आता ठरवलयं...

आता ठरवलयं कोणालाही स्वतःला सहज घेऊ द्यायचे नाही, आणि कोणावरही भरवसा ठेऊन राहायचे नाही.
लायक राहून आपली जागा सांभाळायची आणि प्रत्येकाला त्यांच्या लायकीनूसार जागा घेऊ द्यायची. आपण योग्य आहोत यावर तटस्थ राहून इतरांच्या योग्यतेचा आदर करत राहायचंं.
पहिल्या सारखंच कोणाला आवडलो नाही तरी स्वतःच्या मनासारखंच वागायचं. उद्यापासून पुन्हा सरळ आणि स्पष्ट जगायचं.
-------------------

जर कोणाला काही देण्याची वेळ आली तर आपण त्या व्यक्तीला तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे.
प्रत्येकाला स्वतःजवळ काय आहे फार चांगलं माहीत असतं.
-------------------

उधळावे रंग आपल्या मनातील विचारांचे गुदमरलेलं मन तरी मुक्त होईल.
ओघळु द्यावे अश्रू सारे भावनांचे नात्यातील सारे बंध तरी घट्ट होतील.
--------------------

मला ओळखणाऱ्यानां  माझ्याबद्दल तर्क लावून वागतात आणि  न ओळखणारे सहज स्वीकारतात.
मला ओळखणारे माझ्यावर सहज बोट उगारतात आणि न ओळखणारे माझं बोट धरायला सरसावतात.
अर्थात.... आपली ओळख फक्त विश्वासातील माणसांना करुन द्या कारण साधेपणाचा बुरखा पांघरूण अनेक लोक आपल्या पोळ्या भाजत असतात.
--------------------

काही एकमाञ वस्तूंना बदलण्याचा निरर्थक प्रयत्न करणे जसे चुकीचे आहे.
तसेच काही पाञ व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला मूर्ख ठरवण्यासारखे असते.
--------------------

संत मंडळी सांगून गेली, "निंदकाचे घर असावे शेजारी". पण आता अश्या निंदकानां तुम्ही शेजारीच नाही तर समोरी - माघारी तसेच आजूबाजूला ही पाहू शकता.
आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे कारण माणसं त्यांच्या सोयीनेच विचार करतात.
--------------------

मला माणसं तेव्हा फार विशेष वाटतात जेव्हा ती कोणताही मुखवटा सहज घालतात.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ती विश्वासातील व्यक्तीला खोटं सांगून त्याला वेडात काढल्याचा आनंद साजरा करतात.
--------------------

पुन्हा एकदा सुरू झाला आज शोध.......
कसला ? माहीत नाही. पण सकाळी उठून समस्त शरीर यंञासारखं काम करु लागेल.
पण या यंञाच्या कार्यातून निर्माण होणारं उत्पादन ज्यांना माहित असेल त्यांना आजच्या मेहनतीचा मोबदला " पैसा " आणि मानधन " समाधान " मिळेलच.
अर्थात... तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये स्वतःला एकरुप करा.
--------------------

माणसानं प्रयत्न करणं थांबवून चमत्काराची वाट पाहणे म्हणजे निष्क्रियता.
समोरच्यांनी आपणास कितीही कमजोर केले तरी तटस्थ प्रयत्न करणे म्हणजे सक्रीयता.
म्हणूनच माणसानं वेळेसारखं वागावं जे सोबत आहेत त्यांच्याबरोबर आनंदानं जगावं.
--------------------

आपण कोण आहोत? यापेक्षा .....
आपण कोणाबरोबर आहोत? आणि का आहोत? आपण कसे आहोत?
या प्रश्नांची उत्तरे शोधा यामध्येच तुम्हांला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
--------------------

आयुष्य म्हटलं की चढ-उतार असणारचं.....एक गोष्ट स्वीकारून चालायचं की दोन्ही मध्ये संयम महत्त्वाचा असणारचं.
--------------------

माणसाला स्वप्न बघण्याची प्रवृती असावी पण ती पूर्ण करताना कोणालाही दुःख देण्याची वृती नसावी.
--------------------

माणसानं सर्व काही नाकारले तरी एक शाश्वत सत्य नेहमी स्वीकारले पाहिजे, ते म्हणजे "कोणी कितीही महान, आदर्श आणि मोठं झालं तरी निदंक आणि विरोधक हे असणारच".

मनोगत...

No comments:

Post a Comment