बदामाचे झाड आणि मी...
आपल्या आँफीसच्या खिडकीतून एक बदामाचे झाड दिसते ते मला माझ्यासारखेच आहे कि मी त्या झाडासारखा हा प्रश्न रोज पडतो.
काही दिवसापूर्वीच त्याच्या फांद्या हिरव्यागार झाल्या आहेत. त्याला वेळेने जनू नवा क्षृंगार दिला आहे. बघितलं की मन प्रसन्न होत.
मी त्याला बघतोय गेल्या ३ वर्षापासून माझ्यासमोरच मोठं झालय ते कोणाच्याही माये- आधारावाचून..
वर्षातून तीन वेळा ते मोहरते.
धरणीच्या कुशीत दिलखूलास बहरते.
त्याची काही फळे पोपट, खारी आणि इतर अपरिचित पक्षी देखील खाऊन जातात.. काही फळे खाली पाडून जातात... त्याच्यावर बसून मनसोक्त खेळून जातात.....
पण त्याबद्दल त्याचे आभार कधीच मानत नाहीत..
उडून जातात मन भरल्यावर..... तरी झाड त्यांचा राग करत नाही.
काही कावळे तर त्याच्यावर घर बांधून राहीले आहेत पण झाडाने त्याबद्दल तक्रार ही केली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून भाडेही घेत नाही.
त्याची काही फळे अशीच गळून पडतात पण रुजत नाहीत कारण खाली काँक्रिट आहे ना ! मग मला वाटते त्यालाही कीती दुःख होत असेल.. स्वतःच्या अगांवर मुलांप्रमाने वाढलेली फळे गळतात तेव्हा वाईट वाटतच असणार.... पण त्याची खंत कधी त्याने व्यक्त केली नाही... मोठ्या मनाचं आहे ते..... कारण त्याने वेळेचे आणि निसर्गाचे नियम स्विकारले आहेत.
मागच्या महीन्यात मी आँफीसमध्ये नसताना फारच वाईट घटना घडली. त्या दिवशी मी राञी उशीराच परत आलो होतो. सकाळी नेहमीप्रमाणे त्याला न्याहाळायला गेलो आणि डोळ्यात पाणी आले... त्याच्या एका बाजूच्या फांद्या कोणीतरी तोडून गेले होते. मला ते सांगत होते खुप ञास झाला.... कारण का तोडले हे समजले नाही त्याला. म्हणाले ... मी तर कोणालाही ञास दिला नाही किंवा कोणाच्या अंगावर ही पडलो नाही.तरी मला पाडले असे म्हणत खूप रडले.
मलाही काही समजेना त्याची केविलवानी अवस्था पाहून मलाही काही उमगेना.
शेवटी त्याने स्वतःला सावरले, आपले रडू आवरले. मला म्हणाले खूप बरे वाटते.. तू जेव्हा मला पाहतोस तेव्हा हायसे वाटते. सार्या वेदना मेल्या आता तुझ्या प्रेमळ नजरेन दूर गेल्या आता. पून्हा आनंदाने वार्यावर लहरु लागलं.
मला म्हणालं कधीकधी येत जा.... थोडा वेळ मलाही देत जा.
कधी थकलसं वाटलं ... एकट एकट वाटंल... मी असेन तुझ्यासोबत.
माझ्या सावलीत कोणाचीही उपेक्षा नाही आणि मला कसलीही अपेक्षा नाही.
त्याने मला बरच काही शिकवलयं ..
मला म्हणतं मी तूला माझ्यासारख एकट एकट बर्याच वेळा पाहीलयं.
मला म्हणत...
नाराज नाही व्हयाचं आपल्या जागेवर कायम रहायाचं...
कारण आपण जोपर्यंत उभे असणार तोपर्यंतच लोकानां आपल अस्तित्व दिसणार...
-------------------------------------------------------------------------------------
आपणही असे स्वार्थी वागतो...
