सगळं एका क्षणात संपवलं असतं...
पण तसं करण्याइतकं मन कठोर राहील नाही....
तसं ते कधीच नव्हतं. मन जर तुमच्यात गूंतलेलं नसतं तर..
सगळं एका क्षणात संपवलं असतं. असा कसा गुंतंत गेलो ,
कधी तुमचा झालो काहीच कळलं नाही. जर हे कळलं नसतं तर....
सगळं एका क्षणात संपवलं असतं.
----------------------------------------------------------------
अफवा .....
तिरस्कार करणारे लोक निर्माण करतात.
अडाणी असलेले लोक त्या पसरवतात.
आणि
मूर्ख असलेले लोक त्या स्विकारतात.
----------------------------------------
मनाला समजून वागा....
त्याचा गोंधळ करु नका.
वेळे सोबत चला......
तिला बदलण्याचा प्रयत्न करु नका.
नात्यातील गैरसमज टाळा.....
त्यांना विस्कटू देऊ नका.
------------------------------------
शुन्यालाही किंमत देता येते.......
फक्त त्यापुढे एक होऊन उभे राहता आले पाहीजे.
--------------------------------------
घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच त्रास देतो.
गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा,
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच मागे डोळे न देता पुढे दिले आहेत.
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर वेळही तुमच्या सोबत राहील.
-----------------------------------------------------------------------------
गोष्टी आपल्या मर्जीनुसार झाल्या नाहीत म्हणून नाराज नाही व्हायचं.
आपण आपल्या मनाचा राजा होऊनच राहायचं.
कोणाला नाही दिसलो, तरी आपण स्वतःला स्वतःच्या मनात पाहायचं.
कारण...
माणसाला स्वतःच्या हट्टापुढे आणि सोयीसाठी सर्व काही शून्य असतं.पण आपलं मन तेवढ सहज नसतं.
----------------------------------------------------------------------
नाते जुळने आणि जुळून येणे हे आपल्या विश्वासाचा पुरस्कार असतो.
नाते निरंतर टिकवून ठेवणे हा आपल्या त्यागाचा भाग असतो.
नाते घट्ट करणे हा आपल्या एकनिष्ठतेचा आणि काळजीचा भाग असतो.
---------------------------------------------------------------------
माझा मला राग येतो....
जेव्हा मी भावनांचा व्यापार करणाऱ्यानां नकळत बळी पडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा मी ऊगाचच माझ्या मनाला लबाड माणसांच्या संगतीत सोडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा माझ्या मनाला दुखवणार्यानां केवळ कर्तव्यापायी माझ्या सोबत पाहतो.
-----------------------------------------------------------------
आपण आरशात पाहिले की आपल्याला आपली प्रतिमा दिसते...
आपण तीला नटवतो पण काही वेळानं सगळं पुर्ववत प्रतिमेसारखं होत.
अन् आपल्याला राग येतो , ञास होतो किंवा दुःख होतं.
खरंतर , आपण त्या प्रतिमेचे खरं चिञ नटवलं पाहीजे. कारण जसं ते चिञ असतं तशी आरश्यातील प्रतिमा असते.
ते चिञ म्हणजे " मन ".... म्हणूनच मला वाटतं ' मनी असे ते चित्र दिसे '.
-----------------------------------------------------------------------
"जप"आणि "जप "
दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण
उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वत:ला सावरणे म्हणजे जप.
तरी पण त्यांचा संबंध खुपच जवळचा आहे .
आपण भगवंताची नाम माळ "ज प तो "
तेंव्हा भगवंत आपल्याला " ज प तो "
-----------------------------------------------
आज मेंदूने अचानक मनाला स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मला प्रश्न केला ?
कशासाठी केला आहेस हा हट्ट आणि कशावरून जोडलेली नाती तुझी होतीलच घट्ट ?
थोडासा बावरलो.... कारण नेहमी मन सोबत असायचे त्यामुळे एकटेपण नसायचे.
आज अचानक त्यानं मला सोडलं होतं आणि मेंदूच्या बेरकी तावडीत धाडलं होतं.
पण सगळ्यांना खेळायला लावणारी वेळ माझ्या सोबत होती... दोघांचाही डाव गुपचूप बघत होती.
मला अस्वस्थ पाहून लगेच सावरलं... त्या दोघांना एका उत्तरात आवरलं.
हा जे करतोय ते त्याचं कर्म आहे, माझ्या मिठीत येऊन आपल्यानां दिलेलं मर्म आहे.
हीच त्याची सुरुवात आणि यातच त्याचा शेवट आहे. हे ऐकून मेंदू मागे सरला अन् मानाने लगेच माझा हात धरला. म्हणालं.... खरंच .. " जे जपलं तेच आपलं ".
---------------------------------------------------------------------
बाप आणि मी.....
बालपणापासून तरूणाई पर्यत जवळ कधी बसलो नाही. एकाच घरात राहून आम्ही, एकमेकांसाठी कधी हसलो नाही.
कधी हरवला तेच कळलं नाही जिव्हाळ्याचा संवाद. नेहमीच एकमेकांस दोष देऊन फक्त शांततेचा वादविवाद.
आजही मला आवाज त्यांचा मनापासून येत नाही. आतूरलेले पाऊल माझं त्याच्याकडं वळत नाही.
एकञ राहीलो पण बोलायला वेळ नाही, असं कसं नातं आमचं कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबेल हा अर्धवट जीवन प्रवास.
असं नाही की मला बोलावसं वाटत नाही. खंत याचीच आहे माझ्यासाठी आजही त्याचं मन दाटत नाही.
मनोगत ...........
पण तसं करण्याइतकं मन कठोर राहील नाही....
