खरंतर.... माणसानं आपलं शाश्वत सौंदर्य कृत्रिम साधनांनी नटवू नये. अन् क्षणभंगूर साजात स्वतःला कोणाला भेटवू नये.
कारण साज उतरला की, शरीराची मुद्दल आणि व्याज ही कमी होत. त्यापेक्षा.. मनांच्या भेटी व्हाव्यात,
कारण मनाला साजाची गरजच भासत नाही. अर्थात ... ज्यांना जाणीव नसेल त्यांच्या डोळ्यानां मन दिसत नाही.
जर मानाला नटण्याबद्दल उत्सुकता नाही... तर माणसं स्वतःला का बरं नटवतात कळतं नाही.
---------------------------------------------
विश्वासाला डोळे असते तर तो वेळोवेळी त्याला फसवताना माणसानं विचार केला असता.
पण.. माणसांच्या व्यवहाराच्या नात्यात माणसानं विश्वासालाच सोईस्कर वापरलं आहे.
माणसानं जाणीव ठेवली पाहीजे..... विश्वास म्हणजे विचारांचा श्वास - विचार शाश्वत असला की , श्वास नात्यालां निरंतर जपून ठेवतो.
-----------------------------------------------
बालपण , तारुण्य ह्या सर्व अवस्था म्हणजे फोटोफ्रेम आहेत. म्हणूनच जशी फ्रेम ची काच फूटली की माणसं काच बदलंत नाहीत तर फ्रेमचं टाकून देतात.
अगदी या अवस्थाचं ही असंच असतं...या अवस्थाच्या फ्रेममधील सौंदर्य नावाची काच फूटली तर माणसं या अवस्थातील आठवणींची जाणीव ही फेकून देतात.
-----------------------------------------------
* विचार *
* एवढा तिरस्कार ही करु नका कोणाचा की, चुकून प्रेमचं नकळत हरवून बसाल. आणि एवढं प्रेम ही करू नका कोणावर की, एक दिवस स्वतःच फसाल.
* प्रेम मायाजाळ आहे , त्याचा मोह आवरता येत नाही.... हे जरी खरं असलं तरी समोरच्याला आणि स्वतःला सावरता आलं पाहीजे.
* पक्षी आणि प्राणी निसर्गतः स्थलांतर करतात परंतु आपला रहिवास सोडत नाहीत. माणसं थोडसं वेगळं काही दिसलं तरी आपलं सहज विसरून जातात. अर्थात ...... म्हणूनच माणसाला समाधान मिळत नाही.
* कृञिम रंगाने रंगविलेल्या चेहऱ्याच्या मोहात फसावं की निरागस मनाच्या डोहात असावं....हे ज्याचं त्यानं ठरवावं.
* त्या दिवशी एका तरूणानं मला विचारलं " सर मला करिअरसाठी असं एखादं क्षेञ सूचवा ज्यानं माझं नाव मोठ होईल आणि ज्या क्षेञात जास्त स्पर्धा नाही. मी मनापासून त्याला उत्तर दिलं ...."माणूसकी".
* एकदा प्रत्येकानं स्वतःला विचारावं , आपण खरोखर आदर्श आहोत का ? उत्तर नक्कीच नाही येईल. पण तरीसुद्धा तुम्हांला असं वाटतं की तुम्ही आदर्श होऊ शकता , तर कोणचं अनुकरण करु नका.
* जरूरीचे नसतं...सगळ्यांना आपण आवडलो पाहिजे. क्षणभंगूर वचनं देऊन देणाऱ्यापेक्षा नात्याला जाणीवपूर्वक जपणारं कोणीतरी असणं आवश्यक असतं. ऊगाच तोंडदेखलं सुख देणारं कोणी ....जरूरीचे नसतं.
* मनाला वाटतं तसं वागता आलं पाहीजे , प्रत्येकाला स्वतःसाठी ही जगता आलं पाहीजे. सगळं काही धनानं मिळवता येत नाही , अन् सगळ्यांनाचं मनासारख वागता येत नाही.
* आवडत्या व्यक्तीला स्वतःच करताना किंवा स्वतः आवडत्या व्यक्तीचं होताना........ आपल्या भावनांचा प्रदर्शन करू नका.
