थोडा वेळ देशील मला, थोडसं बोलायचं आहे.
मला लाज वाटली की वेळेला विसरण्या इतका मोठा झोलोय की मनाने खोटा झालोय.
तिनं लगेचच ओळखलं आणि मला जवळ घेत म्हटलं " मी तुझ्यासोबतचं आहे तरी तू स्वतःला सावरून रहा...
स्वतःच्या मनाला आवरून रहा. तुझं मन माझ ऐकत नाही, आणि तुला असं एकटं निराश पडलेलं मला पाहवत नाही.
नेहमी प्रमाणे तीला काहीतरी उत्तर देणार त्याआधीच तीनं मिठीत घेतलं. मला पण भरून आलं...
डोळ्यातलं पाणी मनाविरूद्ध बंड करून गेलं. डोळे भरलेले पाहून वेळ म्हणाली.... फक्त हरवून जाऊ नकोस,
आपलं कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःचं व्हायचं असतं. आता थोडी भावनिक झाली होती...
म्हणाली, "तु नेहमी हसत रहावं वाटतं, तुला एकटं पाहून मन माझं दाटतं.
"मला ही स्वतःला आवरता आलं नाही. मी म्हटल अशी कधीतरी येत जा, मला धीर देत जा.
फक्त बघत होती ..... जणू डोळ्यात भरून मला निघत होती.
------------------------------------
त्या दिवशी एकाने मला उपहासाने विचारले.....
काय आठवण .... आठवण बोलतोस नेहमी.
काय अर्थ आहे या शब्दात....मी सहज सांगितले ....
अर्थ कळण्यास आपल्याकडे कोणीतरी स्वतःच मनाचं आणि मानाचं असं 'एक ' माणूस असावं लागतं ज्याची.
कारण त्याचीच काढतो आपण ....आठवण म्हणजे = आठव + वण ( एक ).
--------------------------------
विचार करतो मी कधी कधी की माणूस जन्माला एवढं सिरयसली का घेतो....
इथून जिवंत कोण जाणार आहे. आपण आज आहोत तसेच उद्या खरंच राहणार आहे का ?
--------------------------------
एक काळ होता माणसाचं मन मायेच्या शब्दांनी भरायचं.
आजही मायेने भरतयं..... फक्त मायेच रूप बदललं आहे.
--------------------------------
माणसं गरीब-श्रीमंत असतात.
काळी-गोरी असतात.
लहान-थोर असतात.
भोळी-भामटी असतात.
आडानी-हुशार असतात.
कपटी-निरागस असतात.
पण.... सगळ्यांना दिवसाचे तास माञ २४ असतात.
--------------------------------
ज्या जखमेतून रक्त येत नाही ती जखम आपल्यांनीच दिलेली असते.
बरं आहे अशा जखमा सहज दिसत नाहीत त्यामुळेच कोणी या जखमांवर हसत नाहीत.
दोष जखम देणाऱ्याचा नसतो, आपणच उगाच वेड्यासारखे जखमा करुन घेत असतो.
--------------------------------
कशी कशी माणसं जीवनाच्या वाटेवर मिळतात....
काही एखाद्या वळणावर सोबत सोडून वळतात....
काही शिषिरातील पानासारखी ओळख विसरून गळतात....
काही निरागस मनाला जखमा देऊन बिनधास्त छळतात....
काही तर स्वतःची पोळी भाजून सोईने दूर पळतात....
काहीं बरोबर आपण निस्वार्थी राहीलो तरी स्वार्थी खेळतात...
काहींशीच मनाचे धागे अतूट आणि अलगद जुळतात...
फक्त आपल्यानांच मनातील दुःखाची वादळ कळतात.
--------------------------------
आजचा थकवा घालवण्यास आणि उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका......
--------------------------------
माणसाला ....
जे मिळत नाही, त्याला तो व्यर्थ समजतो.
जे त्याच्याकडे आहे त्यात तो नेहमी अर्थ शोधत असतो.
जे सहज मिळत त्याची किंमत कळत नाही, जे त्याचे नसते ते चुकूनही त्याच्याकडे वळत नाही.
काही नसलं तरी जाणीव असली पाहीजे, आपले सोबत नसल्याची उणीव भासली पाहीजे.
--------------------------------
मी हल्ली पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !
पुस्तकं महाग झालीयत, माणसं स्वस्त. शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात माणसं.
बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला.
काही तर आयुष्यभर कळत नाहीत !
सगळ्या साईजची सगळ्या विषयांची.
छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.
आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.
दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं
बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.
पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने, घट्ट धरून ठेवणारी.
मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.
सतत खोटी वचनं देणारी माणसं,
काही एकनिष्ठ जाणीवपूर्वक माणसं.
पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,
माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार, विषय, मजकूर सारंच बदलत
शेवटी वाचायला माणूसच उरत नाही.
तरीही अनेक जणात असतो मी,
माझी माणसं मनात ठेवतो.
मनोगत ...
