जपतो त्याला जाणीवेनं जपावं,
लपतो त्याला न भेटण्यासारखं लपावं,
माणसानं सारं समजून वागावं....
जळतो त्याला पोळुन जाळावं,
छळतो त्याला टिचून छळावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
गळतो त्याला पिळून गाळावं,
पळतो त्याला मारून पळवावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
----------------------
माझा एकांत जेव्हा माझ्याशी बोलू लागतो !
सांऱ्यां जुन्याच गोष्टी नव्याने सांगतो.
सारी बरोबर चुक याची गणिते पून्हा मांडतो.
सगळी मनाची नवी सुञे जुन्यातच शोधतो.
मला सांगू लागतो चुकीची सुञामुळे नात्त्याचं गणित चुकतं.
किती पुढे आलो तरी ज्या वाटेवर ज्यांच्याबरोबर चालत आलो आहे त्यांना विसरत नाही.
जुन्या आठवणींनतून मन बाहेर पडत नाही.
एकांतात बावरून मी गर्दीत आपलं कोणी आहे का ? हेच पाहू लागतो.
माणसाच्या या रानात मी आहे का कोणाच्या मनात शोधू लागतो.
----------------------
हे मना, सांगू नको कोणा .....जर झालाच काही गुन्हा.
फूटू देऊ नकोस अश्रूचा पान्हा, तुटू देऊ नकोस भावनांचा कणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
फरक पडत नाही ज्यांना, नको दाखवू त्यानां तुझा भोळेपणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
------------------------------
*प्रसंग* कसाही असो आपला *तोल* जावू देवू नका ,
कोणी आपला कितीही *शाब्दिक* अपमान केला तरी,
त्याला *संयमाने* आणि *धैर्याने* तोंड द्या,
आपल्या स्वतःच्या *परवानगी* शिवाय
आपल्याला कोणीही *दुखवू* शकत नाही.
हे वाक्य मनावर *कोरून* ठेवा आणि
कोणाच्या चुकीच्या *वागण्याने*
आपली *मनशांती* ढळू देवू नका,
काय *घडलंय* यामुळे आपण दुखावले जात नसतो,
तर *घडलेल्या* गोष्टीला आपण दिलेल्या *प्रतिसादामुळे* दुखावले जाण्याची शक्यता असते.
------------------------------
लहानपणी सारेच आपल्या विश्वासातील कोणाचे तरी बोट पकडून चालतात स्वतःच तोल सावरता येईपर्यंत. एकदा कळले की आता पडणार नाही की बस्स !.....
काळजी पोटी निस्वार्थपणे पुढे आलेला हातही आपण सहज झिडकारतो.
तिथूनच स्वार्थ आणि स्वातंत्र्य जपण्याची सुरवात होते. मग वेळोवेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे तेच करत पुढे जातो.
लहानपणापासून आपल्यला जाणीव शिकवली जात नाही, कारण ती आपण ज्या परिस्थितीतून आलो ती लक्षात ठेऊन आपोआप येते.
पण लहानपणी जसे आपण सोयीने हात सोडतो तसेच जाणीव ही सोडतो..... अगदी सहज !
------------------------------
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं,कारण यशाची व्याख्या लोकं ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः ठरवतो.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे,ज्याला ही संपत्ती सापडते, तो खरा सुखी होतो.
माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परस्थिती वाईट असते.चांगल्या कर्माने ती बदलता येते, वाईट परस्थितीत साथ देणारी माणस नात्यातील असोत अथवा नसोत,
तीच खरी "आपली"माणस असतात.
------------------------------
आपल्या माणसावर......
एवढं प्रेम करा की त्याच्या मनात सदैव तुम्हांला गमावण्याची भीती राहील.
आणि एवढा विश्वास ठेवा की तुम्हांला नकळत ही ञास देताना त्याला स्वतःला पच्छाताप दिला पाहीजे.
------------------------------
आपण नेहमीच विचार करतो आपण काय कमावलं, पण कधीतरी असा केलायं का ? की आपण काय गमावलं.
अर्थात...... गमावलं असेल ते आपल्याकडून जातंच , पण जे कमावलं ते तरी कुठं आपल्याकडे राहतं.
------------------------------
सोबत राहणे आणि साथ देणे ह्या दोन्ही गोष्टी फक्त पोकळ वचनात असतील तर सारख्याच आहेत.
माञ साथ देणे कृतीत असेल तर ते सोबत देण्यावर मात करते.
साथ देण्यासाठी मनात जाणीवेची आवश्यकता असते. आजकाल माणसात त्याचीच उणीव भासते.
