जेव्हा आपल्याबरोबर कोणीही नसतं तेव्हा फक्त मन असतं. माणसं झोपेत अचानक बडबडतात, हसतात किंवा दचकून जागी होतात तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी घडत असतं.
त्यावेळेस मेंदू झोपलेला असतो. शरीराचं अस्तित्व असे पर्यंत मन (आत्मा) आपल्या सोबत असतो ते मृत्यूनंतर नष्ट केल्यावर निघून जातो.
जन्म होण्याआधी ते मृत्यूनंतर आपण जसे आहोत तसे आपल्याला स्विकारणारा आपला एकमेव मिञ "मन".
---------------------------------
एकटेपण
माणसाला एकटेपण आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा येत नाही, तर..जेव्हा तो मनानं एकटा होतो तेव्हा येतं.
माणसाला इतर कोणतीही शक्ती तेव्हाच हरवू शकते जेव्हा त्याला मनाचं एकटेपण येत. म्हणूनच मनाची माणसं जोडून मन सांभाळावं. मनाच महत्त्व साऱ्यांना कळावं म्हणूनच ...
---------------------------------
जो तुमच्या आनंदासाठी हारतो त्याच्या बरोबर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. ज्याला तुमचे महत्त्व माहीत आहे त्याला तुम्ही कधीच समजू शकत नाही.
हे जग अजब आणि अनोळखी स्वभावाच्या माणसांनी भरलेलं आहे. इथं "गरज" हीच ओळख आहे , ती पूर्ण झाली की पुन्हा सगळं जसं आहे तसं.
---------------------------------
माझ्या सहवासात न राहणाऱ्या बहुतेकांना असे वाटते की माझ्यात भरपूर चूकीच्या सवयी आहेत....अगदी बरोबर आहे.
पण माझ्यामधील एवढ्या साऱ्या चुका शोधणे ही किती मोठी चुकीची एकच सवय त्याच्यांत असते याचा विचार करूनच मला त्यांची कीव येते.
---------------------------------
जनांसाठी जगण्यापेक्षा माणसांनं मनासाठी जगावं" हेच माझ्या जगण्याचं तत्त्व आहे. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर माणसं मला ओळखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला ओळखणं अवघड असतं...
कारण माझं मन कधीतरीच माझ्या डोळ्यातून वाहतं बाकी माझ्या चेहऱ्यावर माझ्या मेंदूचं राज्य असतं.
---------------------------------
माणसं जेव्हा जाणीवपूर्वक खेळतात, तेव्हा त्याचे खरे अंतरंग कळतात. तशी सगळ्यांची मन कुठं एकमेकांशी जुळतात,
म्हणूनच भावनांना न समजून घेता ती भोळी बनून छळतात. सगळ्यांनाच आधाराचे हात थोडी न मिळतात, आपआपलं वळण आलं की सहज हात सोडून वळतात.
---------------------------------
कोणालाही माहीत नाही आपण कोणासाठी कधीपर्यत असणार , तरी माणसं नाती जोडतात.
पण आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार,अशाप्रकारे जगण्यात कमी पडतात.
जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊनही आपल्या एखाद्या माणसाला दिसत नसतील आणि शब्दांत मांडूनही ते त्याला कळत नसतील....
तर ते माणूस आपलं नसतं , कारण त्याला आपलं मन कळत नसतं.
---------------------------------
फक्त सुरूवात पुरेशी नसते , सुरूवात केलेली कृती शाश्वत ठेवणं आणि निरंतर ठेवणं जरुरीचं असतं.
नाहीतर जन्म तर अनेकांना मिळतो तो सार्थकी लावणं आणि आदर्श करून जगणं जरुरीचं असतं.
---------------------------------
यशस्वी आणि समाधानी माणसाची माणसांची जीवन सूत्र - निस्वार्थ प्रेम आणि अतूट विश्वास.
वाचायला सोपी असली तरी कृतीत वापरण्यास फार कठीण असतात. कारण यासाठी संयम असावा लागतो.
---------------------------------
फार कमी माणसं समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवून नातं जोडतात. त्यानां समोरच्या व्यक्तीबद्दल अविश्वास नसतो असं नसतं...
त्यानां समोरच्या माणसाचं महत्त्व कळत नसतं. खरं तर प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या महत्वाचा नसतो, तर स्वतःच्या स्वार्थाचा असतो.