तसं ते कधीच नव्हतं. मन जर तुमच्यात गूंतलेलं नसतं तर..
सगळं एका क्षणात संपवलं असतं. असा कसा गुंतंत गेलो ,
कधी तुमचा झालो काहीच कळलं नाही. जर हे कळलं नसतं तर....
सगळं एका क्षणात संपवलं असतं.
----------------------------------------------------------------
अफवा .....
तिरस्कार करणारे लोक निर्माण करतात.
अडाणी असलेले लोक त्या पसरवतात.
आणि
मूर्ख असलेले लोक त्या स्विकारतात.
----------------------------------------
मनाला समजून वागा....
त्याचा गोंधळ करु नका.
वेळे सोबत चला......
तिला बदलण्याचा प्रयत्न करु नका.
नात्यातील गैरसमज टाळा.....
त्यांना विस्कटू देऊ नका.
------------------------------------
शुन्यालाही किंमत देता येते.......
फक्त त्यापुढे एक होऊन उभे राहता आले पाहीजे.
--------------------------------------
घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच त्रास देतो.
गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा,
कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच मागे डोळे न देता पुढे दिले आहेत.
चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर वेळही तुमच्या सोबत राहील.
-----------------------------------------------------------------------------
गोष्टी आपल्या मर्जीनुसार झाल्या नाहीत म्हणून नाराज नाही व्हायचं.
आपण आपल्या मनाचा राजा होऊनच राहायचं.
कोणाला नाही दिसलो, तरी आपण स्वतःला स्वतःच्या मनात पाहायचं.
कारण...
माणसाला स्वतःच्या हट्टापुढे आणि सोयीसाठी सर्व काही शून्य असतं.पण आपलं मन तेवढ सहज नसतं.
----------------------------------------------------------------------
नाते जुळने आणि जुळून येणे हे आपल्या विश्वासाचा पुरस्कार असतो.
नाते निरंतर टिकवून ठेवणे हा आपल्या त्यागाचा भाग असतो.
नाते घट्ट करणे हा आपल्या एकनिष्ठतेचा आणि काळजीचा भाग असतो.
---------------------------------------------------------------------
माझा मला राग येतो....
जेव्हा मी भावनांचा व्यापार करणाऱ्यानां नकळत बळी पडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा मी ऊगाचच माझ्या मनाला लबाड माणसांच्या संगतीत सोडतो.
माझा मला राग येतो....
जेव्हा माझ्या मनाला दुखवणार्यानां केवळ कर्तव्यापायी माझ्या सोबत पाहतो.
-----------------------------------------------------------------
आपण आरशात पाहिले की आपल्याला आपली प्रतिमा दिसते...
आपण तीला नटवतो पण काही वेळानं सगळं पुर्ववत प्रतिमेसारखं होत.
अन् आपल्याला राग येतो , ञास होतो किंवा दुःख होतं.
खरंतर , आपण त्या प्रतिमेचे खरं चिञ नटवलं पाहीजे. कारण जसं ते चिञ असतं तशी आरश्यातील प्रतिमा असते.
ते चिञ म्हणजे " मन ".... म्हणूनच मला वाटतं ' मनी असे ते चित्र दिसे '.
-----------------------------------------------------------------------
"जप"आणि "जप "
दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत पण
उच्चारायला वेगळे आणि त्यांचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वत:ला सावरणे म्हणजे जप.
तरी पण त्यांचा संबंध खुपच जवळचा आहे .
आपण भगवंताची नाम माळ "ज प तो "
तेंव्हा भगवंत आपल्याला " ज प तो "
-----------------------------------------------
आज मेंदूने अचानक मनाला स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मला प्रश्न केला ?
कशासाठी केला आहेस हा हट्ट आणि कशावरून जोडलेली नाती तुझी होतीलच घट्ट ?
थोडासा बावरलो.... कारण नेहमी मन सोबत असायचे त्यामुळे एकटेपण नसायचे.
आज अचानक त्यानं मला सोडलं होतं आणि मेंदूच्या बेरकी तावडीत धाडलं होतं.
पण सगळ्यांना खेळायला लावणारी वेळ माझ्या सोबत होती... दोघांचाही डाव गुपचूप बघत होती.
मला अस्वस्थ पाहून लगेच सावरलं... त्या दोघांना एका उत्तरात आवरलं.
हा जे करतोय ते त्याचं कर्म आहे, माझ्या मिठीत येऊन आपल्यानां दिलेलं मर्म आहे.
हीच त्याची सुरुवात आणि यातच त्याचा शेवट आहे. हे ऐकून मेंदू मागे सरला अन् मानाने लगेच माझा हात धरला. म्हणालं.... खरंच .. " जे जपलं तेच आपलं ".
---------------------------------------------------------------------
बाप आणि मी.....
बालपणापासून तरूणाई पर्यत जवळ कधी बसलो नाही. एकाच घरात राहून आम्ही, एकमेकांसाठी कधी हसलो नाही.
कधी हरवला तेच कळलं नाही जिव्हाळ्याचा संवाद. नेहमीच एकमेकांस दोष देऊन फक्त शांततेचा वादविवाद.
आजही मला आवाज त्यांचा मनापासून येत नाही. आतूरलेले पाऊल माझं त्याच्याकडं वळत नाही.
एकञ राहीलो पण बोलायला वेळ नाही, असं कसं नातं आमचं कशालाच कशाचा मेळ नाही.
क्षण एक येईल असा, घेऊन जाईल हा श्वास. अर्ध्यावरच थांबेल हा अर्धवट जीवन प्रवास.
असं नाही की मला बोलावसं वाटत नाही. खंत याचीच आहे माझ्यासाठी आजही त्याचं मन दाटत नाही.
मनोगत ...........

No comments:
Post a Comment