माणसानं सारं समजून वागावं...

जपतो त्याला जाणीवेनं जपावं,
लपतो त्याला न भेटण्यासारखं लपावं,
माणसानं सारं समजून वागावं....
जळतो त्याला पोळुन जाळावं,
छळतो त्याला टिचून छळावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
गळतो त्याला पिळून गाळावं,
पळतो त्याला मारून पळवावं,
माणसानं सारं समजून वागावं.....
----------------------

माझा एकांत जेव्हा माझ्याशी बोलू लागतो !
सांऱ्यां जुन्याच गोष्टी नव्याने सांगतो.
सारी बरोबर चुक याची गणिते पून्हा मांडतो.
सगळी मनाची नवी सुञे जुन्यातच शोधतो.
मला सांगू लागतो चुकीची सुञामुळे नात्त्याचं गणित चुकतं.
किती पुढे आलो तरी ज्या वाटेवर ज्यांच्याबरोबर चालत आलो आहे त्यांना विसरत नाही.
जुन्या आठवणींनतून मन बाहेर पडत नाही.
एकांतात बावरून मी गर्दीत आपलं कोणी आहे का ? हेच पाहू लागतो.
माणसाच्या या रानात मी आहे का कोणाच्या मनात शोधू लागतो.
----------------------

हे मना, सांगू नको कोणा .....जर झालाच काही गुन्हा.
फूटू देऊ नकोस अश्रूचा पान्हा, तुटू देऊ नकोस भावनांचा कणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
फरक पडत नाही ज्यांना, नको दाखवू त्यानां तुझा भोळेपणा...
हे मना, सांगू नको कोणा.....जर झालाच काही गुन्हा.
------------------------------

*प्रसंग* कसाही असो आपला *तोल* जावू देवू नका ,
कोणी आपला कितीही *शाब्दिक* अपमान केला तरी,
त्याला *संयमाने* आणि *धैर्याने* तोंड द्या,
आपल्या स्वतःच्या *परवानगी* शिवाय
आपल्याला कोणीही *दुखवू* शकत नाही.
हे वाक्य मनावर *कोरून* ठेवा आणि
कोणाच्या चुकीच्या *वागण्याने*
आपली *मनशांती* ढळू देवू नका,
काय  *घडलंय* यामुळे आपण दुखावले जात नसतो,
तर *घडलेल्या* गोष्टीला आपण दिलेल्या *प्रतिसादामुळे* दुखावले जाण्याची शक्यता असते.
------------------------------

लहानपणी सारेच आपल्या विश्वासातील कोणाचे तरी बोट पकडून चालतात स्वतःच तोल सावरता येईपर्यंत. एकदा कळले की आता पडणार नाही की बस्स !.....
काळजी पोटी निस्वार्थपणे पुढे आलेला हातही आपण सहज झिडकारतो.
तिथूनच स्वार्थ आणि स्वातंत्र्य जपण्याची सुरवात होते. मग वेळोवेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे तेच करत पुढे जातो.
लहानपणापासून आपल्यला जाणीव शिकवली जात नाही, कारण ती आपण ज्या परिस्थितीतून आलो ती लक्षात ठेऊन आपोआप येते.
पण लहानपणी जसे आपण सोयीने हात सोडतो तसेच जाणीव ही सोडतो..... अगदी सहज !
------------------------------

यशस्वी आयुष्यापेक्षा  समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं,कारण यशाची व्याख्या लोकं ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः ठरवतो.
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन ते अंतःकरणाची संपत्ती आहे,ज्याला ही संपत्ती सापडते, तो खरा सुखी होतो.
माणूस वाईट नसतो माणसावर येणारी परस्थिती वाईट असते.चांगल्या कर्माने ती बदलता येते, वाईट परस्थितीत साथ देणारी माणस नात्यातील असोत अथवा नसोत,
तीच खरी "आपली"माणस असतात.
------------------------------

आपल्या माणसावर......
एवढं प्रेम करा की त्याच्या मनात सदैव तुम्हांला गमावण्याची भीती राहील.
आणि एवढा विश्वास ठेवा की तुम्हांला नकळत ही ञास देताना त्याला स्वतःला पच्छाताप दिला पाहीजे.
------------------------------

आपण नेहमीच विचार करतो आपण काय कमावलं, पण कधीतरी असा केलायं का ?  की आपण काय गमावलं.
अर्थात...... गमावलं असेल ते आपल्याकडून जातंच , पण जे कमावलं ते तरी कुठं आपल्याकडे राहतं.      
------------------------------

सोबत राहणे आणि साथ देणे ह्या दोन्ही गोष्टी फक्त पोकळ वचनात असतील तर सारख्याच आहेत.
माञ साथ देणे कृतीत असेल तर ते सोबत देण्यावर मात करते.
साथ देण्यासाठी मनात जाणीवेची आवश्यकता असते. आजकाल माणसात त्याचीच उणीव भासते.

मनोगत.....

काही तरी करुन जावं !

सारेच करतात छंद आपण स्वतःला कोणाच्या तरी मनात बंद करून जावं.
सगळेच पाहतात निसर्ग आपण त्याच्या गर्भ श्रीमंतीत रमुन जावं.
सारेच देतात आश्वासन आपण आपण कृतीत प्रत्यक्ष करून जावं.
सारेच दाखवतात वाट आपण हात धरून घेऊन जावं.
सगळेच झटतात घेण्यासाठी आपण काहीतरी देऊन जावं.
सगळेच लढतात जिकण्यासाठी आपण हारून न ही जिंकून जावं.
सगळेच जगतात मरेपर्यत आपण मरून ही आठवणीत उरुन जावं.
----------------------

प्रेम.......मनाचं !
एकदा राधेनं भगवान श्रीकृष्णानां विचारले...
मी तुमच्या जवळ असतानाही  तुम्हांला माझ्यापेक्षा ती मीरा का बरं जास्त प्रिय आहे ?
कृष्ण स्मित हास्य करत उद्गारले !
मी आता तुझ्याबरोबर आहे तरी तु माझा विचार न करता आणि माझ्या सहवासात रममान न होता, मीराच्या विचारात मनात ञस्त आहेस.
आणि मी मीरा बरोबर नसतानाही ती फक्त माझ्याच विचारात रममान असते आणि मनात माझ्या विचारातच व्यस्त असते.
मी तुझ्याजवळ असूनही मी तुझा नाही कारण तु माझ्याबरोबर नाहीस.
मी तीच्याबरोबर नसतानाही ती माझ्याबरोबर आहे...... मनानं !
"तनानं कोणाचं असणं हे क्षणभंगुर असू शकतं पण मनानं कोणाच असणं हे शाश्वत असतं."
----------------------

नजरेला ही भाव आणि भाषा असते.
म्हणूनच अस वाटत मला.......
कधी तरी नजरेतून ओळखावं आपल्या माणसांना,
जेव्हा त्यानं बंद केलेलं असत शब्दानां.
सुकलेला कंठ जेव्हा फुटत नाही,
बोलायचं असत पण मूखातून शब्द उठत नाही.
तेव्हा डोळे बोलत असतात, फक्त त्यांच्यात शब्द नसतात.
अशी डोळ्यांची (नजरेची) भाषा समजण्यासाठी मनाची तार जुळलेली असावी लागते.
फार कमी नजरा मनाच्या तारेनं जुळलेल्या असतात,
बहुतेक नजरा तर तनाच्या देखाव्यातच खुळलेल्या दिसतात.
अर्थात...... मनाला भिडलेली नजरंच डोळ्यांची भाषा समजू शकते.
----------------------

तु संयमाने वाग मना !

भंगल्या नात्यातल्या त्या भेगा जुळवीण्यास,
आनंदासह सहजतेने रागा हरवण्या..
तु संयमाने वाग मना !

अहम् पणाचे तेच मनोरे पुन्हा पाडण्यास,
मुखवट्यातील जुणे चेहरे पार तोडण्यास...
तू संयमाने वाग मना !

संशयाचे पडले ठेके मनमनावर जरी,
विश्वासाचे गीत पुन्हा लयीत गातच गाण्यास...
तू संयमाने वाग मनावर !
नाती सारी देखाव्यातील पार *तोडण्यास,
बंध जाणीवेचा घट्ट करण्यास...
तु संयमाने वाग मना !

तुझ्या भावनांच मूल्य राखण्यास,
अन् जगण्याच तत्व जपण्यास.....
तु संयमाने वाग मना !                                                                
----------------------

काय झाले माझ्या मना, काय केल्या कळेना ! कुणासाठी धाव घेई शोधूनीया मिळेना !
भूललास रे पामरा, भावनांच्या मृगजळी ! थांब रे भ्रमरा माझ्या शब्द दाटले गळी !

मी म्हटलं मनाला "ए मना, तु का रे इतका कडू , आपल्यानांच लावतोस उगाचच रडू."
मन म्हणालं "अरे.... मी जेव्हा तुझ्यात नसतो तेव्हा स्वतःला, तुझ्या आपल्यांच्या अश्रूत शोधत असतो."
मी म्हटलं "अरे पण अश्रू म्हणजे नात्याचं सत्व आहे."
मन म्हणालं " तिथंच माझं अस्तित्व असतं."
----------------------

कडू आहे पण सत्य आहे !
सगळे जाणीवांचे झरे आत्मसुखात येऊन सहज आटतात आणि तिथूनच स्वार्थाला पाझर फुटतात.
स्वःसुखासाठी भावनांनचे झेंडे फडकवले जातात आणि कर्तव्य वेशीवर टांगले जाते.
तात्पुरत्या सुखासाठी मनाचं भांडवल केलं जातं आणि मेंदूच्या बाजारात क्षणभंगुर आनंद लुटला जातो.
शब्दांची ढाल आत्मसंरक्षणास वापरली जाते आणि नाती सुळावर चढवली जातात.

जरूरी नाही माझं म्हणनं सांऱ्यांनाचं पटलं पाहिजे, सांऱ्यांनी माझ्या विचारांनीच नटलं पाहिजे.
कारण प्रत्येकाला आपआपल्या सोयीचंच पटतं आणि प्रत्येकजण स्वतःच्या विचारांनीच नटतो.
"विचारांचा विचार करता आला पाहिजे ".

आपलं नातं जर खरोखरच मनाचं आहे तर ते जपा. जर का तुम्ही इतर कुणासोबत मस्त आहात तर उगाच समोरच्यांला वेडं समजू नका.
कारण आपल्या लपवाछपवीच्या शहाणपणाचं प्रदर्शन कधीतरी लागणरंच.
----------------------

* शब्द *
आज शब्द रहायला आला होता, शब्दाला शब्द जोडला आणि आमचा संवाद घडला.
मी म्हटलं "शब्दा !.. तु फार महान आहेस.
अबोल बाळाच्या मुखातूनच अ.. अ...च्या सूरात,
शिरतोस हळूच सांऱ्यांच्या मन घरात.
शब्द म्हणाला " नाही रे तसा मी  "अज्ञ" आहे. म्हणजे  'अ' ते  'ज्ञ' पर्यत.
अविचाराने पाहिलसं तर 'अ'ज्ञान आणि विचार करुन पाहिलसं तर 'ज्ञा'न आहे.
भारावूनच गेलो शब्द सामर्थ्य ऐकून आणि मी दिलं स्वतःला शब्दांमध्ये झोकून.....
मी म्हटलं " शब्दा, तु आहेस म्हणूनच प्रत्येकाला नाव मिळाले आहे, अन् स्वतःच वेगळेपण कळाले आहे.
तुझ्यामुळे 'हसू' 'आनंद' 'दुःख' 'रुसू' सारे मनातून निघून कवी-लेखकांच्या लिखाणातून कागदावर अवतरले आहेत.
तु सागराला तुझ्यातून ओळख देऊन स्वतःला अथांग ठेवलं आहेस.
तु विश्वाला आणि विश्वातील प्रत्येक सजीव - निर्जीवाला स्वतंत्र शब्दरुप ओळख दिलीस.
तु  प्रगल्भ  असं शाश्वत सत्य आहेस. कोणीही नाकारणार नाही असं तथ्य आहेस.
माझ्या जीभेला लगाम घालून शब्द म्हणाला "हुशारच आहेस!
माझ्याच शब्दसुमनांची माझ्यावर उधळण करत तुझ्या रसिकेचं राज्य तयार करतोयसं.
तुझं 'मनोगत' लिहताना हेच करतोस. माझ्यावर नेहमी राज्य करतोस.
तुला माहीत आहे, हे वाचणारे आता वाचताना काय करतील.
मी म्हटलं " नक्कीच ते मनात विचार करत गालात हळूच हसत असतील ". ते हसू ही तुच आहेस " त्यांच्यां 'मनातलं' अन् 'शब्दांतलं'.
शब्द म्हणाला "चल निघतो आता  पहाट झाली..... वाट पाहत असतील माझी सगळे तुझं मनोगत वाचणारे ."

काही कळत नाही !!!