मनोगत.....
लपतो त्याला न भेटण्यासारखं लपावं,
माणसानं सारं समजून वागावं....
जळतो त्याला पोळुन जाळावं,
छळतो त्याला टिचून छळावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
गळतो त्याला पिळून गाळावं,
पळतो त्याला मारून पळवावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
----------------------
माझा एकांत जेव्हा माझ्याशी बोलू लागतो !
सांऱ्यां जुन्याच गोष्टी नव्याने सांगतो.
सारी बरोबर चुक याची गणिते पून्हा मांडतो.
सगळी मनाची नवी सुञे जुन्यातच शोधतो.
मला सांगू लागतो चुकीची सुञामुळे नात्त्याचं गणित चुकतं.
किती पुढे आलो तरी ज्या वाटेवर ज्यांच्याबरोबर चालत आलो आहे त्यांना विसरत नाही.
जुन्या आठवणींनतून मन बाहेर पडत नाही.
एकांतात बावरून मी गर्दीत आपलं कोणी आहे का ? हेच पाहू लागतो.
माणसाच्या या रानात मी आहे का कोणाच्या मनात शोधू लागतो.
----------------------
हे मना, सांगू नको कोणा .....जर झालाच काही गुन्हा.
फूटू देऊ नकोस अश्रूचा पान्हा, तुटू देऊ नकोस भावनांचा कणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
फरक पडत नाही ज्यांना, नको दाखवू त्यानां तुझा भोळेपणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
------------------------------
*प्रसंग* कसाही असो आपला *तोल* जावू देवू नका ,
कोणी आपला कितीही *शाब्दिक* अपमान केला तरी,
त्याला *संयमाने* आणि *धैर्याने* तोंड द्या,
आपल्या स्वतःच्या *परवानगी* शिवाय
आपल्याला कोणीही *दुखवू* शकत नाही.
हे वाक्य मनावर *कोरून* ठेवा आणि
कोणाच्या चुकीच्या *वागण्याने*
आपली *मनशांती* ढळू देवू नका,
काय *घडलंय* यामुळे आपण दुखावले जात नसतो,
तर *घडलेल्या* गोष्टीला आपण दिलेल्या *प्रतिसादामुळे* दुखावले जाण्याची शक्यता असते.
------------------------------
लहानपणी सारेच आपल्या विश्वासातील कोणाचे तरी बोट पकडून चालतात स्वतःच तोल सावरता येईपर्यंत. एकदा कळले की आता पडणार नाही की बस्स !.....
काळजी पोटी निस्वार्थपणे पुढे आलेला हातही आपण सहज झिडकारतो.
तिथूनच स्वार्थ आणि स्वातंत्र्य जपण्याची सुरवात होते. मग वेळोवेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे तेच करत पुढे जातो.
लहानपणापासून आपल्यला जाणीव शिकवली जात नाही, कारण ती आपण ज्या परिस्थितीतून आलो ती लक्षात ठेऊन आपोआप येते.
पण लहानपणी जसे आपण सोयीने हात सोडतो तसेच जाणीव ही सोडतो..... अगदी सहज !
------------------------------
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं,कारण यशाची व्याख्या लोकं ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः ठरवतो.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे,ज्याला ही संपत्ती सापडते, तो खरा सुखी होतो.
माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परस्थिती वाईट असते.चांगल्या कर्माने ती बदलता येते, वाईट परस्थितीत साथ देणारी माणस नात्यातील असोत अथवा नसोत,
तीच खरी "आपली"माणस असतात.
------------------------------
आपल्या माणसावर......
एवढं प्रेम करा की त्याच्या मनात सदैव तुम्हांला गमावण्याची भीती राहील.
आणि एवढा विश्वास ठेवा की तुम्हांला नकळत ही ञास देताना त्याला स्वतःला पच्छाताप दिला पाहीजे.
------------------------------
आपण नेहमीच विचार करतो आपण काय कमावलं, पण कधीतरी असा केलायं का ? की आपण काय गमावलं.
अर्थात...... गमावलं असेल ते आपल्याकडून जातंच , पण जे कमावलं ते तरी कुठं आपल्याकडे राहतं.
------------------------------
सोबत राहणे आणि साथ देणे ह्या दोन्ही गोष्टी फक्त पोकळ वचनात असतील तर सारख्याच आहेत.
माञ साथ देणे कृतीत असेल तर ते सोबत देण्यावर मात करते.
साथ देण्यासाठी मनात जाणीवेची आवश्यकता असते. आजकाल माणसात त्याचीच उणीव भासते.
मनोगत.....












