सारेच करतात छंद आपण स्वतःला कोणाच्या तरी मनात बंद करून जावं.
सगळेच पाहतात निसर्ग आपण त्याच्या गर्भ श्रीमंतीत रमुन जावं.
सारेच देतात आश्वासन आपण आपण कृतीत प्रत्यक्ष करून जावं.
सारेच दाखवतात वाट आपण हात धरून घेऊन जावं.
सगळेच झटतात घेण्यासाठी आपण काहीतरी देऊन जावं.
सगळेच लढतात जिकण्यासाठी आपण हारून न ही जिंकून जावं.
सगळेच जगतात मरेपर्यत आपण मरून ही आठवणीत उरुन जावं.
----------------------
प्रेम.......मनाचं !
एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णानां विचारले...
मी तुमच्या जवळ असतानाही तुम्हांला माझ्यापेक्षा ती मीरा का बरं जास्त प्रिय आहे ?
कृष्ण स्मित हास्य करत उद्गारले !
मी आता तुझ्याबरोबर आहे तरी तु माझा विचार न करता आणि माझ्या सहवासात रममान न होता, मीराच्या विचारात मनात ञस्त आहेस.
आणि मी मीरा बरोबर नसतानाही ती फक्त माझ्याच विचारात रममान असते आणि मनात माझ्या विचारातच व्यस्त असते.
मी तुझ्याजवळ असूनही मी तुझा नाही कारण तु माझ्याबरोबर नाहीस.
मी तीच्याबरोबर नसतानाही ती माझ्याबरोबर आहे...... मनानं !
"तनानं कोणाचं असणं हे क्षणभंगुर असू शकतं पण मनानं कोणाच असणं हे शाश्वत असतं."
----------------------
नजरेला ही भाव आणि भाषा असते.
म्हणूनच अस वाटत मला.......
कधी तरी नजरेतून ओळखावं आपल्या माणसांना,
जेव्हा त्यानं बंद केलेलं असत शब्दानां.
सुकलेला कंठ जेव्हा फुटत नाही,
बोलायचं असत पण मूखातून शब्द उठत नाही.
तेव्हा डोळे बोलत असतात, फक्त त्यांच्यात शब्द नसतात.
अशी डोळ्यांची (नजरेची) भाषा समजण्यासाठी मनाची तार जुळलेली असावी लागते.
फार कमी नजरा मनाच्या तारेनं जुळलेल्या असतात,
बहुतेक नजरा तर तनाच्या देखाव्यातच खुळलेल्या दिसतात.
अर्थात...... मनाला भिडलेली नजरंच डोळ्यांची भाषा समजू शकते.
----------------------
तु संयमाने वाग मना !
भंगल्या नात्यातल्या त्या भेगा जुळवीण्यास,
आनंदासह सहजतेने रागा हरवण्या..
तु संयमाने वाग मना !
अहम् पणाचे तेच मनोरे पुन्हा पाडण्यास,
मुखवट्यातील जुणे चेहरे पार तोडण्यास...
तू संयमाने वाग मना !
संशयाचे पडले ठेके मनमनावर जरी,
विश्वासाचे गीत पुन्हा लयीत गातच गाण्यास...
तू संयमाने वाग मनावर !
नाती सारी देखाव्यातील पार *तोडण्यास,
बंध जाणीवेचा घट्ट करण्यास...
तु संयमाने वाग मना !
तुझ्या भावनांच मूल्य राखण्यास,
अन् जगण्याच तत्व जपण्यास.....
तु संयमाने वाग मना !
----------------------
काय झाले माझ्या मना, काय केल्या कळेना ! कुणासाठी धाव घेई शोधूनीया मिळेना !
भूललास रे पामरा, भावनांच्या मृगजळी ! थांब रे भ्रमरा माझ्या शब्द दाटले गळी !
मी म्हटलं मनाला "ए मना, तु का रे इतका कडू , आपल्यानांच लावतोस उगाचच रडू."
मन म्हणालं "अरे.... मी जेव्हा तुझ्यात नसतो तेव्हा स्वतःला, तुझ्या आपल्यांच्या अश्रूत शोधत असतो."
