कसं जगायचं...



कसे जगायचं हे माणूस ठरवू शकतो.
पण .....
कधीपर्यंत जगायचं हे माणसाला ठरवता येत नाही.
कारण.....
इच्छा आपल्या अधिकारात आहे पण  वेळ आपल्या अधिकारात नाही.
लक्षात ठेवा...
वेळ आपल्या अधिकारात नसली तरी ती केवळ आपल्या भावनांचा आदर करते म्हणूनच इच्छा होऊन आपल्या अधिकारात येते.
----------------------------------------------
वादळात पत्यांचं घर बनत नाही
      रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही....
जग जिंकण्याची हिम्मत ठेवा,
      एकदा हरल्याने कोणी
फकिर होत नाही,
      आणि.......
एकदाच जिंकल्याने कुणी "सिंकदर"  होत नाही...
-------------------------------------------
माणुस नेहमीच मेंदूने विचार करतो.

तरीही......

मनाला वाटेल तसेच वागतो.
---------------------------------------------------------------
जे दिसत नाही तेच शाश्वत रहात.
कारण...
माणसाला जे काही दिसलं आहे ते सर्व त्याने स्वतःच्या सोयीने बदलले आहे.
माञ.....
जे माणसाला दिसलेले नाही तो ते जपण्याचा प्रयत्न करतो.

म्हणुनच माणुस न दिसणाऱ्या

धर्मातील "देव"
आणि
शरीरातील "मन"

यांना जपत असतो.
----------------------------------------------------
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआप गुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात काही जण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैञी म्हणतात....
"जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत....कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं"
--------------------------------------------------
जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.  
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
----------------------------------------------------
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते.
---------------------------------------------------
अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
          ही काही मोठी गोष्ट नाही..!
   आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
         जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
          कर्तबगारीने सुगंधित होते..!
 वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे कि,
गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
 वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते !!

मनोगत....

मराठी विचार...

माऊलीसारखे  कोण  आहे,
जिचे जन्मांतरीचे  ऋण आहे..
असो ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविन जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोङ नाही.,
तिचे नाव जगात आई...
आई ऐवढे कशालाच मोल नाही.

-----------------------------

मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची...

कधीतरी धागा बनुन पहा
आयुष्य सुंदर वाटेल...

-----------------------------------

देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात.
आणि
तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात.
खरच........
अंधार असतो मनात आणि
दीवा लावतात देवळात.....

---------------------------------------------------------------------

विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहीरीतील दगडांकडे नसते तर त्या दगडांमधे ही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट
गोष्टी ऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी सुध्दा सापडतील...

-----------------------------------------------------------------------

आयुष्यातील दोन अप्रतिम गोष्टी ...
एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम ,
अन दुसरे म्हणजे
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता....
किती ही कमवा पण कधी गर्व करू नका … कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात.....
"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जिव लावा"

साथ...

साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
तोडताना एक घाव पुरतो, जोडताना किती भाव मोजावा लागतो
विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर
काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे,
फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे....

---------------------------------------------

आयुष्य जगताना...

"आयुष्य" थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
"आयुष्य" थोडंच जगावं पण...
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेमअसं द्यावं की...
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.... स्वार्थाचंही भानं नसावं,
"आयुष्य" असं जगावं की... मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!

मराठी सुविचार...

विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.

----------------------------------

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.

----------------------------------

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.

----------------------------------

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.

----------------------------------
इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
----------------------------------

तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.

----------------------------------

जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.

----------------------------------

काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता.
त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.

----------------------------------

स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.

----------------------------------

घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.

----------------------------------

आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.

-----------------------------------

चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.

---------------------------------

जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.

------------------------------

बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही.

नेहमीच ....

भुषण यांच्या "कधी कधी" या कवितेच्या नावामधुन प्रेरणा घेऊन मी(मनोहर जाधव) खालील कवितेला छेडण्याचा प्रयत्न करतोय.....

नेहमीच .........

नेहमीच कोणीही ....
स्वतःला शहाणे समजु नये.

नेहमीच कोणीही......
थोबाड वाकडे करुन राहु नये.

नेहमीच कोणीही......
आपलेच नसीब फुटके असे जगु नये.

नेहमीच कोणीही ......
अती पटेली ( ego ) दाखवु नये.

