आपल कोणीही नसतं...

आपल कोणीही नसतं ...
जेव्हा आपलं मन आपलं नसतं.

अन् .....

जग ही स्वस्त असतं...
जेव्हा आपलं मन मस्त असतं.
वेळेने दीलेलं नेहमीच रास्त असतं.
-----------------------------------

मधमाशीची दृष्टी ठेवा.......
फुलांची कमी नसते.

एवढया मोठ्या पोळ्यात.....
आपली जागा आहे याची हमी असते.

आपली जागा टीकवुन पहा.....
अन् पोळ्याशी एकनिष्ठ रहा.
----------------------------

पादणे.....

आपल्यामध्ये पादलात तर आवाज आला पाहीजे ......
त्यांनी आपल्या पादाचाही मनमुराद हसून आनंद घेतला पाहीजे.

अन्...

आपल्यावर जळणार्यामध्ये पादाला तेव्हा ढूसकीच असली पाहीजे...
त्यांना फक्त ञास नाही तर श्वास कोंडून नाकातले केस करपले पाहीजेत..
-------------------------------------------------------------------------

सत्य.....

विश्वास जर बाजारात विकत मिळाला तर " नाते " नाहीसे होईल.

अन्.....

नात्यांचा बाजार बंद नाही झाला तर
" निखळ प्रेम " नाहीसे होईल.
-------------------------------------

एखाद्या व्यक्तीला आपले मानूनही......
त्याच्यावर विश्वास ठेवूनही....
मनात त्याच्याशी नाते जोडूनही.....

जेव्हा आपण.....

केवळ आपल्या सोयीने  त्या व्यक्तीबद्दल चूकीचा विचार मनात आणतो तेव्हा आपण माणूस नसतो...
कारण जनावरं ही सोयीने जगतात...

मनोगत.....
----------------------------------

कधी चांगली .......
तर
कधी वाईट .

कधी योग्य ......
तर
कधी अयोग्य .

कधी निछ्चित.....
तर
कधी अनिछ्चित .


कधी आवश्यक ......
तर
कधी अनावश्यक .

कधी आपल्यांकडून.....
तर
कधी परक्यांकडून .

कधी स्वार्थासाठी......
तर
कधी परमार्थासाठी .

अजबच असते ना...
माणासाची " इच्छा ".
----------------------

माणसाला आपल्या मर्यादा माहीत असल्या तरच.......
त्याला सत्य स्विकारता येते.

नाहीतर अपेक्षाचं मायाजाळ त्याला दुःख दिल्याशिवाय राहत नाही.
अपेक्षा आपल्या लायकीपेक्षा मोठ्या नसाव्यात....
------------------------------------------------------------------

माणसाला जीवंतपपणी
स्वस्थ ठेवणारी.....

किंवा

अस्वस्थ करणारे
एकमाञ सूञ  म्हणजे " मन "

जेव्हा मन स्वतःला जपतं तेव्हा ते स्वार्थी असतं....
इतरांना जपतं तेव्हा परमार्थी असतं.

जे मन स्वतःला जपत इतरांना जपतं ते " नात्याला " जन्म देत...
---------------------------------------------------------------

आपण एकटे असतो तेव्हा....
आपल्या भावनांना आवर घातला पाहीजे....

आणि...

जेव्हा आपण लोकांत असतो तेव्हा...
आपल्या शब्दांना आवर घातला पाहीजे.
----------------------------------------

तुमच्या सहवासातील .....

आनंदाने भरुन जात मन, आठवतात जेव्हा सारे क्षण....
तुमच्या सहवासातील......


शांत होऊन जातं सार विचारांच रण, स्मरता प्रत्येक पाऊल ...
तुमच्या सहवासातील.....
-------------------------------------------------------------

माणसाची विचारशक्ती किती विचिञ असते.....
त्याला जनावर म्हटलं तर राग येतो..

आणि
वाघ म्हटलं तर अभिमान वाटतो...
-----------------------------------

सोन्यात सुगंध नसतो....
ऊसात फळ नसते.....
चंदनात फुलं नसतं.....

विद्वान श्रीमंत नसतो....
आणि
श्रीमंत दिर्घजीवी नसतो.

माणूस कधीच परीपूर्ण नसतो.

मनोगत.....

No comments:

Post a Comment