नातं जोडण्यासाठी आधी मनापासून प्रयत्न करतात माणसं,
अन् अचानक त्या नात्यांवर ही संशय घेतात माणसं.
असं का बरं वागतात माणसं?
काही कळत नाही !
एकटेपण असलं की मनाची सोबत शोधतात माणसं,
अन् कोणी थोडं वेगळ भेटलं की सोबतच्याला विसरतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही?
काही नसलं स्वतःजवळ की ऐकमेकांजवळ सहज हसतात माणसं,
थोडं काही मिळवलं की आपल्यांंजवळ हसणं ही व्यर्थ मानतात माणसं.
असं का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
अडचणी असल्या की आपल्यानां आठवतात माणसं,
अन् आनंदात आपल्यानांच विसरून इतरांना जोडतात माणसं.
अस का बरं करतात माणसं?
काही कळत नाही!
---------------------

माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
निरपेक्ष नाती जोडताना,
जीवन रथ ओढताना,
खाचखळगे, चढउतार असणारच.
अशावेळी एकनिष्ठ राहून विश्वास जोपासत पुढं गेलं पाहीजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
प्रत्येक माणूस इथं नवं आणि वेगळं काहीतरी मिळवण्यास धडपडत असतं.
इच्छा, आवड आणि प्राधान्य हे सगळं सोईस्कर बदलत असतं.
अशावेळी अधीर न होता जाणीव ठेऊन वागलं पाहिजे...
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
जीवनाच्या स्पर्धेत सगळे स्पर्धक भिडणारच,
आपआपल्या पद्धतीने नवीन चाल चालणारच,
स्पर्धा म्हटलं की हार जित होणारच.
अशावेळी यश- अपयश प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे....
माणसाला भावनिक होण टाळता आलं पाहीजे !
---------------------------------

भावनांचा बाजार....
आज बाजारात काय स्वस्त आहे?  खोटेपणा !
आज बाजारात काय उपलब्ध नाही?  खरेपणा !
आज बाजारात काय फ्री मिळत आहे?  खडुसपणा !
आज बाजारात काय जाणवतयं?  खवटपणा !
आज बाजारात काय शिजत आहे?  खुरापतीपणा !
आज बाजारात काय जाणवत नाही?   खमंगपणा !
---------------------------------

पहावं जरा स्मरुन !
कोठून आपण सुरूवात केली, कशी धडपड करुन.
मिळवलं सारं काही अपण ज्यांचा हात धरून.
कधीतरी त्यांची साथ पहावी जरा स्मरुन...
असे क्षण बरेच आहेत जेव्हा आपण गेलो होतो बावरून.
अलगद कोणीतरी आपल्याला घेतलं होत सावरून.
कधीतरी त्यांचं प्रेम पहावं जरा स्मरून...
एकटेच पुढे जात आहोत कोणी दिसत नाही दूरून.
ज्यांचा आधार घेतला त्यानां मागे आलो सारून.
कधीतरी त्यांची सोबत पहावी जरा स्मरून....
कोण इथं अमर राहणार वेळेवर मात करून.
एका क्षणाला सारेजण जाणार कर्म भरून.
कधीतरी त्यांंचा त्याग पहावा जरा स्मरून....
---------------------------------

मन थोडं खिन्न होत !  कारण...
मुद्दा अविश्वासाचा नसतो, रक्ताचं नातं नसतानाही एकमेकांना समजून घेतलेल्या मनातील श्वासाचा असतो.
मुद्दा आवडीचा नसतो, अनेकांना बाजूला सारून मनापासून आपण केलेल्या निवडीचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा कसल्याही उणीवेचा नसतो, स्वार्थ पाठी विसरलेल्या जाणीवेचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
मुद्दा डोळ्यांतील अश्रूचा नसतो, त्यानां जन्म देणाऱ्या मनातील निर्मळ भावनांचा असतो.
म्हणूनच...मन थोडं खिन्न होत ! कारण...
---------------------------------

प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागतं असतो !
कोणी इतरांसाठी तर कोणी स्वतःसाठी जगत असतो.
अर्थात... कोणी कशासाठी आणि कोणासाठी कसं जगायचं हे जे तो स्वतःच्या मनानं ठरवत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
तसं आपण कुणाला काय देतो. रक्ताचा असो वा जोडलेला आयुष्यभर थोडी राहतो.
कोणी कोणाचं मन  किंवा धन थोडीच चोरत असतो, त्यातला आनंद आणि समाधानाच क्षण स्वतःशी जोडत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
कोतीतरी समोरच्यात आपलं सर्वस्व पाहत असतो. तर कोणीतरी सर्व काही साधत असतो. जो आपले हेतू ठाम ठेऊन वागत असतो.
प्रत्येक माणूस आपल्या मनाप्रमाणेच वागत असतो !
---------------------------------

सवय...
जन्म झाला तेव्हा कोणा एका डाँक्टरने आपल्याला पहिल्यांदा हाथ लावला. काळजीचा हाथ होता तो तरीही रडलो.
पुन्हा आईच्या जवळ जाताच केवळ तीच्या उबदार स्पर्शाने शांत झालो.
अर्थात...तीच्या गर्भातच तीच्या उबेची सवय होती.
नंतर अनेक हातांंनी आपल्याला उचललं, खेळवलं पण सांऱ्यांच्याच हातात आपल्याला तसा उबदार आपलेपणा जाणवला नाही,
जेव्हा कधी आपल्याला मायेचा आणि सुरक्षिततेच्या ओलाव्याची कमी वाटली तेव्हा ही आपण खूप रडलो. परत आपल्याच्या सुरक्षा कवचात जाण्यासाठी.
अर्थात...आपल्याला आता आपले कोण याची सवय झाली होती.
आपण चालू , बोलू लागलो म्हणजेच शाळेत आलो. आता माञ स्पर्शातील उबदार पणाचा आपल्याला विसर पडला.
आता आपण  फक्त विचारांची उब शोधू लागलो. जे आपल्या विचारांना मान्य करतील ते आपले समर्थक (मिञ) आणि जे आपले विचार मान्य करणार नाहीत ते आपले विरोधक (शञु).
अर्थात...आता आपल्याला विचारांच्या राजकारणाची सवय झाली.
आता आपण पैसा कमवायला लागलो. इथं मिञ आणि शञू या संकल्पना संपल्या. इथून पुढं सगळं व्यवहारात असणार. आपल्याला आवडणारे आणि न आवडणारे या सगळ्यांमध्ये आपण झक मारुन बसणार. अर्थात...आता आपल्याला इतरांना सहन करण्याची सवय झाली.
आपण कमवते झालो म्हणून आपलं लग्नाचं वय झालं. लग्न झालं आणि मायेची उब संपली आता फक्त शरीरांची देवान-घेवान एका नवीन शरीराला आकार देण्यास.
अर्थात ...स्वतःच्या इच्छेनुसार न जगता केवळ संसाराच्या चक्रात फीरण्याची  सवय आपल्याला आपोआप होणार.
आणि पुन्हा तेच! सवयीच चक्र निरंतर वंशपरंपरेने पुढे जाणार.

मनोगत...

धर प्रहरा हात माझा...!!!

धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
मनी मनांच्या गुंतलेला,
अश्रूंनी चिंब भिजलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
भावनांनी बांधलेला,
वेदनांनी सांधलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
विश्वासाने जोडलेला,
संशयाने तोडलेला...
धर प्रहरा हात माझा,
एकला हा जीव माझा!
----------------------

कधीतरी....
एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
समोरच्याला विश्वासात घेण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
जे आपल्याला आवडत नाहीत त्यानां अडचणीत पाडण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
आपल्या आवडत्या व्यक्तीचं समर्थन करण्यासाठी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
एखाद्या वेळेस कळत तर कधी नकळत , कशासाठी तरी आपण खोटं बोलतोच.
कधीतरी....
खोटं बोलणं चुकीचं नसतं पण त्यातून एखाद्याचं मन दुखवणे किंवा एखाद्याच नुकसान करणं वाईट असतं.
----------------------

कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आहे वाऱ्यावर जरी दिसत आहे स्थावर,
जीवनाच्या पुस्तकाला नाही नात्याचं कव्हर. सगळीच फरपड समाधान मिळेना...
कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना! सगळंच आनंदी दिसतयं जणाला,
मनाची सल कळेना कोणाला. सगळीच ओढातान कारण मिळेना... कुठं जाऊ आता माझ्या मना कळेना
----------------------

आपण विचार करतो तेवढं सगळं सहज नसतं आणि आपल्याला वाटतं तेवढं सगळ सोपं ही नसतं.
प्रत्यक्षात आयुष्य म्हणजे एक संघर्ष आहे, स्वतःचा स्वतःशीच करायचा फक्त आत्मविश्वासाने करायचा.
संघर्ष संघर्ष असावा त्यात सूड आणि मुड नसावा.
----------------------

खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारेच कुठं बरं सोन्यासारखे शुद्ध असतो, मग खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्यानां स्वीकारून वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं.....
आपण सारे कुठे बरं असतो नेहमी खरे, मग उगाच समोरच्याशी खोटेपणानं वागावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं......
आपण थोडी ना सर्वांची दुःख भरून काढतो, मग तोंड देखला आनंद देण्यापेक्षा मनभरुन समाधान द्यावं.
खरचं वाटत असेल कोणीतरी आपलं तर त्याला जीवापाड जपावं....
----------------------

इतरांचा स्वभाव बदलण्यापेक्षा स्वतःची उंची कायम ठेवा. कारण आजूबाजूच्या सामान्य माणसांच्या गर्दीत आपण असामान्य आहोत हे उंचीच दाखवते.
उंचीचे दोन फायदे असतात....
१. आपल्याकडे बघणाऱ्यांना खाली मान घालण्याची गरज नसते ते ताठ मानेने राहतात.
२. आपण कोणाकडे बघीतलं नाही तरी लोक आपल्याकडे बघतातच.
अर्थात....
ज्यांना आपणआवडतो ते अभिमानाने बघतात आणि ज्यांना आपण आवडत नाही ते स्वाभिमान जपण्यास वर मान करून बघतात.
----------------------

देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहोत आपण ? दिव्य शक्ती तर नाही ना !
तरी का जपत असतो आपण निष्फळ अहंकार, कधीतरी पहा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपण हसलो नाही तर सारं जग दुःखी होईल असं आहे का ? नाही ना ! मग हसावं माणसानं बिनधास्त पोटभरुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
आपली नोदं भूतकाळात नाही आणि भविष्यात काय याची खाञी नाही !
तरी का उगाच व्यर्थ घालवतोय आपण वर्तमान. त्यापेक्षा जगा मस्त स्वतःवर प्रेम करुन.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभरुन !
कोण आहे असं जे आपल्या वेदना वाटून घेईल ? कोण आहे असं जे मेल्यावर आपल्या सोबत येईल ?
असं करणं माणसाला शक्य नाही. कारण शरीर स्वतःच त्यामुळे जिवंत असे पर्यत त्याचं जे काही होईल ते आपल्यालाच सहन करायचं आहे.
मग कशासाठी आपण ही धन-दौलत साठवतोयं , असह्य धावपळ करुन रक्त आठवातोय ! त्यापेक्षा मुंगीपाखरा सारखं आनंदानं जगावं मिळवून कणभर.
देता आले कोणास काही तर द्यावे मनभर !
----------------------

त्या दिवशी मटकत मटकत जात होती, स्वतःच्याच तालात हसत गालात.
तीला सहज विचारलं "एवढी आकडतेस ! काय आहे तुझ्यात?"
म्हणाली... सगळ्या पेक्षा वेगळंच आहे माझ्यात !
मी स्तःला सावरलं..अन् विचारलं :
तरी तूला जमतं सगळ्या सारखं वागायला? लाज नाही वाटत असं सरळ सरळ सांंगायला.
म्हणाली..... त्यात कसली आलेय लाज ! माझा हा नेहमीचाच साज.
बऱ्याच जनांचे चे तर मला बघूनच गळतात....... पाय.
ज्यानां मी मिळत नाही मी, ते फक्त चोळतात...... आपले हाथ !
मी म्हटलं अशी चावट भाषा एवढ्या सहज कशी बोलतेस ?
म्हणाली..जे आहे ते आहे. मी थोडीच टाळते !
ज्यालां जे पाहिजे ते ते निवडतात , मला सांऱ्यां गोष्टी स्पष्ट दाखवायला आवडतात.
ज्यांना जमतं ते घेतात, नाही तर गुपचूप निघून जातात.
मी म्हटलं ..... तुझं बरं  आहे.
लगेच म्हणाली .... सगळं खरं आहे.
गेली लगेच निघून मटकत मटकत....मी आपला राहीलो बघतं !
......अशी ही लबाड " वेळ " हो !

मनोगत.......

कसं व्हायचं माणसाचं...!!!

स्वतः केलेलं सारं सार्थ आणि समोरच्यानं स्वतःसाठी काही केलं तर व्यर्थ.
सारं काही हवं असतं माणसाला फक्त अर्थाच.....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
स्वतःला जे हवं ते मिळालचं पाहिजे आणि समोरच्याला हवं ते नसलं तरी चालतं....
म्हणून मला वाटतं...कसं व्हायचं माणसाचं...
-----------------------------------

आपण सारे संपत्ती कमवू अमाप, पण त्या संपत्तीने शेवटच्या क्षणाला  श्वास विकत घेता येत नाही.
आपल्या आजूबाजूला माणसं असतील अगणित, पण माणसांच्या गर्दीत जेव्हा गरज असते कुणाची तरी तेव्हा मनाच्या नात्याशिवाय कोणी पुढं येत नाही.
-----------------------------------

सारं काही जमतं प्रत्येक माणसालां, जसं पंख आल्यावर उडता येतं शेणातल्या कीड्याला.
सारं काही कळत असतं प्रत्येक माणसलां, जसं ज्ञान असतं छोट्याश्या मुंगीला.
सारं काही आवडणारं हवं असतं प्रत्येक माणसालां , इथं माञ उदाहरण म्हणून मांडता येतं नाही कोणाला.
-----------------------------------

जन्म झाला सर्वाचाचं आणि स्वतंत्र झालो आपणं आईच्या नाळेपासून.
डोकं आपलं असावं शांत आणि सकस म्हणून तेल होत टाळूपासून.
शब्द ओळखायला आणि वाक्य बोलायला शिकलो आपण शाळेपासून.
जग आपल्याला समजलं आणि नातं उमगलं जेव्हा दूर गेलो घरापासून.
नात्यात राजकारणाचं तंञ आणि व्यवहाराचा मंञ कळलं इतरांपासून.
वाईट एवढयाचचं वाटतं की... आपण सगळं मिळवलं फक्त स्वार्थापासून.
-----------------------------------

खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
भावनांच्या प्रवाहात मनाची नाती जोडून, अचानक मेंदूच्या आहारी जाऊन. दुसऱ्यावर आरोप करून स्वतःला निर्दोष ठेवतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
चांगलं असेल तेव्हा सक्रीय राहून, वेळप्रसंगी निष्क्रिय राहून. समोरच्यांना निकड असताना आपण अंग काढून लपून राहतो तेव्हा ...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
वचनचिठ्ठी बंद करुन, कर्तव्याला बाजूला सारून . एकनिष्ठतेची लक्तरे आपण वेशीवर टांगतो तेव्हा...
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
आपूलकीचा चेहरा ठेऊन, प्रेमाचे अश्रू दाखवून. जाणीवेचा जेव्हा  बाजार करतो तेव्हा....
खरोखरच आपण सारे एवढे साधे असतो का ?
-----------------------------------

असं का वागतं मन कळत नाही !
जोडलेल्या नात्यातील, निरागस भावनेच्या रोपाला जपतं जीवापाड. अन् अचानक होत मोठं रागाचं झाड..
असं का वागतं मन कळत नाही !
वेडं होऊन देतं फक्त मायेची सावली, अन् अचानक कधीतरी होतं हट्टी बाहुली...
असं का वागतं मन कळत नाही!
सांऱ्यांचा त्याग करून आलयं तुमच्या सावलीत, पण अचानक कधीतरी गूंतंत माऊलीत...
असं का वागतं मन कळत नाही !
सगळ्यांना जपताना स्वतःला सावरत, अन् अचानक कधीतरी एकटेपणानं बावरतं...
असं का वागत मन कळत नाही !
खूप विचार करतो मी पण उत्तर मिळत नाही.
-----------------------------------

अथांग पसरलाय हा जीवन समुद्र, आपण जेव्हा एकटे असतो या प्रवासातल्या बोटीत.
आलचं समजा अचानक नैराश्यांचं वादळ, तर असावं कोणीतरी आपलं अलगद घेणारं मिठीत.
-----------------------------------

संयम आणि शांतता ह्या सर्वांत मोठ्या शक्ती आहेत.
संयम तुम्हाला मेंदूने बळकट करतो. आणि शांतता मनाने बळकट करते.
-----------------------------------

आपल्याला भेटून सगळे आनंदी झाले पाहिजेत असे नाही.
पण आपल्याला भेटून कोणीही दुःखी होऊ नये हे महत्वाचे.
-----------------------------------

कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
नेहमीच ठेवलं होती मी नाउमेदीचं धेय्य, आनंदाने स्वीकारलं मेहणतीच श्रेय.
नेहमीच वेळेबरोबर केले अथक परिश्रमाचे युद्ध, मिळवले समाधान हरपून सारी शुद्ध.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
जपलयं आतापर्यत बिनरक्ताच्या नात्यातलं सत्व, आत्मसन्मानात जगण्याचं असाधारण तत्त्व.
नाही कोणाची हूजुरी नाही कोणाचा गुलाम , निडर नेतृत्व नाही कोणाला सलाम.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.
विरोधकांचे गेम, आपल्याचं प्रेम. गरूड भरारी ची तहान, अस्तित्व मार्ग  हा एकच मान.
कधीतरी सारं काही संपेल एका क्षणात... एकटं असलं की विचार चुकून येतो मनात.

