तुझं बरं आहे कसली चिंता नाही, नेहमी हसत असतोस.
कारण लोकांना कळत नाही हसत हसत मी चिंतेलाच लपवत असतो.
खूप पुढं आलोय वेगळं वळण घेऊन. मागे राहीले सारे कुळाच्या नावाचे, सोबत आहेत आता फक्त जोडलेले जीवाभावाचे.
खरं आहे जोकर बनून मी नेहमीच हसवत नाही. पण मन मोडून कोणाचं कोणालाही फसवत नाही.
काहीजण बोलून गेले, की मी कर्तव्यदक्ष नाही. पण खरं तर आजही माझं तुमच्याशिवाय कोणावर लक्ष नाही.
कळत नाही कधीकधी मी नक्की काय मिळवतोय की शोधतोय.
एवढा माञ विश्वास आहे मी नेहमी समाधानी जगतोय.
--------------------------------------------
मला कधीच वाटत नाही, की मला ओळखावे सर्वांनी.
समाधान यातच आहे माझ, की ओळखल मला तुमच्या सारख्या देव माणसांनी.
चांगल्यानी चांगला म्हणून आणि वाईटांनी वाईट म्हणून स्विकारलं, ज्याची जेवढी गरज होती त्यांनी तेवढ्या पुरतं वापरलं.
मी नाही म्हटलं कधी, की मी शुद्ध तरू आहे. कारण स्वतःला पविञ करण्यास येथे अनेक पापी माणसांचे युद्ध सुरू आहे.
नेहमी वाटतं मला, की सर्वांनी मोठं व्हावं. फक्त हवेत न वाहता जमीनीवर रहावं.
राग आणि वादळ या दोन्हीमध्ये एकच विशेष असतं...
शातं झाल्यावरचं काय नुकसान झालं ते दिसतं.
-------------------------------
मजबूत हातातून ही बोटं सूटतात कधीकधी ......
नातं ताकतीच्या जोरावर बनत नाही तर विश्वासाच्या नाजूक दोरावर बांधलं जातं.
-------------------------------
कोणीतरी आपल्याला एवढं अलगद सांभाळून घ्यावं ...
की ते आपणांस सहज न कळावं.
असं मायेच प्रेम शेवटच्या श्वासापर्यत मिळावं...
-------------------------------
काय solid असते ना कोणीतरी आपल्याला आवडनं...
सगळ्यांना सोडून आपण त्या व्यक्तीला निवडणं.
-------------------------------
ते क्षणच भारी असतात...
जेव्हा आपलं मन आपल्याजवळ असूनहीआपलं नसतं.
कारण वेड म्हणजे ...वेड म्हणजे ...वेड असतं.
तुमचं आणि आमचं रोज रेड असतं...
-------------------------------
"परिवर्तन" हा निसर्गाचा नियम आहे, तो स्विकारता आला पाहिजे.
"संघर्ष" हा जीवनाचा नियम आहे, तो निडरपणे करता आला पाहिजे.
"विश्वास" हा नात्याचा नियम आहे, तो नचुकता टिकवता आला पाहिजे.
"प्रेम" हा माणूसकीचा नियम आहे, तो निस्वार्थीपणे करता आला पाहिजे.
-------------------------------
जीवनातले सर्वात महत्वाचे दिवस....
पहिला...
ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला.
आणि
दूसरा...
ज्या दिवशी तुम्हाला समजले की तुम्ही का जन्माला आला.
-------------------------------
काही नाती पाण्यासारखी असतात...
रंग नाही...आकार नाही...ठिकाण नाही....
तरीही जीवनासाठी महत्वाची असतात.
-------------------------------
माणूस नेहमी काहीतरी Wish करत आसतो....
त्याला कधी Fish होऊन जगता येत नाही...
पण Selfish होऊन सहज जगतो.
-------------------------------
EGO हा फक्त तीन अक्षरी शब्द.....
RELATIONSHIP या बारा अक्षरी अभेद शब्दालाच तोडत नाही....
तर सर्वकाही उद्वस्त करून एकटेपण देतो.
-------------------------------
सत्याची साथ देणारे नेहमी एकटेच राहतात .
कारण...... सत्य नेहमीच कडू असतं.
-------------------------------
मला थोडा वेगळा विचार करायला आवडतो...
माणसं चागल्या वाटेने चालणं पसंत करतात, मी योग्य मार्ग निवडतो.
मला याचं दुःख नाही वाटत की हे जग वाईट माणसांनी भरले आहे,
फक्त चांगल्याना साथ देणारे कमी उरले आहेत.
