बाजारात शोरूमचं थैमान माजलयं. जे कपडे दिसायला पाहीजेत ते आहेतच पण जे कधी दिसू नयेत अशा कपड्यांना निर्जीव पुतळ्यांवर सजवलयं.
पशुमय प्रवृत्तीला नराधमांच्या खत घातलयं निरागस मनांमध्ये अविचारांच बीज रूजवलयं...बाजारात शोरूमचं थैमान माजलयं.
वाईट याचं वाटतय निर्जिव पुतळ्यांसारखंच सजीव माणसानं ही चालत्या-फिरत्या शोरूमचं प्रदर्शन मांडलयं.
काय घालवं आणि काय दाखवावं याचं भान सांडलयं. बाजारात आता माणसाच्या शोरूमचं थैमान माजलयं.
-------------------------------------------
प्रेम....रंग आणि अंग बघूनच करतात माणसं...
हे आता तुमच्यातील काही हसला असाल आणि काही 'असं नसतं' असे म्हणाला असाल.
काही जनानां पटलं नसेल तर काहीनां राग आला असेल. तुम्ही व्यक्त केलेले विचार मेंदूचे होते.
कारण खरं प्रेम करणारे विचार करत नाहीत तर.. आपल्या मनातल्या भावनांना जपत असतात.
म्हणूनच व्यक्त करताना मेंदूचा कमी अन् मनाचा जास्त वापर करा.
-------------------------------------------
राञ....म्हणजे काय ?
थकलेल्या प्रत्येक शरीराला आपल्या घट्ट मिठीत घेणारी प्रेमळ आई.
माणसाला बालपणातचं आईच्या कुशीत झोपता येतं, आई नेहमीच कुशीत आणि मिठीत घेऊ शकत नाही आणि काही माणसानां राहाता येत नाही.
म्हणूनच वेळेनं बनवली आहे राञ.
------------------------------
सकाळ म्हणजे काय ?
राञी निवांत विसावलेल्या आपल्या लाडक्यांसाठी वेळेने तयार केलेली नव्या अनुभवांची शिदोरी.
शेवटी पोट भारल्याशिवाय मेहनत करता येत नाही आणि मेहनती शिवाय थकून राञ रूपी आईच्या मिठीत सूखावता येत नाही.........
सकाळी उठाल तेव्हा शिदोरीचा आनंद घेण्यास शुभेच्छा.
-------------------------------------------
माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात हे जरी खरं असलं तरी ते कर्तृत्व करण्यास ज्यांनी जन्म दिला,
ज्यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले, ज्यांनी मोठं होण्याच्या शर्यतीत स्पर्धा देऊन जिकंण्यास प्रवृत्त केले ,
ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्यांनी यश-अपयशात सोबत केली, अशा अनेक माणसांमुळेच माणूस मोठा होतो.
म्हणूनच कितीही मोठं झालं तरी माणूसकी जपता आली पाहिजे. अर्थात ..... "जाणीव " ठेवली पाहीजे.
-------------------------------------------
"अमाप पैसा" कमवला तरी त्याने निस्वार्थी आणि निरागस प्रेम विकत घेता येत नाही.
"शिखर प्रसिद्धी" मिळवली तरी त्याचा आनंद आणि समाधान कायम टिकून रहात नाही.
पण..."मनातली आठवण" एक छोटीशी किंवा क्षणभराची आठवण कायम सोबत रहाते.
कधी हळूच गालात हसते तर कधी झर्यासारखी डोळ्यांमधून उन्मळून येते. फक्त आनंद आणि समाधान देते.
-------------------------------------------
जसं पोटभरून जेवणं जरुरीचं असतं, तसं मनभरून प्रेम करणं ही शिकावं माणसानं.
जसं मानात राहणं जरूरीचं असतं, तसं मनात राहणं ही शिकावं माणसानं.
-------------------------------------------
जगात आणि जीवनात सर्वच गोष्टींवर मर्यादा आहेत ...वेळेच्या, वयाच्या, वागण्याच्या ....
फक्त एका गोष्टींवर मर्यादा नाही, तरी ती गोष्ट फार कमी माणसांना करता येते. "चांगला विचार करणे".
आपण त्या कमी माणसांमध्ये असावं आणि नेहमी बसावं.
-------------------------------------------
आपली वाट लावण्याची प्रवृत्ती नसली तरी चालेल, पण वाट बघण्याची जरूर असावी. कारण वाट बघण्यातच सयंमाची खरी परिक्षा असते.
-------------------------------------------
* गरज नसते.........*
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ विधीची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कोणत्याही वाटेची गरज नसते.
जे स्वतः वर विश्वास ठेवतात त्यांना नसीबाची गरज नसते.
मेहनत करून पुढे जाणाऱ्यांना कोणत्याही रथाची गरच नसते.
-------------------------------------------
*बदल*.....
एक काळ होता जेव्हा नजरेला नजर मिळाली आणि इशारा झाला की प्रेम व्हायचं.
आजही नजर आहे पण *बदल* एवढाच की .....त्या नजरेनं आता समोरच्याचं सौंदर्य आणि संपत्ती पाहीली जाते.