मनोगत...

आपण सर्वच तसे शहाणे असतो...


आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरच्या आपल्याला काय हवं! काय नको! ते फार साधवपणे शोधत असतो, हवं ते त्याच्या कडून मिळवत नको तेव्हा त्याला बरोबर टाळत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा घालतो.
समोरचा मूर्ख आहे असा गैरसमज करून, मनात रोष असला तरी खोटे हसू चेहऱ्यावर खेळवत असतो.
आपण सर्वच तसे शहाणे असतो पण वेळेनूसार भोळेपणाचा मुखवटा आणतो.
-----------------------------------

माणसानं अपेक्षा आपल्या क्षमतेनूसार कराव्या आणि अपेक्षा मोठी असल्यास आपली क्षमता वाढवावी.
माणसानं स्वप्नं तर बघावी पण ती प्रत्यक्षात आणण्यास कृती करावी.
माणसानं नाती जरूर जोडावी पण ती जपण्याची जाणीव ठेवावी.
-----------------------------------

माणसाला कालची गोष्ट आणि उद्याची गोष्ट आत्ताच्या क्षणात मिळवता येत नाही...
तरीही माणूस आजजे महत्त्व ओळखू शकत नाही यातचं सुख आणि समाधान हरवून जातं.
-----------------------------------

माणसाला काही नाही करता आलं तरी, जाणीवेचं मूल्य धरता आलं पाहिजे.
जरूरी नाही की सारं काही चांगलचं करता आलं पाहिजे, पण विस्कटलेलं सावरता आलं पाहिजे.
नेहमीच जिंकलं नाही तरी अपयश स्वीकाराता आलं पाहिजे.
-----------------------------------

इतरांसाठी आपण झूरत राहायचं आणि त्यांनी माञ मजा मारत राहायचं.
मग आपण तरी कशाला मनानं मरत राहायचं त्यापेक्षा मस्त जगायचं.
असही सगळेच कुठे सरळस्ष्ट असतात, लपतछपत मिष्ठ असतात.
मग आपण तरी कशाला कडू व्हायचं, आपल्या मनाला रडू द्यायचं.
त्यापेक्षा मस्त जगायचं आपल्या मनासारखं वागायचं.
-----------------------------------

"प्रेम" आणि "राग" ह्या दोन्ही ऐकण्यात वेगळ्या वाटतात, वेगवेगळ्या परिस्थितीत येतात.
पण एक गोष्ट सारखीच करतात कोणाच्या तरी भावना दुखावतात आणि स्वार्थापायी जाणीव विसरून क्षणभंगुर सुखासाठी जपलेलं नातं सहज पायदळी देतात.
-----------------------------------

"एक" आणि "अनेक" यामधील माणसालां एकच निवडता येतं. माणसं ही फार हुशारीने आणि स्वतःच्या सोयीने यामधील स्वतःसाठी निवडत असतात.
पैसा हा पैसा असतो, एक रूपातला तरी माणसाला तो अनेक संख्येत हवा असतो.
माणूस हा माणूस असतो पण अनेक रूपातला तरी माणसाला आवडत माणूस एकच हवा असतो.
-----------------------------------

आपण जन्मलो तेव्हा इतरांची गरज म्हणून पहीलं वस्ञ घातलं ते "लंगोट".
आपण मरतो तेव्हा इतरांची गरज म्हणून शेवटचं वस्ञ घातलं ते "कफण".
या दोन्हीनां खिसा नाही तरी आयुष्यभर काय जमवत असतो आणि कशासाठी?
-----------------------------------

तसं... प्रत्येकाला स्वतःची स्वप्नं असतात. फरक एवढाच की,
काहीजण ती एकनिष्ठतेने साध्य करत असतात तर काहीजण ती धूर्तपणे साध्य करत असतात.
तसं.... प्रत्येकाला स्वतःच्या इच्छा असतात. फरक एवढाच की,
काहीजण त्या आपला विश्वास ठसवून पूर्ण करत असतात तर काहीजण त्या कोणाला तरी फसवूण पूर्ण करत असतात.
-----------------------------------

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.
जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
-----------------------------------

घर जेवढ मोठ असतं तेवढ्या खिडक्या मोठ्या नसतात.
घराला खिडक्या कितीही असल्या मुख्य दरवाजे अनेक नसतात.
घराचा मुख्य दरवाजा कितीही मोठा असला तरी त्याचं कुलूप तेवढं मोठ नसतं.
घराचं कुलूप जेवढं मोठं असतं तेवढी मोठी त्याची चावी नसते.
अर्थात....घर कितीही मोठं असलं तरी त्यावर अधिकार चावीचा असतो.                                                                   माणसाचं अस्तित्व देखील असंच असतं.
घर म्हणजे शरीर.
खिडक्या म्हणजे नाक-कान.
दरवाजा म्हणजे तोंड.
कुलूप म्हणजे जीभ
आणि...चावी म्हणजे मन.
"मन म्हणजे अरुप धन"

मनोगत....

विचार करतोय....

का बरं जमतं नाही माणसाला "नाक " होऊन वागायला इतरांना दोष न देता जे योग्य ते स्वीकारायला.
हवेत असंख्य इतर नको असलेले वायु असतानाही नाक कसं फक्त आँक्सीजन शोषून घेतं.
का बरं जमतं नाही माणसाला " सूर्य " होऊन वागायला इतरांना दोष न देता निरपेक्ष जगायला.
एकमाञ तेजस्वी आणि स्वयंपूर्ण शक्ती असतानाही सर्वांनी आपल्याला पाहिलंचं पाहिजे असं हट्ट न करणं.
-------------------------------

काही सन दिवसाचे तर काही मोजक्या दिवसाचे, काही एक दिवसाचा आनंद देतात तर काही  मोजक्या दिवसांचे.
माणूसही हे सारे सन साजरे करतो आणि त्यामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
पण जन्मापासून मरणापर्यत जो सन रोज सोबत करतो एकनिष्ठपणे ,  आपण दुर्लक्ष केले तरी नियमित येतो आपली सोबत करायला त्याला कधीच जाणीवपूर्वक आंनदानै न्याहळत नाही.
अर्थात.... माणसाचा स्वभावाच असतो क्षणभंगुर आनंदात जगण्याचा, शाश्वत समाधान सोडून.
-------------------------------

आनंद आणि समाधान या एकमेकानां पूरक गोष्टी आहेत. जसं दूध आणि त्यावर येणारी साय. दूध म्हणजे आनंद आणि साय म्हणजे समाधान.
दूधाशिवाय साय तयार होत नाही कारण ती शाश्वत आहे, साईमधून लोणी किंवा तूपच तयार होतं. त्यामुळे साय नसेल तर दूध नासतं.
तसंच शुद्ध आनंदाशिवाय शाश्वत समाधान निर्माण होत नाही. ते क्षणभंगुर समाधान माणसाला नेहमी क्षणभंगुर गोष्टी शोधायला लावत.
अश्या क्षणभंगुर गोष्टीसाठी जन्म व्यर्थ घालवण्यापेक्षा एखादी गोष्ट शाश्वत करावी. सगळे कसतात ते सगळ्यानांच येत , एक काहीतरी इतरांपेक्षा वेगळ करण्यातच शाश्वत समाधान असतं.
"तुम्ही जरी साऱ्या गोष्टीचे गुलाम असलात तरी एका गोष्टीचे राजा असावं ".
-------------------------------

कायम रहावी आठवण !
आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात अनेक माणसं येतात. जरुरीचं नसतं ती सारीचं मनात जागा घेतात.
पण त्यातली काही अचूक स्वतःच अस्तित्व कोरतात. अश्या माणसांशी जोडावं मन... अन् मनात तुमच्या त्यांची कायम रहावी आठवण.
जन्माला आलेला प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपडणार, वेळ आली की मरणार. जन्म - मृत्यू शाश्वत सत्य आहे ते देव ही नाही खोडणारं.
अश्या या प्रवासात जोडावा प्रत्येक क्षण.. अन् तुमच्या आयुष्यात त्यांची कायम रहावी आठवण.
-------------------------------

आवडत नाही माझ्या पावलांनां अडखळून पडण्याची भीती, अनेकांची नीती जरी माझी वाट अडवण्याची होती.
मनी नाही माझ्या नसलेल्यांची खंत आता, दुःख करण्यास त्याचे नाही मला उसंत आता.
प्रवास हा आत्मशोधाचा माझा असेल  सदैव निरंतर, जरी वाढले अनपेक्षित विश्वासाच्या नात्यांमधील अंतर.
-------------------------------

मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं. आता म्हणालं तरी असे का करता, समोरच्याच मन का मारता?
खरं सांगू... मला माझा स्वभाव लपवता येत नाही. उगाचच खोटे भाव आणून समोरच्याला फसवता येत नाही.
पण खरंच सागतो मला कळतं जेव्हा माझं वागणं तुम्हाला छळतं.
-------------------------------

कसा गुंतला जीव माझा तुमच्या मनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
जुळले कसे हे नाते आपूले अन् कोणत्या क्षणी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
संगंम हा आपूल्या आयुष्याचा कधी आदर्श जाहला जनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी?
प्रेम लाभले असे मला हा जन्म तुमचा ज्ञ्रुनी, कळेना माझ्या मना जरा सांगेल का कोणी ?
-------------------------------

काय देणार आपण एकमेकाला, जर कामी आलो नाही योग्य क्षणाला.
काय करणार अशा धनाला, जे समाधान देत नाही मनाला.
काय म्हणून मारायचं स्वतःला, जर फरक पडत नसेल त्यानं कोणाला.
काय देतो आपण अशा माणसाला, जे सर्वस्व अर्पण करत आपल्याला.
-------------------------------

धक्का देणारे बरेच असतात, पुढे नेण्यासाठी नाही तर पाडण्यासाठी...
आपण स्वतःला सावरणं जरुरीचं असतं.
भडकवणारे बरेच असतात, जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी...
आपण स्वतःला आवरण जरुरीचं असतं.
शिजवणारे बरेच असतात , वाढण्यासठी नाहीतर नातं मोडण्यासाठी....
आपण न बावरणं जरुरीचं असतं.
मनोगत...

कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.

जर कधी मन खूपच नाराज असेल , आणि स्वतःजवळ कोणीच नसेल.
तेव्हा मनाला संयमाचा आधार द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा...
विचारांची वादळं तर असणारचं , एकटेपणा कधीतरी भासणारचं.
अशावेळी मनाला स्वतःचं भाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
जसे भासते तसे असतेच असे नाही , आपले दुःख सांऱ्यांनां दिसतेच असे नाही.
अशावेळी मनाला क्षणांचा गाव द्यावा.
कधीतरी आठवणींनां वाव द्यावा.
-----------------------

बऱ्याच काळानंतर पाहिले मी तीला काल.
तेव्हा ही तशीच जसं माकडं म्हणतं "माझीच लाल."
मी म्हटलं" दिसत नाहीस हल्ली.
"म्हणाली" अजून सोडली नाही गल्ली".
मी म्हटलं मला तर म्हणाली होतीस मुलांची लाईन लावीन, तेव्हा मला वाटलं शिस्त प्रमुख होशील.
वाटलं नव्हतं अशी वाया जाशील. म्हणाली.."वाया गेलयं माझ खेटर.. माझा नवा छावा आहे चायनीज हाँटेलात वेटर.
मी म्हटलं.... मस्त! तुझ्या मोठ्या स्वप्नांनां आणखीन काय असेल बेटर.
मी म्हटलं अगं आता तरी सुधर, आवर जरा पदर.
"म्हणाली" पदर तर पडणारच रे, वाऱ्यावार उडणारचं रे.
"मी म्हटलं" अगं अशी किती दिवस वाऱ्यावर ठेवणार.
"म्हणाली" अजून मी तरूण आहे, सारं काही भरून आहे.
मी म्हटलं ठीक , वेळ आल्यावर शिक.
जे इतरांची ठेवत नाहीत इज्जत,  त्यांची अशीच राहणार भाजत.
मग भाजल्यावर झाले जरी कडक हाल, तरी माकड म्हणणार माझीच लाल.
-----------------------