मी म्हटलं "अरे पण अश्रू म्हणजे नात्याचं सत्व आहे."
मन म्हणालं " तिथंच माझं अस्तित्व असतं."
----------------------
कडू आहे पण सत्य आहे !
सगळे जाणीवांचे झरे आत्मसुखात येऊन सहज आटतात आणि तिथूनच स्वार्थाला पाझर फुटतात.
स्वःसुखासाठी भावनांनचे झेंडे फडकवले जातात आणि कर्तव्य वेशीवर टांगले जाते.
तात्पुरत्या सुखासाठी मनाचं भांडवल केलं जातं आणि मेंदूच्या बाजारात क्षणभंगुर आनंद लुटला जातो.
शब्दांची ढाल आत्मसंरक्षणास वापरली जाते आणि नाती सुळावर चढवली जातात.
जरूरी नाही माझं म्हणनं सांऱ्यांनाचं पटलं पाहिजे, सांऱ्यांनी माझ्या विचारांनीच नटलं पाहिजे.
कारण प्रत्येकाला आपआपल्या सोयीचंच पटतं आणि प्रत्येकजण स्वतःच्या विचारांनीच नटतो.
"विचारांचा विचार करता आला पाहिजे ".
आपलं नातं जर खरोखरच मनाचं आहे तर ते जपा. जर का तुम्ही इतर कुणासोबत मस्त आहात तर उगाच समोरच्यांला वेडं समजू नका.
कारण आपल्या लपवाछपवीच्या शहाणपणाचं प्रदर्शन कधीतरी लागणरंच.
----------------------
* शब्द *
आज शब्द रहायला आला होता, शब्दाला शब्द जोडला आणि आमचा संवाद घडला.
मी म्हटलं "शब्दा !.. तु फार महान आहेस.
अबोल बाळाच्या मुखातूनच अ.. अ...च्या सूरात,
शिरतोस हळूच सांऱ्यांच्या मन घरात.
शब्द म्हणाला " नाही रे तसा मी "अज्ञ" आहे. म्हणजे 'अ' ते 'ज्ञ' पर्यत.
अविचाराने पाहिलसं तर 'अ'ज्ञान आणि विचार करुन पाहिलसं तर 'ज्ञा'न आहे.
भारावूनच गेलो शब्द सामर्थ्य ऐकून आणि मी दिलं स्वतःला शब्दांमध्ये झोकून.....
मी म्हटलं " शब्दा, तु आहेस म्हणूनच प्रत्येकाला नाव मिळाले आहे, अन् स्वतःच वेगळेपण कळाले आहे.
तुझ्यामुळे 'हसू' 'आनंद' 'दुःख' 'रुसू' सारे मनातून निघून कवी-लेखकांच्या लिखाणातून कागदावर अवतरले आहेत.
तु सागराला तुझ्यातून ओळख देऊन स्वतःला अथांग ठेवलं आहेस.
तु विश्वाला आणि विश्वातील प्रत्येक सजीव - निर्जीवाला स्वतंत्र शब्दरुप ओळख दिलीस.
तु प्रगल्भ असं शाश्वत सत्य आहेस. कोणीही नाकारणार नाही असं तथ्य आहेस.
माझ्या जीभेला लगाम घालून शब्द म्हणाला "हुशारच आहेस!
माझ्याच शब्दसुमनांची माझ्यावर उधळण करत तुझ्या रसिकेचं राज्य तयार करतोयसं.
तुझं 'मनोगत' लिहताना हेच करतोस. माझ्यावर नेहमी राज्य करतोस.
तुला माहीत आहे, हे वाचणारे आता वाचताना काय करतील.
मी म्हटलं " नक्कीच ते मनात विचार करत गालात हळूच हसत असतील ". ते हसू ही तुच आहेस " त्यांच्यां 'मनातलं' अन् 'शब्दांतलं'.
शब्द म्हणाला "चल निघतो आता पहाट झाली..... वाट पाहत असतील माझी सगळे तुझं मनोगत वाचणारे ."