म्हणूनच मन असेल निस्वार्थ, तरचं नात्याला आणि जीवनाला अर्थ.
---------------------------------
कोणाच्याही निस्वार्थ कर्तुत्वावर चिकलफेक करणारे आणि निरर्थक आरोप करणारी माणसं कितीही महान असली तरी त्यांच्या आधीन जाऊन नतमस्तक होणं मला कधीच जमलं नाही.
बेभरवसा माणसांच्या गोळक्यात रहाण्यापेक्षा मला एकटेपण जास्त आवडते.
---------------------------------
आपण खूप काही मिळवू शकतो पण ते मिळवण्यापेक्षा त्यातून आपल्याला समाधान किती मिळाले हे महत्वाचे असते.
कारण आपण बऱ्याच वेळा जे मिळवतो त्याचा आनंद न घेता अधिक मिळवण्यासाठी धावत असतो. जर आनदं घेता येत नसेल तर समाधान कसे मिळेल.
अर्थातच... समाधान हे आनंदात लपलेल सत्व आहे.
---------------------------------
कसली तयारी करत असतं माझं मन? आणि सर्व शारीरिक बळ एकञ येत कशासाठी? का हा येणारा दिवस माझ्यात आतूरता निर्माण करत असतो?
कारण माझ्या सर्वस्वाच्या मानाचा दिवस असतो हा ! माझ्या दुसऱ्या जन्माचा असतो हा! माझ्या अस्तित्वाच्या मार्गातील सन्मानाचा दिवस असतो हा!
---------------------------------
आयुष्यात कधीतरी....
पटत नसला तुम्हाला माझा स्वभाव आज जरी , अशी वेळ येईलच आठवण येईल तुम्हांला माझी.....
आज आहे अंगात दमक आणि रगांत चमक , खंत नाही तुमच्या मनी माझ्या नसण्याची जरी, असा क्षण येईलच जेव्हा आठवण येईल तुम्हाला माझी....
अविश्वास आणि गैरसमज वाढवतात नात्यातली दरी , तरी गोष्ट एक सांगतो खरी , असं वळण येईलच जिथं आठवण येईल तुम्हांला माझी.....
मनोगत...
त्यावेळेस मेंदू झोपलेला असतो. शरीराचं अस्तित्व असे पर्यंत मन (आत्मा) आपल्या सोबत असतो ते मृत्यूनंतर नष्ट केल्यावर निघून जातो.
जन्म होण्याआधी ते मृत्यूनंतर आपण जसे आहोत तसे आपल्याला स्विकारणारा आपला एकमेव मिञ "मन".
---------------------------------
एकटेपण
माणसाला एकटेपण आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा येत नाही, तर..जेव्हा तो मनानं एकटा होतो तेव्हा येतं.
माणसाला इतर कोणतीही शक्ती तेव्हाच हरवू शकते जेव्हा त्याला मनाचं एकटेपण येत. म्हणूनच मनाची माणसं जोडून मन सांभाळावं. मनाच महत्त्व साऱ्यांना कळावं म्हणूनच ...
---------------------------------
जो तुमच्या आनंदासाठी हारतो त्याच्या बरोबर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. ज्याला तुमचे महत्त्व माहीत आहे त्याला तुम्ही कधीच समजू शकत नाही.
हे जग अजब आणि अनोळखी स्वभावाच्या माणसांनी भरलेलं आहे. इथं "गरज" हीच ओळख आहे , ती पूर्ण झाली की पुन्हा सगळं जसं आहे तसं.
---------------------------------
माझ्या सहवासात न राहणाऱ्या बहुतेकांना असे वाटते की माझ्यात भरपूर चूकीच्या सवयी आहेत....अगदी बरोबर आहे.
पण माझ्यामधील एवढ्या साऱ्या चुका शोधणे ही किती मोठी चुकीची एकच सवय त्याच्यांत असते याचा विचार करूनच मला त्यांची कीव येते.
---------------------------------
जनांसाठी जगण्यापेक्षा माणसांनं मनासाठी जगावं" हेच माझ्या जगण्याचं तत्त्व आहे. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर माणसं मला ओळखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला ओळखणं अवघड असतं...