* कधीतरी आपणही कोणाचे सोबती बनावं....कारण जेव्हा आपण एकटे असू तेव्हा त्याची सोबत मिळतेच. सकाळ झाल्यावर माणसांचा बाजार भरतो त्यात आपलही कोणीतरी असावं अशी इच्छा असल्यास आधी आपण कोणाचं तरी असावं.
-----------------------------------------------
कधी अचानक आपल्या माणसाची आठवण का येते ?
आठवण म्हणजे आपल्या मनाच्या नेणिवेतून झालेली जाणीव. आठवण त्याच माणसांची येते ज्यांनी आपल्या मनात जागा केलेली असते.
आठवण म्हणजे मनाच्या झर्याला आलेला पाझर, जो अश्रूद्वारे बाहेर येतो.
कधी सुखद तर कधी दुखद, पण दोन्ही वेळा खारटंच. अर्थात ..... आठवण म्हणजे मनातील इच्छा.
-----------------------------------------------
प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एक दिवस असतो जेव्हा त्याच्यासाठी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रेम असतं आणि चांगले विचार असतात.
पण त्याचा आनंद तो माणूस घेऊ शकत नसतो......तो दिवस म्हणजे " मृत्यू ". मला कळत नाही एखादा व्यक्ती जिवंत असताना लोक त्याच्यासाठी का एकञ येत नाहीत.
-----------------------------------------------
आपण कशासाठी जगतोय ?
असा साधा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर उत्तर देणं फार अवघड आहे.
कारण काहीतरी मिळवायचं किंवा काहीतरी करायच या प्रयत्नात नक्की काय मिळवायचं किंवा करायचं हा साधा विचार करणं ही आपण विसरतो.
-----------------------------------------------
जेव्हा आपण स्वतःला सावरू शकत नाही आणि समजू शकत नाही... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजतं ते खरं "नातं".
अशा अलौकिक सत्वाला नावामध्ये बांधणे चुकीचं होईल. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते सहवासात अनुभवावं लागतं.
कारण साज उतरला की, शरीराची मुद्दल आणि व्याज ही कमी होत. त्यापेक्षा.. मनांच्या भेटी व्हाव्यात,
कारण मनाला साजाची गरजच भासत नाही. अर्थात ... ज्यांना जाणीव नसेल त्यांच्या डोळ्यानां मन दिसत नाही.
जर मानाला नटण्याबद्दल उत्सुकता नाही... तर माणसं स्वतःला का बरं नटवतात कळतं नाही.
---------------------------------------------
विश्वासाला डोळे असते तर तो वेळोवेळी त्याला फसवताना माणसानं विचार केला असता.
पण.. माणसांच्या व्यवहाराच्या नात्यात माणसानं विश्वासालाच सोईस्कर वापरलं आहे.
माणसानं जाणीव ठेवली पाहीजे..... विश्वास म्हणजे विचारांचा श्वास - विचार शाश्वत असला की , श्वास नात्यालां निरंतर जपून ठेवतो.
-----------------------------------------------
बालपण , तारुण्य ह्या सर्व अवस्था म्हणजे फोटोफ्रेम आहेत. म्हणूनच जशी फ्रेम ची काच फूटली की माणसं काच बदलंत नाहीत तर फ्रेमचं टाकून देतात.
अगदी या अवस्थाचं ही असंच असतं...या अवस्थाच्या फ्रेममधील सौंदर्य नावाची काच फूटली तर माणसं या अवस्थातील आठवणींची जाणीव ही फेकून देतात.
-----------------------------------------------
* विचार *
* एवढा तिरस्कार ही करु नका कोणाचा की, चुकून प्रेमचं नकळत हरवून बसाल. आणि एवढं प्रेम ही करू नका कोणावर की, एक दिवस स्वतःच फसाल.
* प्रेम मायाजाळ आहे , त्याचा मोह आवरता येत नाही.... हे जरी खरं असलं तरी समोरच्याला आणि स्वतःला सावरता आलं पाहीजे.