सगळेच पाहतात निसर्ग आपण त्याच्या गर्भ श्रीमंतीत रमुन जावं.
सारेच देतात आश्वासन आपण आपण कृतीत प्रत्यक्ष करून जावं.
सारेच दाखवतात वाट आपण हात धरून घेऊन जावं.
सगळेच झटतात घेण्यासाठी आपण काहीतरी देऊन जावं.
सगळेच लढतात जिकण्यासाठी आपण हारून न ही जिंकून जावं.
सगळेच जगतात मरेपर्यत आपण मरून ही आठवणीत उरुन जावं.
----------------------
प्रेम.......मनाचं !
एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णानां विचारले...
मी तुमच्या जवळ असतानाही तुम्हांला माझ्यापेक्षा ती मीरा का बरं जास्त प्रिय आहे ?
कृष्ण स्मित हास्य करत उद्गारले !
मी आता तुझ्याबरोबर आहे तरी तु माझा विचार न करता आणि माझ्या सहवासात रममान न होता, मीराच्या विचारात मनात ञस्त आहेस.
आणि मी मीरा बरोबर नसतानाही ती फक्त माझ्याच विचारात रममान असते आणि मनात माझ्या विचारातच व्यस्त असते.
मी तुझ्याजवळ असूनही मी तुझा नाही कारण तु माझ्याबरोबर नाहीस.
मी तीच्याबरोबर नसतानाही ती माझ्याबरोबर आहे...... मनानं !
"तनानं कोणाचं असणं हे क्षणभंगुर असू शकतं पण मनानं कोणाच असणं हे शाश्वत असतं."
----------------------
नजरेला ही भाव आणि भाषा असते.
म्हणूनच अस वाटत मला.......
कधी तरी नजरेतून ओळखावं आपल्या माणसांना,
जेव्हा त्यानं बंद केलेलं असत शब्दानां.
सुकलेला कंठ जेव्हा फुटत नाही,
बोलायचं असत पण मूखातून शब्द उठत नाही.
तेव्हा डोळे बोलत असतात, फक्त त्यांच्यात शब्द नसतात.
अशी डोळ्यांची (नजरेची) भाषा समजण्यासाठी मनाची तार जुळलेली असावी लागते.
फार कमी नजरा मनाच्या तारेनं जुळलेल्या असतात,
बहुतेक नजरा तर तनाच्या देखाव्यातच खुळलेल्या दिसतात.
अर्थात...... मनाला भिडलेली नजरंच डोळ्यांची भाषा समजू शकते.
----------------------
तु संयमाने वाग मना !
भंगल्या नात्यातल्या त्या भेगा जुळवीण्यास,
आनंदासह सहजतेने रागा हरवण्या..
तु संयमाने वाग मना !
अहम् पणाचे तेच मनोरे पुन्हा पाडण्यास,
मुखवट्यातील जुणे चेहरे पार तोडण्यास...
तू संयमाने वाग मना !
संशयाचे पडले ठेके मनमनावर जरी,
विश्वासाचे गीत पुन्हा लयीत गातच गाण्यास...
तू संयमाने वाग मनावर !
नाती सारी देखाव्यातील पार *तोडण्यास,
बंध जाणीवेचा घट्ट करण्यास...
तु संयमाने वाग मना !
तुझ्या भावनांच मूल्य राखण्यास,
अन् जगण्याच तत्व जपण्यास.....
तु संयमाने वाग मना !
----------------------
काय झाले माझ्या मना, काय केल्या कळेना ! कुणासाठी धाव घेई शोधूनीया मिळेना !
भूललास रे पामरा, भावनांच्या मृगजळी ! थांब रे भ्रमरा माझ्या शब्द दाटले गळी !
मी म्हटलं मनाला "ए मना, तु का रे इतका कडू , आपल्यानांच लावतोस उगाचच रडू."
मन म्हणालं "अरे.... मी जेव्हा तुझ्यात नसतो तेव्हा स्वतःला, तुझ्या आपल्यांच्या अश्रूत शोधत असतो."