मनोगत...
पशुमय प्रवृत्तीला नराधमांच्या खत घातलयं निरागस मनांमध्ये अविचारांच बीज रूजवलयं...बाजारात शोरूमचं थैमान माजलयं.
वाईट याचं वाटतय निर्जिव पुतळ्यांसारखंच सजीव माणसानं ही चालत्या-फिरत्या शोरूमचं प्रदर्शन मांडलयं.
काय घालवं आणि काय दाखवावं याचं भान सांडलयं. बाजारात आता माणसाच्या शोरूमचं थैमान माजलयं.
-------------------------------------------
प्रेम....रंग आणि अंग बघूनच करतात माणसं...
हे आता तुमच्यातील काही हसला असाल आणि काही 'असं नसतं' असे म्हणाला असाल.
काही जनानां पटलं नसेल तर काहीनां राग आला असेल. तुम्ही व्यक्त केलेले विचार मेंदूचे होते.
कारण खरं प्रेम करणारे विचार करत नाहीत तर.. आपल्या मनातल्या भावनांना जपत असतात.
म्हणूनच व्यक्त करताना मेंदूचा कमी अन् मनाचा जास्त वापर करा.
-------------------------------------------
राञ....म्हणजे काय ?
थकलेल्या प्रत्येक शरीराला आपल्या घट्ट मिठीत घेणारी प्रेमळ आई.
माणसाला बालपणातचं आईच्या कुशीत झोपता येतं, आई नेहमीच कुशीत आणि मिठीत घेऊ शकत नाही आणि काही माणसानां राहाता येत नाही.
म्हणूनच वेळेनं बनवली आहे राञ.
------------------------------
सकाळ म्हणजे काय ?
राञी निवांत विसावलेल्या आपल्या लाडक्यांसाठी वेळेने तयार केलेली नव्या अनुभवांची शिदोरी.
शेवटी पोट भारल्याशिवाय मेहनत करता येत नाही आणि मेहनती शिवाय थकून राञ रूपी आईच्या मिठीत सूखावता येत नाही.........
सकाळी उठाल तेव्हा शिदोरीचा आनंद घेण्यास शुभेच्छा.
-------------------------------------------
माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात हे जरी खरं असलं तरी ते कर्तृत्व करण्यास ज्यांनी जन्म दिला,
ज्यांनी त्यासाठी मार्गदर्शन केले, ज्यांनी मोठं होण्याच्या शर्यतीत स्पर्धा देऊन जिकंण्यास प्रवृत्त केले ,
ज्यांनी प्रोत्साहन दिलं, ज्यांनी यश-अपयशात सोबत केली, अशा अनेक माणसांमुळेच माणूस मोठा होतो.
म्हणूनच कितीही मोठं झालं तरी माणूसकी जपता आली पाहिजे. अर्थात ..... "जाणीव " ठेवली पाहीजे.
-------------------------------------------
"अमाप पैसा" कमवला तरी त्याने निस्वार्थी आणि निरागस प्रेम विकत घेता येत नाही.
"शिखर प्रसिद्धी" मिळवली तरी त्याचा आनंद आणि समाधान कायम टिकून रहात नाही.
पण..."मनातली आठवण" एक छोटीशी किंवा क्षणभराची आठवण कायम सोबत रहाते.
कधी हळूच गालात हसते तर कधी झर्यासारखी डोळ्यांमधून उन्मळून येते. फक्त आनंद आणि समाधान देते.
-------------------------------------------
जसं पोटभरून जेवणं जरुरीचं असतं, तसं मनभरून प्रेम करणं ही शिकावं माणसानं.
जसं मानात राहणं जरूरीचं असतं, तसं मनात राहणं ही शिकावं माणसानं.
-------------------------------------------
जगात आणि जीवनात सर्वच गोष्टींवर मर्यादा आहेत ...वेळेच्या, वयाच्या, वागण्याच्या ....
फक्त एका गोष्टींवर मर्यादा नाही, तरी ती गोष्ट फार कमी माणसांना करता येते. "चांगला विचार करणे".
आपण त्या कमी माणसांमध्ये असावं आणि नेहमी बसावं.
-------------------------------------------
आपली वाट लावण्याची प्रवृत्ती नसली तरी चालेल, पण वाट बघण्याची जरूर असावी. कारण वाट बघण्यातच सयंमाची खरी परिक्षा असते.
-------------------------------------------
* गरज नसते.........*
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ विधीची गरज नसते.
नदीला वाहण्यासाठी कोणत्याही वाटेची गरज नसते.
जे स्वतः वर विश्वास ठेवतात त्यांना नसीबाची गरज नसते.
मेहनत करून पुढे जाणाऱ्यांना कोणत्याही रथाची गरच नसते.
-------------------------------------------
*बदल*.....
एक काळ होता जेव्हा नजरेला नजर मिळाली आणि इशारा झाला की प्रेम व्हायचं.
आजही नजर आहे पण *बदल* एवढाच की .....त्या नजरेनं आता समोरच्याचं सौंदर्य आणि संपत्ती पाहीली जाते.
मनोगत...