नेहमीच कोणीही.......
उगाचच दुःखी होऊ नये.

नेहमीच कोणीही........
आपल्या ग्रुपवर येणे विसरु नये.

कारण ......

आपण फक्त आपल्यांसाठी...
नेहमीच...... हे विसरु नये.

मनोगत...

-----------------------------------------------------------------------------

जात्याचा खालचा दगड स्थिर असतो.

वरचा दगड फिरणारा असतो.

दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते.

अगदी माणसाच्या शरीरातील जात्याचे दोन दगडही तसेच असावेत.

मेंदू रुपी वरचा दगड फिरत राहीला तरी .....
मन रुपी खालचा दगड नेहमी स्थिर असावा.

म्हणजे .....

नाती जपता येतात. जीवनात समाधान रुपी शुभ्र पीठ मिळते.

मनोगत.....


मनातले सुविचार...

नाते हे हॄदयात असले पाहिजे
शब्दांत नाही!

आणि नाराजी ही शब्दांत असली पाहिजे
हॄदयात नाही.

ज्याला ‪जिंकून‬ देखील केव्हा हरायचं हे माहीत असतं..,
तो ‪हरून‬ सुद्धा जिंकलेला असतो.

------------------------------------------------------------

पहिली लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती ।

नंतर  लोक प्रैक्टिकल झाले
नात्याचा फायदा उचलू लागले ।

आता लोक प्रोफेशनल झाले
फायदा असेल तरच नाती बनवतात .

---------------------------------------------------------

परक्यांना  हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.

---------------------------------------------------------

देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना ...
ढग तुटतात आणि पाऊस पडतो, जमिनीला भेगा आल्या कि शेत बनते,
वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलत आणि बीज अंकुरल कि झाड होत.
म्हणून... माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून
घ्यायचं कि देव आपला उपयोग चांगल्या
गोष्टीसाठी करतो.

-------------------------------------------------------

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच भेटत नसतं,
सर्व काही नशीबात असतं,
पण आपलं नशीब घङवण हे आपल्याच हातात असतं.....
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि  पैसा " नाही 
तर "स्वभाव आणि  संबंध" कामाला येतात ....

मनोगत.....

मनातील भावना...

मंदिर हा शब्द "मन"आणि "दर"या दोन शब्दांची संधी आहे.
'मन' म्हणजे अर्थातच आपलं 'मन'आणि 'दर' म्हणजे दार!

तात्पर्य इतकंच जिथे आपण मनाचे दरवाजे खुले करतो ते स्थान म्हणजे मंदिर!

आणि

मन म्हणजे म * न
   म म्हणजे मी
   न म्हणजे नाही
अर्थात जिथे मी नाही असे स्थान म्हणजेच ज्या ठिकाणी "मी" पणाचा अहंकार गळून पडतो ते स्थान म्हणजे मंदिर!
सगळेच जाणतात की,परमेश्वर प्रत्येकाच्या मनात असतो.
आणि जे मन अहंकार विरहित असतं
तेच  मन हे खरं मंदिर असतं.

मनोगत......
-----------------------------------------------------------------

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावलागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..

----------------------------------------------------------------------------------


जिवनाच्या या अथांग महासागरात कोणी आपलं म्हणनारं,
आपल्या सर्वान वर स्वताः पेक्षा ही जास्त प्रेम करणारं,
आपल्या भविष्यासाठि वेळोवेळी झिजणारं,
आणि आपलं अस्तिव घडविणारं.....
आपले हे "अस्तिव मार्ग"......

---------------------------------------------------

वर्षातले दोन दिवस आपण काहीही करू शकत नाही......

कालचा दिवस
आणि
उद्याचा दिवस

जर आपणास काही करायचे असेल  तर ते आजच करा.
कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे.

मनोगत.....
------------------------------------------------------------

दाटुन आलेल्या मेघा सारखं मनं कधी कधी भरुन येत,
पावसाच्या पहिल्या थेंबा सारखं मनातिल भावना भरुन येतात आणि हळुच डोळे पाणवतात,
मन हे सारख विचारांत का असतं?
जी गोष्ट आपल्याकडे नाही,  त्यासाठि धडपडत का असतं?
कधी खुप आनंदात, तर कधी खुप दुःखात बुडालेल का असतं?

