* सुंदर विचार *

* जी माणसं बदला बरोबर बदलतात...ती यशस्वी होतात...जी माणसं बदला नंतर बदलतात...ती जगतात...जी माणसं बदल घडण्यास कारण असतात...ती नेतृत्व करतात.
* प्रत्येक माणसाचं व्यक्तीमत्व त्याच्या विचार आणि कृती यामधून प्रकट होत असतं. त्याकडे आपलं लक्ष नसलं तरी इतरांचं बारीक लक्ष असतं.
* खरचं जेवढं वाटत तेवढं आयुष्य सहज नसतं. येणाऱ्या क्षणानां सांभाळून स्वतःला सावरता आलं पाहीजे.
आपण कोणाचे आहोत हे वेळ दाखवते. फक्त जे ती दाखवेल ते स्विकारत जगता आलं पाहीजे.
* गर्दीत आपल कोणचं नसलं तरी आपल्याला एकटं वाटत नाही. पण आपल्यांमध्ये असूनही एकटं असणं यासारखं ञासदायक आणि दुःखाची वेळ कोणतीच नसते.
एकटेपण हे खूप काही शिकवतं.
* परिस्थिती कशीही असो, माणसाला वेळेबरोबर राहता आलं पाहीजे. आज कळलं जेव्हा कोणीही बरोबर नसतं तेव्हा वेळेला सोबत ठेऊन आपण आपलं असणं जरूरी असते.
* आपल्यानां जपण्यास, त्याच्यासाठी जागण्यास आणि जगण्यास मनाची आवश्यकता असते. कारण व्यवहार करण्यास धनाची आवश्यकता असते.
एखाद्या विचारानं भारावून जाणं जरूरी नसतं तर त्याला कृतीत आणून जोपासनं महत्त्वाचं असतं.
* चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं सहज समजत नाहीत. त्यांना मनापासून वाचावं लागतं आपल्या सहवासात ठेवावं लागतं.
* ज्यावेळी माणूस स्वतः च्या  स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्यावेळी त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.
त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते. निरपेक्ष भाव, मनःशक्ती आणि एकनिष्ठता यामुळे आपण योग्य कार्य करू शकतो.
* आपण जर आपल्या पलिकडे जाऊन  आपल्या माणसांसाठी जगलो तर जीवन सार्थक होते. अस्तित्व प्रत्येकाला हवे असते फक्त मार्ग निवडता आला पाहिजे.
* माणसाला स्वार्थ त्यागता येत नाही आणि जाणीवपूर्वक वागता येत नाही.
* जी माणसं तुमच्याबरोबर मनापासून बोलतात त्यांना मेंदूने उत्तर देऊ नका. जे कपटी विचार ठेवतात त्यांना मनात जागा देऊ नका.
* Solid असतात संबंध... तरी liquid सारखे वाहून जातात कधीकधी. बेधुंद असतात सबंध... म्हणूनच कधी करू नये त्याचा छंद.
* अपेक्षा किती  विचित्र गोष्ट  आहे, पूर्ण  झाली नाही तर *क्रोध* वाढतो. आणि... पूर्ण  झाली  तर *लोभ* वाढतो.
---------------------------------

त्या दिवशी देव ही वैतागला होता वाटतं.... 
एकदम प्रगट झाला आणि म्हणाला " अरे नेहमी काहीतरी मागणं घेऊन येता,
कधीतरी मनानं पण या ना ! कदाचित देव विसरला असेल बहुतेक माणसं व्यवहारानेच संबंध ठेवतात.
------------------------------------

बावरुन जाऊ नये , 
जर आपलीच माणसं स्वतःला सावरुन वागताना "नातं" नावाची अदृश्य गोष्ट विसरली असतील.
एखाद्याला फक्त शब्दांनी जिकंण सोपं असतं , त्याला जाणीव ठेऊन जपणं कठीण असतं.
--------------------------------------

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी, भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते..
झाली चूक माफ करण्यात मोठेपना असतो, सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात...
म्हणुन चुका एकांतात सागांव्यात आणि कौतुक चारचौघात करावं नातं जास्त टिकतं.!
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती, ताकदवान नसतो. पडलेल्यांना उचलणारा आणि सावरनारा व्यक्ती,
खरा ताकदवान असतो, अहंकार वाऱ्यावर उडून जातो , कायम टिकणारी गोष्ट एकच,
ती म्हणजे; चारित्र्य आणि माणुसकी. यांना  टिकविण्यासाठी जाणीव महत्वाची.
---------------------------------