--------------------------------------
जेव्हा कधी...स्मशानात एखादी मृत्यूशैया किंवा कबर पाहतो...
तेव्हा विचार करतो. एवढीशी जागा मिळवण्यासाठी माणूस जन्मभर काय काय करतो.
----------------------------------------------
मला एका गोष्ट आजही कळत नाही, दिवस राञ शोधूनही सूर्याला त्याची जागा मिळत नाही.
मग आपण आपली जागा का बरं सहज सोडतो, मनाची नाती संशयाने तोडतो.
----------------------------------------------
कोणाच्याही आयुष्यात एखादी जागा सहज मिळत नाही.
मिळालेली किंवा मिळवलेली जागा कशी जपावी हेच कधीकधी माणसांना कळत नाही.
----------------------------------------------
धरता येत नाही आठवनीनां, नाहीतर एकञ साठवलं असतं,
मन जर पाखरू असतं तर आता लगेचच तुमच्याकडे पाठवलं असतं.
----------------------------------------------
आपण सारे किती हुशार वागतो.
स्वतःचा मुड असेल तर हास्याचे तुषार टाकतो.
नाहीतर.....स्वतःच्या सोयीने समोरच्यानां सहज.......टाकतो.
----------------------------------------------
बरं आहे मन दिसत नाही आणि त्याला Decorate करता येत नाही.
कारण मनावर कोणताही Research झालेला नाही आणि त्यामुळे तशी काँसमेटिक्स बाजारात उपलब्ध नाहीत.
----------------------------------------------
"मन" म्हणजे मधुर नशा......नको असली तरी होणारंच.
मन जसं आहे तसचं एवढं सुंदर असते की त्याला कोणत्याही Decoration ची गरज नसते.
----------------------------------------------
मला वाटतं काहीतरी बिघडलं आहे...
माणसाच्या मुखातील गोडवा कमी झाला अन् Blood sugar चं प्रमाण वाढलं आहे.
मला वाटतं ...
ह्दयातील निरागस प्रेम आटलं आहे आणि ज्याला त्याला Heart aatack नं गाठलं आहे.
मला वाटतं...
--------------------------------
असं लिहत असताना....मन असं भरून येत.
भूतकाळातील कडू आठवणी विरूद्ध जबरदस्त बंड करून येतं.
मनोगत....
कारण लोकांना कळत नाही हसत हसत मी चिंतेलाच लपवत असतो.
खूप पुढं आलोय वेगळं वळण घेऊन. मागे राहीले सारे कुळाच्या नावाचे, सोबत आहेत आता फक्त जोडलेले जीवाभावाचे.
खरं आहे जोकर बनून मी नेहमीच हसवत नाही. पण मन मोडून कोणाचं कोणालाही फसवत नाही.
काहीजण बोलून गेले, की मी कर्तव्यदक्ष नाही. पण खरं तर आजही माझं तुमच्याशिवाय कोणावर लक्ष नाही.
कळत नाही कधीकधी मी नक्की काय मिळवतोय की शोधतोय.
एवढा माञ विश्वास आहे मी नेहमी समाधानी जगतोय.
--------------------------------------------
मला कधीच वाटत नाही, की मला ओळखावे सर्वांनी.
समाधान यातच आहे माझ, की ओळखल मला तुमच्या सारख्या देव माणसांनी.
चांगल्यानी चांगला म्हणून आणि वाईटांनी वाईट म्हणून स्विकारलं, ज्याची जेवढी गरज होती त्यांनी तेवढ्या पुरतं वापरलं.
मी नाही म्हटलं कधी, की मी शुद्ध तरू आहे. कारण स्वतःला पविञ करण्यास येथे अनेक पापी माणसांचे युद्ध सुरू आहे.
नेहमी वाटतं मला, की सर्वांनी मोठं व्हावं. फक्त हवेत न वाहता जमीनीवर रहावं.
राग आणि वादळ या दोन्हीमध्ये एकच विशेष असतं...
शातं झाल्यावरचं काय नुकसान झालं ते दिसतं.
-------------------------------
मजबूत हातातून ही बोटं सूटतात कधीकधी ......
नातं ताकतीच्या जोरावर बनत नाही तर विश्वासाच्या नाजूक दोरावर बांधलं जातं.
-------------------------------
कोणीतरी आपल्याला एवढं अलगद सांभाळून घ्यावं ...
की ते आपणांस सहज न कळावं.
असं मायेच प्रेम शेवटच्या श्वासापर्यत मिळावं...
-------------------------------
काय solid असते ना कोणीतरी आपल्याला आवडनं...