मी म्हटलं "अरे पण अश्रू म्हणजे नात्याचं सत्व आहे."
मन म्हणालं " तिथंच माझं अस्तित्व असतं."
----------------------
कडू आहे पण सत्य आहे !
सगळे जाणीवांचे झरे आत्मसुखात येऊन सहज आटतात आणि तिथूनच स्वार्थाला पाझर फुटतात.
स्वःसुखासाठी भावनांनचे झेंडे फडकवले जातात आणि कर्तव्य वेशीवर टांगले जाते.
तात्पुरत्या सुखासाठी मनाचं भांडवल केलं जातं आणि मेंदूच्या बाजारात क्षणभंगुर आनंद लुटला जातो.
शब्दांची ढाल आत्मसंरक्षणास वापरली जाते आणि नाती सुळावर चढवली जातात.
जरूरी नाही माझं म्हणनं सांऱ्यांनाचं पटलं पाहिजे, सांऱ्यांनी माझ्या विचारांनीच नटलं पाहिजे.
कारण प्रत्येकाला आपआपल्या सोयीचंच पटतं आणि प्रत्येकजण स्वतःच्या विचारांनीच नटतो.
"विचारांचा विचार करता आला पाहिजे ".
आपलं नातं जर खरोखरच मनाचं आहे तर ते जपा. जर का तुम्ही इतर कुणासोबत मस्त आहात तर उगाच समोरच्यांला वेडं समजू नका.
कारण आपल्या लपवाछपवीच्या शहाणपणाचं प्रदर्शन कधीतरी लागणरंच.
----------------------
* शब्द *
आज शब्द रहायला आला होता, शब्दाला शब्द जोडला आणि आमचा संवाद घडला.
मी म्हटलं "शब्दा !.. तु फार महान आहेस.
अबोल बाळाच्या मुखातूनच अ.. अ...च्या सूरात,
शिरतोस हळूच सांऱ्यांच्या मन घरात.
शब्द म्हणाला " नाही रे तसा मी "अज्ञ" आहे. म्हणजे 'अ' ते 'ज्ञ' पर्यत.
अविचाराने पाहिलसं तर 'अ'ज्ञान आणि विचार करुन पाहिलसं तर 'ज्ञा'न आहे.
भारावूनच गेलो शब्द सामर्थ्य ऐकून आणि मी दिलं स्वतःला शब्दांमध्ये झोकून.....
मी म्हटलं " शब्दा, तु आहेस म्हणूनच प्रत्येकाला नाव मिळाले आहे, अन् स्वतःच वेगळेपण कळाले आहे.
तुझ्यामुळे 'हसू' 'आनंद' 'दुःख' 'रुसू' सारे मनातून निघून कवी-लेखकांच्या लिखाणातून कागदावर अवतरले आहेत.
तु सागराला तुझ्यातून ओळख देऊन स्वतःला अथांग ठेवलं आहेस.
तु विश्वाला आणि विश्वातील प्रत्येक सजीव - निर्जीवाला स्वतंत्र शब्दरुप ओळख दिलीस.
तु प्रगल्भ असं शाश्वत सत्य आहेस. कोणीही नाकारणार नाही असं तथ्य आहेस.
माझ्या जीभेला लगाम घालून शब्द म्हणाला "हुशारच आहेस!
माझ्याच शब्दसुमनांची माझ्यावर उधळण करत तुझ्या रसिकेचं राज्य तयार करतोयसं.
तुझं 'मनोगत' लिहताना हेच करतोस. माझ्यावर नेहमी राज्य करतोस.
तुला माहीत आहे, हे वाचणारे आता वाचताना काय करतील.
मी म्हटलं " नक्कीच ते मनात विचार करत गालात हळूच हसत असतील ". ते हसू ही तुच आहेस " त्यांच्यां 'मनातलं' अन् 'शब्दांतलं'.
शब्द म्हणाला "चल निघतो आता पहाट झाली..... वाट पाहत असतील माझी सगळे तुझं मनोगत वाचणारे ."




