आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरच्या आपल्याला काय हवं! काय नको! ते फार साधवपणे शोधत असतो, हवं ते त्याच्या कडून मिळवत नको तेव्हा त्याला बरोबर टाळत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरचा मूर्ख आहे असा गैरसमज करून, मनात रोष असला तरी खोटे हसू चेहऱ्यावर खेळवत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा आणतो.
-----------------------------------
माणसानं अपेक्षा आपल्या क्षमतेनूसार कराव्या आणि अपेक्षा मोठी असल्यास आपली क्षमता वाढवावी.
माणसानं स्वप्नं तर बघावी पण ती प्रत्यक्षात आणण्यास कृती करावी.
माणसानं नाती जरूर जोडावी पण ती जपण्याची जाणीव ठेवावी.
-----------------------------------
माणसाला कालची गोष्ट आणि उद्याची गोष्ट आत्ताच्या क्षणात मिळवता येत नाही...
तरीही माणूस आजजे महत्त्व ओळखू शकत नाही यातचं सुख आणि समाधान हरवून जातं.
-----------------------------------
माणसाला काही नाही करता आलं तरी, जाणीवेचं मूल्य धरता आलं पाहिजे.
जरूरी नाही की सारं काही चांगलचं करता आलं पाहिजे, पण विस्कटलेलं सावरता आलं पाहिजे.
नेहमीच जिंकलं नाही तरी अपयश स्वीकाराता आलं पाहिजे.
-----------------------------------
इतरांसाठी आपण झूरत राहायचं आणि त्यांनी माञ मजा मारत राहायचं.
मग आपण तरी कशाला मनानं मरत राहायचं त्यापेक्षा मस्त जगायचं.
असही सगळेच कुठे सरळस्ष्ट असतात, लपतछपत मिष्ठ असतात.
मग आपण तरी कशाला कडू व्हायचं, आपल्या मनाला रडू द्यायचं.
त्यापेक्षा मस्त जगायचं आपल्या मनासारखं वागायचं.
-----------------------------------
"प्रेम" आणि "राग" ह्या दोन्ही ऐकण्यात वेगळ्या वाटतात, वेगवेगळ्या परिस्थितीत येतात.
पण एक गोष्ट सारखीच करतात कोणाच्या तरी भावना दुखावतात आणि स्वार्थापायी जाणीव विसरून क्षणभंगुर सुखासाठी जपलेलं नातं सहज पायदळी देतात.
-----------------------------------
"एक" आणि "अनेक" यामधील माणसालां एकच निवडता येतं. माणसं ही फार हुशारीने आणि स्वतःच्या सोयीने यामधील स्वतःसाठी निवडत असतात.
पैसा हा पैसा असतो, एक रूपातला तरी माणसाला तो अनेक संख्येत हवा असतो.
माणूस हा माणूस असतो पण अनेक रूपातला तरी माणसाला आवडत माणूस एकच हवा असतो.
-----------------------------------
आपण जन्मलो तेव्हा इतरांची गरज म्हणून पहीलं वस्ञ घातलं ते "लंगोट".
आपण मरतो तेव्हा इतरांची गरज म्हणून शेवटचं वस्ञ घातलं ते "कफण".
या दोन्हीनां खिसा नाही तरी आयुष्यभर काय जमवत असतो आणि कशासाठी?
-----------------------------------
तसं... प्रत्येकाला स्वतःची स्वप्नं असतात. फरक एवढाच की,
काहीजण ती एकनिष्ठतेने साध्य करत असतात तर काहीजण ती धूर्तपणे साध्य करत असतात.
तसं.... प्रत्येकाला स्वतःच्या इच्छा असतात. फरक एवढाच की,
काहीजण त्या आपला विश्वास ठसवून पूर्ण करत असतात तर काहीजण त्या कोणाला तरी फसवूण पूर्ण करत असतात.
-----------------------------------
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.
जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
-----------------------------------
घर जेवढ मोठ असतं तेवढ्या खिडक्या मोठ्या नसतात.
घराला खिडक्या कितीही असल्या मुख्य दरवाजे अनेक नसतात.
घराचा मुख्य दरवाजा कितीही मोठा असला तरी त्याचं कुलूप तेवढं मोठ नसतं.
घराचं कुलूप जेवढं मोठं असतं तेवढी मोठी त्याची चावी नसते.
अर्थात....घर कितीही मोठं असलं तरी त्यावर अधिकार चावीचा असतो. माणसाचं अस्तित्व देखील असंच असतं.
घर म्हणजे शरीर.
खिडक्या म्हणजे नाक-कान.
दरवाजा म्हणजे तोंड.
कुलूप म्हणजे जीभ
आणि...चावी म्हणजे मन.
"मन म्हणजे अरुप धन"
मनोगत....

No comments:
Post a Comment