शिऱ्याची प्लेट आली की त्यात रवा, काजू, बदाम, मणूके, बेदाणे सगळंच दिसत होतं.आपल्याला ते सगळं आकर्षित करत आणि ते पाहून आपण भारावून जातो.
पण ज्या मुळे तो शिरा गोड लागतो ती साखर आपल्या सहज लक्षात येत नाही कारण ती दिसत नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असतं. दिसत नसलं तरी आपल्यामुळे त्या व्यक्तीला गोडवा आणि पूर्णत्व मिळावं यासाठी आपण सहज विरघळून जातो आणि एकरूप होतो.
आपला जीवन रुपी शिरा देखील असाच असतो. जीवनात त्याला बदाम, काजू, मणुके, बेदाणे अशा रूपात येणारी माणसं सहज दिसतात आणि त्यात आपण भारावून जातो.
पण आपल्यासाठी विरघळलेलं आणि  एकरुप झालेलं साखर रुपी माणूस आपण सहज विसरतो.
-----------------------

झिडकारलं जरी जणानं मला, तरी आधार द्यावा मनानं मला.
दूर केल जरी इतरांनी मला, जवळ ठेवावं माझ्यांनी मला.
तिरस्कारलं जरी परक्यांनी मला, तरी स्वीकारावं माझ्यांनी मला.
झालो जरी कधी अपरिचित या विश्वाला, परिचित असावं मी माझ्या विश्वासाला.
-----------------------

जीवनाचा प्रवास.......
ऐश्वर्य भोगताना आईच्या गर्भात, जेव्हा घेता येत नव्हता स्वतःहून श्वास.
तेव्हापासून सुरू झाला हा प्रवास....
जोपर्यंत जात नाही पुन्हा आईच्या गर्भात तो पर्यंत सुरू राहणार हा जीवनाचा प्रवास.
-----------------------

काय पाहतोस रे मना, जे दिसत नाही कुणा !
का बावरतोस रे मना, तरी कळतं नाही कुणा !
काय मागतोस रे मना, जे देता येत नाही कुणा !
का उदास होतोस रे मना, जर कळत नसेल कुणा !
-----------------------

चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
नेहमीच कोणासाठी तरी किंवा  कशासाठी तरी धावतोय, एकदाच मिळणाऱ्या या जन्मातील अनमोल क्षणांनां गमावतोय. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.......
काय करतोय तर फक्त मनाची ओढातानं, कशासाठी फक्त कोणाची तरी मर्जी राखण्यासाठी अन् मग आपल्या मर्जीचं काय? म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या.........
खरंतर सारे मस्त असतात आपआपल्या जगात, सारे रंग राखलेले आणि त्यात सोयीने माखलेले. आपणच बेरंग वाटतो सगळ्यांना. म्हणूनच म्हटलं...
चला जरा जगून पाहू या, मनासारखं वागून पाहू या..........
-----------------------

काय करायचं जेव्हा सारं काही प्रतिकूल असतं !
असं वागायचं........
जणू जे होतयं ते सारं होणारच आहे , आयुष्य थोडं खाली-वर करणारंच.                                                                 घाबरायंंच नाही, बिनधास्त रहायंच !
असं वागायचं.....
आपली वाटणारी माणसं ही आपली नसतात, रक्ताच्या नात्याची अंग काढून बसतात.
तूटायंच नाही, तटस्थ रहायंच !
असं वागायचं..........
आपण परिपूर्ण  प्रयत्न करतोय , जिंकायचंच आहे असा निर्धार मनी धरतोय तरीही हरतोय.
पडायंच नाही, फक्त लढायंच !
असं वागायचं........
-----------------------

सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त आकर्षण ! मनं जुळण्याचा एकही क्षण नसतो.  तेव्हा प्रेमात ....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त देखावा ! प्रत्यक्षात काहीच हवा नसते. अशा मैञीत .......
सगळं काही वाऱ्यावर असतं.
फक्त विरंगुळा ! एकमेकांबाबत जराही लळा नसतो. अश्या नात्यात.....
सगळं काही वाऱ्यावर असतं.
-----------------------

धन्य मम हा जन्म जाहला, या जन्मी मज तुम्ही लाभला.
एकमाञ हा जन्म जाहला, अस्तित्व मार्ग या मनी कोरला.
येथेच मज हो देव भावला, तुमच्या सहवासात पावला.
अधिक नको आता काही मजला, अतुट असावा मनबंध आपला.
-----------------------

माझं मनोगत जेव्हा काही गोष्टी मांडत असतं,
तेव्हा ते प्रत्यक्षात त्या गोष्टी विरूद्ध भांडत असतं.
माझं मनोगत म्हणजे कोणाच्या विरोधात जाण्याचं तंञ नसतं,
कारण प्रत्येकाला मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य असतं.
म्हणूनच मला ही माझं विचार स्वातंत्र्य वापरून वागायला आवडतं,
अन् ... कोणालाही खटकलं तरी जे खरं ते सांगायला आवडतं.
मनोगतातलं कोणी काय घ्यायचं आणि टाळायचं हा ज्याचं त्यानं ठरवायचं असतं,
मला फक्त माझ्या मनाला प्रत्यक्ष  मांडायचं असतं.

मनोगत...

असं वाटतयं सारं मृगजळ आहे...!

आपण निर्मळ वागलं तरी संशयाला जास्त बळ आहे, निरागस भावनांना नेहमीच फसवणूकीचे फळ आहे....
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
स्वार्थ येथे पावलांवर आणि एकनिष्ठता मैलावर तरी, निस्वार्थी नात्यांवर अविश्वासाचा मळ आहे...
असं वाटतय  माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
मेंदू म्हणजे खोटेपणाची एकमाञ कळ आहे, मनाचा माञ यामध्ये नेहमीच छळ आहे.
असं वाटतयं माणसाचं नातं म्हणजे एक मृगजळ आहे.
---------------------------

असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आंनंदाचे नाही तर कधीतरी कोणीतरी अलगद सावरलेले क्षणही आठवायचे असतात.
असे क्षणच साठवायचे असतात....
नेहमीच आपण कोणाला हरवले होते हे आठवण्यापेक्षा कधीतरी आपण हरुणही जिंकलो होतो.
असे क्षणच साठवायचे असतात.....
आपण काय कमावले आणि काय गमावले याचाच विचार करण्यापेक्षा कधीतरी आपण कधी आणि कशात  समाधान  मिळवले.
असे क्षणच साठवायचे असतात.....
---------------------------

असं काही तरी करुन जाईन......
नेहमीच जिकंता आलं नाही तरी, तुमच्यासाठी हरुणही जिंकून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
कायम कोणाच्याही आयुष्यात नाही राहिलो तरी , सांऱ्यांच्या आठवणीत उरून जाईन.
असं काही तरी करुन जाईन......
स्वीकारली नाही जरी मी संसाराची जबाबदारी तरी, तुम्हाला जबाबदारी शिकवून जाईन.
असं काही तरी करुन जाईन.......
शरीराने जरी राहिलो जवळ तुमच्या तरी , मनाने निरंतर तुमचाच राहीन.
असं काही तरी करुन जाईन.....
मरण अटळ आहे माहीत आहे मला तरी , दुसरा जन्म तुमच्याच गर्भी घेऊन पुन्हा तुमच्या जवळ हक्काने राहीन.
असं काही तरी करुन जाईन......
---------------------------

मलाही वरवरच वागता येईल, पण तसं केलं तर जगण्यातला अर्थच निघून जाईल.
मलाही अंग काढून व्यवहारीक वागता येईल, पण तसं केलं तर आपल्या नात्यातला आत्मा निघून जाईल.
आत्मा नसल्यास शरीर जसे निरर्थक असते, तसचं नात्यात आत्मियता नसेल तर ते निरर्थक आहे.
---------------------------

माणसानं आपल्या गेलेल्या आयुष्यातील आठवणींनां कधीच कुरवाळत बसू नये, कारण त्या आठवणी असतात.
त्यांची तुलना कधीच वर्तमानातील आयुष्याशी करु नये, कारण प्रत्येक घटना परिस्थितीवर अवलंबून असते.
आपण सद्य परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे जास्त योग्य असते.
आपण परिस्थिती किंवा स्वतःला बदलू शकतो, वेळ बदलता येत नाही कारण ती कायम अरिवर्तनीय असते.
---------------------------

कोणासाठी चांगले तर कोणासाठी वाईट असतो आपण , खरंतर जसे ज्यांचे विचार असतात तसे त्यांना वाटतो आपण.
कोणासाठी छान तर कोणासाठी घान असतो आपण, खरंतर जशी ज्यांची नजर असते तसे त्यांना दिसतो  आपण.
कोणासाठी मनामध्ये तर कोणासाठी जनामध्ये असतो आपण, खरंतर जशी ज्यांची भावना तसे त्याच्यांत असतो आपण.
---------------------------

टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते !
एकञ selfi काढणारे आणि त्यासोबत 'Best friend' 'made for each other' वैगरे बरचं काही लिहणारे, वेळ आली की फक्त selfish च वागतात.....
टीका करत नाही,थोडी चेष्टा वाटते...
जीवनातलं सगळं काही सपलं आहे असे dp वर चिञ आणि status ठेवणारे आणि दयनीय स्थिती दाखवून सात्वनं करुन घेणारे, प्रत्यक्षात मस्त मजा करत असतात..
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते. एकमेकांवर खूप विश्वास आहे आणि रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे असे भासवणारे, पाठ फीरताच निंदेची घंटा वाजवतात.
टीका करत नाही, थोडी चेष्टा वाटते.
---------------------------

बरं झालं .. देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं....
नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
कारण काचेच्या मागच्या भागाला गंधकाचा लेप दिल्यावर आरसा बनतो, तसेच चेहऱ्यावर भावनांचा लेप आल्यावर चेहऱ्याचा आरसा होतो.
म्हणूनच म्हटलं ! बरं झाल ..देवानं चेहऱ्याला आरसा नाही बनवलं. नाहीतर प्रत्येकाला खऱ्या चेहऱ्याने जगणं कठीण झालं असतं.
---------------------------

सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
चारचौघात कमरेत हात, अन् घरच्यांनां कळलं तर सापाची कात.सरळ सांगायला चोरी असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
औकात काडीची आणि वार्ता माडीची, आईबापाच्या कमाईवर फुकटचा देखावा असतं.
सूरवातीला कूरकूरीत नंतर चाहात बुडवलेली खारी असतं, पण आजकालाच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
एकमेकांच्या हातावर एकमेकांचं नाव नाहीतर नावाचं अल्फाबेट, बाकी सगळं पिक्चर नाहीतर सिरियलचा सेट असतं.
भाड्याची बाईक अन् मागे तोडांवर स्कार्फ लावून पोरी असं असतं, पण आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी  भारी असतं.
सगळ्यांचे लवर म्हणून आपला पण लवर प्रत्यक्षात मनावर नसतो आवर, खरंतर हा फक्त फँशनचा फीवर असतं.
प्रदर्शन नुसतं असंस्कारी असं टपोरी असतं, आजकालच्या पोरांच प्रेम स्वतःसाठी भारी असतं.
---------------------------

जीवनाचा आनंद आपल्या जीभेच्या दर्जावर अवलंबून असतो.
जीवनाचे समाधान आपल्या मनाच्या गर्भावर अवलंबून असते.
---------------------------

नाती कधीच नैसर्गिक रित्या मरत नाहीत त्यांची  हत्या केली जाते .....
स्वार्थ, अहंम, संशय, अविश्वास, निरर्थक अपेक्षा किंवा दुर्लक्ष अश्या प्रवृत्ती मधून.
---------------------------

असे जगाया शिकव क्षणा... जपून घेण्या माझ्याच्या मना.
चेहऱ्याला या माझ्या आता कृतीत जरा तु आण मना... निरागस जगाया शिकव क्षणा.
---------------------------

तुम्ही तुमच्या समोरची परिस्थिती बदलू शकत नाही....
तुम्ही बदलू शकता फक्त तीला सामोरे जाण्याचा योग्य पर्याय आणि तंत्र.
---------------------------

जेव्हा तुमच्याकडे कोणाचे लक्ष नसेल तेव्हा तुमचे स्वतःवर लक्ष असणे जरूरीचे आहे. कारण इतरांना तुमच्या बाबतीत विचार करायला वेळ नसतो तेव्हा तुम्ही त्यांच्या लक्षात येत नाही.
प्रत्येकाला आपलं लक्ष असतं , म्हणूनच तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवणं जरुरीचं असतं.
---------------------------

हसतानाही दुःखाचे गहीवर आवरता आले पाहीजेत.
खुप काही बोलताना आपले शब्द सावरता आले पाहीजेत.

मनोगत...

आता ठरवलयं...

