मी नशीबात असेल...

मी नशीबात असेल तर या भरवस्यावर आणि हातावरील रेषांच्या भविष्यावर कधीच विश्वास ठेवला नाही.
कारण... मी अनेकाचं नशीब फुटलेलं आणि हातावरच्या रेषांना विस्कटलेलं पाहीलं आहे.
माणसानं आपल्या कृत्याचा स्वीकार आणि कर्तव्याची जबाबदारी घ्यावी. असं वागणं म्हणजे माणूसकीला जागणं म्हणता येतं.
नाहीतरं अनेकांना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन नात्याला ठार  करताना आणि स्वतःच्या गळ्यत निर्दोषत्वाचा हार घालताना ही मी पाहिलं आहे.
------------------------------

का बरं माणसं उगाचच नात्यांचा आणि जिव्हाळ्याचा देखावा करतात? काही माणसं एखादं नातं निच्छित स्वार्थ किंवा हेतूने ठेवतात,
तो स्वार्थ किंवा हेतू साध्य झाल्यावर त्या नात्यालाच दोष देतात. का बरं माणसं जाणीव न ठेवता नात्यांचा असा व्यापार करतात.
खरं आहे.... प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात, पण त्यासाठी निर्मळ भावनांना का बरं फसवतात.
------------------------------

माणसानं स्वप्नं आकाश भरारी ची ठेवावी, परंतु हे विसरू नये भरारीची सुरूवात आणि शेवट जमिनीवरंच होतो.
अर्ध्या हळकुंंडांने पिवळे होऊ नये, कारण पिवळेपण हा हळदीचा गुण आहे.
आपल्यामध्ये जे अंतर्भूत नाही ते क्षणभंगुर किंवा कालबाह्य आहे हे लक्षात ठेवावे. वस्तूची साठवण करण्यापेक्षा व्यक्तीची आठवण ठेवायला शिका.
------------------------------

काही माणसं क्षणभंगुर रूपाच्या अहमांंत स्वतःला वेगळं समजतात.
काही माणसं परपोषी संशयानं स्वतःला स्वतःला वेगळं करतात.
काही माणसं केवळ निरर्थक हट्टामध्ये स्वतःला आपल्यांपासून वेगळं ठेवातात.
एखादचं माणूस असं असतं जे केवळं मनाला जपण्यासाठी सारं काही त्याग करु शकत.
------------------------------

नातं काळांच.......
काळांच नातं अतुट असतं.
माणसासाठी वर्तमान महत्वाचा असतो, पण माणूस नेहमी भविष्याचाच विचार करत बसतो.
आणि भूतकाळाला विसरून वर्तमानाला गमावत असतो.
भविष्य महत्वाचा नसतो असे  नाही, पण आयुष्य तर वर्तमानावरचं अवलंबून असतं.
माणसाला कळत नसतं, भूतकाळाच्या गर्भातूनच वर्तमानाचा जन्म झालेला असतो.
अन् .... भविष्य साकारण्यासाठी ही  वर्तमानाच महत्त्वाचा असतो.
------------------------------

तेव्हा आपण एकटेच असतो.
जग माणसांनी भरलेल असतं,
अन् नातं गरजे पुरतंच उरलेलं असतं.
जेव्हा आपण कोणाच्या मनात नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
संबंधात फक्त स्वार्थ शोधला जातो,
अन् क्षणभंगुर सुखात आनंद मानला जातो.
जेव्हा आपल्या भावनांना आधार  नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
विश्वासातील रागावर ऊगाचच रूसतो,
संशयाच्या प्रेमात सहजच फसतो.
जेव्हा सगळ्यांमध्ये असूनही आपण समाधानी नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो....
------------------------------

अहंम आणि आत्मा...
अहंम अर्थात Ego आणि आत्मा अर्थात Soul यामध्ये फरक काय?
अहंम नेहमी शोधत असतो स्वार्थ आणि आत्मा फक्त परमार्थ.
अहंम म्हणजे दिशाहीन असत्य  आणि आत्मा शाश्वत सत्य.
अहंमासाठी जीवन म्हणजे हाव  आणि आत्म्यासाठी निर्मळ भाव.
अहंम म्हणजे मी पणा चा शोध   आणि आत्मा म्हणजे जीवन बोध.
अहंम म्हणजे "मीच" आणि आत्मा म्हणजे "तुम्हीच".
------------------------------

चेहरा...
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
------------------------------

जगणं ...
आनंद साजरा करणं म्हणजे जगणंं.
दुःखाला सामोरे जाणं म्हणजे जगणं.
स्वतःच्या डोळ्यातील हास्य इतरांना देणं म्हणजे जगणं.
इतरांच्या डोळ्यांतील अश्रूनां सावरणं म्हणजे जगणं.
एकञ गप्पा-गोष्टी, गाणी गाणं म्हणजे जगणं.
एकटं असलं तरी निसर्गाशी सवांद साधणं म्हणजे जगणं.
जोडलेलं नातं जपणं म्हणजे जगणं.
सोडलेलं गोतं शिपणंं म्हणजे जगणं.
जोडलेले हात आवरणं म्हणजे जगणं.
पकडलेला हात सावरणं म्हणजे जगणं.
पक्ष्यांना उडतानां पाहणं म्हणजे जगणं.
लक्ष्यांनां साध्य करणं म्हणजे जगणं.
तुम्ही माझ्याबरोबर असणं म्हणजे जगणं.
मी तुमच्यामध्ये असणं म्हणजे जगणं.
आपल्यांसाठी मागणं म्हणजे जगणं.
समोरच्याला मान देऊन वागणं म्हणजे जगणं.
मुंगीचे प्रयत्न म्हणजे जगणं.
कासवाची चाल म्हणजे जगणं.
गरूड भरारी म्हणजे जगणं.
मुळाचं मातीशी नातं म्हणजे जगणं.
सूकलेल्या झाडांच्या फांदीवर एखादं पान फुटणं म्हणजे जगणं.
आपल्यांच्या आठवणीत मन दाटनं म्हणजे जगणं.

मनोगत...

1 comment: