकलो होतो.
असे क्षणच साठवायचे असतात.....
आपण काय कमावले आणि काय गमावले याचाच विचार करण्यापेक्षा कधीतरी आपण कधी आणि कशात समाधान मिळवले.
असे क्षणच साठवायचे असतात.....
---------------------------
असं काही तरी करुन जाईन......
नेहमीच जिकंता आलं नाही तरी, तुमच्यासाठी हरुणही जिंकून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
कायम कोणाच्याही आयुष्यात नाही राहिलो तरी , सांऱ्यांच्या आठवणीत उरून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
स्वीकारली नाही जरी मी संसाराची जबाबदारी तरी, तुम्हाला जबाबदारी शिकवून जाईन.
असं काही तरी करुन जाईन.......
शरीराने जरी राहिलो जवळ तुमच्या तरी , मनाने निरंतर तुमचाच राहीन.
असं काही तरी करुन जाईन.....
मरण अटळ आहे माहीत आहे मला तरी , दुसरा जन्म तुमच्याच गर्भी घेऊन पुन्हा तुमच्या जवळ हक्काने राहीन.
असं काही तरी करुन जाईन......
---------------------------
मलाही वरवरच वागता येईल, पण तसं केलं तर जगण्यातला अर्थच निघून जाईल.
मलाही अंग काढून व्यवहारीक वागता येईल, पण तसं केलं तर आपल्या नात्यातला आत्मा निघून जाईल.
आत्मा नसल्यास शरीर जसे निरर्थक असते, तसचं नात्यात आत्मियता नसेल तर ते निरर्थक आहे.
---------------------------
माणसानं आपल्या गेलेल्या आयुष्यातील आठवणींनां कधीच कुरवाळत बसू नये, कारण त्या आठवणी असतात.
त्यांची तुलना कधीच वर्तमानातील आयुष्याशी करु नये, कारण प्रत्येक घटना परिस्थितीवर अवलंबून असते.
आपण सद्य परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य असते.
आपण परिस्थिती किंवा स्वतःला बदलू शकतो, वेळ बदलता येत नाही कारण ती कायम अरिवर्तनीय असते.
---------------------------
कोणासाठी चांगले तर कोणासाठी वाईट असतो आपण , खरंतर जसे ज्यांचे विचार असतात तसे त्यांना वाटतो आपण.
कोणासाठी छान तर कोणासाठी घान असतो आपण, खरंतर जशी ज्यांची नजर असते तसे त्यांना दिसतो आपण.
कोणासाठी मनामध्ये तर कोणासाठी जनामध्ये असतो आपण, खरंतर जशी ज्यांची भावना तसे त्याच्यांत असतो आपण.
---------------------------
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते !
एकञ selfi काढणारे आणि त्यासोबत 'Best friend' 'made for each other' वैगरे बरचं काही लिहणारे, वेळ आली की फक्त selfish च वागतात.....
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते...
जीवनातलं सगळं काही सपलं आहे असे dp वर चिञ आणि status ठेवणारे आणि दयनीय स्थिती दाखवून सात्वनं करुन घेणारे, प्रत्यक्षात मस्त मजा करत असतात..
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते. एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे असे भासवणारे, पाठ फीरताच निंदेची घंटा वाजवतात.
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते.
---------------------------
बरं झालं .. देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं....
नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
कारण काचेच्या मागच्या भागाला गंधकाचा लेप दिल्यावर आरसा बनतो, तसेच चेहऱ्यावर भावनांचा लेप आल्यावर चेहऱ्याचा आरसा होतो.
म्हणूनच म्हटलं ! बरं झाल ..देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं. नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
---------------------------
सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
चारचौघात कमरेत हात, अन् घरच्यांनां कळलं तर सापाची कात.सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
औकात काडीची आणि वार्ता माडीची, आईबापाच्या कमाईवर फुकटचा देखावा असतं.
सूरवातीला कूरकूरीत नंतर चाहात बुडवलेली खारी असतं, पण आजकालाच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
एकमेकांच्या हातावर एकमेकांचं नाव नाहीतर नावाचं अल्फाबेट, बाकी सगळं पिक्चर नाहीतर सिरियलचा सेट असतं.
