* आपलीच माणसं *...

आपलीच माणसं किती सहज  अविश्वास दाखवतात.....
जीवापाड जपलेल्या नात्यावर कानोकानी संशय घेतात, समोरच्याला दोष देऊन स्वतः निर्दोष राहतात. आपलीच माणसं.....
आपण सर्वस्व अर्पण करतो, पण आपण जर नकळत चुकलो तरी अंग काढून जातात. आपलीच माणसं......
आपण प्रत्येक क्षणात त्यांना आठवतात, पण ती माञ सोईस्कर नवा चेहरा नटवतात. आपलीच माणसं.....
---------------------------------

नेहमीच ससा बनून जगू नये... कारण उंदीरानांही चरबी येते आपल्याला उगाचच घाबरवण्याची.
नेहमीच माकडासारखं ही वागू नये... कारण इतरांवर अवघड वेळ येते आपल्यातला माणूस ओळखण्याची.
नेहमीच हरणासारखं गरीब होऊ नये..कारण बुद्धीभ्रष्ट लाडंगे वाट पाहत असतात सावजाची.
नेहमीच वाघासारखं वावरु नये... कारण तारांबळ होते आपल्यावर निरागस प्रेम करणाऱ्याची.
---------------------------------

वेडी मनाची......अशी फार थोडी असतात माणसं.
"नाती म्हणजे अनमोल मोती" म्हणून जपणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"वचन म्हणजे भावनांच जतन" म्हणून सांभाळणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"आपलं धन म्हणजे आपल्या माणसाचं मन" म्हणणारी.... अशी फार थोडी असतात माणसं.
---------------------------------

जरूरीचे नसतं , की सगळ्यांनी वाचल्यावर आणि काँमेंट दिल्यावरचंं आपल लिहणं योग्य असतं.
कारण प्रत्येकाच्या आवडीचं आणि छंदाच जग वेगवेगळं असतं. असही नसतं की आपलं लिहणं आणि मन सगळ्यांनाच रूचतं.
---------------------------------

प्रत्येक माणूस सोईने वागतं, जेव्हा त्याला आपलं काय कळायला लागतं. आपल काय ठरवणं खूप सोपं असतं कारण त्यात स्वार्था शिवाय आणि कशाच जगच नसतं.
---------------------------------

माणसं प्राण्यांपेक्षा विकसित आहेत. कारण माणसं प्राण्यांना पाळतात त्यांचा उपयोग होतो म्हणून.
बरं झालं प्राणी विकसित नाही झाले... नाहीतर माणसाचं जगणं प्राण्यांपेक्षा वाईट झालं असतं.
---------------------------------

* स्वार्थ *
आपण स्वतःला....स्वार्थापासून वेगळ ठेऊ शकत नाही मग म्हणून आपल्याला इतर कोणालाही दोष देण्यास अधिकार नाही.
इथं प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीनूसार जगण्याची मुभा आहे....म्हणूनच स्वार्थ पदोपदी उभा आहे.
फरक एवढाच की.......
काही स्वार्थ मनासाठी असतात तर काही मेंदूसाठी.
काही स्वार्थ इतरांसाठी असतात तर काही स्वतःसाठी.
काही स्वार्थ समाधानासठी असतात काही अभिमानासाठी.
काही चांगल्यासाठी असतात तर काही कोणाच्या वाईटासाठी.
अर्थात.... स्वार्थ नेहमीच वाईट असतो असं नाही. पण ज्याचा त्याला वाईट आहे की Right आहे हे माहीत असतं.
---------------------------------

शब्दांचे अर्थ बदलतात पण शब्द कधीच बदलत नाहीत.
पाण्याच्या अवस्था बदलतात पण पाणी कधीच बदलत नाही.
माणूस बदलतो वेळ कधीच बदलत नाही.
---------------------------------

जे भाड्याने (रूपये देऊन) आणलेले असते ते आपल्याकडे कायम रहात नाही. ते कायम स्वरूपाचे नसते.
मग त्या वस्तू असोत किंवा व्यक्ती त्या एका काळ मर्यादेपर्यतच आपल्याकडे असू शकतात. कारण आपण त्या मिळवलेल्या नसतात किंवा त्यावर आपला मालकी हक्क नसतो.
परंतु....ज्या वस्तू किंवा व्यक्ती आपण आपल्या कर्तुत्व किंवा मेहनतीने मिळवलेल्या असतात. त्या आपण मानाने ठेऊ शकतो. कारण त्या आपल्याच असतात. कारण जे जपलं तेच आपलं असतं.
---------------------------------

मी शोधत असतो अशी माणसं जी कोणत्याही मुखवट्याशिवाय खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. ना स्वतः फसण्याची भीती ना कोणाला फसवण्याची इच्छा.
स्वतःच्या स्वच्छ निरागस आणि निखळ भावनांचा बंध समोरच्या माणसाच्या मनाशी घट्ट राहून जगणारी माणसं. तुम्ही म्हणालं काय गरज आहे अशी माणसं शोधायची....
कारण मला सवय आहे जे माझ्याकडे नाही ते इतरांच्या व्यक्तीत्वात शोधून त्यातून समाधान आणि आनंद मिळवण्याची.
सगळेच बोध तपस्येतून होत नाहीत आणि सगळेच शोध होकायंञ आणि सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने लागत नाहीत.
---------------------------------

* अटळ सत्य *
या जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे *आनेवाला पल जानेवाला है* या गाण्यासारखे. जे मनात करावसं ते करायचं आणि जे बोलावं वाटतं ते बोलायचं कारण ते परत करण्याची वेळ येईल की नाही हे निच्छीत नसते. आज जे आपल्याकडे आहे ते आपले आहे, जे काल पर्यंत होतं आणि आज नाही ते आपलं नाहीच... त्या फक्त आठवणी आणि उद्या काय असेल  त्याबद्दल फक्त वेळच ठरवू शकते.
जगताना मनाचा विचार करा कारण जनाचा विचार करताना जगता येत नाही. फक्त जगताना मनात आणि जनात आपलं माणूस सोबत असणं जरूरी असतं.
आपलं कोण आहे प्रत्येकानं आपआपलं ठरवायचं असतं. हे ठरवण्याचं नाव नातं असतं. त्याला नाव नसलं तरी मनात वाव असणं जरूरीचं असतं.
---------------------------------

*Mood..... अर्थात "लहर"*

का वागतात माणसं एवढी rude. जी आणतात नात्यात खोटा mood.
काहीजण करतात एकदमच कहर. आली जर त्यांना चुकून एखादी लहर.
सहजच माणसं होऊन जातात dud. जेव्हा आणतात ती नात्यात mood.
संशयी विचार म्हणजे भयानक जहर. क्षणात संपतात नाती आली जर लहर.
जाणीवपूर्वक म्हणावं ok I should. नात्यांमध्ये कधी आणू नका mood.
---------------------------------

मनाची नाती वेळच जुळवून आणते. जर वेळेने ती जूळवली असतील तर ती जपा.
जर अशी नाती जुळली नसतील तर आजचा दिवस तुम्हाला वेळेने दिला आहे. तुमच्या मनाच नातं जुळावंं आणि तुम्हाला एखादं छान माणूस मिळावं.

मनोगत...

No comments:

Post a Comment