आपल्या चांगुलपणाबद्दल नेहमी काहीतरी का मागतो.
हे वागणं माणसाच्या स्वभावाचे एक अविभाज्य अंग असतं.
त्यामध्ये नफ्या- तोट्याचा संग नसतं.
जगात देणारे बरेच असले तरी आपण कोणाहीकडे मागत नाही.
कारण मनाला आपल्यांशिवाय कोणीही दिलेलं आवडत नाही.
शेवटी मन हे लहान बाळासारखं असतं.
आपल्या आईनं मारलं म्हणून तीला नाकारत नसतं.
पण मन जेव्हा तरुण होत तेव्हा त्यातलं निर्मळपण हरून जातं.
तेव्हापासूनच आपण अर्थी लागतो...
नकळत आपणही स्वार्थी वागतो.
-------------------------------------------------------------
सांगून ही ऐकत नाही...
आपला हट्ट सोडत नाही.
आठवणींमध्ये प्रत्येक क्षण नाहतं...
मन रोज तूझीच वाट पाहतं.
तसा त्याचा ही दोष नाही आणि ...
तुझ्यावर ही रोष नाही.
त्यालाही मी मारतं नाही...
कारण ते तुझ्याशिवाय कोणाचाचं हट्ट करत नाही .
लहान बाळ ते सांगून त्याला समजत नाही .
त्याच्या हट्टात मला दुसरं काही उमजत नाही.
माणसासारखं असत तर मोठं होत होत विसरल असतं...
स्वतःच्या सोईने त्यानं कोणाला तरी स्विकारलं असतं.
पण.. मोठं कधी ते होणार नाही...
कोणाच्याही दारी मायेसाठी जाणार नाही...
तसं ते एकमाञ आहे...
म्हणूनच तुझ्यासाठीच पाञ आहे.
------------------------------------------
माणसानं .......
इतरांवर नाही ठेवला तरी ....
स्वतःवर विश्वास ठेवावा.....माणसानं. .
इतरांना नाही हरवता आलं तरी....
स्वतः हरू नये...... माणसानं.
सर्वानाच नाही सांभाळता आलं तरी..
स्वतः ला सांभाळांव..... माणसानं.
इतर जरी स्वार्थी असले तरी.....
स्वतः एकनिष्ठ असावं.... माणसानं.
सारं जग खोटं असलं तरी.....
स्वतः खरं असावं.... माणसानं.
सगळेजण अयोग्य असले तरी....
स्वतः योग्य असावं... माणसानं.
सारेजण इतरांबरोबर असले तरी...
स्वतः स्वतःचे असावं.... माणसानं.
-------------------------------------------
ए मना.....
ए मना........फार हट्टी आहेस.
नेहमी स्वतःचीच सांगतोस कथा...
उद्या नसेल कोणीही बरोबर,
मग कोणाला सांगशील तुझी व्यथा.
ए मना..... बिनधास्त आहेस.
आज वागतोयस वाघासारखा,
मुकूट नाही तरी राजा सारखा.....
उद्या होशील मायेला ही पारखा.
ए मना..... स्वछंदी आहेस.
स्वतःला वाटेल तसाच वागतोस. पण शब्दाला जागतोस...
नेहमी आपल्यांसाठीच मागतोस.
ए मना..... वेडा आहेस.
आठवणींचा गाव सोडत नाहीस. नात्याशिवाय दुसरं काही जोडत नाहीस.
सगळंच जोडलेलं आहेस, अचानक विस्कटलं तर रडू नको बरं.
ए मना... रागीट आहेस.
तत्वानां सोडत नाहीस. अपमानाला पचवत नाहीस.
उद्या मानानं नाही ठेवलं , तर ञास करुन घेऊ नकोस.
माणसं सोयीने बदलतात हे लक्षात ठेव, बावरु नकोस.
वेळेसोबत रहा, घाबरु नकोस.