आता ठरवलयं कोणालाही स्वतःला सहज घेऊ द्यायचे नाही, आणि कोणावरही भरवसा ठेऊन राहायचे नाही.
लायक राहून आपली जागा सांभाळायची आणि प्रत्येकाला त्यांच्या लायकीनूसार जागा घेऊ द्यायची. आपण योग्य आहोत यावर तटस्थ राहून इतरांच्या योग्यतेचा आदर करत राहायचंं.
पहिल्या सारखंच कोणाला आवडलो नाही तरी स्वतःच्या मनासारखंच वागायचं. उद्यापासून पुन्हा सरळ आणि स्पष्ट जगायचं.
-------------------

जर कोणाला काही देण्याची वेळ आली तर आपण त्या व्यक्तीला तेच देऊ शकतो जे आपल्याकडे आहे.
प्रत्येकाला स्वतःजवळ काय आहे फार चांगलं माहीत असतं.
-------------------

उधळावे रंग आपल्या मनातील विचारांचे गुदमरलेलं मन तरी मुक्त होईल.
ओघळु द्यावे अश्रू सारे भावनांचे नात्यातील सारे बंध तरी घट्ट होतील.
--------------------

मला ओळखणाऱ्यानां  माझ्याबद्दल तर्क लावून वागतात आणि  न ओळखणारे सहज स्वीकारतात.
मला ओळखणारे माझ्यावर सहज बोट उगारतात आणि न ओळखणारे माझं बोट धरायला सरसावतात.
अर्थात.... आपली ओळख फक्त विश्वासातील माणसांना करुन द्या कारण साधेपणाचा बुरखा पांघरूण अनेक लोक आपल्या पोळ्या भाजत असतात.
--------------------

काही एकमाञ वस्तूंना बदलण्याचा निरर्थक प्रयत्न करणे जसे चुकीचे आहे.
तसेच काही पाञ व्यक्तींना बदलण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला मूर्ख ठरवण्यासारखे असते.
--------------------

संत मंडळी सांगून गेली, "निंदकाचे घर असावे शेजारी". पण आता अश्या निंदकानां तुम्ही शेजारीच नाही तर समोरी - माघारी तसेच आजूबाजूला ही पाहू शकता.
आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे कारण माणसं त्यांच्या सोयीनेच विचार करतात.
--------------------

मला माणसं तेव्हा फार विशेष वाटतात जेव्हा ती कोणताही मुखवटा सहज घालतात.
त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ती विश्वासातील व्यक्तीला खोटं सांगून त्याला वेडात काढल्याचा आनंद साजरा करतात.
--------------------

पुन्हा एकदा सुरू झाला आज शोध.......
कसला ? माहीत नाही. पण सकाळी उठून समस्त शरीर यंञासारखं काम करु लागेल.
पण या यंञाच्या कार्यातून निर्माण होणारं उत्पादन ज्यांना माहित असेल त्यांना आजच्या मेहनतीचा मोबदला " पैसा " आणि मानधन " समाधान " मिळेलच.
अर्थात... तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये स्वतःला एकरुप करा.
--------------------

माणसानं प्रयत्न करणं थांबवून चमत्काराची वाट पाहणे म्हणजे निष्क्रियता.
समोरच्यांनी आपणास कितीही कमजोर केले तरी तटस्थ प्रयत्न करणे म्हणजे सक्रीयता.
म्हणूनच माणसानं वेळेसारखं वागावं जे सोबत आहेत त्यांच्याबरोबर आनंदानं जगावं.
--------------------

आपण कोण आहोत? यापेक्षा .....
आपण कोणाबरोबर आहोत? आणि का आहोत? आपण कसे आहोत?
या प्रश्नांची उत्तरे शोधा यामध्येच तुम्हांला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
--------------------

आयुष्य म्हटलं की चढ-उतार असणारचं.....एक गोष्ट स्वीकारून चालायचं की दोन्ही मध्ये संयम महत्त्वाचा असणारचं.
--------------------

माणसाला स्वप्न बघण्याची प्रवृती असावी पण ती पूर्ण करताना कोणालाही दुःख देण्याची वृती नसावी.
--------------------

माणसानं सर्व काही नाकारले तरी एक शाश्वत सत्य नेहमी स्वीकारले पाहिजे, ते म्हणजे "कोणी कितीही महान, आदर्श आणि मोठं झालं तरी निदंक आणि विरोधक हे असणारच".

मनोगत...

मी जर झाड असतो तर...

माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती.
माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता.
माझ्या नात्यांच्या फांद्यावर अनेकाच्या इच्छांची फुले-फळे बहरली असती.
माझ्या कर्तव्यदक्ष पानांनी मायेच्या सूर्यप्रकाशात नात्यांच्यां फांद्यानां सांभाळले असते.
निरागस वाऱ्यावर डूलताना माझ्या भावनांच रसायन झाडाच्या प्रत्येक पेशीत पोचलं असतंं.
ज्यांना हे झाड आहे तसं आवडलं असतं त्या सजीवानं हे झाड आपलं म्हणून निवडलं असतं.
------------------------------

कठीण असतं खरेपणानं जगणं..
एखाद्याला दिलेल्या शब्दाला जागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
एखाद्या साठी सहज स्वार्थ त्यागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणतीही अपेक्षा न ठेवता वागणं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
कोणाची निंदा न करता त्याच्या मागनं, कठीण असतं खरेपणानं जगणं.
------------------------------

माझे आजोबा अशिक्षित होते, ते आपला अंगठा स्वाक्षरी म्हणून वापरायचे.
माझे वडील शिकले होते, ते आपली स्वाक्षरी कागदपञावर करायचे.
मी माझ्या आँफीसमध्ये आत जाण्यास आणि बाहेर येण्यास अंगठ्याचा ठसा वापरतो.
सध्याची पिढी मोबाईल वर काम करायला अंगठा वापरतेय.
कळत नाही प्रगती कशाला म्हणायचे?
------------------------------

फक्त एक करा...
खुप नाराज आहात तुम्ही वेळेच्या खेळावर , काहीच करु शकत नाही आहात तुम्ही स्वबळावर.
तेव्हा फक्त एक करा.... वेळेचा हात घट्ट धरा.
प्रयत्न तुम्ही अथक करताय , विश्वासाला मनाशी धरताय पण धेय्य साध्य होत नाही.
तेव्हा फक्त एक करा.... विश्वासाचा हात घट्ट धरा.
तुमच्या अपेक्षा स्वाभाविक आहे अगदी साधारण परंतु मनाची नेहमीच उपेक्षा होते.
तेव्हा फक्त एक करा.... मनाचा हात घट्ट धरा.
------------------------------

अन् नातं जडतं ...
एखादं  माणूस आपल्या भावनांना अलगद सांभाळू लागतं..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसात कधीतरी मन अलगत गुंतलं जात..... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं डोळ्यांना कळत-नकळत वेड लागतं... अन् नातं जडतं.
एखाद्या वळणावर एखादं माणूस आपली काळजी घेऊ लागतं.... अन् नातं जडतं.
एखाद्या माणसाचं हसणं म्हणजे आपलं असणं होऊन जातं... अन् नातं जडतं.
आपला श्वास एखाद्या माणसाच्या असण्यासाठी आतूर होतो... अन् नातं जडतं.
एखाद्याच्या प्रेमळ सावलीत आयुष्य सहज सुखावतं.... अन् नातं जडतं.
------------------------------

समाजरूपी पोत्यातून एकदा बाल-युवारूपी धान्य निवडायला घेतले.
अर्थात... धान्य निसर्ग नियमानुसार मातेच्या उदरातूनचं आकारलं होतं. फरक एवढाच की, या धान्यांला अडचणींच्या पाऊस-वाऱ्यानं कोवळेपणातचं झोडपलं होतं.
तरी माय-बाप शेतकऱ्यांनं धान्य सावरलं आणि जपलं होतं.
तरी अपरिपक्व धान्यालां कसलीही लागण होणं सहज शक्य होतं, कारण पोत्यातलं वातावरण असुरक्षित होतं.
बिचाऱ्या शेतकऱ्यांनं किती जपलं तरी धान्यातं असंस्काररूपी कीड, भुंगे, गार-खडे होणं नैसर्गिक आणि स्वाभाविक होतं.
अस्तित्व मार्ग रुपी सुपात जेव्हा आपूलकीच्या पश्यानं पोत्यातलं धान्य घेतलं. तेव्हा सारं बाहेर आल आतलं.
मोकळ्यावर येता क्षणी कीड भुंगे लागले पळू हळूहळू...इथं आपली नासाडी प्रवृत्ती टिकणार नाही हे लागले त्यानां कळू.
धान्यात लपलेल्या खडे- गारा  निवडल्या अचूक कारण धान्याच्या साजात त्याचं योग्य नव्हतं रूप.
मग काय....बाल-युवा विकास केंद्राच्या खळ्यात धान्याला दिला प्रेमाचा वारा, अलगद वाढला की हो त्याचा तोरा.
वाऱ्यानं धान्यातलं नैराश्य झटकून टाकलं अन् धान्य कला-कौश्यल्यानं माखलं.
या धान्याचं आता बियानं झालयं अन् आता ते नावारूपात आलयं.  नवं धान्य पिकवायला कोणत्याही बिकट परिस्थितीत.
------------------------------

माणसाबाबतीत एक गोष्ट फार विशेष असते , की माणसाची वेळ सरली की त्याला सर्व काही सहज भासते.
खरंतर ... वेळ कधीच सरत नाही, फक्त  माणसाला जाणीव उरत नाही.
माणसानं कितीही पसरावं फक्त जमिनीस ( परिस्थितीस ) कधी न विसरावं.
------------------------------

अहंम नसता तर...
माणसाला माणसाचं महत्त्व सहज कळलं असतं, अहंम नसता तर.....
मनाचं मोठंपण ठेऊन सहज जुळली असती नाती, अहंम नसता तर.....
एखाद्याच्या कर्तुत्वाची राहीली असती सहज जाणीव, अहंम नसता तर.....                                                                 माणूसकीची कधीही झाली नसती उणीव, अहंम नसता तर.....
आपल्या जागेवर एकनिष्ठ राहिली असती माणसं, अहंम नसता तर....
चांगली माणसं ओळखणं फारच कठीण झालं असतं, अहंम नसता तर.
------------------------------

शक्य असते तर फाडून टाकली असती माणसाच्या मनातील संशयाची लक्तरे....देऊन त्यांच्या निरर्थक विचारांना सडेतोड उत्तरे.
पण विचार येतो , अथांग संशयात बरबटलेली ती माणसं ही उत्तरे समजण्यास पाञ असतील का?
नाहीतर... आपलाच बिरबल व्हायचा, उकीरड्यावरील डुकराला राजमहालात आणून , गुलाब पाण्याची अंघोळ घालून मखमलावर झोपवणारा.
कारण शेवटी डूक्कर उकीरड्यावरचं सुखावणार , अन् स्वतःच्या प्रवृत्तीत आपलं मन दुखावणार.
पण मन ऐकत नसतं , सगळं काही हीच अपेक्षा करत असतं.
------------------------------

"विचार"
असाच शातं बसलो होतो. अर्थात विचार करत तेवढ्यातच " विचार " समोर आला आणि म्हणाला, काय ? कोणाबरोबर आहेस !
मी ही उत्तरलो, "मी नेहमीच असतो तुझ्याबरोबर, पण आज पाहतोय प्रत्यक्ष खरोखर ".
मला भेटायला आलास तसा सर्वांना भेटतोस का रे ?
तसा थोडा अस्वस्थ झाला आणि म्हणाला, माझा विचार पडलाय कोणाला ?
मी तर वेळेनूसार सर्वांकडे जातो पण जो तो मला सोयीनेच घेतो.
तरी...माझी जाणीव ठेऊन का रे वागत नाहीत सारे, मनात खोटं ठेऊन का दाखवतात खरे.
मी काही बोलणार, इतक्यात पुढे म्हणाला, "ञास होतो रे मला! जेव्हा माणसं पोसतात माझ्यामध्ये संशयाला.
मी गोंंधळून गेलो त्याची अवस्था पाहून ,मनात अस्वस्थ झालो न राहून.
जवळ येऊन म्हणाला " अरे वेड्या,  गुंतूं नकोस माझ्यात, मी स्वतःला ओवले आहे तुझ्यात.
हसतच पुढे म्हणाला " माझंही मन दाटत, फक्त कोणी मला सहज घेतलंं की वाईट वाटतं ".
"तु कसा वागतोस निःपक्ष, म्हणून आलो तुझ्यासमोर प्रत्यक्ष ".
आज नंतर जर दिसलो नाही कोणाला, तरी माणसं पाहतील तुझ्या कृतीत मला.
दिसेनासा झाला दुसऱ्या क्षणात, पण कायम असतो माझ्या मनात...सर्वाचा.....  " विचार ".
-----------------------------------------------
माणसानं धनानं मोठं व्हावं पण मनानं खोटं होऊ नये.
माणसाकडे आठवणींचे पर्व असावे पण साठवणीचा गर्व असू नये.
माणसाचं नातं अक्षय असावं पण मनात संशय असू नये.

मनोगत...

मी नशीबात असेल...

मी नशीबात असेल तर या भरवस्यावर आणि हातावरील रेषांच्या भविष्यावर कधीच विश्वास ठेवला नाही.
कारण... मी अनेकाचं नशीब फुटलेलं आणि हातावरच्या रेषांना विस्कटलेलं पाहीलं आहे.
माणसानं आपल्या कृत्याचा स्वीकार आणि कर्तव्याची जबाबदारी घ्यावी. असं वागणं म्हणजे माणूसकीला जागणं म्हणता येतं.
नाहीतरं अनेकांना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेऊन नात्याला ठार  करताना आणि स्वतःच्या गळ्यत निर्दोषत्वाचा हार घालताना ही मी पाहिलं आहे.
------------------------------

का बरं माणसं उगाचच नात्यांचा आणि जिव्हाळ्याचा देखावा करतात? काही माणसं एखादं नातं निच्छित स्वार्थ किंवा हेतूने ठेवतात,
तो स्वार्थ किंवा हेतू साध्य झाल्यावर त्या नात्यालाच दोष देतात. का बरं माणसं जाणीव न ठेवता नात्यांचा असा व्यापार करतात.
खरं आहे.... प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असतात, पण त्यासाठी निर्मळ भावनांना का बरं फसवतात.
------------------------------

माणसानं स्वप्नं आकाश भरारी ची ठेवावी, परंतु हे विसरू नये भरारीची सुरूवात आणि शेवट जमिनीवरंच होतो.
अर्ध्या हळकुंंडांने पिवळे होऊ नये, कारण पिवळेपण हा हळदीचा गुण आहे.
आपल्यामध्ये जे अंतर्भूत नाही ते क्षणभंगुर किंवा कालबाह्य आहे हे लक्षात ठेवावे. वस्तूची साठवण करण्यापेक्षा व्यक्तीची आठवण ठेवायला शिका.
------------------------------

काही माणसं क्षणभंगुर रूपाच्या अहमांंत स्वतःला वेगळं समजतात.
काही माणसं परपोषी संशयानं स्वतःला स्वतःला वेगळं करतात.
काही माणसं केवळ निरर्थक हट्टामध्ये स्वतःला आपल्यांपासून वेगळं ठेवातात.
एखादचं माणूस असं असतं जे केवळं मनाला जपण्यासाठी सारं काही त्याग करु शकत.
------------------------------

नातं काळांच.......
काळांच नातं अतुट असतं.
माणसासाठी वर्तमान महत्वाचा असतो, पण माणूस नेहमी भविष्याचाच विचार करत बसतो.
आणि भूतकाळाला विसरून वर्तमानाला गमावत असतो.
भविष्य महत्वाचा नसतो असे  नाही, पण आयुष्य तर वर्तमानावरचं अवलंबून असतं.
माणसाला कळत नसतं, भूतकाळाच्या गर्भातूनच वर्तमानाचा जन्म झालेला असतो.
अन् .... भविष्य साकारण्यासाठी ही  वर्तमानाच महत्त्वाचा असतो.
------------------------------

