नेहमीच गरुड भरारी जरुरी नसतं...

कधीकधी चिमणीसारखे समाधानी ही जगता आलं पाहीजे.
नेहमीच मोरासारखा तोरा दाखवून राहणे जरुरी नसतं ....
कधीकधी कावळ्यासारखं स्वतःवर प्रेम करत ही जगता आलं पाहिजे.
नेहमीच मांजरासारखे डोळे मिटून दूध पिणे चांगलं नसतं...
कधीकधी इमानदार कुञ्यासारखं जिथं खाल्लं तिथं एकनिष्ठ ही राहता आलं पाहिजे.
---------------------------------------------------------------

नेहमीच पुस्तकात सगळं शिकता येत नाही....
माणूस .....पक्षी आणि प्राणी यांच्याकडूनही बरचं काही शिकू शकतो....
फक्त शिकण्याची प्रवृत्ती जरुरी आहे.
---------------------------------------------------------------

शरीर आणि मन यामधील एक विशेष  म्हणजे ....
शरीराला कोणीही धक्का देऊ शकतं. पण.....
मनाला तेच धक्का देतात जे मनात असतात.
---------------------------------------------------------------

प्रेम म्हणजे मौसमी झरा...
अर्थात ...झरा जसा भूगर्भात पाणी असे पर्यंत खळखळतो.
तसंच प्रेमही मनात निरागस भावना असेपर्यत दाटत.
पाऊस संपल्यावर जसा झरा आटतो, तसंच भावनांचा पाऊस संपला की प्रेमही आटतं.
पण फरक एवढाच की...."झरा" आजही जमिनीशी एकनिष्ठ आहे.
फक्त "प्रेम" मन सोडून मेंदूच्या आहारी जाऊन व्यवहारी झाले आहे.
------------------------------------------------

असं काही तरी व्हावं...
ज्यांना आपण आवडतो त्याचं मन आपल्या मनात यावं.
उत्कंठ प्रेमाच्या भावनांना आपण न्याहळून पहावं.
अन्... नातं निशब्द रहावं.
------------------------------------------

काही माणसं फारच भोळी वागतात... 
पण स्वतःची पोळी सोयीस्कर  भाजतात..
चेहऱ्यावर साधी दिसतात. पण मनात महा लबाड असतात.
तोंडाने साखरेसारखे गोड बोलतात..
पण स्वतःची चाल अचूक चालतात.
--------------------------------------------

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
कोणालाही न उलगडायला दिलेलं, क्षणांची पानं  खोलत होतो.

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
अचानक मन करुण झालं, डोळ्यांतून पाणी टचकण भरून आलं ....

एकदा असंच एकांतात ...स्वतःशीच बोलत होतो.
पुढच्या क्षणाला सगळं स्तब्ध, अन् मी निःशब्द...

हे पान फक्त माझं गुपित आहे, म्हणून आजही मनाच्या कुपीत आहे.
खरंच....मला असं वाटत.
प्रत्येकानं कधीतरी स्वतःशी बोलावं.. असं कुपितलं पान स्वतःसाठी खोलावं.
---------------------------------------------------------------

Make up अर्थात .... शृंगार या शब्दाचा अर्थ समजल्या पासून मी पाहतोय.
बहुतेक माणसं सुंदर दिसण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि जीवाची ओढातान करत असतात.
पण मला वाटत खरी आणि शाश्वत  सुंदरता मिळवण्यासाठी कधीतरी आपण हे जाणलं पाहीजे की....

आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे आपल्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.

मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.

मनातले भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
आपला चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.
खरी सुंदरता मिळवण्यासाठी ......
माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे, खळखळून हसलं पाहिजे,
दिलखुलास विनोद केले पाहिजेत, मनसोक्त रडलं पाहिजे !

थोडक्यात स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.
त्यासाठी वाचन पाहिजे, चिंतन पाहिजे, खेळ पाहिजे.... हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर बनतो.

मन शुद्ध आणि एकनिष्ठ असलं की चेहरा आपोआप तेजस्वी होतो.
सुंदर होण्यासाठी जणाचा नाही ..... मनचा आरसा वापरा. मनाचा आरसा नेहमी तुमची खरी प्रतिमा दाखवेल.
---------------------------------------------------------------

कधी वाटते ....
एक अशी बँक असावी....
सर्व नात्यांची जिथे रोज बचत करावी.
कधी वाटते...
एक असं मंदिर असावं ...
सर्व भावनांनी जिथे नेहमी शुद्धीकरण व्हावं.
कधी वाटते...
आपलंच कोणीतरी असं असावं...
ज्यात बँक आणि मंदिर एकञ असावं.
---------------------------------------------------------------

"अंदाज" चुकीचा असू शकतो , कारण तो आपल्या मेंदूचा अनिश्चित  विचारांचा वार असतो.
"अनुभव" बहुधा बरोबर असतो , कारण तो आपल्या जीवनातील निश्चित घटनांचा सार असतो.
---------------------------------------------------------------

स्वप्न जेव्हा तारखेसहीत लिहिली जातात, तेव्हा ती धेय्य होतात.
धेय्याला पायरी पायरीने जोडले की, नियोजन होते.
नियोजन कृतीत उतरवले की, स्वप्नपूर्ती होते.
---------------------------------------------------------------

नेहमीच वाटतं, 
जसं तुम्ही मला प्रत्येक क्षणात मनात ठेवता....
अगदी तसंच ....
तुम्हालाही फक्त मनातच नाही, तर ह्दयाच्या प्रत्येक ठोक्याला समोर ठेवावे.
पण तसं करता येत नाही...
कारण वेळेच्या पुढे जायला मला आवडत नाही...
---------------------------------------------------------------

जसं माणसाचं जीवन अवलंबून असत श्वासावर....
तसंच नातं अवलंबून असतं विश्वासावर.
जसा श्वास ह्दयापर्यत पोचल्यावर  ह्दय फुलंत अन् ...श्वास न पोचल्यास ते गूदमरतं.
अगदी  तसंच...विश्वास ह्दयात पोचल्यावर नातं फुलतं आणि विश्वास संशयात बरबटला तर ते विस्कटतं.
---------------------------------------------------------------

माणसं ही अजब वागतात...
समोर असलेल्या माणसावर अविश्वास करतात......
आणि ज्याला कधी पाहीलं नाही त्याला विश्वात्मा मानतात.
---------------------------------------------------------------

तुमच्या आठवणीत जगणं यासारखी दुसरी माजा नाही........
आणि.... तुमच्याशिवाय जगणं यापेक्षा मोठी सजा नाही.
---------------------------------------------------------------

स्वच्छ मनाच्या भांड्यात स्वप्नाचं आधण ....
त्यात चवीनुसार विचारांची साखर ...
मस्त सकारात्मक स्वादाचा आल्याचा तुकडा ......
कृतीशीलतेची दोन चमचे चहा पावडर ......
प्रयत्नांना मस्त उकळी फुटल्यावर
निग्रहाच्या ताज्या दुधात
संयमाच्या गाळणीतून गाळून
समाधानाच्या कपातून दोन घोट परिपुर्तिच्या आनंदाचे ....
असा फक्कड चहा उद्या सकाळी घेऊनच पहा…

मनोगत....

No comments:

Post a Comment