मनोगत.....
आपल्या आँफीसच्या खिडकीतून एक बदामाचे झाड दिसते ते मला माझ्यासारखेच आहे कि मी त्या झाडासारखा हा प्रश्न रोज पडतो.
काही दिवसापूर्वीच त्याच्या फांद्या हिरव्यागार झाल्या आहेत. त्याला वेळेने जनू नवा क्षृंगार दिला आहे. बघितलं की मन प्रसन्न होत.
मी त्याला बघतोय गेल्या ३ वर्षापासून माझ्यासमोरच मोठं झालय ते कोणाच्याही माये- आधारावाचून..
वर्षातून तीन वेळा ते मोहरते.
धरणीच्या कुशीत दिलखूलास बहरते.
त्याची काही फळे पोपट, खारी आणि इतर अपरिचित पक्षी देखील खाऊन जातात.. काही फळे खाली पाडून जातात... त्याच्यावर बसून मनसोक्त खेळून जातात.....
पण त्याबद्दल त्याचे आभार कधीच मानत नाहीत..
उडून जातात मन भरल्यावर..... तरी झाड त्यांचा राग करत नाही.
काही कावळे तर त्याच्यावर घर बांधून राहीले आहेत पण झाडाने त्याबद्दल तक्रार ही केली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडून भाडेही घेत नाही.
त्याची काही फळे अशीच गळून पडतात पण रुजत नाहीत कारण खाली काँक्रिट आहे ना ! मग मला वाटते त्यालाही कीती दुःख होत असेल.. स्वतःच्या अगांवर मुलांप्रमाने वाढलेली फळे गळतात तेव्हा वाईट वाटतच असणार.... पण त्याची खंत कधी त्याने व्यक्त केली नाही... मोठ्या मनाचं आहे ते..... कारण त्याने वेळेचे आणि निसर्गाचे नियम स्विकारले आहेत.
मागच्या महीन्यात मी आँफीसमध्ये नसताना फारच वाईट घटना घडली. त्या दिवशी मी राञी उशीराच परत आलो होतो. सकाळी नेहमीप्रमाणे त्याला न्याहाळायला गेलो आणि डोळ्यात पाणी आले... त्याच्या एका बाजूच्या फांद्या कोणीतरी तोडून गेले होते. मला ते सांगत होते खुप ञास झाला.... कारण का तोडले हे समजले नाही त्याला. म्हणाले ... मी तर कोणालाही ञास दिला नाही किंवा कोणाच्या अंगावर ही पडलो नाही.तरी मला पाडले असे म्हणत खूप रडले.
मलाही काही समजेना त्याची केविलवानी अवस्था पाहून मलाही काही उमगेना.
शेवटी त्याने स्वतःला सावरले, आपले रडू आवरले. मला म्हणाले खूप बरे वाटते.. तू जेव्हा मला पाहतोस तेव्हा हायसे वाटते. सार्या वेदना मेल्या आता तुझ्या प्रेमळ नजरेन दूर गेल्या आता. पून्हा आनंदाने वार्यावर लहरु लागलं.
मला म्हणालं कधीकधी येत जा.... थोडा वेळ मलाही देत जा.
कधी थकलसं वाटलं ... एकट एकट वाटंल... मी असेन तुझ्यासोबत.
माझ्या सावलीत कोणाचीही उपेक्षा नाही आणि मला कसलीही अपेक्षा नाही.
त्याने मला बरच काही शिकवलयं ..
मला म्हणतं मी तूला माझ्यासारख एकट एकट बर्याच वेळा पाहीलयं.
मला म्हणत...
नाराज नाही व्हयाचं आपल्या जागेवर कायम रहायाचं...
कारण आपण जोपर्यंत उभे असणार तोपर्यंतच लोकानां आपल अस्तित्व दिसणार...
-------------------------------------------------------------------------------------
आपणही असे स्वार्थी वागतो...
