कसं व्हायचं माणसाचं...!!!

स्वतः केलेलं सारं सार्थ आणि समोरच्यानं स्वतःसाठी काही केलं तर व्यर्थ.
सारं काही हवं असतं माणसाला फक्त अर्थाच.....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
स्वतःला जे हवं ते मिळालचं पाहिजे आणि समोरच्याला हवं ते नसलं तरी चालतं....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
-----------------------------------

आपण सारे संपत्ती कमवू अमाप, पण त्या संपत्तीने शेवटच्या क्षणाला  श्वास विकत घेता येत नाही.
आपल्या आजूबाजूला माणसं असतील अगणित, पण माणसांच्या गर्दीत जेव्हा गरज असते कुणाची तरी तेव्हा मनाच्या नात्याशिवाय कोणी पुढं येत नाही.
-----------------------------------

सारं काही जमतं प्रत्येक माणसालां, जसं पंख आल्यावर उडता येतं शेणातल्या कीड्याला.
सारं काही कळत असतं प्रत्येक माणसलां, जसं ज्ञान असतं छोट्याश्या मुंगीला.
सारं काही आवडणारं हवं असतं प्रत्येक माणसालां , इथं माञ उदाहरण म्हणून मांडता येतं नाही कोणाला.
-----------------------------------

जन्म झाला सर्वाचाचं आणि स्वतंत्र झालो आपणं आईच्या नाळेपासून.
डोकं आपलं असावं शांत आणि सकस म्हणून तेल होत टाळूपासून.
शब्द ओळखायला आणि वाक्य बोलायला शिकलो आपण शाळेपासून.
जग आपल्याला समजलं आणि नातं उमगलं जेव्हा दूर गेलो घरापासून.
नात्यात राजकारणाचं तंञ आणि व्यवहाराचा मंञ कळलं इतरांपासून.
वाईट एवढयाचचं वाटतं की... आपण सगळं मिळवलं फक्त स्वार्थापासून.
-----------------------------------

खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
भावनांच्या प्रवाहात मनाची नाती जोडून, अचानक मेंदूच्या आहारी जाऊन. दुसऱ्यावर आरोप करून स्वतःला निर्दोष ठेवतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
चांगलं असेल तेव्हा सक्रीय राहून, वेळप्रसंगी निष्क्रिय राहून. समोरच्यांना निकड असताना आपण अंग काढून लपून राहतो तेव्हा ...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
वचनचिठ्ठी बंद करुन, कर्तव्याला बाजूला सारून . एकनिष्ठतेची लक्तरे आपण वेशीवर टांगतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
आपूलकीचा चेहरा ठेऊन, प्रेमाचे अश्रू दाखवून. जाणीवेचा जेव्हा  बाजार करतो तेव्हा....
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
-----------------------------------

असं का वागतं मन कळत नाही !
जोडलेल्या नात्यातील, निरागस भावनेच्या रोपाला जपतं जीवापाड. अन् अचानक होत मोठं रागाचं झाड..
असं का वागतं मन कळत नाही !
वेडं होऊन देतं फक्त मायेची सावली, अन् अचानक कधीतरी होतं हट्टी बाहुली...
असं का वागतं मन कळत नाही!
सांऱ्यांचा त्याग करून आलयं तुमच्या सावलीत, पण अचानक कधीतरी गूंतंत माऊलीत...
असं का वागतं मन कळत नाही !
सगळ्यांना जपताना स्वतःला सावरत, अन् अचानक कधीतरी एकटेपणानं बावरतं...
असं का वागत मन कळत नाही !
खूप विचार करतो मी पण उत्तर मिळत नाही.
-----------------------------------

अथांग पसरलाय हा जीवन समुद्र, आपण जेव्हा एकटे असतो या प्रवासातल्या बोटीत.
आलचं समजा अचानक नैराश्यांचं वादळ, तर असावं कोणीतरी आपलं अलगद घेणारं मिठीत.
-----------------------------------

संयम आणि शांतता ह्या सर्वांत मोठ्या शक्ती आहेत.
संयम तुम्हाला मेंदूने बळकट करतो. आणि शांतता मनाने बळकट करते.
-----------------------------------

आपल्याला भेटून सगळे आनंदी झाले पाहिजेत असे नाही.
पण आपल्याला भेटून कोणीही दुःखी होऊ नये हे महत्वाचे.
-----------------------------------

कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
नेहमीच ठेवलं होती मी नाउमेदीचं धेय्य, आनंदाने स्वीकारलं मेहणतीच श्रेय.
नेहमीच वेळेबरोबर केले अथक परिश्रमाचे युद्ध, मिळवले समाधान हरपून सारी शुद्ध.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
जपलयं आतापर्यत बिनरक्ताच्या नात्यातलं सत्व, आत्मसन्मानात जगण्याचं असाधारण तत्त्व.
नाही कोणाची हूजुरी नाही कोणाचा गुलाम , निडर नेतृत्व नाही कोणाला सलाम.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
विरोधकांचे गेम, आपल्याचं प्रेम. गरूड भरारी ची तहान, अस्तित्व मार्ग  हा एकच मान.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.

मनोगत...

No comments:

Post a Comment