भाड्याची बाईक अन् मागे तोडांवर स्कार्फ लावून पोरी असं असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
सगळ्यांचे लवर म्हणून आपला पण लवर प्रत्यक्षात मनावर नसतो आवर, खरंतर हा फक्त फँशनचा फीवर असतं.
प्रदर्शन नुसतं असंस्कारी असं टपोरी असतं, आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
---------------------------
जीवनाचा आनंद आपल्या जीभेच्या दर्जावर अवलंबून असतो.
जीवनाचे समाधान आपल्या मनाच्या गर्भावर अवलंबून असते.
---------------------------
नाती कधीच नैसर्गिक रित्या मरत नाहीत त्यांची हत्या केली जाते .....
स्वार्थ, अहंम, संशय, अविश्वास, निरर्थक अपेक्षा किंवा दुर्लक्ष अश्या प्रवृत्ती मधून.
---------------------------
असे जगाया शिकव क्षणा... जपून घेण्या माझ्याच्या मना.
चेहऱ्याला या माझ्या आता कृतीत जरा तु आण मना... निरागस जगाया शिकव क्षणा.
---------------------------
तुम्ही तुमच्या समोरची परिस्थिती बदलू शकत नाही....
तुम्ही बदलू शकता फक्त तीला सामोरे जाण्याचा योग्य पर्याय आणि तंत्र.
---------------------------
जेव्हा तुमच्याकडे कोणाचे लक्ष नसेल तेव्हा तुमचे स्वतःवर लक्ष असणे जरूरीचे आहे. कारण इतरांना तुमच्या बाबतीत विचार करायला वेळ नसतो तेव्हा तुम्ही त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रत्येकाला आपलं लक्ष असतं , म्हणूनच तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवणं जरुरीचं असतं.
---------------------------
हसतानाही दुःखाचे गहीवर आवरता आले पाहीजेत.
खुप काही बोलताना आपले शब्द सावरता आले पाहीजेत.
मनोगत...
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
स्वार्थ येथे पावलांवर आणि एकनिष्ठता मैलावर तरी, निस्वार्थी नात्यांवर अविश्वासाचा मळ आहे...
असं वाटतय माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
मेंदू म्हणजे खोटेपणाची एकमाञ कळ आहे, मनाचा माञ यामध्ये नेहमीच छळ आहे.
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
---------------------------
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आंनंदाचे नाही तर कधीतरी कोणीतरी अलगद सावरलेले क्षणही आठवायचे असतात.
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आपण कोणाला हरवले होते हे आठवण्यापेक्षा कधीतरी आपण हरुणही जिंकलो होतो.
असे क्षणच साठवायचे असतात.....
आपण काय कमावले आणि काय गमावले याचाच विचार करण्यापेक्षा कधीतरी आपण कधी आणि कशात समाधान मिळवले.
असे क्षणच साठवायचे असतात.....
---------------------------
असं काही तरी करुन जाईन......
नेहमीच जिकंता आलं नाही तरी, तुमच्यासाठी हरुणही जिंकून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
कायम कोणाच्याही आयुष्यात नाही राहिलो तरी , सांऱ्यांच्या आठवणीत उरून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
स्वीकारली नाही जरी मी संसाराची जबाबदारी तरी, तुम्हाला जबाबदारी शिकवून जाईन.
असं काही तरी करुन जाईन.......
शरीराने जरी राहिलो जवळ तुमच्या तरी , मनाने निरंतर तुमचाच राहीन.
असं काही तरी करुन जाईन.....
मरण अटळ आहे माहीत आहे मला तरी , दुसरा जन्म तुमच्याच गर्भी घेऊन पुन्हा तुमच्या जवळ हक्काने राहीन.
असं काही तरी करुन जाईन......
---------------------------
मलाही वरवरच वागता येईल, पण तसं केलं तर जगण्यातला अर्थच निघून जाईल.
मलाही अंग काढून व्यवहारीक वागता येईल, पण तसं केलं तर आपल्या नात्यातला आत्मा निघून जाईल.
आत्मा नसल्यास शरीर जसे निरर्थक असते, तसचं नात्यात आत्मियता नसेल तर ते निरर्थक आहे.
---------------------------
माणसानं आपल्या गेलेल्या आयुष्यातील आठवणींनां कधीच कुरवाळत बसू नये, कारण त्या आठवणी असतात.
त्यांची तुलना कधीच वर्तमानातील आयुष्याशी करु नये, कारण प्रत्येक घटना परिस्थितीवर अवलंबून असते.
