सत्य नेहमीच सुंदर नसते...

सत्य नेहमीच सुंदर नसते आणि जे सुंदर असते ते सगळेच सत्य  नसते.
सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असेलच असे नाही. पण चांगल्या विचारांचा माणूस सुंदर शकतो.
---------------------------------------

"ज्ञान" हे "पैशा" पेक्षा श्रेष्ठ आहे..
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते. याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते.                                                               पण.... केवळ ज्ञान असून उपयोगाचे नाही.
ते कसे , केव्हा आणि कोणासाठी वापरायचे याचे ही ज्ञान हवे.
---------------------------------------

मनुष्य कितीही गोरा असला, तरी त्याची सावली मात्र काळीच असते,
"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण,फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकारआहे.
---------------------------------------

मर्यादा ही कशासाठी ठेवायची हे ज्याने त्याने ठरवायचे असते.
कारण माणूस स्वतःला जास्त चांगला ओळखतो.
त्यामुळे आपण जेव्हा इतरांवर मर्यादा घालतो तेव्हा आपली फसगत होणे स्वाभाविक आहे.
इतरांना बदलण्यासाचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदला.
---------------------------------------

माणसं  चुकून हरवतात तेव्हा त्यांना शोधनं ठीक असते...
पण माणसं जेव्हा जाणीवपूर्वक हरवतात तेव्हा त्यांना शोधनं निरर्थक असते.
---------------------------------------

दुधापासून दही, ताक, लोणी, तुप हे सर्व तयार होत असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वातून आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं.
---------------------------------------

कधीकधी आपण स्वतःला शहाणे समजून काही बदल आणण्याचा प्रयत्न करतो.
पण म्हणतात ना... तेरड्याचा रंग तीन दिवस. अशी माणसाची प्रवृती झाली आहे.
त्यामुळे निसर्गाकडून बरेच काही शिकता येत. ढग भरून आले याचा अर्थ पाऊस पडतोच असे नाही.
---------------------------------------

डोळे पाण्याने भरून येतात म्हणजे माणूस खरोखर रडतोच असं नाही...
आकाशत ढग भरून येतात म्हणजे पाऊस पडतोच असं नाही...
---------------------------------------

जीवनाच्या कोणत्याही वळणावर निर्णय घेताना मेंदूचा नाही तर मनाची बाजू ऐकून घ्या.
कारण मेंदूतील निर्णय ही मजबूरी असू शकते पण मनातील निर्णय नेहमीच मंजूरी असते.
---------------------------------------

मत्सराने तिरस्काराने भरलेला तुमचा हितशत्रु देखील काय करेल तर... जास्तीतजास्त तुमची संपत्ती हिरावु शकेल..
पण तुमचं ज्ञान, अनुभव, एकनिष्ठता, जाणीव, वेळ या गोष्टी तो कसा हिरावून घेईल.
पण तुम्ही जर मत्सराने तिरस्काराने आतुन जळत रहाल तर ते तुम्हालाच आतुन पोखरत राहील..
त्यामुळे कोणाचाही मत्सर वा तिरस्कार करु नका.. समाधानी रहायला शिका.आपोआप सुखी व्हाल.
वेळ प्रत्येकाला तेच देते जे तो इतरांसाठी चिंततो. इतरांसाठी किंबहुना सर्वांसाठीच सुख समाधान मागा. तुम्हालाही सुख समाधान लाभेल.
-------------------------------------
मनातले सुविचार...

* आपण... कोणासाठी?, का?, कसं ?, कधीपर्यत?, कशासाठी ?, असायचं हे प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीने ठरवतो.

* दगड न होता दगडातील काही चांगले गुण घेऊन स्वतःच्या जीवनाचे सुंदर शिल्प घडविताना दुःखाचे ठोके सहन करण्याची शक्ती आणि संयम  सुखाचे मूर्तीरूप धारण करता येते.

* जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तडजोड करायला शिका. कारण तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.

* चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य,एकनिष्ठता आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.

* पूर्ण वेडंपण किंवा पूर्ण शहाणपण असलेलं माणूस ञासदायक असतं. पण अर्धवेडं किंवा अर्धशहाण फारच धोकादायक असतं.

* आज ढळलेला सूर्य उद्या पून्हा उगवणार... नवीन दिवसासाठी नवीन तेज तो राञीच्या अंधारातचं जमवणार...

* माणूस हा भूतलावरील एकमेव प्राणी आहे जो स्वतःच्या सोयीचे सुंदर नियोजन करतो आणि भूतकाळ सहज विसरतो.

* माणसाच्या आयुष्याची सुरवात स्वतःच्या रडण्याने होते आणि आयुष्याचा शेवट इतरांच्या रडण्याने होतो.

मनोगत..

No comments:

Post a Comment