आपल्या चांगुलपणाबद्दल नेहमी काहीतरी का मागतो.
हे वागणं माणसाच्या स्वभावाचे एक अविभाज्य अंग असतं.
त्यामध्ये नफ्या- तोट्याचा संग नसतं.
जगात देणारे बरेच असले तरी आपण कोणाहीकडे मागत नाही.
कारण मनाला आपल्यांशिवाय कोणीही दिलेलं आवडत नाही.
शेवटी मन हे लहान बाळासारखं असतं.
आपल्या आईनं मारलं म्हणून तीला नाकारत नसतं.
पण मन जेव्हा तरुण होत तेव्हा त्यातलं निर्मळपण हरून जातं.
तेव्हापासूनच आपण अर्थी लागतो...
नकळत आपणही स्वार्थी वागतो.
-------------------------------------------------------------
सांगून ही ऐकत नाही...
आपला हट्ट सोडत नाही.
आठवणींमध्ये प्रत्येक क्षण नाहतं...
मन रोज तूझीच वाट पाहतं.
तसा त्याचा ही दोष नाही आणि ...
तुझ्यावर ही रोष नाही.
त्यालाही मी मारतं नाही...
कारण ते तुझ्याशिवाय कोणाचाचं हट्ट करत नाही .
लहान बाळ ते सांगून त्याला समजत नाही .
त्याच्या हट्टात मला दुसरं काही उमजत नाही.
माणसासारखं असत तर मोठं होत होत विसरल असतं...
स्वतःच्या सोईने त्यानं कोणाला तरी स्विकारलं असतं.
पण.. मोठं कधी ते होणार नाही...
कोणाच्याही दारी मायेसाठी जाणार नाही...
तसं ते एकमाञ आहे...
म्हणूनच तुझ्यासाठीच पाञ आहे.
------------------------------------------
माणसानं .......
इतरांवर नाही ठेवला तरी ....
स्वतःवर विश्वास ठेवावा.....माणसानं. .
इतरांना नाही हरवता आलं तरी....
स्वतः हरू नये...... माणसानं.
सर्वानाच नाही सांभाळता आलं तरी..
स्वतः ला सांभाळांव..... माणसानं.
इतर जरी स्वार्थी असले तरी.....
स्वतः एकनिष्ठ असावं.... माणसानं.
सारं जग खोटं असलं तरी.....
स्वतः खरं असावं.... माणसानं.
सगळेजण अयोग्य असले तरी....
स्वतः योग्य असावं... माणसानं.
सारेजण इतरांबरोबर असले तरी...
स्वतः स्वतःचे असावं.... माणसानं.
-------------------------------------------
ए मना.....
ए मना........फार हट्टी आहेस.
नेहमी स्वतःचीच सांगतोस कथा...
उद्या नसेल कोणीही बरोबर,
मग कोणाला सांगशील तुझी व्यथा.
ए मना..... बिनधास्त आहेस.
आज वागतोयस वाघासारखा,
मुकूट नाही तरी राजा सारखा.....
उद्या होशील मायेला ही पारखा.
ए मना..... स्वछंदी आहेस.
स्वतःला वाटेल तसाच वागतोस. पण शब्दाला जागतोस...
नेहमी आपल्यांसाठीच मागतोस.
ए मना..... वेडा आहेस.
आठवणींचा गाव सोडत नाहीस. नात्याशिवाय दुसरं काही जोडत नाहीस.
सगळंच जोडलेलं आहेस, अचानक विस्कटलं तर रडू नको बरं.
ए मना... रागीट आहेस.
तत्वानां सोडत नाहीस. अपमानाला पचवत नाहीस.
उद्या मानानं नाही ठेवलं , तर ञास करुन घेऊ नकोस.
माणसं सोयीने बदलतात हे लक्षात ठेव, बावरु नकोस.
वेळेसोबत रहा, घाबरु नकोस.
मनोगत.....