डोळ्यांत अश्रू का येतात ?
माणूस आनंदाच्या डोहात बुडून त्याचा मनात अंहकार वाढू नये. तसेच दुःखाच्या नदीत गुदमरून त्याच्यात नैराश्य येऊ  नये ,
यासाठी मनरूपी महासागरातून उगम पावनारी अश्रूंरूपी नदी विध्यात्याने निर्माण केली आहे.
ज्यामुळे अती आनंदात आणि दुःखात अश्रू डोळ्यांमधून बाहेर येतात. अर्थात... ते मनरूपी महासागरातून येतात म्हणूनच ते खारट असतात.
जसे मीठ जेवणात चव आणते तसेच मनरुपी खारट महासागर जीवनाला चव आणतो.
म्हणूनच मनात आनंदरूपी अती गोडवा किंवा दुःखरूपी तिखटपणा वाढू नये यासाठी अश्रू डोळ्यांमधून बाहेर येतात.
---------------------------------

तेव्हा माणसं हळूहळू मरतात...
जेव्हा एकांतांत स्वतःला नैराश्यात ठेवतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा एकनिष्ठ न राहता कोणाची फसवणूक करतात. तेव्हा माणसं....
जेव्हा एखाद्याचा अनावश्यक तिरस्कार करतात. तेव्हा माणसं...
जेव्हा स्वार्थीपणात एखाद्याच्या भावनांशी खेळतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा जाणीव विसरून आपल्यानां विसरतात. तेव्हा माणसं ...
जेव्हा मनाला मारून मेंदूच्या आहारी जाऊन नाती तोडतात. तेव्हा माणसं...
---------------------------------

माणसाच्या लायकीपेक्षा जास्त अपेक्षा वाढतात तेव्हा त्याला नैराश्य मिळते.
अर्थात स्वप्न नक्की पहावी , पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती आवश्यक असते.
अपेक्षा या जागेपणी केलेल्या असतात म्हणून त्यांना मर्यादेत ठेवता येऊ शकते.
स्वप्नाचां जन्मच मनाच्या नेणिवेतील कप्प्यातून होतो त्यामूळे त्यांवर मर्यादा घालता येत नाही.
---------------------------------

एकदा वाघ भावनिक झाला अन् माणसात आला... माणसांनी त्याला मांजरासारख खेळवलं.
चूक माणसांची नसते, त्यांची प्रवृत्तीच खेळण्याची असते. वाघानं आपली ओळख ठेऊन जगलं पाहाजे होत.
अर्थात ....... आपली जागा सोडल्यावर मान राहात नाही, कारण सगळ्यांना मन कळत नाही.
वेळेने सांगितलं आहे... मनानं जग अन् पून्हा वाघ बनून बघ.
---------------------------------

घरात मोठ कुणीतरी पाहीजेच..

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी (वयस्कर) माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा. कुठल्याही कार्याचा श्रीगणेशाय करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा निर्णय अंतिम असायचा, ते म्हणतील तीच पुर्व दिशा सगळे निमुटपणे मानायचे व त्यांचा आदेश कृतीत आणायचे. त्यामुळे घरातील देवघरानंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील मोठ्यांचे...! आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागला. स्वयंपाकखोली काय अन्  देवघर काय सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली. मोठी माणसं नाहीसी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक, शिस्त, संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहील्या आहेत. पूर्वी ह्याच गोष्टी, चालिरिती घरातील मोठी माणसे सांगायची...म्हणून...

घरात मोठी माणसे पाहीजेच...
संध्याकाळी दिवे लावणीला शुभमकरोति- रामरक्षा चा सूर कानावर पडलाच पाहीजे. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहीजे. रात्रीच उरलेल अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी-तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणार कुणीतरी पाहीजे. मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारे कुणीतरी पाहीजे. चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला घरात कुणीतरी मोठ पाहीजे हो..एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं...टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण का करावं यामागच कारण उत्तमरित्या पटवून देणारं... बाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं...आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणार...खरच घरात कुणीतरी मोठ पाहीजेच.
पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर...आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर...
लिंबू-मिरची ला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन...

एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबड मुख असू देत की कमी ऐकू येणारे कान...
कसं का असेना...सांगसवर करणारं घरात कुणीतरी मोठ पाहीजेच. ज्या झाडाला फळ-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसेल तरी निदान सावली तर देते, त्या सावलीत आपली अनेक कामे सहज होतात. घरातील मोठी-वयस्कर माणसं ही तशीच असतात...त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोक ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहीजेच.
घरात मोठ कुणीतरी पाहीजेच...
मनोगत...

No comments:

Post a Comment