तेव्हा आपण एकटेच असतो.
जग माणसांनी भरलेल असतं,
अन् नातं गरजे पुरतंच उरलेलं असतं.
जेव्हा आपण कोणाच्या मनात नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
संबंधात फक्त स्वार्थ शोधला जातो,
अन् क्षणभंगुर सुखात आनंद मानला जातो.
जेव्हा आपल्या भावनांना आधार  नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो...
विश्वासातील रागावर ऊगाचच रूसतो,
संशयाच्या प्रेमात सहजच फसतो.
जेव्हा सगळ्यांमध्ये असूनही आपण समाधानी नसतो.
तेव्हा आपण एकटेच असतो....
------------------------------

अहंम आणि आत्मा...
अहंम अर्थात Ego आणि आत्मा अर्थात Soul यामध्ये फरक काय?
अहंम नेहमी शोधत असतो स्वार्थ आणि आत्मा फक्त परमार्थ.
अहंम म्हणजे दिशाहीन असत्य  आणि आत्मा शाश्वत सत्य.
अहंमासाठी जीवन म्हणजे हाव  आणि आत्म्यासाठी निर्मळ भाव.
अहंम म्हणजे मी पणा चा शोध   आणि आत्मा म्हणजे जीवन बोध.
अहंम म्हणजे "मीच" आणि आत्मा म्हणजे "तुम्हीच".
------------------------------

चेहरा...
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा.
------------------------------

जगणं ...
आनंद साजरा करणं म्हणजे जगणंं.
दुःखाला सामोरे जाणं म्हणजे जगणं.
स्वतःच्या डोळ्यातील हास्य इतरांना देणं म्हणजे जगणं.
इतरांच्या डोळ्यांतील अश्रूनां सावरणं म्हणजे जगणं.
एकञ गप्पा-गोष्टी, गाणी गाणं म्हणजे जगणं.
एकटं असलं तरी निसर्गाशी सवांद साधणं म्हणजे जगणं.
जोडलेलं नातं जपणं म्हणजे जगणं.
सोडलेलं गोतं शिपणंं म्हणजे जगणं.
जोडलेले हात आवरणं म्हणजे जगणं.
पकडलेला हात सावरणं म्हणजे जगणं.
पक्ष्यांना उडतानां पाहणं म्हणजे जगणं.
लक्ष्यांनां साध्य करणं म्हणजे जगणं.
तुम्ही माझ्याबरोबर असणं म्हणजे जगणं.
मी तुमच्यामध्ये असणं म्हणजे जगणं.
आपल्यांसाठी मागणं म्हणजे जगणं.
समोरच्याला मान देऊन वागणं म्हणजे जगणं.
मुंगीचे प्रयत्न म्हणजे जगणं.
कासवाची चाल म्हणजे जगणं.
गरूड भरारी म्हणजे जगणं.
मुळाचं मातीशी नातं म्हणजे जगणं.
सूकलेल्या झाडांच्या फांदीवर एखादं पान फुटणं म्हणजे जगणं.
आपल्यांच्या आठवणीत मन दाटनं म्हणजे जगणं.

मनोगत...

माझ्यासोबत कोण आहे...

माझ्यासोबत कोण आहे हा विचार करत राहीलो असतो तर तुम्हा सर्वांना कधीच भेटलो नसतो. मी नेहमी कोणातरी सोबत असावं असा विचार करत असतो.
फक्त ज्या कोणाच्या सोबत असेण त्याला समजलं पाहिजे की तो/ती माझ्यासोबत आहे. यासाठी अधिक काही नाही फक्त " विश्वास " पुरेसा असतो.
-----------------------------

आपल्यासाठी कोणीतरी असावं अशी सगळ्यांनाच वाटत असतं.... आपण कोणासाठी तरी असावं  म्हणजे कोणा एकाची तरी इच्छा पूर्ण होईल.
-----------------------------

जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा तुम्ही केलेल्या चूकानां देखील लोक जोक समजतात. आणि जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा तुमच्या जोक ला देखील तुमची चुक समजली जाते.
-----------------------------

मी जो आणि जसा विचार करतो तो सगळ्यांना पटेल असे नाही...आणि माझा विचार पटलाच पाहिजे असा विचार करणारे पटेल माझ्या सोबत मी ठेवत नाही.
कारण प्रत्येक जण इतरांसाठी नटतो आणि फक्त माझ्यांसाठीच झटतो आणि नटतो.
-----------------------------

स्वतःला अवखळ समजून मी नेहमी निखळ माणसं शोधत असतो. माझ्यासारखेच असतात सर्व हे मला अनुभवाने कळते.
फरक एवढाच मी माझ्यामधील अवखळपणा स्वीकारून  वागतो..मला भेटलेले बहुतांश त्यांचा अवखळपणा लपवून आणि नकारून वागताना दिसतात.
-----------------------------

नाती आणि फ्रीजमाध्ये तयार केलेले बर्फ एक सारखेच असतात....ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.*
दोघांना सांभाळण्यासाठी फक्त एकच उपाय असतो....गारवा कायम ठेवायचा असतो "
-----------------------------

जीवनात काहीही निर्माण करण्याआधी त्या निर्मिती ची जबाबदारी घेण्यास स्वतःला तयार करणे जरुरीचं असतं. पाण्यात उडी मारण्यासाठी पोहायला शिकणं जरुरी असतं.
पोहायचं म्हटलं की पाण्याचा गारवा आणि सर्दी सोसण्याची तयारी हवी.
-----------------------------

कशाच्या शोधात निघालाय यापेक्षा, जे शोधताय ते का शोधताय हे महत्वाचं असतं. सगळेच धावतायत म्हणून धावू नका, मी कशासाठी धावू हा प्रश्न दमछाक होण्याआधी स्वतःला विचारा.
कारण आपण इतरांना दोष देतो पण निर्णय स्वतःचेचं घेतो ना?
-----------------------------

अगणित मानाचे लोक आपल्या आजूबाजूला ठेवण्यापेक्षा , मोजता येतील एवढी मनाची माणसं ठेवा. आयुष्याच्या खडतर प्रवासात तुम्हांला  इच्छापूर्तीची वाट आणि स्वप्न साकारण्याचा मार्ग लाभावा.
-----------------------------

चालताना ठेच लागली म्हणून आपण दगडावर राग काढत बसतो का? नाही! आपण आपल्या लागलेल्या भागाला जपून ठेवतो.
असचं... नात्यात ही करावं. जर आपल्याला कोणी दुखावलं तर त्याला दोष देत रहाण्यापेक्षा स्वतःच्या मनाला सांभाळावं.
-----------------------------

इथं प्रत्येकाला वाटतं की आपलंच म्हणणं बरोबर आहे! हो... अगदी खरं आहे. पण जसं आपण आपण आपल्या जागेवर बरोबर आहोत तसं समोरचा त्याच्या जागेवर बरोबर असेल.
ही साधारण गोष्ट स्वीकारणे माणसं सहज टाळतात..... तरीही मीच बरोबर आहे अश्या भ्रमात वागतात.
-----------------------------

" गणिती चिन्ह जीवनाचं "
आपण बरोबर असणं चूकीचं नसतं. फक्त आपण बरोबर असू तर समोरचा गुणाकार असल्यास आपल्या पेक्षा भारी असू शकतो. मग समजा आपण गुणाकार असल्यास समोरचा घातांकात किंवा वर्गमुळात असेल तरी आपल्यापेक्षा भारी असू शकतो. समजा आपण वर्गमुळ किंवा घातांक असलो आणि समोरचा सरासरी किंवा भाजक असेल तरी तो भारी असू शकतो. अर्थात....आपण बरोबर असणं कधीही छान असलं तरी बाकी राहणं अधिक उत्तम असतं. "बाकी" महत्त्वाची असते कारण जीवनाच्या गणितात सर्वांची ल.सा.वी., म.सा.वी., बेरीज, वजाबाकी, गुणोत्तर  तर होणारच असते.
-----------------------------

वातावरणात मिसळलेला प्राणवायु जसा डोळ्यांना दिसत नाही पण तो श्वासात जानवतो, आपल्याला जीवन देत असतो.
अगदी तसंच मनाच असत मानवी शरीरातील मन दिसत नाही पण ते स्वभावात जानवते, आपणांस जाणीव देत असतं.
-----------------------------

कधी हीशेब करु नये वेळेचा, कारण वेळ कधी काही देत नाही आणि कधी कोणाचं काही घेत नाही.
हीशेब ठेवलाच तर जीवनात जोडलेल्या नात्यांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर आयुष्यातील व्यतीत केलेल्या क्षणांचा ठेवा.
हीशेब ठेवलाच तर एकमेकांच्या सहवासातील आठवणींचा ठेवा.
कोणाला जोडले ?
कसे जोडले ?
कशा साठी जोडले ?
समोरच्याने जोडले का ?
काय मिळवले ?
काय गमावले ?
कारण या सर्वात आपण आपल्याला आणि आपल्यांना शोधू शकतो आणि ओळखू शकतो.

मनोगत...

"मन - मिञ"

जेव्हा आपल्याबरोबर कोणीही नसतं तेव्हा फक्त मन असतं. माणसं झोपेत अचानक बडबडतात, हसतात किंवा दचकून जागी होतात तेव्हा त्यांच्या मनात काहीतरी घडत असतं.
त्यावेळेस मेंदू झोपलेला असतो. शरीराचं अस्तित्व असे पर्यंत मन (आत्मा) आपल्या सोबत असतो ते मृत्यूनंतर नष्ट केल्यावर निघून जातो.
जन्म होण्याआधी ते मृत्यूनंतर आपण जसे आहोत तसे आपल्याला स्विकारणारा आपला एकमेव मिञ "मन".
---------------------------------

एकटेपण
माणसाला एकटेपण आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा येत नाही, तर..जेव्हा तो मनानं एकटा होतो तेव्हा येतं.
माणसाला इतर कोणतीही शक्ती तेव्हाच हरवू शकते जेव्हा त्याला मनाचं एकटेपण येत. म्हणूनच मनाची माणसं जोडून मन सांभाळावं. मनाच महत्त्व साऱ्यांना कळावं म्हणूनच ...
---------------------------------

जो तुमच्या आनंदासाठी हारतो त्याच्या बरोबर तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. ज्याला तुमचे महत्त्व माहीत आहे त्याला तुम्ही कधीच समजू शकत नाही.
हे जग अजब आणि अनोळखी स्वभावाच्या माणसांनी भरलेलं आहे. इथं "गरज" हीच ओळख आहे , ती पूर्ण झाली की पुन्हा सगळं जसं आहे तसं.
---------------------------------

माझ्या सहवासात न राहणाऱ्या  बहुतेकांना असे वाटते की माझ्यात भरपूर चूकीच्या सवयी आहेत....अगदी बरोबर आहे.
पण माझ्यामधील एवढ्या साऱ्या चुका शोधणे ही किती मोठी चुकीची एकच सवय त्याच्यांत असते याचा विचार करूनच मला त्यांची कीव येते.
---------------------------------

जनांसाठी जगण्यापेक्षा माणसांनं मनासाठी जगावं" हेच माझ्या जगण्याचं तत्त्व आहे. जेव्हा माझ्या चेहऱ्यावर माणसं मला ओळखण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मला ओळखणं अवघड असतं...
कारण माझं मन कधीतरीच माझ्या डोळ्यातून वाहतं बाकी माझ्या चेहऱ्यावर माझ्या मेंदूचं राज्य असतं.
---------------------------------

माणसं जेव्हा जाणीवपूर्वक खेळतात, तेव्हा त्याचे खरे अंतरंग कळतात. तशी सगळ्यांची मन कुठं एकमेकांशी जुळतात,
म्हणूनच भावनांना न समजून घेता ती भोळी बनून छळतात. सगळ्यांनाच आधाराचे हात थोडी न मिळतात, आपआपलं वळण आलं की सहज हात सोडून वळतात.
---------------------------------

कोणालाही माहीत नाही आपण कोणासाठी कधीपर्यत असणार , तरी माणसं नाती जोडतात.
पण आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार,अशाप्रकारे जगण्यात कमी पडतात.
जेव्हा मनातले भाव चेहऱ्यावर येऊनही आपल्या एखाद्या माणसाला दिसत नसतील आणि शब्दांत मांडूनही ते त्याला कळत नसतील....
तर ते माणूस आपलं नसतं , कारण त्याला आपलं मन कळत नसतं.
---------------------------------

फक्त सुरूवात पुरेशी नसते , सुरूवात केलेली कृती शाश्वत ठेवणं आणि निरंतर ठेवणं जरुरीचं असतं.
नाहीतर जन्म तर अनेकांना मिळतो तो सार्थकी लावणं आणि आदर्श करून जगणं जरुरीचं असतं.
---------------------------------

यशस्वी आणि समाधानी माणसाची माणसांची जीवन सूत्र - निस्वार्थ प्रेम आणि अतूट विश्वास.
वाचायला सोपी असली तरी कृतीत वापरण्यास फार कठीण असतात. कारण यासाठी संयम असावा लागतो.
---------------------------------

फार कमी माणसं समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास ठेवून नातं जोडतात. त्यानां समोरच्या व्यक्तीबद्दल अविश्वास नसतो असं नसतं...
त्यानां समोरच्या माणसाचं महत्त्व कळत नसतं. खरं तर प्रश्न समोरच्या व्यक्तीच्या महत्वाचा नसतो, तर  स्वतःच्या स्वार्थाचा असतो.
म्हणूनच मन असेल निस्वार्थ, तरचं नात्याला आणि जीवनाला अर्थ.
---------------------------------

कोणाच्याही निस्वार्थ कर्तुत्वावर चिकलफेक करणारे आणि निरर्थक आरोप करणारी माणसं कितीही महान असली तरी त्यांच्या आधीन जाऊन नतमस्तक होणं मला कधीच जमलं नाही.
बेभरवसा माणसांच्या गोळक्यात रहाण्यापेक्षा मला एकटेपण जास्त आवडते.
---------------------------------

आपण खूप काही मिळवू शकतो पण ते मिळवण्यापेक्षा त्यातून आपल्याला समाधान किती मिळाले हे महत्वाचे असते.
कारण आपण बऱ्याच वेळा जे मिळवतो त्याचा आनंद न घेता अधिक मिळवण्यासाठी धावत असतो. जर आनदं घेता येत नसेल तर समाधान कसे मिळेल.
अर्थातच... समाधान हे आनंदात लपलेल सत्व आहे.
---------------------------------

कसली तयारी करत असतं माझं मन? आणि सर्व शारीरिक बळ एकञ येत कशासाठी? का हा येणारा दिवस माझ्यात आतूरता निर्माण करत असतो?
कारण माझ्या सर्वस्वाच्या मानाचा दिवस असतो हा ! माझ्या दुसऱ्या जन्माचा असतो हा!  माझ्या अस्तित्वाच्या मार्गातील सन्मानाचा दिवस असतो हा!
---------------------------------

आयुष्यात कधीतरी....
पटत नसला तुम्हाला माझा स्वभाव आज जरी , अशी वेळ येईलच आठवण येईल तुम्हांला माझी.....
आज आहे अंगात दमक आणि रगांत चमक , खंत नाही तुमच्या मनी माझ्या नसण्याची जरी, असा क्षण येईलच जेव्हा आठवण येईल तुम्हाला माझी....
अविश्वास आणि गैरसमज वाढवतात नात्यातली दरी , तरी गोष्ट एक सांगतो खरी , असं वळण येईलच जिथं आठवण येईल तुम्हांला माझी.....

