दिखाव्याच्या या काळात सगळं कसं ठरलेलं असतं.....
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाटक / सिनेमातंल एक पाञ कोरलेल असतं.
प्रेम ही आजकाल दिखाव्यासाठीच केल जातं...
कारण आपणही माँर्डन आहोत याच प्रदर्शन रस्त्यावर मांडल जात.
भावना ही आजकाल दिखाव्याच्या बाजारात स्वस्त झाल्या आहेत....
कारण त्या फक्त आपल्यासाठी न राहता, सार्वजनिक झाल्या आहेत.
नाती ही दिखाव्याच्या वार्यावर मदहोश होऊन लहरत आहेत.....
जो कोणी पैशाचं खतपाणी घालेल तेथे अविचाराने बहरत आहेत.
घरं ही दिखाव्याच्या रखरखीतउन्हात ओसाड झाली आहेत....
माणसं अन् माणूसकी सोडून वस्तूंची आरास झाली आहे.
--------------------------------------------------------------
न राहून लिहावसं वाटल थोडं?
पैशाची स्थिरता मिळवताना
बरचं गणित चुकत जातं .....
पैसा गरजे एवढा असण्यातच खरा आनंद असतो
शेवटी हेच उत्तर बाकी राहतं.
लहानपणी शाळेमध्ये
एकच ड्रेस असायचा .....
खाकी चड्डी/ स्कर्ट पांढरा शर्ट
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा.
पायात चप्पल असणं
ही मोठेपणाची खून असायची .....
मिञामध्ये एखाद्या कडेच
'बाटाची'चप्पल दिसायची.
रॅशनच्या दुकानावर
आपण चकरा मारायचो.....
तेंव्हा कुठं कापडाच्या पिशवित
किलोभर साखर आणायचो.
एका वर्गातून पास होऊन जाताना
पुंस्तकं जुनेच असायचे ......
भारत माझा देश आणि बे एक बे
पोरं आभिमानाने म्हणायचे
दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचो......
आवडणारा फराळातील पदार्थ
शेवटी खाण्यास ठेवायचो.
श्रीखंड -पूरी , पापड, लोनचं
सणासुदीशिवाय नसायची.....
सकाळच्या नाष्टयाला माञ नेहमी
गरम चपातीच असायची.
पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स
आजकाल फँशन आली आहे......
श्रीमंतीच्या मुखवटयामुळे
जगण्याची तारांबळ झाली आहे.
स्वयंपाक घरात आता सगळा
किराना भरलेला असतो ....
तरी घरची झूणका भाकर खाण्याचा
मुहूर्त येत नसतो.
हल्ली इथं प्रत्येकजन
धन शोधत चाललाय.....
हे माझं , ते मला करताना
मन हरवून बसलाय.
का बरं पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत......
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत.
काय तर म्हणे आम्ही आता
हाय फाय झालो .....
चार पैसे मिळवूनही
माणूसकीच्या बाहेर गेलो.
कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही ......
एवढं मात्र खरं की
सुख समाधान मिळंत नाही .
प्रगती झाली का अधोगती
काहीच कळंत नाही....
माणसाला आपल्यांसाठी ही
वेळ मिळत नाही.
अहंकार कुरवाळल्या मुळे
प्रेमाचे झरे आटतायत.....
आणि
भावनांना सावरायला आपल्याःपेक्षा
" सायकियाट्रिक "जवळचे वाटतायत.
भ्रमा मधे राहु नका
जागं व्हा थोडं ......
माणसा शिवाय माणसाचं
सूटत नसतं कोडं.
न राहून लिहावसं वाटलं थोडं.
-------------------------------------
वेळेनूसार सारं काही बदलत असतं !
जीवनाचे रंग आणि ढंग बदलतात.....
गडद नात्याचे रंग .....
कळत फीखट होतात.
गोड वाटणारे स्वभाव ......
नकळत तिखट होतात.
नव्या स्वप्नाचे रंग .....
नकळत रंगतात.
अपेक्षा चे भंग .....
पायदळी तुडवले जातात.
प्रत्येकजन आपआपल्या जागेवर...
बरोबर असतो.
वेळ बदलली तरी आपल्या सोबत असलेला व्यक्ती ....
आपला पाठीराखा खरोखर असतो.
बाकी....
वेळेनूसार सारं काही बदलत असतं.
--------------------------------------
आपल्याला कोणीतरी आदर्श समजणे.....
हे त्या माणसाचे मोठेपण असते...
कारण ....
आपण नक्की काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहित असते.
खरंतर....
आपण आदर्श नसलो तरी कोणाचे काही जात नाही.
पाणी उताराशिवाय वाहत नाही.
आपण नसलो तरी... आपले बाळ जगणार हे प्रत्येक आईला माहीत असते.
तरी बाळासाठी जगण्याचा तीचा हट्ट असतो....
मनोगत.....
