सजीव हा जन्माला येतोच

* सजीव हा जन्माला येतोच.... जन्माला येणं महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे असते जीवन जगणे.
प्राण्यांना जन्म मिळतो परंतु त्यानां आपला इतिहास आणि संस्कृती जपता येत नाही.
झाडा-वेलींना जन्म मिळतो परंतु त्यांना आपल्या भाव-भावना प्रकट करता येत नाहीत.
माणसाला जन्म मिळतो, त्याला वरील दोन्ही गोष्टी करता येतात परंतु वरील सजीवांप्रमाने समाधानी आणि जाणीवपूर्वक वागता येत नाही.
अर्थात.... या भूतलावर कोणत्याही सजीवाचा जन्म परिपूर्ण नाही.
------------------------------------------------------

* शुल्लक अहंकार  सांभाळताना बहुमोल नाती सहज निसटुन जातात.

* गरज असते फक्त शुल्लक अहंकार  सोडुन देण्याची.

* मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; माझ्याकडे बघितलंच नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही.
अशा छोट्या गोष्टी सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.

* सूक्ष्म अहंकार हा अमरवेली सारखा परपोषी असतो.तो सोडता आला पाहिजे . तो लगेच सोडता येणारच नाही.
महाकठिण आहे ते,पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...कारण नाती या अहंकारापेक्षा अनमोल असतात.

* माणसाची सर्वात मोठी ओळख ही केवळ त्याच्याकडे असणाऱ्या अमाप ज्ञानातून होत नाही ...तर मनात प्रेमळ भावना, इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि जाणीव यातूनच होत असते.

* प्रयत्नांचे पंखांची भरारी आणि आत्मविश्वाचा मार्ग यामध्ये आजच्या दिवसाची सुरूवात करा. संयमाची शिदोरी आणि समाधानाचे लक्ष्य  असल्यावर मनभरुन आनंद तुम्हाला मिळेलच.

* माणसानं माणसात असताना मोबाईल, खिशात ठेवून माणसात राहावं...मोबाईल हातात ठेवून माणसं, खिशात ठेवल्यागत वागू नये..

* प्रत्येकावर विश्वास ठेवणे चुक असले तरी... कोणावरही विश्वास न ठेवण्यासारखी घोर चूक कोणतीच नाही. कारण कोणावरही विश्वास न ठेवणे हे स्वतःवरच्या अविश्वासाचे लक्षण आहे.

* कधीच कोणाच्या हुशारी विषयी तर्क लावू नका. कारण प्रत्येक माणूस वेळेनुसार, अनुभवाने किंवा  स्वतःच्या सोईने हुशार होतोच.

* डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो; पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो, कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे आणि कोणी ताठ बनत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे.
------------------------------------------------------

* विचार, नियोजन, कृती, एकसंघता, प्रेम, राग, दुःख, यातना, आनंद, जाणीव यासारख्या अनेक गोष्टी प्राण्यांमध्ये ही दिसून येतात...तरी मनुष्य स्वतःला श्रेष्ठ समजतो....
उलट प्राण्यांना स्वतःची मर्यादा ओळखून वागता येते आणि दूसर्याचा अपमान करण्याची वृत्ती नसते, हेच मनुष्याला जन्मभर करता येत नाही.
------------------------------------------------------

* अनेक वेळा आपण केवळ आपल्या काल्पनिक तर्कांद्वारे आपल्या विश्वासातील माणसं आणि नाती गमावून बसतो. तर्क लावणे चुकीचे नाही पण त्यात तथ्य ( सत्य ) असणे जरूरीचे असते.
कोणत्याही व्यक्तीबद्दल तर्क लावण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल सर्वव्यापी अभ्यास असावा लागतो आणि असा अभ्यास करण्यास त्या व्यक्तीला सर्वंअंगाने समजून घेणे जरूरीचे असते..
अर्थातच त्यासाठी त्याचा सहवास मिळविणे जरूरीचे असते. अशाप्रकारे जर एखाद्याच्या  सहवासात आपण आपण राहू शकतो
तर त्या व्यक्तीबद्दल तर्कांद्वारे अनुमान न लावता स्पष्ट संवाद साधून नाते आणि व्यक्ती दोन्ही जपावं.
------------------------------------------------------

* नातं मनाच्या मातीतलं असेल तर ते रूजतं.......
आपूलकीच्या आणि मायेच्या भावनेत ते अंकुरतं......
निस्वार्थ आणि एकनिष्ठ प्रेमाच्या प्रकाशात ते आकारतं.......
विश्वासाच्या आधारावर ते सतत बहरतं.......
------------------------------------------------------

* आम्ही लहानपणी लपाछपी चा खेळ खेळायचो ज्यामध्ये लपलेल्या सर्वांना ज्याच्यावर डाव ( राज्य ) असेल त्याने शोधायचे.
फार मज्जा असायची कारण आपण लपलेल्यानां शोधले की मनात आणि चेहऱ्यावर असलेला आनंद गगनात मावेनासा होत असे.
ज्याला शोधलंय तो ही मान्य करून समोर येत असे कोणतेही कारण न देता अगदी निरागसपणे.
आज तो डाव राहीला नाही, तो आनंद , ती निरागस भावना , लपून राहणे ही राहीले नाही.
कारण आजकाल माणसं न लपता ही एखाद्याला समोरासमोर नजरअदांज (टाळून ) करून अनोळखी भाव आणून बाजू काढतात.
आता माणसांना चेहऱ्यावर मुखवटा घालून वागण्याची सवय झाली आहे त्यामुळे लपण्याची गरज पडत नाही.
मग अशा मुखवटा घातलेल्यानां शोधण्यात अर्थ ही नाहीचं आणि मज्जा तर जराही नाही.
------------------------------------------------------