आपण सद्य परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य असते.
आपण परिस्थिती किंवा स्वतःला बदलू शकतो, वेळ बदलता येत नाही कारण ती कायम अरिवर्तनीय असते.
---------------------------
कोणासाठी चांगले तर कोणासाठी वाईट असतो आपण , खरंतर जसे ज्यांचे विचार असतात तसे त्यांना वाटतो आपण.
कोणासाठी छान तर कोणासाठी घान असतो आपण, खरंतर जशी ज्यांची नजर असते तसे त्यांना दिसतो आपण.
कोणासाठी मनामध्ये तर कोणासाठी जनामध्ये असतो आपण, खरंतर जशी ज्यांची भावना तसे त्याच्यांत असतो आपण.
---------------------------
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते !
एकञ selfi काढणारे आणि त्यासोबत 'Best friend' 'made for each other' वैगरे बरचं काही लिहणारे, वेळ आली की फक्त selfish च वागतात.....
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते...
जीवनातलं सगळं काही सपलं आहे असे dp वर चिञ आणि status ठेवणारे आणि दयनीय स्थिती दाखवून सात्वनं करुन घेणारे, प्रत्यक्षात मस्त मजा करत असतात..
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते. एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे असे भासवणारे, पाठ फीरताच निंदेची घंटा वाजवतात.
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते.
---------------------------
बरं झालं .. देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं....
नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
कारण काचेच्या मागच्या भागाला गंधकाचा लेप दिल्यावर आरसा बनतो, तसेच चेहऱ्यावर भावनांचा लेप आल्यावर चेहऱ्याचा आरसा होतो.
म्हणूनच म्हटलं ! बरं झाल ..देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं. नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
---------------------------
सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
चारचौघात कमरेत हात, अन् घरच्यांनां कळलं तर सापाची कात.सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
औकात काडीची आणि वार्ता माडीची, आईबापाच्या कमाईवर फुकटचा देखावा असतं.
सूरवातीला कूरकूरीत नंतर चाहात बुडवलेली खारी असतं, पण आजकालाच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
एकमेकांच्या हातावर एकमेकांचं नाव नाहीतर नावाचं अल्फाबेट, बाकी सगळं पिक्चर नाहीतर सिरियलचा सेट असतं.
भाड्याची बाईक अन् मागे तोडांवर स्कार्फ लावून पोरी असं असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
सगळ्यांचे लवर म्हणून आपला पण लवर प्रत्यक्षात मनावर नसतो आवर, खरंतर हा फक्त फँशनचा फीवर असतं.
प्रदर्शन नुसतं असंस्कारी असं टपोरी असतं, आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
---------------------------
जीवनाचा आनंद आपल्या जीभेच्या दर्जावर अवलंबून असतो.
जीवनाचे समाधान आपल्या मनाच्या गर्भावर अवलंबून असते.
---------------------------
नाती कधीच नैसर्गिक रित्या मरत नाहीत त्यांची हत्या केली जाते .....
स्वार्थ, अहंम, संशय, अविश्वास, निरर्थक अपेक्षा किंवा दुर्लक्ष अश्या प्रवृत्ती मधून.
---------------------------
असे जगाया शिकव क्षणा... जपून घेण्या माझ्याच्या मना.
चेहऱ्याला या माझ्या आता कृतीत जरा तु आण मना... निरागस जगाया शिकव क्षणा.
---------------------------
तुम्ही तुमच्या समोरची परिस्थिती बदलू शकत नाही....
तुम्ही बदलू शकता फक्त तीला सामोरे जाण्याचा योग्य पर्याय आणि तंत्र.
---------------------------
जेव्हा तुमच्याकडे कोणाचे लक्ष नसेल तेव्हा तुमचे स्वतःवर लक्ष असणे जरूरीचे आहे. कारण इतरांना तुमच्या बाबतीत विचार करायला वेळ नसतो तेव्हा तुम्ही त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रत्येकाला आपलं लक्ष असतं , म्हणूनच तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवणं जरुरीचं असतं.
---------------------------
हसतानाही दुःखाचे गहीवर आवरता आले पाहीजेत.
खुप काही बोलताना आपले शब्द सावरता आले पाहीजेत.
मनोगत...

No comments:
Post a Comment