धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
मनी मनांच्या गुंतलेला,
अश्रूंनी चिंब भिजलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
भावनांनी बांधलेला,
वेदनांनी सांधलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
विश्वासाने जोडलेला,
संशयाने तोडलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
----------------------
कधीतरी....
एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
समोरच्याला विश्वासात घेण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
जे आपल्याला आवडत नाहीत त्यानां अडचणीत पाडण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
आपल्या आवडत्या व्यक्तीचं समर्थन करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
एखाद्या वेळेस कळत तर कधी नकळत , कशासाठी तरी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
खोटं बोलणं चुकीचं नसतं पण त्यातून एखाद्याचं मन दुखवणे किंवा एखाद्याच नुकसान करणं वाईट असतं.
----------------------
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आहे वाऱ्यावर जरी दिसत आहे स्थावर,
जीवनाच्या पुस्तकाला नाही नात्याचं कव्हर. सगळीच फरपड समाधान मिळेना...
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आनंदी दिसतयं जणाला,
मनाची सल कळेना कोणाला. सगळीच ओढातान कारण मिळेना... कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना
----------------------
आपण विचार करतो तेवढं सगळं सहज नसतं आणि आपल्याला वाटतं तेवढं सगळ सोपं ही नसतं.
प्रत्यक्षात आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे, स्वतःचा स्वतःशीच करायचा फक्त आत्मविश्वासाने करायचा.
संघर्ष संघर्ष असावा त्यात सूड आणि मुड नसावा.
----------------------
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारेच कुठं बरं सोन्यासारखे शुद्ध असतो, मग खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्यानां स्वीकारून वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारे कुठे बरं असतो नेहमी खरे, मग उगाच समोरच्याशी खोटेपणानं वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं......
आपण थोडी ना सर्वांची दुःख भरून काढतो, मग तोंड देखला आनंद देण्यापेक्षा मनभरुन समाधान द्यावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं....
----------------------
इतरांचा स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःची उंची कायम ठेवा. कारण आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या गर्दीत आपण असामान्य आहोत हे उंचीच दाखवते.
उंचीचे दोन फायदे असतात....
१. आपल्याकडे बघणाऱ्यांना खाली मान घालण्याची गरज नसते ते ताठ मानेने राहतात.
२. आपण कोणाकडे बघीतलं नाही तरी लोक आपल्याकडे बघतातच.
अर्थात....
ज्यांना आपणआवडतो ते अभिमानाने बघतात आणि ज्यांना आपण आवडत नाही ते स्वाभिमान जपण्यास वर मान करून बघतात.
----------------------
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहोत आपण ? दिव्य शक्ती तर नाही ना !
तरी का जपत असतो आपण निष्फळ अहंकार, कधीतरी पहा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपण हसलो नाही तर सारं जग दुःखी होईल असं आहे का ? नाही ना ! मग हसावं माणसानं बिनधास्त पोटभरुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपली नोदं भूतकाळात नाही आणि भविष्यात काय याची खाञी नाही !
तरी का उगाच व्यर्थ घालवतोय आपण वर्तमान. त्यापेक्षा जगा मस्त स्वतःवर प्रेम करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहे असं जे आपल्या वेदना वाटून घेईल ? कोण आहे असं जे मेल्यावर आपल्या सोबत येईल ?
असं करणं माणसाला शक्य नाही. कारण शरीर स्वतःच त्यामुळे जिवंत असे पर्यत त्याचं जे काही होईल ते आपल्यालाच सहन करायचं आहे.
मग कशासाठी आपण ही धन-दौलत साठवतोयं , असह्य धावपळ करुन रक्त आठवातोय ! त्यापेक्षा मुंगीपाखरा सारखं आनंदानं जगावं मिळवून कणभर.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभर !
----------------------
त्या दिवशी मटकत मटकत जात होती, स्वतःच्याच तालात हसत गालात.
तीला सहज विचारलं "एवढी आकडतेस ! काय आहे तुझ्यात?"
म्हणाली... सगळ्या पेक्षा वेगळंच आहे माझ्यात !
मी स्तःला सावरलं..अन् विचारलं :
तरी तूला जमतं सगळ्या सारखं वागायला? लाज नाही वाटत असं सरळ सरळ सांंगायला.
म्हणाली..... त्यात कसली आलेय लाज ! माझा हा नेहमीचाच साज.
बऱ्याच जनांचे चे तर मला बघूनच गळतात....... पाय.
ज्यानां मी मिळत नाही मी, ते फक्त चोळतात...... आपले हाथ !
मी म्हटलं अशी चावट भाषा एवढ्या सहज कशी बोलतेस ?
म्हणाली..जे आहे ते आहे. मी थोडीच टाळते !
ज्यालां जे पाहिजे ते ते निवडतात , मला सांऱ्यां गोष्टी स्पष्ट दाखवायला आवडतात.
ज्यांना जमतं ते घेतात, नाही तर गुपचूप निघून जातात.
मी म्हटलं ..... तुझं बरं आहे.
लगेच म्हणाली .... सगळं खरं आहे.
गेली लगेच निघून मटकत मटकत....मी आपला राहीलो बघतं !
......अशी ही लबाड " वेळ " हो !
मनोगत.......
एकला हा जीव माझा!