कारण माझं मन कधीतरीच माझ्या डोळ्यातून वाहतं बाकी माझ्या चेहऱ्यावर माझ्या मेंदूचं राज्य असतं.
---------------------------------
माणसं जेव्हा जाणीवपूर्वक खेळतात, तेव्हा त्याचे खरे अंतरंग कळतात. तशी सगळ्यांची मन कुठं एकमेकांशी जुळतात,
म्हणूनच भावनांना न समजून घेता ती भोळी बनून छळतात. सगळ्यांनाच आधाराचे हात थोडी न मिळतात, आपआपलं वळण आलं की सहज हात सोडून वळतात.
---------------------------------
कोणालाही माहीत नाही आपण कोणासाठी कधीपर्यत असणार , तरी माणसं नाती जोडतात.
पण आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार,अशाप्रकारे जगण्यात कमी पडतात.
जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊनही आपल्या एखाद्या माणसाला दिसत नसतील आणि शब्दांत मांडूनही ते त्याला कळत नसतील....
तर ते माणूस आपलं नसतं , कारण त्याला आपलं मन कळत नसतं.
---------------------------------
फक्त सुरूवात पुरेशी नसते , सुरूवात केलेली कृती शाश्वत ठेवणं आणि निरंतर ठेवणं जरुरीचं असतं.
नाहीतर जन्म तर अनेकांना मिळतो तो सार्थकी लावणं आणि आदर्श करून जगणं जरुरीचं असतं.
---------------------------------
यशस्वी आणि समाधानी माणसाची माणसांची जीवन सूत्र - निस्वार्थ प्रेम आणि अतूट विश्वास.
वाचायला सोपी असली तरी कृतीत वापरण्यास फार कठीण असतात. कारण यासाठी संयम असावा लागतो.
---------------------------------
फार कमी माणसं समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवून नातं जोडतात. त्यानां समोरच्या व्यक्तीबद्दल अविश्वास नसतो असं नसतं...
त्यानां समोरच्या माणसाचं महत्त्व कळत नसतं. खरं तर प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या महत्वाचा नसतो, तर स्वतःच्या स्वार्थाचा असतो.
म्हणूनच मन असेल निस्वार्थ, तरचं नात्याला आणि जीवनाला अर्थ.
---------------------------------
कोणाच्याही निस्वार्थ कर्तुत्वावर चिकलफेक करणारे आणि निरर्थक आरोप करणारी माणसं कितीही महान असली तरी त्यांच्या आधीन जाऊन नतमस्तक होणं मला कधीच जमलं नाही.
बेभरवसा माणसांच्या गोळक्यात रहाण्यापेक्षा मला एकटेपण जास्त आवडते.
---------------------------------
आपण खूप काही मिळवू शकतो पण ते मिळवण्यापेक्षा त्यातून आपल्याला समाधान किती मिळाले हे महत्वाचे असते.
कारण आपण बऱ्याच वेळा जे मिळवतो त्याचा आनंद न घेता अधिक मिळवण्यासाठी धावत असतो. जर आनदं घेता येत नसेल तर समाधान कसे मिळेल.
अर्थातच... समाधान हे आनंदात लपलेल सत्व आहे.
---------------------------------
कसली तयारी करत असतं माझं मन? आणि सर्व शारीरिक बळ एकञ येत कशासाठी? का हा येणारा दिवस माझ्यात आतूरता निर्माण करत असतो?
कारण माझ्या सर्वस्वाच्या मानाचा दिवस असतो हा ! माझ्या दुसऱ्या जन्माचा असतो हा! माझ्या अस्तित्वाच्या मार्गातील सन्मानाचा दिवस असतो हा!
---------------------------------
आयुष्यात कधीतरी....
पटत नसला तुम्हाला माझा स्वभाव आज जरी , अशी वेळ येईलच आठवण येईल तुम्हांला माझी.....
आज आहे अंगात दमक आणि रगांत चमक , खंत नाही तुमच्या मनी माझ्या नसण्याची जरी, असा क्षण येईलच जेव्हा आठवण येईल तुम्हाला माझी....
अविश्वास आणि गैरसमज वाढवतात नात्यातली दरी , तरी गोष्ट एक सांगतो खरी , असं वळण येईलच जिथं आठवण येईल तुम्हांला माझी.....
मनोगत...




