मराठी विचार...

माऊलीसारखे  कोण  आहे,
जिचे जन्मांतरीचे  ऋण आहे..
असो ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविन जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोङ नाही.,
तिचे नाव जगात आई...
आई ऐवढे कशालाच मोल नाही.

-----------------------------

मोत्यानां तर सवयच असते विखुरण्याची,
पण धाग्याला सवय असते,
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची...

कधीतरी धागा बनुन पहा
आयुष्य सुंदर वाटेल...

-----------------------------------

देवाची मूर्ति विकत घेताना, रुपयांचा भाव करतात.
आणि
तीच मूर्ति घरात आली की देवाकडे कोटी मागतात.
खरच........
अंधार असतो मनात आणि
दीवा लावतात देवळात.....

---------------------------------------------------------------------

विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहीरीतील दगडांकडे नसते तर त्या दगडांमधे ही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट
गोष्टी ऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी सुध्दा सापडतील...

-----------------------------------------------------------------------

आयुष्यातील दोन अप्रतिम गोष्टी ...
एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम ,
अन दुसरे म्हणजे
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता....
किती ही कमवा पण कधी गर्व करू नका … कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात.....
"आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जिव लावा"

No comments:

Post a Comment