मनोगत...

आवड ही असावी लागते...

आवड ही असावी लागते. आपण ती कोणा मध्ये निर्माण करु शकत नाही. कारण प्रत्येक माणूस स्वतःच्या आवडीने आणि सवडीने समोरच्याशी वागत असतो.
मला भावनांचा बाजार माःडता आला असता तर मला ही तसं वागता आलं असतं. बर मला भावनांना फसवता येत नाही. तस असतं तर आज मला हे लिहता आलः नसत.
-------------------------------------

आनंद आणि दुःख या माणसाच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत. बघा ना ! आज पर्यंत अनेक आनंद  आणि दुःख देणाऱ्या घटना घडून गेल्या आहेत.
आपण त्या त्या वेळेस फारच भारावून गेले असाल... एकतर दुःखाने किंवा आनंदाने. पण त्यात तुम्हाला कायम राहता आलेले नाही. कारण घटना ही वेळेचा एक छोटासा भाग आहे.
आता मी म्हटले म्हणून कदाचित तुम्ही काही तरी आठवत असाल आनंदाचे किंवा दुःखाचे पण आता ते तुमच्या बरोबर नाही. आहेत फक्त आठवणी.
आठवण हे एकच असं औषध आहे जे पुन्हा त्या घटना आपल्या आयुष्यात आणू शकते. पाळलेल्या प्राण्यांना देखील आठवण ( ओळख ) असते. मग माणसात ती का बरं लोप पावत जात आहे?
-------------------------------------

कोणत्याही विशेष गोष्टीत एकमाञता शोधणे फार सोपे असते. परंतू एखाद्या सामान्य गोष्टीत विशेषता शोधणे फार कठीण असते.
मला सामान्यात विशेषता शोधणे जास्त आवडते.
-------------------------------------

कधीकधी खुप वेळ लागतो काही सत्य गोष्टी स्वीकारायला. मला आज स्वीकारावे लागले की, प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची वेळे कोणाला द्यायचे हे ठरवलेले असते.
जर तो वेळ तुमच्याकडे पाहिजे तेव्हा आला नाही तर ती वेळ  आणि व्यक्ती तुमच्यासाठी नाही. कारण तेव्हा ती व्यक्ती त्याच्या स्वतःच्या आवडीच्या आणि सवडीच्या जगात असते.
-------------------------------------

कधीकधी मला वाटायचं "मी एकटाच" माझं कोणंच नाही. पण काही घटनांनी मला दाखवून दिलं...
एखाद्याची बरीच माणसं  असूनही तो व्यक्ती एकटाच असतो. ती वेळ असते जेव्हा माणूस एका जागेवर पडून निष्क्रिय असतो.
-------------------------------------

माणसाच्या निर्मिती पासून त्याची माती होईपर्यत एकच गोष्ट त्याच्या सोबत असते......
"वेळ". त्यामुळे आपल्या वेळेला म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ज्यानं कोणी सजवले असेल त्याला विसरू नका.
-------------------------------------

मी मस्त दिसतो...मी मस्त लिहतो...मी मस्त नाचतो...मी मस्त हसतो...मी मस्त विचार करतो असं मला कोणी म्हटलंच नाही.
का कळतं नाही...कदाचित् मला विचार करता येत नाही. पण कृती करता येते.
-------------------------------------

नेहमीच वाटते मला... माझे विचार "मस्त" नसले तरी हरकत नाही, पण ते "स्वस्त" कधीच नसावेत.
जशी माझ्यात "लाज" नसेल तर हरकत नाही, पण चूकुनही "माज" नसावा.
-------------------------------------

एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणं कीती छान असतं....
कारण राग-रुसवा , गैरसमज , अविश्वास , दुःख अशा अनेक भाजकांनी भागले तरी प्रेमाची बाकी उरतेच.
-------------------------------------

माणसाच्या सद्य स्थितीवरून त्याच्या भविष्याचे अनुमान लावू नका. कारण वेळ अशी एक शक्ती आहे जी कोळश्यामध्ये हीरा निर्माण करते आणि शिंपल्यामध्ये मोती.
-------------------------------------

मी असाच होतो , असाच आहे आणि असाच असणार.
तुम्हांला हा अभिमान वाटत असेल तर हा माझ्यासाठी आत्मसन्मान आहे. तुम्हाला माज वाटला तरी माझ्यासाठी जगण्यासाठी साज आहे.
तुम्ही माझ्यासाठी असाल की नाही है मला माहीत नाही पण मला तुमच्यासाठी असले पाहीजे तर मला स्वतःला शाश्वत ठेवणे जरूरीचे आहे.
मला कोणीतरी सांभाळावं म्हणून मी कोणालाही सांभाळत नाही तर माझी जबाबदारीची जाणीव सोडून मला जगता येत नाही.
-------------------------------------

त्या दिवशीआँफीसच्या दिशेने चालत होतो होतो तेव्हा माझ्यापासून १०० मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती,  बहुदा रोज नियमाने चालत असणार.
निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन असे वाटले.

मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला त्या माणसाला गाठायला थोडसं चालायचे होते आणि आँफीस कडे उजवीकडे फिरायचे होते व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू याची खात्री मला होती...

थोड्याच वेळात लक्षात आले की दोघांमधील अंतर कमी झाले आहे, मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते. माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती  पाहून..

आणि तो क्षण आला, मी त्याला पार केले, मागे टाकले..!
हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये.. हुर्र्‍ये..
मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलीच आपण स्पर्धा....! स्पर्धा..? याबद्दल त्या व्यक्तिला तर काहीच माहीत नव्हते, तो या स्पर्धेचा भाग ही नव्हता.

मात्र जिंकण्याच्या ओढीने मी माझा रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो, जेथून वळायचे होते ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, परत चालणे वाढणार  होते, अचानक चिडचिड होवू लागली, अस्वस्थता आली. उलट जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता...

असेच होते ना आयुष्यात सुद्धा ? सगळे लक्ष कोण पुढे आहे, कोण पुढे जातो आहे, कोण पुढे जाईल ? याकडेच असते; सहकारी ? शेजारी..? मित्र? नातेवाईक?, यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण  पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.

मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते.
या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे “हे न संपणारे दुष्ट चक्र आहे.” ही नशा आहे, झिंग आहे हे ध्यानात येत नाही.

कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे हे ध्यानात येत नाही. विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व सुख गमावून बसतो.*

कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की; कोणी तरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच; कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणार; कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच; कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच; कोणाजवळ तरी काही तरी वेगळे असणारच...

तेव्हा लक्ष आपल्यावर, आपल्या ध्येयावर केंद्रित करावे, आपली चालण्याची गती आपल्या कालच्या गतीपेक्षा कशी आहे..? हे पाहावे. आहे ते कसे उपभोगता येईल हे पाहावे . आपल्याकडे आहे ते पहिलं जपावं.

मनोगत...

आयुष्य आणि भविष्य ...

या दोन्हीनां बदलण्यासाठी लढावं लागतं आणि या दोन्हीनां सहज करण्यासाठी समजावं लागतं.
धेय्य निच्छीत असावं आणि प्रयत्न करण्याची प्रवृत्ती असावी मग स्वप्न प्रत्यक्षात येतातंच.
दरी- खोऱ्यातून वाहणारी नदी वाहताना समुद्र आणखी किती दूर आहे हे विचारत बसत नाही.
------------------------------------------

मला कळत नाही माणसं लहरी नुसार का वागतात. आपण ठरवलेल्या संकल्प किंवा घेतलेल्या निर्णयावर तटस्थ का नसतात. लक्षात असलं पाहीजे आपण जेव्हा तटस्थ नसतो तेव्हा आपण स्वतःबद्दल शाशंक असतो. समोरच्यांनी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी आपल्याला स्वतःकडे आत्मविश्वास असला पाहिजे.
------------------------------------------

 मन हे अमृत आहे आणि अ मृत ही आहे. कसेही पाहीले तरी सुंदर आणि योग्य आहे. आपण त्याला कसे पाहतो आणि स्विकारतो ते महत्त्वाचे असते.
------------------------------------------

एकच विचारणार आहे मी बाप्पाला, जर खरोखरच तू प्रसन्न होतोस आपल्या भक्ताला...
तर आजनंतर एक वरदान दे मानवाला आणि मृत्यूआधी रोपट्याचं रूप दे त्याला. खरोखरचं मनाचं आणि जीवाचं माणूस असेल ज्या कुणाचं,
संगोपन करतील ते त्या रोपट्याचं. अमरत्वच मिळेल त्या जीवाला कारण कधीच मरण नसतं बीजांला.
------------------------------------------

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर...तासभर साथ देणारी माणसं
बस आणि ट्रेन मध्ये पण भेटतात. मनाची माणसं जोडा....
कारण जी मनाची नसतात ती कोणाची नसतात.
माणसं अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
इथं स्वतःची आवड आणि सवड जपणारे जास्त आहेत. आपण माणसं जपावी.
------------------------------------------

जे घडत ते चांगल्यासाठीच ...! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं.
वेळ तिचे कर्तव्य करत असते , तेव्हा तिला चांगले वाईट विचार करता येत नाही.
------------------------------------------

तसा चोर प्रत्येकाच्या स्वभावात असतो.....फरक इतकाच की , काही जणांनी तो इतरांना हसवण्याकरीता ठेवलेला असतो आणि काही जणांनी तो इतरांना फसवण्याकरीता असतो.
------------------------------------------

एक वेळ अशीही येते जेव्हा आपण केवळ जनात नाही तर मनातही एकटे असतो. कधीकधी आजूबाजूला अनेक माणसं असतात पण तरीही आपल्या मनात एकटेच असतो.
आपण एकटे असताना आपल्या एकटेपणाला सहज ओळखणारं माणूस आपलं असतं.
------------------------------------------

शाश्वत सत्य......
आजकाल एखाद्याचं घर बांधून देण्यासाठी कोणाचाही हात पुढे येत नाही.
पंरतू एखाद्याच्या तुटलेल्या घराच्या दगडी/वीटा उचलून नेण्यासाठी कितीतरी जण तयार असतात. " जपलं ते आपलं ".
------------------------------------------

बऱ्याच वेळा मी स्वतः काय आहे ते मला माहीत आहे असे बहुतांश लोकांचा समज असतो. आणि समोरच्या व्यक्तीला तो स्वतः काय आहे याचा समज असतो.
पण त्या दोघांना एकमेकाला समजून घेण्याची प्रवृत्ती असेल तर नातं जुळतं. नाहीतर शहाण्यांची या जगात कमी नाही. आणि कोण स्वतःला काय समजतो याची हमी नाही.

मनोगत....

* आपलीच माणसं *...

आपलीच माणसं किती सहज  अविश्वास दाखवतात.....
जीवापाड जपलेल्या नात्यावर कानोकानी संशय घेतात, समोरच्याला दोष देऊन स्वतः निर्दोष राहतात. आपलीच माणसं.....
आपण सर्वस्व अर्पण करतो, पण आपण जर नकळत चुकलो तरी अंग काढून जातात. आपलीच माणसं......
आपण प्रत्येक क्षणात त्यांना आठवतात, पण ती माञ सोईस्कर नवा चेहरा नटवतात. आपलीच माणसं.....
---------------------------------

नेहमीच ससा बनून जगू नये... कारण उंदीरानांही चरबी येते आपल्याला उगाचच घाबरवण्याची.
नेहमीच माकडासारखं ही वागू नये... कारण इतरांवर अवघड वेळ येते आपल्यातला माणूस ओळखण्याची.
नेहमीच हरणासारखं गरीब होऊ नये..कारण बुद्धीभ्रष्ट लाडंगे वाट पाहत असतात सावजाची.
नेहमीच वाघासारखं वावरु नये... कारण तारांबळ होते आपल्यावर निरागस प्रेम करणाऱ्याची.
---------------------------------

वेडी मनाची......अशी फार थोडी असतात माणसं.
"नाती म्हणजे अनमोल मोती" म्हणून जपणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"वचन म्हणजे भावनांच जतन" म्हणून सांभाळणारी....अशी फार थोडी असतात माणसं.
"आपलं धन म्हणजे आपल्या माणसाचं मन" म्हणणारी.... अशी फार थोडी असतात माणसं.
---------------------------------

जरूरीचे नसतं , की सगळ्यांनी वाचल्यावर आणि काँमेंट दिल्यावरचंं आपल लिहणं योग्य असतं.
कारण प्रत्येकाच्या आवडीचं आणि छंदाच जग वेगवेगळं असतं. असही नसतं की आपलं लिहणं आणि मन सगळ्यांनाच रूचतं.
---------------------------------

प्रत्येक माणूस सोईने वागतं, जेव्हा त्याला आपलं काय कळायला लागतं. आपल काय ठरवणं खूप सोपं असतं कारण त्यात स्वार्था शिवाय आणि कशाच जगच नसतं.
---------------------------------

माणसं प्राण्यांपेक्षा विकसित आहेत. कारण माणसं प्राण्यांना पाळतात त्यांचा उपयोग होतो म्हणून.
बरं झालं प्राणी विकसित नाही झाले... नाहीतर माणसाचं जगणं प्राण्यांपेक्षा वाईट झालं असतं.
---------------------------------