मला लाज वाटली की वेळेला विसरण्या इतका मोठा झोलोय की मनाने खोटा झालोय.
तिनं लगेचच ओळखलं आणि मला जवळ घेत म्हटलं " मी तुझ्यासोबतचं आहे तरी तू स्वतःला सावरून रहा...
स्वतःच्या मनाला आवरून रहा. तुझं मन माझ ऐकत नाही, आणि तुला असं एकटं निराश पडलेलं मला पाहवत नाही.
नेहमी प्रमाणे तीला काहीतरी उत्तर देणार त्याआधीच तीनं मिठीत घेतलं. मला पण भरून आलं...
डोळ्यातलं पाणी मनाविरूद्ध बंड करून गेलं. डोळे भरलेले पाहून वेळ म्हणाली.... फक्त हरवून जाऊ नकोस,
आपलं कोणी नसतं तेव्हा आपण स्वतःचं व्हायचं असतं. आता थोडी भावनिक झाली होती...
म्हणाली, "तु नेहमी हसत रहावं वाटतं, तुला एकटं पाहून मन माझं दाटतं.
"मला ही स्वतःला आवरता आलं नाही. मी म्हटल अशी कधीतरी येत जा, मला धीर देत जा.
फक्त बघत होती ..... जणू डोळ्यात भरून मला निघत होती.
------------------------------------
त्या दिवशी एकाने मला उपहासाने विचारले.....
काय आठवण .... आठवण बोलतोस नेहमी.
काय अर्थ आहे या शब्दात....मी सहज सांगितले ....
अर्थ कळण्यास आपल्याकडे कोणीतरी स्वतःच मनाचं आणि मानाचं असं 'एक ' माणूस असावं लागतं ज्याची.
कारण त्याचीच काढतो आपण ....आठवण म्हणजे = आठव + वण ( एक ).
--------------------------------
विचार करतो मी कधी कधी की माणूस जन्माला एवढं सिरयसली का घेतो....
इथून जिवंत कोण जाणार आहे. आपण आज आहोत तसेच उद्या खरंच राहणार आहे का ?
--------------------------------
एक काळ होता माणसाचं मन मायेच्या शब्दांनी भरायचं.
आजही मायेने भरतयं..... फक्त मायेच रूप बदललं आहे.
--------------------------------
माणसं गरीब-श्रीमंत असतात.
काळी-गोरी असतात.
लहान-थोर असतात.
भोळी-भामटी असतात.
आडानी-हुशार असतात.
कपटी-निरागस असतात.
पण.... सगळ्यांना दिवसाचे तास माञ २४ असतात.
--------------------------------
ज्या जखमेतून रक्त येत नाही ती जखम आपल्यांनीच दिलेली असते.
बरं आहे अशा जखमा सहज दिसत नाहीत त्यामुळेच कोणी या जखमांवर हसत नाहीत.
दोष जखम देणाऱ्याचा नसतो, आपणच उगाच वेड्यासारखे जखमा करुन घेत असतो.
--------------------------------
कशी कशी माणसं जीवनाच्या वाटेवर मिळतात....
काही एखाद्या वळणावर सोबत सोडून वळतात....
काही शिषिरातील पानासारखी ओळख विसरून गळतात....
काही निरागस मनाला जखमा देऊन बिनधास्त छळतात....
काही तर स्वतःची पोळी भाजून सोईने दूर पळतात....
काहीं बरोबर आपण निस्वार्थी राहीलो तरी स्वार्थी खेळतात...
काहींशीच मनाचे धागे अतूट आणि अलगद जुळतात...
फक्त आपल्यानांच मनातील दुःखाची वादळ कळतात.
--------------------------------
आजचा थकवा घालवण्यास आणि उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो.
पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका......
--------------------------------
माणसाला ....
जे मिळत नाही, त्याला तो व्यर्थ समजतो.
जे त्याच्याकडे आहे त्यात तो नेहमी अर्थ शोधत असतो.
जे सहज मिळत त्याची किंमत कळत नाही, जे त्याचे नसते ते चुकूनही त्याच्याकडे वळत नाही.
काही नसलं तरी जाणीव असली पाहीजे, आपले सोबत नसल्याची उणीव भासली पाहीजे.
--------------------------------
मी हल्ली पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !
पुस्तकं महाग झालीयत, माणसं स्वस्त. शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात माणसं.
बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला.
काही तर आयुष्यभर कळत नाहीत !
सगळ्या साईजची सगळ्या विषयांची.
छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.
आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.
दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं
बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.
पाठीवर थाप मारणारी, हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने, घट्ट धरून ठेवणारी.
मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.
सतत खोटी वचनं देणारी माणसं,
काही एकनिष्ठ जाणीवपूर्वक माणसं.
पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,
माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार, विषय, मजकूर सारंच बदलत
शेवटी वाचायला माणूसच उरत नाही.
तरीही अनेक जणात असतो मी,
माझी माणसं मनात ठेवतो.
मनोगत ...

No comments:
Post a Comment