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नाटक / सिनेमातंल एक पाञ कोरलेल असतं.
प्रेम ही आजकाल दिखाव्यासाठीच केल जातं...
कारण आपणही माँर्डन आहोत याच प्रदर्शन रस्त्यावर मांडल जात.
भावना ही आजकाल दिखाव्याच्या बाजारात स्वस्त झाल्या आहेत....
कारण त्या फक्त आपल्यासाठी न राहता, सार्वजनिक झाल्या आहेत.
नाती ही दिखाव्याच्या वार्यावर मदहोश होऊन लहरत आहेत.....
जो कोणी पैशाचं खतपाणी घालेल तेथे अविचाराने बहरत आहेत.
घरं ही दिखाव्याच्या रखरखीतउन्हात ओसाड झाली आहेत....
माणसं अन् माणूसकी सोडून वस्तूंची आरास झाली आहे.
--------------------------------------------------------------
न राहून लिहावसं वाटल थोडं?
पैशाची स्थिरता मिळवताना
बरचं गणित चुकत जातं .....
पैसा गरजे एवढा असण्यातच खरा आनंद असतो
शेवटी हेच उत्तर बाकी राहतं.
लहानपणी शाळेमध्ये
एकच ड्रेस असायचा .....
खाकी चड्डी/ स्कर्ट पांढरा शर्ट
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा.
पायात चप्पल असणं
ही मोठेपणाची खून असायची .....
मिञामध्ये एखाद्या कडेच
'बाटाची'चप्पल दिसायची.
रॅशनच्या दुकानावर
आपण चकरा मारायचो.....
तेंव्हा कुठं कापडाच्या पिशवित
किलोभर साखर आणायचो.
एका वर्गातून पास होऊन जाताना
पुंस्तकं जुनेच असायचे ......
भारत माझा देश आणि बे एक बे
पोरं आभिमानाने म्हणायचे
दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचो......
आवडणारा फराळातील पदार्थ
शेवटी खाण्यास ठेवायचो.
श्रीखंड -पूरी , पापड, लोनचं
सणासुदीशिवाय नसायची.....
सकाळच्या नाष्टयाला माञ नेहमी
गरम चपातीच असायची.
पिझ्झा , बर्गर , न्यूडल्स
आजकाल फँशन आली आहे......
श्रीमंतीच्या मुखवटयामुळे
जगण्याची तारांबळ झाली आहे.
स्वयंपाक घरात आता सगळा
किराना भरलेला असतो ....
तरी घरची झूणका भाकर खाण्याचा
मुहूर्त येत नसतो.
हल्ली इथं प्रत्येकजन
धन शोधत चाललाय.....
हे माझं , ते मला करताना
मन हरवून बसलाय.
का बरं पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत......
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत.
काय तर म्हणे आम्ही आता
हाय फाय झालो .....
चार पैसे मिळवूनही
माणूसकीच्या बाहेर गेलो.
कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही ......
एवढं मात्र खरं की
सुख समाधान मिळंत नाही .
प्रगती झाली का अधोगती
काहीच कळंत नाही....
माणसाला आपल्यांसाठी ही
वेळ मिळत नाही.
अहंकार कुरवाळल्या मुळे
प्रेमाचे झरे आटतायत.....
आणि
भावनांना सावरायला आपल्याःपेक्षा
" सायकियाट्रिक "जवळचे वाटतायत.
भ्रमा मधे राहु नका
जागं व्हा थोडं ......
माणसा शिवाय माणसाचं
सूटत नसतं कोडं.
न राहून लिहावसं वाटलं थोडं.
-------------------------------------
वेळेनूसार सारं काही बदलत असतं !
जीवनाचे रंग आणि ढंग बदलतात.....
गडद नात्याचे रंग .....
कळत फीखट होतात.
गोड वाटणारे स्वभाव ......
नकळत तिखट होतात.
नव्या स्वप्नाचे रंग .....
नकळत रंगतात.
अपेक्षा चे भंग .....
पायदळी तुडवले जातात.
प्रत्येकजन आपआपल्या जागेवर...
बरोबर असतो.
वेळ बदलली तरी आपल्या सोबत असलेला व्यक्ती ....
आपला पाठीराखा खरोखर असतो.
बाकी....
वेळेनूसार सारं काही बदलत असतं.
--------------------------------------
आपल्याला कोणीतरी आदर्श समजणे.....
हे त्या माणसाचे मोठेपण असते...
कारण ....
आपण नक्की काय आहोत हे फक्त आपल्यालाच माहित असते.
खरंतर....
आपण आदर्श नसलो तरी कोणाचे काही जात नाही.
पाणी उताराशिवाय वाहत नाही.
आपण नसलो तरी... आपले बाळ जगणार हे प्रत्येक आईला माहीत असते.
तरी बाळासाठी जगण्याचा तीचा हट्ट असतो....
मनोगत.....

No comments:
Post a Comment