* पक्षी आणि प्राणी निसर्गतः स्थलांतर करतात परंतु आपला रहिवास सोडत नाहीत. माणसं थोडसं वेगळं काही दिसलं तरी आपलं सहज विसरून जातात. अर्थात ...... म्हणूनच माणसाला समाधान मिळत नाही.
* कृञिम रंगाने रंगविलेल्या चेहऱ्याच्या मोहात फसावं की निरागस मनाच्या डोहात असावं....हे ज्याचं त्यानं ठरवावं.
* त्या दिवशी एका तरूणानं मला विचारलं " सर मला करिअरसाठी असं एखादं क्षेञ सूचवा ज्यानं माझं नाव मोठ होईल आणि ज्या क्षेञात जास्त स्पर्धा नाही. मी मनापासून त्याला उत्तर दिलं ...."माणूसकी".
* एकदा प्रत्येकानं स्वतःला विचारावं , आपण खरोखर आदर्श आहोत का ? उत्तर नक्कीच नाही येईल. पण तरीसुद्धा तुम्हांला असं वाटतं की तुम्ही आदर्श होऊ शकता , तर कोणचं अनुकरण करु नका.
* जरूरीचे नसतं...सगळ्यांना आपण आवडलो पाहिजे. क्षणभंगूर वचनं देऊन देणाऱ्यापेक्षा नात्याला जाणीवपूर्वक जपणारं कोणीतरी असणं आवश्यक असतं. ऊगाच तोंडदेखलं सुख देणारं कोणी ....जरूरीचे नसतं.
* मनाला वाटतं तसं वागता आलं पाहीजे , प्रत्येकाला स्वतःसाठी ही जगता आलं पाहीजे. सगळं काही धनानं मिळवता येत नाही , अन् सगळ्यांनाचं मनासारख वागता येत नाही.
* आवडत्या व्यक्तीला स्वतःच करताना किंवा स्वतः आवडत्या व्यक्तीचं होताना........ आपल्या भावनांचा प्रदर्शन करू नका.
* कधीतरी आपणही कोणाचे सोबती बनावं....कारण जेव्हा आपण एकटे असू तेव्हा त्याची सोबत मिळतेच. सकाळ झाल्यावर माणसांचा बाजार भरतो त्यात आपलही कोणीतरी असावं अशी इच्छा असल्यास आधी आपण कोणाचं तरी असावं.
-----------------------------------------------
कधी अचानक आपल्या माणसाची आठवण का येते ?
आठवण म्हणजे आपल्या मनाच्या नेणिवेतून झालेली जाणीव. आठवण त्याच माणसांची येते ज्यांनी आपल्या मनात जागा केलेली असते.
आठवण म्हणजे मनाच्या झर्याला आलेला पाझर, जो अश्रूद्वारे बाहेर येतो.
कधी सुखद तर कधी दुखद, पण दोन्ही वेळा खारटंच. अर्थात ..... आठवण म्हणजे मनातील इच्छा.
-----------------------------------------------
प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एक दिवस असतो जेव्हा त्याच्यासाठी जमलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रेम असतं आणि चांगले विचार असतात.
पण त्याचा आनंद तो माणूस घेऊ शकत नसतो......तो दिवस म्हणजे " मृत्यू ". मला कळत नाही एखादा व्यक्ती जिवंत असताना लोक त्याच्यासाठी का एकञ येत नाहीत.
-----------------------------------------------
आपण कशासाठी जगतोय ?
असा साधा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला तर उत्तर देणं फार अवघड आहे.
कारण काहीतरी मिळवायचं किंवा काहीतरी करायच या प्रयत्नात नक्की काय मिळवायचं किंवा करायचं हा साधा विचार करणं ही आपण विसरतो.
-----------------------------------------------
जेव्हा आपण स्वतःला सावरू शकत नाही आणि समजू शकत नाही... तेव्हा आपल्याला अलगद सावरतं आणि सहज समजतं ते खरं "नातं".
अशा अलौकिक सत्वाला नावामध्ये बांधणे चुकीचं होईल. नातं दिसत नाही आणि भासत ही नाही ते सहवासात अनुभवावं लागतं.

No comments:
Post a Comment