* स्वार्थ *
आपण स्वतःला....स्वार्थापासून वेगळ ठेऊ शकत नाही मग म्हणून आपल्याला इतर कोणालाही दोष देण्यास अधिकार नाही.
इथं प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीनूसार जगण्याची मुभा आहे....म्हणूनच स्वार्थ पदोपदी उभा आहे.
फरक एवढाच की.......
काही स्वार्थ मनासाठी असतात तर काही मेंदूसाठी.
काही स्वार्थ इतरांसाठी असतात तर काही स्वतःसाठी.
काही स्वार्थ समाधानासठी असतात काही अभिमानासाठी.
काही चांगल्यासाठी असतात तर काही कोणाच्या वाईटासाठी.
अर्थात.... स्वार्थ नेहमीच वाईट असतो असं नाही. पण ज्याचा त्याला वाईट आहे की Right आहे हे माहीत असतं.
---------------------------------

शब्दांचे अर्थ बदलतात पण शब्द कधीच बदलत नाहीत.
पाण्याच्या अवस्था बदलतात पण पाणी कधीच बदलत नाही.
माणूस बदलतो वेळ कधीच बदलत नाही.
---------------------------------

जे भाड्याने (रूपये देऊन) आणलेले असते ते आपल्याकडे कायम रहात नाही. ते कायम स्वरूपाचे नसते.
मग त्या वस्तू असोत किंवा व्यक्ती त्या एका काळ मर्यादेपर्यतच आपल्याकडे असू शकतात. कारण आपण त्या मिळवलेल्या नसतात किंवा त्यावर आपला मालकी हक्क नसतो.
परंतु....ज्या वस्तू किंवा व्यक्ती आपण आपल्या कर्तुत्व किंवा मेहनतीने मिळवलेल्या असतात. त्या आपण मानाने ठेऊ शकतो. कारण त्या आपल्याच असतात. कारण जे जपलं तेच आपलं असतं.
---------------------------------

मी शोधत असतो अशी माणसं जी कोणत्याही मुखवट्याशिवाय खऱ्या चेहऱ्याने जगत असतात. ना स्वतः फसण्याची भीती ना कोणाला फसवण्याची इच्छा.
स्वतःच्या स्वच्छ निरागस आणि निखळ भावनांचा बंध समोरच्या माणसाच्या मनाशी घट्ट राहून जगणारी माणसं. तुम्ही म्हणालं काय गरज आहे अशी माणसं शोधायची....
कारण मला सवय आहे जे माझ्याकडे नाही ते इतरांच्या व्यक्तीत्वात शोधून त्यातून समाधान आणि आनंद मिळवण्याची.
सगळेच बोध तपस्येतून होत नाहीत आणि सगळेच शोध होकायंञ आणि सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने लागत नाहीत.
---------------------------------

* अटळ सत्य *
या जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे *आनेवाला पल जानेवाला है* या गाण्यासारखे. जे मनात करावसं ते करायचं आणि जे बोलावं वाटतं ते बोलायचं कारण ते परत करण्याची वेळ येईल की नाही हे निच्छीत नसते. आज जे आपल्याकडे आहे ते आपले आहे, जे काल पर्यंत होतं आणि आज नाही ते आपलं नाहीच... त्या फक्त आठवणी आणि उद्या काय असेल  त्याबद्दल फक्त वेळच ठरवू शकते.
जगताना मनाचा विचार करा कारण जनाचा विचार करताना जगता येत नाही. फक्त जगताना मनात आणि जनात आपलं माणूस सोबत असणं जरूरी असतं.
आपलं कोण आहे प्रत्येकानं आपआपलं ठरवायचं असतं. हे ठरवण्याचं नाव नातं असतं. त्याला नाव नसलं तरी मनात वाव असणं जरूरीचं असतं.
---------------------------------

*Mood..... अर्थात "लहर"*

का वागतात माणसं एवढी rude. जी आणतात नात्यात खोटा mood.
काहीजण करतात एकदमच कहर. आली जर त्यांना चुकून एखादी लहर.
सहजच माणसं होऊन जातात dud. जेव्हा आणतात ती नात्यात mood.
संशयी विचार म्हणजे भयानक जहर. क्षणात संपतात नाती आली जर लहर.
जाणीवपूर्वक म्हणावं ok I should. नात्यांमध्ये कधी आणू नका mood.
---------------------------------

मनाची नाती वेळच जुळवून आणते. जर वेळेने ती जूळवली असतील तर ती जपा.
जर अशी नाती जुळली नसतील तर आजचा दिवस तुम्हाला वेळेने दिला आहे. तुमच्या मनाच नातं जुळावंं आणि तुम्हाला एखादं छान माणूस मिळावं.

मनोगत...

* मेळा भावनांचा *

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय, आठवण काढत नाही हल्ली ?
मी म्हणालो ...अरे नुकताच "संयम" स्विकारलाय.
तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.
आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात भेटतात का ?
मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी.

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.
मीही मग मुद्दाम "गडबडी"च्या गाडीत बसलो आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या आपल्यापेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात. कसं काय सर्व? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं......."सयंम" आणि "विश्वास"हे मिञ आहेत सध्या ह्रदयघरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय..
एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय." आणि "जाणीवेला" सोबत ठेऊन जगतोय.

तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन माझी "इर्षा"करत गेलं दुसर्‍याला भुलवायला.......

तेंव्हापासुन आनंदच आनंद आणि समाधान सर्वत्र अनुभवतोय...
----------------------------------------

* खरं काय असत माहित आहे? *
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.
खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.

बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.

खरं तर सगळे कागद सारखेच…
त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.

आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.
ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.
----------------------------------------

* आठवण *
आज...फार जूनी म्हणजे (१५ वर्षापूर्वीची) फाईल आणि डायरीमधील मधील कागदपत्रे चाळत होतो.
अचानक एक कागदाचा लीफाफा (पाकीट) मिळाले. उघडून पाहीले तर त्यात एक १०० /- रूपयांची नोट मिळाली.
मेंदूवर थोडा जोर दिला तेव्हा आठवले, १९९५ साली मी एक छोटीशी स्वरचीत कवीता मी पेपर मध्ये छापण्यास पाठवली होती त्याचे मानधन म्हणून मला संपादक मंडळाने दिले होते ते शंभर रुपये. पाहून मन भरून आलं...
खरं सांगू स्वतःचा अभिमान वाटला. कारण २० वर्षानंतर ही १००/- रूपयांची नोट तशीच होती, आजच्या १०० /- रूपयांच्या नोटीच्याच  मुल्याची. पण २० वर्षानंतर माझ्यात माणूस म्हणून झालेले बदल १०० पेक्षा जास्त आहेत. तेव्हा एकटाच मनाचा राजा होतो पण आज स्वतःच्या मनाचा राजा असताना १००पेक्षा जास्त माझ्या मनाची जपणारी माणसं जोडली आहेत. वेळेनुसार पैशाचं रूप बदलत नाही त्याचं केवळ तुलनात्मक मूल्य बदलत पण माणसाचं रूप बदलत पण त्याचं मन बदलू नये.
----------------------------------------

* आजपर्यंत.......*
मान्य आहे की,बालवाडीपासून इ.९वी पर्यतचे एकही प्रगती पञक नाही जपून ठेवता आले. पण इ.१०वी पासून M.phil. पर्यंतची सर्व बोर्ड सर्टिफिकेट आणि डीगरी सर्टिफिकेट मी आज २० वर्षानंतर ही जपून ठेवली आहेत. पण आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी इन्टरव्यु पँनल ने फक्त माझ्या बायोडाटा पाहिला (मला १० वी ते M.Phil.या प्रत्येक परीक्षेत किती टक्के मिळालेत हे पाहिले की नाही माहीत नाही) पण मला प्रत्यक्ष कृतीत शिक्षणाचा संदर्भ किती लावता येतो आणि त्या ज्ञानाचा वापर मी कसा करू शकतो याची शहाणीशा (तपासणी) अनेक प्रश्न विचारून केली होती.
अर्थात ... कागदावर असलेल्या ग्रेड /टक्के यापेक्षा माझी कृतीशील विचार प्रवृत्ती जास्त महत्त्वाची ठरली. अगदी आजपर्यंत....
----------------------------------------

बहुतांश माणसं का बरं समाधानी नसतात, कारण एकदम सोपं आहे - जन्माला आल्यानंतर बालकाला लवकरात लवकर बाल अवस्थेतून तरूण अवस्थेत जायचं असतं. याच तारूण्यात जीवनाच्या प्रत्येक क्षणाला अनुभवन्या ऐवजी संपंत्ती जमवण्यात व्यस्थ राहतात. जेव्हा तारूण्य नकळत प्रौढ अवस्थेतून म्हातारपणात घेऊन जातं तेव्हा माणसं परत बालपणाच्या अवस्थेची इच्छा करतात. अर्थात ती पूर्ण होणं शक्य नसतं मग माणसं आपल्या नातवंडासोबत खेळत आपली इच्छा पूर्ण करतात. माणसं जे स्वतः जवळ आहे त्याचा पूर्ण आनंद न घेता आणि त्याचं महत्व न ओळखता पुढे निघून जातात. कालमध्ये आणि उद्यामध्ये जगण्याऐवजी आज आणि आज पेक्षा सध्यस्थितीत जगा आणि मग बघा.
----------------------------------------

काल चा मेसेज वाचून समजले की आयसँक न्युटन ने सांगितलेल्या गुरूत्वाकर्षनाचा तिसरा नियम हा वैश्विक नियम आहे... "प्रत्येक क्रियेला समांतर प्रतिक्रिया असते".
अर्थात आपण बोललो तरच समोरचा बोलतो. पण यालाही अपवाद आहे. कारण या जगात अशीही माणसं आहेत जी समोरच्या व्यक्तीबद्दल कोणताही चूकीचा विचार न करता आणि तर्क न लावता आपल्या परीने संवाद साधत असतात. कारण त्यांचा हेतू अगदी  निस्वार्थी असतो. अशा सर्व माणसांना माझा मनःपूर्वक नमस्कार.

मनोगत......

सत्य नेहमीच सुंदर नसते...

सत्य नेहमीच सुंदर नसते आणि जे सुंदर असते ते सगळेच सत्य  नसते.
सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असेलच असे नाही. पण चांगल्या विचारांचा माणूस सुंदर शकतो.
---------------------------------------

"ज्ञान" हे "पैशा" पेक्षा श्रेष्ठ आहे..
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते. याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते.                                                               पण.... केवळ ज्ञान असून उपयोगाचे नाही.
ते कसे , केव्हा आणि कोणासाठी वापरायचे याचे ही ज्ञान हवे.
---------------------------------------

मनुष्य कितीही गोरा असला, तरी त्याची सावली मात्र काळीच असते,
"मी" श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे. पण,फक्त "मीच" श्रेष्ठ आहे हा अहंकारआहे.
---------------------------------------

मर्यादा ही कशासाठी ठेवायची हे ज्याने त्याने ठरवायचे असते.
कारण माणूस स्वतःला जास्त चांगला ओळखतो.
त्यामुळे आपण जेव्हा इतरांवर मर्यादा घालतो तेव्हा आपली फसगत होणे स्वाभाविक आहे.
इतरांना बदलण्यासाचा निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदला.
---------------------------------------

माणसं  चुकून हरवतात तेव्हा त्यांना शोधनं ठीक असते...
पण माणसं जेव्हा जाणीवपूर्वक हरवतात तेव्हा त्यांना शोधनं निरर्थक असते.
---------------------------------------

दुधापासून दही, ताक, लोणी, तुप हे सर्व तयार होत असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वातून आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं.
---------------------------------------

कधीकधी आपण स्वतःला शहाणे समजून काही बदल आणण्याचा प्रयत्न करतो.
पण म्हणतात ना... तेरड्याचा रंग तीन दिवस. अशी माणसाची प्रवृती झाली आहे.
त्यामुळे निसर्गाकडून बरेच काही शिकता येत. ढग भरून आले याचा अर्थ पाऊस पडतोच असे नाही.
---------------------------------------

डोळे पाण्याने भरून येतात म्हणजे माणूस खरोखर रडतोच असं नाही...
आकाशत ढग भरून येतात म्हणजे पाऊस पडतोच असं नाही...
---------------------------------------

जीवनाच्या कोणत्याही वळणावर निर्णय घेताना मेंदूचा नाही तर मनाची बाजू ऐकून घ्या.
कारण मेंदूतील निर्णय ही मजबूरी असू शकते पण मनातील निर्णय नेहमीच मंजूरी असते.
---------------------------------------

मत्सराने तिरस्काराने भरलेला तुमचा हितशत्रु देखील काय करेल तर... जास्तीतजास्त तुमची संपत्ती हिरावु शकेल..
पण तुमचं ज्ञान, अनुभव, एकनिष्ठता, जाणीव, वेळ या गोष्टी तो कसा हिरावून घेईल.
पण तुम्ही जर मत्सराने तिरस्काराने आतुन जळत रहाल तर ते तुम्हालाच आतुन पोखरत राहील..
त्यामुळे कोणाचाही मत्सर वा तिरस्कार करु नका.. समाधानी रहायला शिका.आपोआप सुखी व्हाल.
वेळ प्रत्येकाला तेच देते जे तो इतरांसाठी चिंततो. इतरांसाठी किंबहुना सर्वांसाठीच सुख समाधान मागा. तुम्हालाही सुख समाधान लाभेल.
-------------------------------------
मनातले सुविचार...

* आपण... कोणासाठी?, का?, कसं ?, कधीपर्यत?, कशासाठी ?, असायचं हे प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीने ठरवतो.

* दगड न होता दगडातील काही चांगले गुण घेऊन स्वतःच्या जीवनाचे सुंदर शिल्प घडविताना दुःखाचे ठोके सहन करण्याची शक्ती आणि संयम  सुखाचे मूर्तीरूप धारण करता येते.

* जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तडजोड करायला शिका. कारण तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात असते.

* चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य,एकनिष्ठता आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.

* पूर्ण वेडंपण किंवा पूर्ण शहाणपण असलेलं माणूस ञासदायक असतं. पण अर्धवेडं किंवा अर्धशहाण फारच धोकादायक असतं.

* आज ढळलेला सूर्य उद्या पून्हा उगवणार... नवीन दिवसासाठी नवीन तेज तो राञीच्या अंधारातचं जमवणार...

* माणूस हा भूतलावरील एकमेव प्राणी आहे जो स्वतःच्या सोयीचे सुंदर नियोजन करतो आणि भूतकाळ सहज विसरतो.

* माणसाच्या आयुष्याची सुरवात स्वतःच्या रडण्याने होते आणि आयुष्याचा शेवट इतरांच्या रडण्याने होतो.

मनोगत..