* आयुष्यातील प्रत्येक चुकीच्या वळणावर , अनुत्तरीत प्रश्नावर , हतबल करणाऱ्या अडचणीत,
निराशावादी विचारात जी व्यक्ती आपल्यासोबत तटस्थ उभी असते ... त्या व्यक्तीबद्दल अविश्वास म्हणजे नात्याचा अंत असतो.
------------------------------------------------------

* पक्ष्यांना साऱ्या आकाशाचे एश्वर्य आणि सौंदर्य मोकळे असते तरी ते कधी दिशा विसरत नाहीत. माणसं माञ थोड्याफार स्वार्थात सगळं काही सहज विसरतात.

* आपण काय विचार करतो... आपल्याला काय माहिती आहे .... आपण कशावर विश्वास ठेवतो...
आपले काय समज आहेत..... या साऱ्या गोष्टी गौण असतात....महत्वाचे आहे आपण काय कृती करतो.*
------------------------------------------------------

* शब्द महत्त्वाचे असतात कारण त्यांना अर्थ असतात. पण प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता येत नाही.
म्हणूनच श्वास , नजर आणि स्पर्श हा अनमोल गोष्टी अस्तित्वात आहेत.
अर्थात ... जीवन सर्वांसाठी सारखेच असते. फरक फक्त एवढाच असतो कोणी स्वतःच्या मनासारखं जगत असतं आणि कोणीतरी आपल्याचं मन जपून जगत असतं.
------------------------------------------------------

* आयुष्य म्हणजे अनुभव , प्रयोग आणि स्वप्न यांचे उत्कृष्ट समीकरण आहे.
कालचा दिवस हा अनुभव होता , आजचा दिवस हा प्रयोग असतो आणि उद्याचा दिवस हे स्वप्न असेल.
म्हणूनच तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची स्वप्न साकार करा.
------------------------------------------------------

* सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक सूवर्णसंधी.
या संधीचा योग्य वापर करण्यासाठी स्वच्छ विचार , निर्मळ मन आणि चेहऱ्यावर स्मित हास्य असावे. यामुळे स्वतःबरोबरच समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो आणि सुंदर बनतो.
------------------------------------------------------

* वेळेचा आभारी आहे मी.... तिने शब्दाला जन्म दिला.
उपसता येतात शब्दांनी आनंद , दुःख , संताप , संशय , सुखाच्या सर्व भावनाआणि मोकळं करता येत मनाला.
------------------------------------------------------


* सर्व झुरत प्रेम करणाऱ्या येड्यांसाठी *
एकदा तरी साला सगळं मनासारखं होऊ दे !
मी तिला पहाताना तिनं ही मला डोळे भरून पाहू दे. एकदा तरी साला.....
माझं बोलावनं नेहमीचचं आहे, तिचं बोलावनं कधीतरी येऊ दे. एकदा तरी साला......
नूसतचं किती झुरायचं , दुरूनचं बघायचं..कधीतरी तिचा अलगद स्पर्श होऊ दे. कधी तरी साला.....
खिशाला कडकी तर पटणार कशी लडकी...आहे तसे छान आहोत तीला आता तरी कळू दे. कधी तरी साला...            
प्रेम-लफडं काही जमत नाही.. अरे यार लग्नंच जमू दे. कधी तरी साला...
------------------------------------------------------

* कोण म्हणत......* 
की प्रेमाची लफडी फक्त सिनेमा, सिरियल, नाटकातच असतात. अहो पोकळ मनाच्या माणसांचे प्रेमाचे लोचे होतातच.
आजकाल प्रेमासाठी मनाची नाही, तर.. धनाची आणि देहाची गरज असते. एकतर पोरांनी बापाच्या खिशाला हात घालून इम्परेशन पाडायचे किंवा पोरींनी आपल्या शरीराचे प्रदर्शन करून इम्परेशन पाडायचे.
काहीजण तर उगाचच हवेत उडतात अन् प्रेमात पडतात.            
काहीजण फक्त फँशन म्हणून सगळेजण करतात म्हणून प्रेम करतात.
काहीजण केवळ छंद म्हणून प्रेम करतात तर काही मंद होऊन प्रेम करतात.
काहीजण  आईवडीलांना फाट्यावर मारून प्रेम करतात तर काहीजण स्वतःला काट्यावर ( अपमान सहन करत ) मारून प्रेम करतात.
काहीजण गल्लीत प्रेम करतात तर काही नाक्यावर उभ्या भडव्या टपोरी भाई वर प्रेम करतात.
काहीजण इतरांना जळवायला प्रेम करतात तर काहीजण स्वतःची जळते म्हणून प्रेम करतात.
काहीजण स्वतःची लाल करायला प्रेम करतात तर काहीजण उलटी चाल करायला प्रेम करतात.
काहीजण फुकटचा आईस्क्रीम, पिझा- बर्गर, फ्रँकी खाऊन तर काही उदारीच्या बाईक अन् कपड्यावर फीदा होऊन प्रेम करतात.
खरंच यडं.. नक्की प्रेम करतात की भावनांचा गेम करतात. म्हणूनच म्हटलं कोण म्हणत की....

मनोगत......

No comments:

Post a Comment