सगळ्यांना सोडून आपण त्या व्यक्तीला निवडणं.
-------------------------------
ते क्षणच भारी असतात...
जेव्हा आपलं मन आपल्याजवळ असूनहीआपलं नसतं.
कारण वेड म्हणजे ...वेड म्हणजे ...वेड असतं.
तुमचं आणि आमचं रोज रेड असतं...
-------------------------------
"परिवर्तन" हा निसर्गाचा नियम आहे, तो स्विकारता आला पाहिजे.
"संघर्ष" हा जीवनाचा नियम आहे, तो निडरपणे करता आला पाहिजे.
"विश्वास" हा नात्याचा नियम आहे, तो नचुकता टिकवता आला पाहिजे.
"प्रेम" हा माणूसकीचा नियम आहे, तो निस्वार्थीपणे करता आला पाहिजे.
-------------------------------
जीवनातले सर्वात महत्वाचे दिवस....
पहिला...
ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला.
आणि
दूसरा...
ज्या दिवशी तुम्हाला समजले की तुम्ही का जन्माला आला.
-------------------------------
काही नाती पाण्यासारखी असतात...
रंग नाही...आकार नाही...ठिकाण नाही....
तरीही जीवनासाठी महत्वाची असतात.
-------------------------------
माणूस नेहमी काहीतरी Wish करत आसतो....
त्याला कधी Fish होऊन जगता येत नाही...
पण Selfish होऊन सहज जगतो.
-------------------------------
EGO हा फक्त तीन अक्षरी शब्द.....
RELATIONSHIP या बारा अक्षरी अभेद शब्दालाच तोडत नाही....
तर सर्वकाही उद्वस्त करून एकटेपण देतो.
-------------------------------
सत्याची साथ देणारे नेहमी एकटेच राहतात .
कारण...... सत्य नेहमीच कडू असतं.
-------------------------------
मला थोडा वेगळा विचार करायला आवडतो...
माणसं चागल्या वाटेने चालणं पसंत करतात, मी योग्य मार्ग निवडतो.
मला याचं दुःख नाही वाटत की हे जग वाईट माणसांनी भरले आहे,
फक्त चांगल्याना साथ देणारे कमी उरले आहेत.
--------------------------------------
जेव्हा कधी...स्मशानात एखादी मृत्यूशैया किंवा कबर पाहतो...
तेव्हा विचार करतो. एवढीशी जागा मिळवण्यासाठी माणूस जन्मभर काय काय करतो.
----------------------------------------------
मला एका गोष्ट आजही कळत नाही, दिवस राञ शोधूनही सूर्याला त्याची जागा मिळत नाही.
मग आपण आपली जागा का बरं सहज सोडतो, मनाची नाती संशयाने तोडतो.
----------------------------------------------
कोणाच्याही आयुष्यात एखादी जागा सहज मिळत नाही.
मिळालेली किंवा मिळवलेली जागा कशी जपावी हेच कधीकधी माणसांना कळत नाही.
----------------------------------------------
धरता येत नाही आठवनीनां, नाहीतर एकञ साठवलं असतं,
मन जर पाखरू असतं तर आता लगेचच तुमच्याकडे पाठवलं असतं.
----------------------------------------------
आपण सारे किती हुशार वागतो.
स्वतःचा मुड असेल तर हास्याचे तुषार टाकतो.
नाहीतर.....स्वतःच्या सोयीने समोरच्यानां सहज.......टाकतो.
----------------------------------------------
बरं आहे मन दिसत नाही आणि त्याला Decorate करता येत नाही.
कारण मनावर कोणताही Research झालेला नाही आणि त्यामुळे तशी काँसमेटिक्स बाजारात उपलब्ध नाहीत.
----------------------------------------------
"मन" म्हणजे मधुर नशा......नको असली तरी होणारंच.
मन जसं आहे तसचं एवढं सुंदर असते की त्याला कोणत्याही Decoration ची गरज नसते.
----------------------------------------------
मला वाटतं काहीतरी बिघडलं आहे...
माणसाच्या मुखातील गोडवा कमी झाला अन् Blood sugar चं प्रमाण वाढलं आहे.
मला वाटतं ...
ह्दयातील निरागस प्रेम आटलं आहे आणि ज्याला त्याला Heart aatack नं गाठलं आहे.
मला वाटतं...
--------------------------------
असं लिहत असताना....मन असं भरून येत.
भूतकाळातील कडू आठवणी विरूद्ध जबरदस्त बंड करून येतं.
मनोगत....

No comments:
Post a Comment