आयुष्य आणि भविष्य ...

या दोन्हीनां बदलण्यासाठी लढावं लागतं आणि या दोन्हीनां सहज करण्यासाठी समजावं लागतं.
धेय्य निच्छीत असावं आणि प्रयत्न करण्याची प्रवृत्ती असावी मग स्वप्न प्रत्यक्षात येतातंच.
दरी- खोऱ्यातून वाहणारी नदी वाहताना समुद्र आणखी किती दूर आहे हे विचारत बसत नाही.
------------------------------------------

मला कळत नाही माणसं लहरी नुसार का वागतात. आपण ठरवलेल्या संकल्प किंवा घेतलेल्या निर्णयावर तटस्थ का नसतात. लक्षात असलं पाहीजे आपण जेव्हा तटस्थ नसतो तेव्हा आपण स्वतःबद्दल शाशंक असतो. समोरच्यांनी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्याला स्वतःकडे आत्मविश्वास असला पाहिजे.
------------------------------------------

 मन हे अमृत आहे आणि अ मृत ही आहे. कसेही पाहीले तरी सुंदर आणि योग्य आहे. आपण त्याला कसे पाहतो आणि स्विकारतो ते महत्त्वाचे असते.
------------------------------------------

एकच विचारणार आहे मी बाप्पाला, जर खरोखरच तू प्रसन्न होतोस आपल्या भक्ताला...
तर आजनंतर एक वरदान दे मानवाला आणि मृत्यूआधी रोपट्याचं रूप दे त्याला. खरोखरचं मनाचं आणि जीवाचं माणूस असेल ज्या कुणाचं,
संगोपन करतील ते त्या रोपट्याचं. अमरत्वच मिळेल त्या जीवाला कारण कधीच मरण नसतं बीजांला.
------------------------------------------

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर...तासभर साथ देणारी माणसं
बस आणि ट्रेन मध्ये पण भेटतात. मनाची माणसं जोडा....
कारण जी मनाची नसतात ती कोणाची नसतात.
माणसं अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
इथं स्वतःची आवड आणि सवड जपणारे जास्त आहेत. आपण माणसं जपावी.
------------------------------------------

जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं.
वेळ तिचे कर्तव्य करत असते , तेव्हा तिला चांगले वाईट विचार करता येत नाही.
------------------------------------------

तसा चोर प्रत्येकाच्या स्वभावात असतो.....फरक इतकाच की , काही जणांनी तो इतरांना हसवण्याकरीता ठेवलेला असतो आणि काही जणांनी तो इतरांना फसवण्याकरीता असतो.
------------------------------------------

एक वेळ अशीही येते जेव्हा आपण केवळ जनात नाही तर मनातही एकटे असतो. कधीकधी आजूबाजूला अनेक माणसं असतात पण तरीही आपल्या मनात एकटेच असतो.
आपण एकटे असताना आपल्या एकटेपणाला सहज ओळखणारं माणूस आपलं असतं.
------------------------------------------

शाश्वत सत्य......
आजकाल एखाद्याचं घर बांधून देण्यासाठी कोणाचाही हात पुढे येत नाही.
पंरतू एखाद्याच्या तुटलेल्या घराच्या दगडी/वीटा उचलून नेण्यासाठी कितीतरी जण तयार असतात. " जपलं ते आपलं ".
------------------------------------------

बऱ्याच वेळा मी स्वतः काय आहे ते मला माहीत आहे असे बहुतांश लोकांचा समज असतो. आणि समोरच्या व्यक्तीला तो स्वतः काय आहे याचा समज असतो.
पण त्या दोघांना एकमेकाला समजून घेण्याची प्रवृत्ती असेल तर नातं जुळतं. नाहीतर शहाण्यांची या जगात कमी नाही. आणि कोण स्वतःला काय समजतो याची हमी नाही.

मनोगत....

No comments:

Post a Comment