मनोगत.....

आयुष्यात एकदा...

आयुष्यात एकदा...इतका मोठा पाऊस पडावा ....कि,
'Ego' सगळा वाहून जावा...,

आयुष्यात एकदा...इतकं कडक ऊन पडाव .....कि,
जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं..,

आयुष्यात एकदा...इतकी जबरदस्त
थंडी पडावी......कि,
सगळी दूःख गोठून जावी...,

आणि....
आयुष्यात एकदा....पुन्हा शाळा अशी भरावी.......की,
प्रत्येकाला त्याचे लहानपण "कायम"चे लक्षात रहावे...,

आयुष्यात एकदा.....असे जगावे की....
आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज कळावी......

हाय ते हाय..... मनोगत.....
https://www.facebook.com/manohar.jadhav.3152

कधी कधी...

कधी कधी असे वाटते कि सर्वा काहि सोडुनी द्यावे. कुठेतरी लांब उंच अश्या ठिकाणी फिरायला जावे.

तिथे फक्त तुम्ही आणी मी असावे
बाकिच्यांना दुसर्या कामाला लावावे...

निसर्गाच्या सानीध्यात स्वताला हरवुनी द्यावे
पक्षांचि किलबिल मनात साठवावे...

वाहणार्या झर्या चे मधुर गित ऐकावे,
जिवन म्हणजे हेच असत का? मनाला ते विचारावे...

तेवढ्यात,
एक खारु ताईने तुमच्या कडे यावे, तुम्ही खुप आनंदुन जावे...

पण हे बघुन मला काहितरी अतरंगी सुचावे
आणी त्या खारुला मी हाकलुन लावावे...

तुम्ही रागाने माझ्या कडे बघावे,
मी हसुन धावत सुटावे, तम्ही पण पाठी पाठी यावे...

नंतर खुप हसावे, वेडे वाकडे नाचावे,
मुलांना पण त्यात सामील करुन घ्यावे...

जिवनातील अमुल्य असे ज्ञान तुम्ही आम्हाला द्यावे,
आणी मन लावुन आम्ही ते ऐकावे...

आयुष्य भर तुम्ही आमच्या सोबत आसावे
असे साकडे आम्ही सर्वानी देवाला घालावे....
कधी कधी वाटते मला.......आपण सर्व जन सोबतच असावे.....

सरांच मनोगत...

मनोगत...

मनाला धिर देणार असत सरांच मनोगत....
रोज काहीतरी शिकविणार असत सरांच मनोगत...

जिवनातील रोज नविन पहाट घेउन येणार असत सरांच मनोगत...
भरकटलेल्यांना नवी दिशा देणार असत सरांच मनोगत...

एखद्याला बकरा बनवण्यात पण पुढे असत सरांच मनोगत...
मुलांच हसण बघुन आनंदीत होणार असत सरांच मनोगत...

रोज वाट बघायला लावणार असत सरांच मनोगत...
जगातिल घडामोडी सांगणार असत सरांच मनोगत..
----------------------------------------------------------------------------

मनोगत...

मला अस वाटतं कि मनोगत म्हणजे मनातुन येणारी भावना....
जी विचारांतुन शब्दात उतरते आणी आपल्या समोर येते.
मनात जे विचारा चालु असतात त्यातील थोडेच शब्द रुपी मांडता येतात...सर्वच विचार आपल्या समोर येत नाहीत आणि येऊ पण नये अस मला वाटतं.. मनातील सर्वच सांगायला पाहिजे असे काही नाही.
-------------------------------------------------------------------------------------------------

मनोगत...
 
कुणी सांगेल का मला कुठे असेल मनोगत?
या वेड्या माणसाला कोणी सांगेल का?...
खुप अस्वथ वाटतयं जेव्हा पासुन हरवलं मनोगत....
मनाला धिर देणार, त्याला समजावणारं ते एकच तर होतं आमच म्हणुन घेणारं...
कदाचित रागवल तर नसेल ना? आमचि काही चुक तर झाली नसेल ना?.. ज्याणे ते आमच्या पासुण लांब गेलय...
मनात खुप चिंतेचे प्रश्न आहेत पण ते घालवणारं आमचं मनोगत कुठे तरी हरवलयं...
कुणि सांगेल का कुठे, कसे असेल ते...?