मनी मनांच्या गुंतलेला,
अश्रूंनी चिंब भिजलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
भावनांनी बांधलेला,
वेदनांनी सांधलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
विश्वासाने जोडलेला,
संशयाने तोडलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
----------------------
कधीतरी....
एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
समोरच्याला विश्वासात घेण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
जे आपल्याला आवडत नाहीत त्यानां अडचणीत पाडण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
आपल्या आवडत्या व्यक्तीचं समर्थन करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
एखाद्या वेळेस कळत तर कधी नकळत , कशासाठी तरी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
खोटं बोलणं चुकीचं नसतं पण त्यातून एखाद्याचं मन दुखवणे किंवा एखाद्याच नुकसान करणं वाईट असतं.
----------------------
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आहे वाऱ्यावर जरी दिसत आहे स्थावर,
जीवनाच्या पुस्तकाला नाही नात्याचं कव्हर. सगळीच फरपड समाधान मिळेना...
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आनंदी दिसतयं जणाला,
मनाची सल कळेना कोणाला. सगळीच ओढातान कारण मिळेना... कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना
----------------------
आपण विचार करतो तेवढं सगळं सहज नसतं आणि आपल्याला वाटतं तेवढं सगळ सोपं ही नसतं.
प्रत्यक्षात आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे, स्वतःचा स्वतःशीच करायचा फक्त आत्मविश्वासाने करायचा.
संघर्ष संघर्ष असावा त्यात सूड आणि मुड नसावा.
----------------------
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारेच कुठं बरं सोन्यासारखे शुद्ध असतो, मग खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्यानां स्वीकारून वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारे कुठे बरं असतो नेहमी खरे, मग उगाच समोरच्याशी खोटेपणानं वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं......
आपण थोडी ना सर्वांची दुःख भरून काढतो, मग तोंड देखला आनंद देण्यापेक्षा मनभरुन समाधान द्यावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं....
----------------------
इतरांचा स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःची उंची कायम ठेवा. कारण आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या गर्दीत आपण असामान्य आहोत हे उंचीच दाखवते.
उंचीचे दोन फायदे असतात....
१. आपल्याकडे बघणाऱ्यांना खाली मान घालण्याची गरज नसते ते ताठ मानेने राहतात.
२. आपण कोणाकडे बघीतलं नाही तरी लोक आपल्याकडे बघतातच.
अर्थात....
ज्यांना आपणआवडतो ते अभिमानाने बघतात आणि ज्यांना आपण आवडत नाही ते स्वाभिमान जपण्यास वर मान करून बघतात.
----------------------
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहोत आपण ? दिव्य शक्ती तर नाही ना !
तरी का जपत असतो आपण निष्फळ अहंकार, कधीतरी पहा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपण हसलो नाही तर सारं जग दुःखी होईल असं आहे का ? नाही ना ! मग हसावं माणसानं बिनधास्त पोटभरुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपली नोदं भूतकाळात नाही आणि भविष्यात काय याची खाञी नाही !
तरी का उगाच व्यर्थ घालवतोय आपण वर्तमान. त्यापेक्षा जगा मस्त स्वतःवर प्रेम करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहे असं जे आपल्या वेदना वाटून घेईल ? कोण आहे असं जे मेल्यावर आपल्या सोबत येईल ?
असं करणं माणसाला शक्य नाही. कारण शरीर स्वतःच त्यामुळे जिवंत असे पर्यत त्याचं जे काही होईल ते आपल्यालाच सहन करायचं आहे.
मग कशासाठी आपण ही धन-दौलत साठवतोयं , असह्य धावपळ करुन रक्त आठवातोय ! त्यापेक्षा मुंगीपाखरा सारखं आनंदानं जगावं मिळवून कणभर.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभर !
----------------------
त्या दिवशी मटकत मटकत जात होती, स्वतःच्याच तालात हसत गालात.
तीला सहज विचारलं "एवढी आकडतेस ! काय आहे तुझ्यात?"
म्हणाली... सगळ्या पेक्षा वेगळंच आहे माझ्यात !
मी स्तःला सावरलं..अन् विचारलं :
तरी तूला जमतं सगळ्या सारखं वागायला? लाज नाही वाटत असं सरळ सरळ सांंगायला.
म्हणाली..... त्यात कसली आलेय लाज ! माझा हा नेहमीचाच साज.
बऱ्याच जनांचे चे तर मला बघूनच गळतात....... पाय.
ज्यानां मी मिळत नाही मी, ते फक्त चोळतात...... आपले हाथ !
मी म्हटलं अशी चावट भाषा एवढ्या सहज कशी बोलतेस ?
म्हणाली..जे आहे ते आहे. मी थोडीच टाळते !
ज्यालां जे पाहिजे ते ते निवडतात , मला सांऱ्यां गोष्टी स्पष्ट दाखवायला आवडतात.
ज्यांना जमतं ते घेतात, नाही तर गुपचूप निघून जातात.
मी म्हटलं ..... तुझं बरं आहे.
लगेच म्हणाली .... सगळं खरं आहे.
गेली लगेच निघून मटकत मटकत....मी आपला राहीलो बघतं !
......अशी ही लबाड " वेळ " हो !
मनोगत.......

No comments:
Post a Comment