जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय .
मला
सर्वांचंच म्हणणं पटतं, त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
जगाचं असंच असतं.
मनुष्य गरीब असला की.....
लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.
श्रीमंत असला की.......
म्हणतात ,दोन नंबर करत असणार !
त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ?
प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय .झालो का श्रीमंत ?
तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .
पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.
पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही.
नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.
जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या
म्हणतात.
समजा वाडवडीलांची संपत्ती
मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार , बघा कसा बसलाय आयत्या बिळावर
नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ?
आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत.....
म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ
नाही.असं आयुष्य काय कामाचं?
जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.
मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.
तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला.
त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.
दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील
'' अजून किती दिवसकाढणार कुणास ठाऊक ?
''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात.
जाड असला की हत्ती म्हणतात.
बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.
जाड मनुष्य दिसल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.
सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार !
नाही केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.
सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.
स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा . स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?
विशेष म्हणजे....
खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे. परिस्थितीचं गांभिर्य
नाही.
गंभीर असणंही त्यांना रुचत नाही.
म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.
तुम्ही यशस्वी झालात तरी यांना
अडचण होते.म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.
अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही .मग भोगा कर्माची फळं.
लोकांचं काय घेऊन बसलात ?
काहीही केलंत तरी त्याला नावं
ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती
मनावर घ्यायचं ?
जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?
त्यापेक्षा मस्त मनासारख जगायचं आणि मस्त वागायचं.....
--------------------------------------------
कधीकधी वाटतं .....
मी का आहे असा ?
" चक्री वादळासारखा "
स्वतः उध्वस्त आणि आजूबाजूच्या सर्वांचे अस्तित्व उध्वस्त करत जाणारा......
भावनाशून्य आणि स्वप्नशून्य..
बिनधास्त आणि बेधडक...
स्वतः भोवतीच फिरत असताना,
मी घोगावत जाताना,
लोक माझा तिरस्कार करतात अन्..
घाबरतात ही मला आदरपूर्वक ..
कारण माझी गती हीच माझी शिस्त आहे......
मी माझ्यांच्या विचारातच मस्त आहे.
मनोगत.....
------------------------------------
शोध ....
कधी कधी विचार येतो मनात....
नक्की काय शोधतोय प्रत्येकजण
या माणसांच्या वनात.....
आणि
शोधही असा असंतुष्ट...
कुठे थाबांयच कोणालाच नाही स्पष्ट .
कोणालाही माहिती नाही कोणाचाच पुढील क्षण...
धावत असते सैरावैरा अपेक्षा आणि स्वप्नानी भरलेल मन....
या शोधाची सुञधार म्हणजे वेळ...
आपल्यांमध्येच खेळावा,
हा शोधाचा खेळ.....
मला
सर्वांचंच म्हणणं पटतं, त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
जगाचं असंच असतं.
मनुष्य गरीब असला की.....
लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.
श्रीमंत असला की.......
म्हणतात ,दोन नंबर करत असणार !
त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ?
प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय .झालो का श्रीमंत ?
तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .
पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.
पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही.
नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.
जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या
म्हणतात.
समजा वाडवडीलांची संपत्ती
मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार , बघा कसा बसलाय आयत्या बिळावर
नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ?
आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत.....
म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ
नाही.असं आयुष्य काय कामाचं?
जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव.
मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.
तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला.
त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.
दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील
'' अजून किती दिवसकाढणार कुणास ठाऊक ?
''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात.
जाड असला की हत्ती म्हणतात.
बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.
जाड मनुष्य दिसल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.
सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार !
नाही केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.
सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.
स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा . स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?
विशेष म्हणजे....
खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे. परिस्थितीचं गांभिर्य
नाही.
गंभीर असणंही त्यांना रुचत नाही.
म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.
तुम्ही यशस्वी झालात तरी यांना
अडचण होते.म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.
अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही .मग भोगा कर्माची फळं.
लोकांचं काय घेऊन बसलात ?
काहीही केलंत तरी त्याला नावं
ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती
मनावर घ्यायचं ?
जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?
त्यापेक्षा मस्त मनासारख जगायचं आणि मस्त वागायचं.....
--------------------------------------------
कधीकधी वाटतं .....
मी का आहे असा ?
" चक्री वादळासारखा "
स्वतः उध्वस्त आणि आजूबाजूच्या सर्वांचे अस्तित्व उध्वस्त करत जाणारा......
भावनाशून्य आणि स्वप्नशून्य..
बिनधास्त आणि बेधडक...
स्वतः भोवतीच फिरत असताना,
मी घोगावत जाताना,
लोक माझा तिरस्कार करतात अन्..
घाबरतात ही मला आदरपूर्वक ..
कारण माझी गती हीच माझी शिस्त आहे......
मी माझ्यांच्या विचारातच मस्त आहे.
मनोगत.....
------------------------------------
शोध ....
कधी कधी विचार येतो मनात....
नक्की काय शोधतोय प्रत्येकजण
या माणसांच्या वनात.....
आणि
शोधही असा असंतुष्ट...
कुठे थाबांयच कोणालाच नाही स्पष्ट .
कोणालाही माहिती नाही कोणाचाच पुढील क्षण...
धावत असते सैरावैरा अपेक्षा आणि स्वप्नानी भरलेल मन....
या शोधाची सुञधार म्हणजे वेळ...
आपल्यांमध्येच खेळावा,
हा शोधाचा खेळ.....

No comments:
Post a Comment